(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुंबईतील बसचा प्रवास

    मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो...

    बसमध्ये सीटवर बसलेला बस आपल्या बापाची समजतो ...

    सारखेच पैसे देऊनही एक आरामात आणि

    दुसरा धक्के बुक्के किव्हा प्रसंगी शिव्याही खात असतो ...

    कंडक्टर सारखा आगे बढो म्हणत असतो

    शेवटी उतरणाराही दरवाज्यात पोहचत असतो...

    मुंबईतील बसचा प्रवासी बऱ्याचदा चुकून

    झालेल्या चुकीचाच दंड भरत असतो...

    त्या चुका करण्यालाही कधी - कधी

    त्याचा नाइलाज कारणीभूत असतो...

    बस मध्ये पुरुषाला स्त्रीचा धक्का

    लागला तर तो माफ असतो...

    पण पुरुषाचा चुकूनही स्त्रीला लागला

    तरी तो नालायक ठरतो...

    बसमध्ये राखीव जागा मिळविण्यासाठी

    जो तो धडपडत असतो ...

    त्या धडपडीचा त्रासही विनाकारण निमूट उभ्याने

    प्रवास करणाऱ्यांनाच सहन करावा लागतो...

    म्हणूनच म्हणतो मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो ...

    याच बसमध्ये कित्येकदा नवीन भांडणाचा ,

    भानगडीचा आणि प्रसंगी प्रेमप्रकरणाचा जन्म होतो ...

    माझ्या सारखा चुकून एकादा लेखकही या बस मुळेच घडतो ...

    जो या बसमध्येच कित्येक कावितांसह

    कथाही जन्माला घालतो ...

    - निलेश बामणे

     

      October 26, 2013


  • आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

    आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.

    काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्ट देवून ?. आणि कित्येक भक्तगण असे आहेत की जे त्या पंढरपूरची वारी दर वर्षी न चुकता करतात. हे केवळ मानसिक समाघान आहे कां ? कां ह्याला अंधश्रद्धा म्हणतां येईल ? विठोबा कोण ?, परमेश्वर कोण ? भक्ती म्हणजे काय ?, कशाने काय प्राप्त होते ?, असे एक नाही असंख्य प्रश्न आज तागायत अनुत्तरीत राहीलेले आहेत. ज्याला जसे ज्ञान प्राप्त झाले, जसे वातावरण मिळाले, त्या परिस्थितीप्रमाणे तो प्रश्नांची उकल करीत गेला. अनेक विचार, परंतु एक वाक्यता केंव्हांच झाली नाही. विज्ञानाच्या शोध बुद्धिने इंद्रियांना जे कळले, काहींनी त्याला महत्व दिले. कल्पनेच्या विचारांच्या झेपेमुळे सत्य काय असू शकेल. त्या अज्ञात शक्तींच्या अस्तित्वाला कांहीनी महत्व दिले. गम्मत म्हणजे ज्याचा शोध घेणे, ह्यात प्रगती करण्यापेक्षा, तथाकथीत विचरवंतच आपसांत संघर्ष करताना दिसतात.

    माझ्या समोर आज तरी एक प्रश्न आला. जो मी वर व्यक्त केला. कां इतक्या प्रचंड संखेने लोक पंढरपूरला यात्रेसाठी जमा होतात ? पंढरपूरलाच नव्हे तर कोणत्याही घार्मिक स्थळ यात्रेला, कुंभमेळाला लोक भक्तीभावाने जमतात. पन्नास, शंभर लोक संख्या असेल तर कदाचित अंधश्रद्धा हे नाव देवून स्वतःचे भावनिक सांतवन केलेही असते. परंतु जेंव्हा संख्या लाखोच्या घरांत जाते, तेंव्हा आश्चर्य व कौतूक पण वाटू लागते. कित्येक उच्च शिक्षित, वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणारे, विद्वान मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसतात. कांही तरी या मध्ये सत्य असेल, प्रेरणा असेल, जी इतक्या समुदायाला खेचून घेते.

    पुंडलीक आणि विठ्ठोबाची जी घटना घडली, त्याचा मी गांभिर्याने विचार करु लागलो. निसर्गाचा सहभाग आणि मानवी योजना ह्यांत काय असतील ह्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. सारे कांही घडत असते ते निसर्गाच्या नियमाना धरुनच.

    निसर्गाच्या तीन गुणधर्म वा नियममांचा मी विचार केला.

