(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • सत्यम् शिवम् सुंदरम्

    माणसाचं मन असतं कुठे? त्यात काय, काय असतं? ते सगळं आपल्याला कळतं का? माणूस मनाचा वापर करतो, की मन आपल्यावर स्वार होतं? असे एका ना दोन अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ माझं मन कुरताडत असतं. अस्वस्थ करीत असतं. माझ्या वयाच्या अकराव्या वर्षी मी पहिली चोरी केली. एका पानटपरीवाल्याचे आठ रुपये पंचेचाळीस पैसे मी लांबविले. ती घटना मी विसरलो, असं समजत होतो. नित्यजीवनावर त्या घटनेचे काही परिणामही जाणवत नव्हते; पण दहा वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा मी त्या पानवाल्याकडे या चोरीची कबुली दिली, त्याचे पैसे दामदुपटीने परत केले तेव्हा कळलं, की माझी चोरी त्याला त्याचवेळी ज्ञात होती. तो काही बोलला नव्हता. त्या दहा वर्षांत त्यानं कधीही या घटनेची आठवणही मला करून दिलेली नव्हती. मी चोर नाही, माझा सद्सद्विवेक जागा आहे, असा त्याचा विश्वास होता. एका अर्थानं चूक कबूल केल्यानंतरही तोच जिंकला होता. एक साधा पानवाला; पण मनाच्या नीतळपणाची साक्ष तो अजूनही मला देत असतो.

  • काजळ भरलेले डोळे (कथा)

    ती जणू बोलायचं म्हणून बोलत होती. खूप क्षीण आवाजात मिसेस तिवारीने मनोजला म्हटले, ‘कोमा ताले वू’ आणि आपला नाजूकसा उजवा हात त्याच्यासमोर केला. मनोज चकित झाला. त्याच्या एवढंही लक्षात आलं नाही की फ्रेच भाषेत ओळख करून देताना/घेताना ‘हाऊ डू यू डू’साठी वापरलेल्या वाक्याचं उत्तर त्या भाषेत द्यावं, कमीत कमी ती नाजुकसा, कृश हात हातात तरी घ्यावा. त्याच्या गप्प राहण्याचा वेगळाच अर्थ लावून यावेळी मिसेस तिवारींनी जर्मन भाषेत विचारलं, “आस्प्रेचे किन इंग्लिश. एस्ट एस ओ के इच ड्युश स्प्रेचे’ (मला इंग्रजी येत नाही. जर्मनमध्ये बोलू का?) मनोजचा लहानपणापासूनचा मित्र धीरज तिवारीने सांगितलं होतं की, त्याने खूप प्रयत्न करूनही त्याची पत्नी इंग्रजी शिकू शकली नाही. एवढंच काय तिला भोजपुरी सोडून खडी बोली हिंदीमध्ये बोलणंही अशक्य होतं. परंतु मिसेस तिवारी फ्रेंच आणि जर्मनमध्ये बोलतील, हे त्याला माहिती नव्हतं. आपल्या पत्नीला अतिशय कोमल स्वरात त्याने समजावून सांगितलं. “हा मनोज, माझा बालपणचा मित्र. याच्याशी आपल्या भाषेत (भोजपुरी) आरामात बोलू शकशील.’ आता मिसेस तिवारी मोठे मोठे डोळे करून त्याच्याशी बोलू लागली आणि बघतच राहिली. जणू एखाद्या अस्पष्ट चित्रात प्रवेश “करून आपली एखादी खूप आवडती गोष्ट ती शोधीत होती. जी कुठे तरी हरवली होती.

  • चांगुलपणाचा अनुभव

    जगात चांगुलपणा ही आहे . हे कळले.. पोलीस तसेच तो टँक्सीवाला यांच्यामुळे.. नेहमी लक्षात राहील असा होता हा अनुभव.