    १ निसर्ग सदा सर्वकाळ निश्चीत व सत्य स्वरुपांत असतो. ( Nature is always regular and definite )

    २ निसर्गाचा मार्ग नेहमी चक्रमय ठरलेला असतो. म्हणूनच आपण जीवनाला जीवन चक्र म्हणतो. चक्र याचा अर्थ नैसर्गिक अविष्कार वा घटना घडतात, व त्याची पुनरावृत्ती होत राहते. जे घडले ते पुन्हा घडणे ही किमया ह्या निसर्ग चक्रामुळेच साधली जाते. ( Nature repeats itself )

    3 अत्यंत महत्वाचा गुणधर्म निसर्गांत दिसून येतो, तो म्हणजे नैसर्गिक चमत्कार .

    Miracle by Nature

    काय अर्थ याचा ? केव्हां केव्हां निसर्ग- चाकोरीमध्ये अशी एखादी घटना घडते की त्याचा शोध बोध कदाचित् त्या झालेल्या क्षणी होत नसतो. सामान्यजन त्या घटनेला आश्चर्य समजतात. चमत्कार समजतात. दिव्यता भव्यता समजतात. परमेश्वराची अमर्याद शक्तीच हे करु शकते हे ठरवितात. थोडक्यांत चमत्कार आणि नमस्कार हे समिकरण जन्माला येवूं लागते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निश्चीतता येवू लागते. इत्यादी इत्यादी. परंतु एक मात्र सत्य दिसून येते, ते म्हणजे निसर्ग एखाद्या घटनेमधून चमत्काराचे दर्शन घडवित असतो.

    पौरानीक कथांचे ग्रंथ वाचताना भक्त पुंडलीकाची कथा वाचीत होतो. पुंडलीक एक महान व्यक्तीमत्व. एका प्रेरणेने भारुन गेलेले. आपल्या जन्मदात्या आई-वडीलाना आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणारा. त्यांची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव समजणारा. ईश्वरी अस्तीत्वाला देखील त्याने माता पित्याच्या समोर दुय्यम स्थान दिले होते. कित्येक वर्षे त्याची माता पिता सेवा चालू होती. जीवनातील सर्वस्व त्यागुन फक्त आईवडील सेवा हे वृत त्याने धारण केले होते. त्याचे हे श्रम व प्रेम एवढे महान होऊ तागले की ते ईश्वरी दरबारांत मान्यता प्राप्त होऊ लागले.

    ईश्वर नेहमी चांगल्या गुणांची सदैव दखल घेत असतो. हा अध्यात्मिक इतिहास आहे. सती सावित्रीची पतीभक्ती व सेवा ह्यानी देखील ईश्वराला झुकावेंच लागले. पुंडलीकाने केवळ माता-पिता सेवा-भक्ती केली. हेच त्यांचे सामर्थ्य परमेश्वराच्या प्रसन्नतेत झाले.

    पुंडलीकाची माता पिता सेवाभक्ती यानी प्रेरीत होऊन, परमेश्वराने त्याला श्री विठ्ठलाच्या रुपांत दर्शन देऊन धन्य केले. पुंडलीकाचे ह्रदय मन भरुन आले. त्याने सविनय नमस्कार केला.परंतु हाच त्याच्या भक्तीच्या कसोटीचा क्षण होता. ज्या क्षणी पांडूरंगाने पुंडलीकास दर्शन दिले, त्यावेळी पंढरपूर नजीक चंद्रभागेच्यातीरी, त्याचे आईवडील त्याच्या मांडीचा आसरा घेत झोपले होते. समोर उभा प्रत्यक्ष परमेश्वर श्री विठ्ठल आणि मांडीवर निद्रेत आईवडील. तो त्यांची झोप मोडू शकत नव्हता. शेवटी पुंडलीकाने विठ्ठलाला नमस्कार करीत, जवळ असलेली एक विट त्याच्या पुढ्यांत टाकली. त्याला त्यावर उभे राह्यण्याची विनंती केली. आईवडीलांची झोप चाळवली गेली. ते जागे झाले. त्याना ईश्वरी दर्शन होणे शक्यच नव्हते. कारण त्यांच्यात ते दिव्य सामर्थ्य नव्हते. त्यानी जाग येताच स्नानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुंडलीकाने त्यांना मान देवून, तो त्यांना चंद्रभागेतीरी घेऊन गेला. जाताना त्या परमात्म्याला श्री विठ्ठलाला विनंती केली की त्याने त्याच विटेवर उभे राहून पुंडलीक येण्याची वाट बघावी. तो आईवडीलांना स्नान घालून परत येईल. आजतागायत आठ्ठाविस युगे झालेली आहेत. श्री विठ्ठल आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याच महान आईबाप सेवक भक्ताची, पुंडलीकाची वाट बघत आहे. त्याच्या वाटेवर लागलेले विठ्ठलाचे डोळे आजही आम्ही बघून, ईश्वर दर्शनाचा आनंद लुटतो. लाखो लाखोच्या संखेने तेथे जमा होतो.

    निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम आणि पुंडलीक-विठ्ठलाची पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ? हा विचार डोकाऊ लागला. एक चमत्कार झाला. एक आश्चर्य सर्वानी बघीतले, जाणले, अनुभवले. ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती. ती फक्त पुंडलीकातच होती. तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता. परंतु त्या वेळच्या, त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल. एक प्रकाश, एक शितल आल्हादकारक वातावरण, बेहोष करणारा दरवळणारा सुगंध, एक उत्साहाची चैतन्याची लाट, समाधान शांतता यांच्या लहरी, हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक, नितांत आनंद म्हणून झाले असेल. ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही. अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी. हा अनुभव कल्पनातीत व अप्रतीम असावा. पुंडलीकाने तो बघीतला, भोगला. इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद, संपर्क, हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा. जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते. क्षण शांत झाला, परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना.

    कालचक्राप्रमाणे वर्ष सरता, पुन्हा लोक त्याच ठिकाणी, त्याच वेळी जमा झाले. चाचपडत राहीले. शोध घेत राहीले. कारण जर तो आनंद चेतनामय चमत्कारी, विलक्षण अनुभवी क्षण नैसर्गिक असेल, तर निसर्ग चक्रानुसार तो पुन्हा बरसेल. पुन्हा मिळेल. ह्या आशेत. त्याच जागी त्याच वेळी जो पुंडलीकावर बरसला. तसा कदाचित् पुन्हा बरसेल. प्रत्येकजण त्या नितांत आनंदाचा Ecstasy of Joy चा एक साक्षिदार, भागीदार, होऊ इच्छितो. त्याच्या दयेचा एखादा शिंतोडा कदाचित् आपल्याही अंगावर पडेल ह्या अपेक्षेने. त्याच भावनेने लाखोंच्या संखेने जमतात. त्याच स्थळी म्हणजे पंढरपूरला त्याच वेळी म्हणजे आषाढी एकादशीला, ज्या काळी पुंडलिकाला विठ्ठोबानी दर्शन दिले असेल. सर्व भक्त शोध बोध घेत असतात.

    निसर्गाच्या नियमित, चक्रमय, आणि पुनुरावृत्ती ह्या गुणधर्मच्या शोधांत. आम्ही सर्वजण तेथे जमतो. तो निश्चीत बरसेल आणि तो बरसतो देखील. जो तो आपले नशिब आजमावतो. कुणावर तो बरसला असेल हे समजण्यास आजतरी मार्ग वा साधन नाहीत. हेच त्या स्थळाचे ( पंढरपूर ) व वेळेचे ( आषाढी एकादशी ) महात्म्य असेल कां ? अशाच अनेक धार्मिक यात्रांच्या, कुंभमेळाच्या मागे दडलेली कारणमिमांसा व नैसर्गिक चक्ररचना कारणीभूत असू शकेल कां ?

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      June 5, 2016


  • जादू की झप्पी

    टीव्हीवर एकामागून एक चॅनलची सुरू असलेली ढकलगाडी एकदम मुन्नाभाई एम बी बी एस वर येऊन थांबली .. त्यात “जादू की झप्पी” चा प्रसंग सूरु होता . यानी त्या शाळेच्या पुस्तकातून नजर वर करत टीव्हीकडे बघितलं आणि गालातल्या गालात थोडा हसला . बायकोनी हेरलं ते .

      February 4, 2026


  • भारत बंद (वात्रटिका)

    आणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला नक्की भेट द्या

    -- सूर्यकांत डोळसे

      July 6, 2010


  • अमेरिकन गाठुडं – ४

    येथे गरीब असो श्रीमंत असो कार आवश्यक आहे. ‘कार’ हि येथे, रोटी-कपडा-और मकान इतकीच गरजेची आहे. त्याला करणेही आहेत. विरळ आणि विखुरलेली रहिवाशी वस्त्या. दूर अंतरावरील गरजेच्या वस्तूंचे आउटलेटस, सार्वजनिक वाहतूक खूप अविकसित, त्यामुळे तिच्यावर अवलुबुन रहाणे अशक्य. स्वस्त कार्स, आणि त्या साठी सहज, कमी दरावरील कर्ज, उत्तम रस्ते, त्यामुळे चारचाकी वाहन गरजेचे झाले असावे.

      November 18, 2020


  • बेबी सोनिया

    नायिका म्हणून तिचा पहिला चित्रपट होता, ‘रिक्शावाला’ तो काही फारसा चालला नाही. ‘यादों की बारात’ या मल्टीस्टार चित्रपटात तिच्यावर ‘लेकर हम दिवाना दिल.’ हे गाणं चित्रीत केले गेले. या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली व चित्रपट निर्मात्यांची तिच्यासाठी रांग लागली.

      June 22, 2022


  • जीवनाचा मूलमंत्र

    गावाबाहेर नदीच्या काठावर एका झोपडीत एक सत्पुरुष राहात होते. ही झोपडी त्यांनी स्वतःच बांधली होती. नदीच्या काठावरच शंकराचे देऊळ होते. तेथे दर्शनासाठी बरेच लोक येत. सर्व लोक निघून गेल्यावर हे सत्पुरुष त्या मंदिरात जायचे व त्या मंदिराची स्वच्छता करायचे. त्यांचा हा दिनक्रमच होता. काही लोक त्यांच्या दर्शनाला यायचे मात्र ते सत्पुरुष कोणाकडे काही मागायचे नाहीत वा कोणी दिले तरी ते घ्यायचेही नाहीत. स्वतः कष्ट करून पोटासाठी लागेल तेवढीच ते कमाई करायचे. एकदा त्यांच्याकडे एक तरुण आला व त्यांना म्हणाला की, मी आतापर्यंत जे जे केले त्यात मला अपयश आले. त्यामुळे नैराश्य आले असून, मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ जाताना तुमच्यासारख्या सत्पुरुषाला भेटावे म्हणून आलो आहे. त्या सत्पुरुषाने त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली व त्याला आपल्या झोपडीत नेले. ते त्याला म्हणाले की, तुझा निर्णयच झाला असेल तर तू अवश्य आत्महत्या कर. फक्त आता मला भूक लागली आहे. मी जे काही करेन ते तूही खा व नंतर तू तुझ्या मनाप्रमाणे वागू शकतोस. असे म्हणून त्या सत्पुरुषाने घरात जे काही किरकोळ सामान होते, त्याचा उपयोग करून गव्हाची छान खीर केली. ती खीर शिजताना तिचा सुवास दरवळत होता. त्यामुळे तो तरुण सुखावला होता. खीर तयार झाल्यानंतर त्या सत्पुरुषाने खिरीचे भांडे त्या तरुणाच्या हातात देत म्हटले हे बाहेर घेऊन जा व तेथे बाहेर उकीरड्यावर फेकून दे. सत्पुरुषाचे हे बोलणे ऐकून त्या तरुणाला फारच आश्चर्य वाटले. तो म्हणाला एवढी चांगली सुंदर खीर तुम्ही बनवलेली व ती न खाता बाहेर उकीरड्यावर फेकून द्यायला सांगता. त्यावर सत्पुरुष त्याला म्हणाले की, तू जे काही करतोस तेच मीही करतो आहे. तुझे जीवन या खिरीसारखेच छान व सुंदर आहे. परंतु, तू आत्महत्या करून ते नष्ट करीत आहेस. त्या तरुणाला सत्पुरुषाच्या उपदेशातील मर्म कळले व आत्महत्येचा विचार सोडून तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून गेला.

      December 30, 2017


  • इमारतींचं सौंदर्य

    अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात आली आणि ते दृश्य पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. बागेतल्याच एका बाकावर बसून मी त्या इमारतीचं सौंदर्य शांतपणे न्याहाळू लागलो. बागेच्या समोरच्याच फुटपाथवर पाचसहा इमारतींचीं रांग दिसत होती. रांगेतल्या प्रत्येक इमारतीचं सौंदर्य खरोखरोच अप्रतिम होतं. युरोपियन पठडीतल्या बैठया घरांच्या शैलीतल्या त्या इमारतींमध्ये साम्य बरंच होतं आणि स्वतःचं खास वैशिष्टयही. प्रत्येक इमारत वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात सजली होती. एका इमारतीची रंगसंगती नजर खिळवत होती तर दुसरीचं नक्षीकाम मनाला भूरळ पाडीत होतं. नंतर एका ब्रोशरमध्ये त्या इमारतींचा फोटोही मी पाहिला व मोस्ट फोटोग्राफ्ड बिल्डिंग्ज असं त्यांचं वर्णनही मी वाचलं. माझ्या स्वतःच्या कॅमेऱ्यात मी त्या इमारतींचं सौंदर्य टीपलंच होतं. साहजिकच त्यांचं ते अचूक वर्णन मनोमन पटलं. त्या इमारतीत राहणाऱ्या भाग्यवान रहिवाशांचा मला खरोखरीच हेवा वाटला.

    अमेरिका म्हणजे गगनचुंबी इमारती असं समीकरण आपल्या मनात रुजलेलं असतं. प्रत्यक्षात अमेरिकेत गगनचुंबी इमारती केवळ शहरातील एखाद्या भागातच सिमित असतात. बाकी राहत्या वस्तीतली घरं ही बैठी, जुन्या पठडीतली. सुरुवातीला हे वास्तव स्वीकारणं आपल्याला कठीण जातं मात्र बैठया टुमदार घरांचं सौंदर्य नजरेत भिनलं की गगनचुंबी इमारतींच्या बाजाराचं अप्रूप रहात नाही. एकमेकींशी स्पर्धा करणाऱ्या गगनचुंबी इमारतींची स्काय लाईन मात्र आपल्याला थक्क करुन जाते. शहराचं, देशाचं वैभव, सुबत्ता अशा स्काय लाईनमुळे अधोरेखित होते. संध्याकाळी अशा इमारती दिव्यांच्या रोषणाईने सजल्या की त्यांना कॅमेऱ्यात टिपणं अनिवार्य होऊन जातं.

    इमारतींचं सौंदर्य टीपणं हा एक छंद आहे. हा छंद जडला की नजरेसमोर येणारी प्रत्येक इमारत आपण बारकाईने न्याहाळू लागतो. त्यानंतर आपल्या मनात नकळत इमारतींचं वर्गीकरण सुरु होतं. कुठली इमारत सामान्य आहे, कुठली इमारत केवळ राहण्याच्या दृष्टीने ठीक आहे आणि कुठली इमारत खरोखरच देखणी आहे अशी विभागणी करण्यात वेळ मजेत निघून जातो. देखणी इमारत समोर आली की त्या इमारतीच्या रचनाकाराविषयी मनात आदराची भावना दाटून येते. इमारत उभी करण्याचं काम उरकताना त्या रचनाकाराने कलात्मक दर्जा गाठलेला असतो. अशा इमारती मग आपल्या कायम स्मरणात राहतात. रस्त्यातून जात असताना -आता ती इमारत येईल- हे आपल्याला आधीच जाणवतं. ती विशिष्ट इमारत समोर आली की भान हरपून आपण पुन्हा त्या इमारतीचा रुबाब न्याहाळू लागतो. अमुक रस्ता म्हणजे अमुक इमारत ही खूणगाठ मनात घट्ट रुजते.

    इमारतींचं सौंदर्य प्रथम मनात भरलं ते गोव्यामध्ये. गोव्यातील मंगेशी, शांतादुर्गा, अशा देवळांच्या परिसरात पाऊल ठेवलं की मन प्रसन्न होऊन जातं. देवळाची मुख्य इमारत, समोरील दीपमाळ, सभोवतालची धर्मशाळेची वास्तू, पायथ्याशी असलेलं छोटंसं तळ या सर्वच गोष्टी मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करुन जातात आणि आपण सहजरित्या नतमस्तक होऊन जातो देवळाच्या परिसरांप्रमाणेच गोव्यातील चर्चेसही हृदयात ठसतात. ओल्ड गोवा परिसरातील चर्चेस पाहताना धर्मभेद विसरुन आपण लीन होऊन जातो. गोव्यात सर्वच रस्त्यांतून डोकावणारी छोटी छोटी घरं पहात रहावी अशीच असतात. अनेक जुन्या घरांच्या समोरच्या ओसरीवर 'बल्काव' ही आढळतात. बल्काव म्हणजे बसण्यासाठी बांधलेला छोटासा ओटा. या बल्कावांवर बसलं की समोरच्या रस्त्यात काय चाललंय याची खबर लागते. बल्कावावर बसून रस्त्यातून येणाऱ्याजणाऱ्यांशी गप्पा मारणं हा सुशेगत गोवेकरांचा आवडीचा छंद.

    पूर्वी पुण्यात औंध परिसरात छोटे बंगले दिसत. टूमदार बंगला आणि सभोवताली पसरलेली बाग हे औंध परिसराचं वैशिष्टय गणलं जात असे. आता या बंगल्याच्या जागी बहुमजली इमारती उठत आहेत. बंगल्यांची संस्कृती मागे पडून आता इमारतींचं विश्व आकार घेत आहे. अशा इमारतींमध्ये फ्लॅटस आलीशान असतात. इथे अद्ययावत सुखसोयी दिमतीला हजर असतात. मात्र या इमारती पाहात असताना परिचितांच्या मनात जुने बंगलेच समोर येतात. इमारतींचं सौंदर्य एकदा मनावर ठसलं की ते कधीच पुसलं जात नाही हे अगदी खरं.

    मुंबईत व्ही.टी. फोर्टमधील जुन्या इमारतींचं सौंदर्य अद्यापही अबाधित राहिलं आहे. आता अशा इमारतींची गणना हेरिटेज मध्ये होत असल्याने पुढेही या इमारतींना धोका उरलेला नाही. एकेकाळी २६ जानेवारीच्या निमित्ताने या इमारतींवर रोषणाई केली जात असे. ही रोषणाई पाहण्यासाठी सलग तीन दिवस जनसागर लोटत असे. ट्रकमध्ये बसून दक्षिण मुंबईचा फेरफटका मारणं आणि गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल परिसराला अभिवादन करुन पहाटे घरी परतणं हा शिरस्ताच बनून गेला होता. पुढे वीजेच्या टंचाईमुळे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या सोहळ्याला पूर्णविराम द्यावा लागला. मात्र त्यावेळचा मुंबईकरांचा उत्साह आजही अनेकांच्या स्मरणात असेल. इमारतींचं सौंदर्य उपभोगण्याची ही प्रथा मागे पडली याचं खरोखरच दुःख होतं. आज या भागातून फिरणारा सामान्य माणूस पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेतच हिंडताना आढळतो आणि आलीशान गाडीतून जाणारा धनिक सभोवातलचं सोंदर्य टिपण्यऐवजी लॅपटॉपवरील कामकाज उरकण्यात गर्क असतो. एकेकाळी आमचं सौंदर्य अनुभवायला अख्खी मुंबापुरी लोटत असे असं या मंडळींना सांगण्याचा मोह या इमारतींनाही होत असेल, कुणी सांगावं? नाही म्हणायला या इमारतींचं सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यात काही परदेशी मंडळी गर्क असल्याचं आजही पाहवयाला मिळतं. या मंडळींच्या कॅमेऱ्यासमोर ताठ मानेने उभं राहताना या इमारतींनाही आनंद होत असावा.

    इमारत आणि सभोवतालचा परिसर यांचं सौंदर्य खुलविण्यासाठी वास्तूरचनाशास्त्रात आता लॅन्डस्केप डिझाईनिंग ची शाखा उदयाला आली आहे. बांधकामाचे अनेक नवे प्रकल्प राबविण्याआधी या मंडळींचा सल्ला घेतला जातो. इमारतीच्या सभोवताली बाग कुठे असावी, या बागेत कुठली झाडं लावावीत, कुठल्या फुलांची रोपं लावावीत, पायाखालच्या वाटेचं · डिझाईन कसं असावं असा सारा तपशील ही मंडळी पुरवतात आणि त्या बरहुकूम मग कॉम्प्लेक्स आकार घेतो. इमारतींचं सौंदर्य खुलविण्याच्या कलेला प्रशिक्षणाची जोड लाभते आहे. नवी पिढी खरोखरच भाग्यवान म्हणायला हवी.

    - सुनील रेगे

      October 1, 2022


  • एक थेंब, तहानलेला !

    लेफ्टनंट जनरल निंभोरकरांचे ते शब्द ,पाण्याच्या त्या एका थेंबाने ऐकले आणि तो एकदम उत्तेजित झाला ..थेंब रोमांचित झाला. थेंबाचा अणुरेणू प्रफुल्लित झाला. हे काहीतरी विलक्षण ऐकायला मिळालं होतं.

      September 27, 2019


  • तू म्हणतीस तसंच

    सकाळ झाली तशी सखू उठून लगबगीने कामाला लागली.आज सक्रातरचा सण,घरी काही तरी गोड-धोड करायचे व्हते. सणावाराला कधी तरी गोड-धोड लेकरांना मिळायचं,न्हायी तर एरी घरात आठरा विश्व दारिद्र्यच व्हते.कालच सखूने बाजारातून गुळ आणला व्हता.

      February 4, 2026