  • फोटो

    " ऐ , ऐक ना " 
    " त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . " 
    " मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . " 
    " ओके " . 
    " पाठवला . " 
    " बघितला . " 
    " Delete केलास " 
    " तू काय आहेस ? फोटो पाठवलेला आवडला का ते तरी निदान आधी विचारायचं ? " 
    " प्लीज़ सांग ना . delete केलास . " 
    " खरं म्हणजे अतिशय जीवावर आलं होतं . पण केला फोटो delete . काय अप्रतिम फोटो आहे !
    ज्याचा आहे आणि ज्याने काढला आहे अशा दोघांनाही full marks . " 
    " खरंच आवडला ? " 
    " अगदी मनापासून . म्हणून तर delete करायच अगदी जीवावर आलं होतं .  पण तू delete का
    करायला सांगितले ?  मधेही एकदा असंच एक फोटो delete करायला सांगितले होतेस . " 
    " कारण याआधी पाठवलेली selfi फक्त तुझ्यासाठी होती . तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहायलेली
    मला आवडले नसते . चाललेही नसते . " 
    " Selfi काही vulgar अवतारात नव्हती . " 
    " चावटपणा नको . तसा हा फोटोही काही vulgar नाहीये . आणि तसे फोटो पाठवायला ना आपले ते
    वय आहे , ना आपली तशी व्रुत्ती . " 
    " धन्यवाद माताजी . पण हा फोटो का ?  झकास फोटो . अगदी सालंकृत . छान भरजरी साडी आणि
    मोजकेच पण ठसठशीत दागिने . " 
    " म्हणूनच delete करायला सांगितले . मला दागिने जरासुद्धा आवडत नाहीत . " 
    " नशिबवान आहे नवरा . माझ्यासारखा " . 
    " हा थट्टेने घ्यायचा विषय नाही . अक्षरशः सक्ती केल्यासारखे मागे लागून हा फोटो काढला
    गेलाय . " 
    " ओहो हो . . . म्हणून पापड मोडलाय का बाईसाहेबांचा !  जबरद्स्तीचा पुरावा नाही उरता
    कामा मागे . " 
    " प्लीज़ . तुला पाठवायलाच नको होता फोटो . कुठचाच . " 
    " मस्करी नाही करत . पण खरंच सुंदर . . . .  मान अजून जरा इकडे केली असतीस तर कानातले
    आणखी छान आले असते फोटोत .  नाहीतरी एकच साइड आहे ना " 
    " अजून नाही का काही " 
    " रागावनार नसशील तर सांगतो . " 
    " सांगा महाराज . आता तुमची सक्ती . " 
    " स्वतचे कौतुक ऐकायचे असले तर तसं मोकळेपणाने सांगावे माणसाने . " 
    " तू म्हणजे ना . . " 
    " साडीला matching म्हणून लाल चंद्रकोर हे बरोबर . पण मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा
    टीळा हवा . खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका . आणि त्या
    चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको ; पण ठळक हवी .  ती रेषा जाडी नको ; पण भरदार हवी . नजरेत
    पटकन भरेल अशी . " 
    " अजून काही प्रिस्क्रिप्शन ? " 
    " चंद्रकोरीची रेषा भुवई  खाली वळते तिथपासून दुसऱ्या भुवईच्या खाली वळते तिथपर्यंत
    बेस सारखी हवी . आणि दोन भुवयान्च्या बरोबर मधे तौ लाल कुंकवाचा ठिपका . दोन
    भुवयान्च्या मधे जिथे नाकाच वरचे टोक संपते तिथे हा ठिपका हवा . परातीत चंद्राचे
    प्रतिबिंब पडाव तसा . नाहीतर कड़वा चौथ ला चाळणीत चंद्र दिसावा तसा . " 
    " आता हे काय ? " 
    " वेडाबाई , ही चंद्रकोर माझा पति किती प्रेमाने मला साथ देतो याचे प्रतीक आहे . 
    त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्म्रुतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा
    ठिपका . अगदी लांबून सुद्धा लक्ष वेधून घेईल असा . आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या
    भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण . चंद्रकोर आणि हा टीळा म्हणजे परस्पर प्रीतीचा
    कळस आणि ध्वज असतो ग . " 
    " सॉलिड आहे हे . " 
    " तसं नाही ग . हे संकेत समजून घेणं फार छान असते ग . काय आहे ना आपण एकमेकांवर प्रेम
    करतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे असतेच ; पण ते कसे करतो , कशासाठी करतो हे नाजूकपने
    सूचित करता येणं हेही तितकेच महत्वाचे असते . " 
    " म्हणजे ? " 
    " आपल्या पिढीत प्रेम वाटण्याची सुद्धा  एक परिमीति असते . लगेचच delete केलेला फोटो
    पाहताना मला ते सारखे आठवत होते . " 
    "हे काहीतरी वेगळेच सुरु आहे तुझे आज . " 
    " अलग होंगे ; मगर गलत नही " 
    " डायलॉगबाजी पूरे . जरा ढील द्यायचा अवकाश की झाले सुरु . वेगळी परिमीति म्हणजे तुला
    काय म्हणायचे ते सांग . " 
    " आपल्या पिढीची प्रेमाची तर्हा जरा भिडस्त आहे आजच्या पिढीच्या मते . " 
    " म्हणजे ? " 
    " आपल्या पिढीच्या प्रेमाचे फोटोच वेगळे आहेत . एक तर ते श्रीमान योगी कादंबरीतल्या
    शिवाजी महाराज - सईबाई सारखे आहे . . उमलत्या कर्तुत्वाच्या काळात उमलत गेलेले . नाहीतर
    ते " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकातल्या संभाजी महाराज - येसूबाई सारखे . एकमेकांच्या
    कर्तुत्वाचा आदर करत व्यक्त होणारे . . . . " स्वारीचे हे रूप , स्वारीचे हे तेज ,
    स्वारीचा हा पराक्रम " अशा शब्दांत एकमेकांविषयी व्यक्त होणार . . . . आंधळी आपुलकी
    नाही तर आदरयुक्त , अभिमानपूर्न खानदानी आत्मीयता . दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून
    विकसित होत जाणारे .  एकमेकांविषयी कौतुक आणि आदर असणारे .  गाण्यात कसे प्रत्येक
    कडव्यां नंतर ध्रुवपद येते तसे . प्रत्येक टप्प्यावर ही आठवण काढणारं . उगाचच नाही "
    इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकाचा प्रत्येक अंक " स्वारीचे हे रूप , स्वारीची ही जिद्द . .
    . . " या वाक्यानी संपत . एकाने पुढच्यासाठी शब्दांत घातले तर पुढच्याच्या भावना
    पहिल्याविशयी कुठे वेगळ्या असतात ? " 
    " अगदी खरं आहे रे हे " 
    "  तिसरा प्रकार म्हणजे " स्वामी " कादंबरी तल्या थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई सारखे
    . अकाली करपलेल्या कर्तुत्ववान जीवनातील मोजक्या क्षणांची शिदोरी देणारे . आठवणही येऊ
    नाही अशा अनेक क्षणांचे डाग इतरजण आयुष्याच्या अन्गरख्यावर उडवत असताना आठवणीने आठवणीत
    ठेवावे असे काहीतरी क्षण पदरात घालत असे प्रेमाचे डाग मिरवावेत असे . " 
    " परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून् " 
    " तसं नाही ग . मला माझ्या पत्नीचा विचार करताना नेहमीच असं वाटत असत " 
    " पटलं मला " 
    "  ती चंद्रकोर , तो ठिपका , तो नाकाच्या शेंडयावर बसलेला लटका राग हे वैवाहिक
    आयुष्याचे फार छान फोटो आहेत .  सहवासाच्या कमेर्याने काढलेले . फक्त एकमेकांनाच
    दिसणारे . पॉज़िटिव फोटो आणि नेगेटिव रील एकांतात उलगडणरे आणि जनांत सुचवनारे . मैफीलीत
    श्रोत्यांना नाही जाणवत तानपुर्याचे स्वर फारसे . पण गायक अस्वस्थ असतो त्यान्च्याशिवाय
    . असे हे क्षण , श्रुंगार - संकेत आयुष्याचे तानपुरे असतात .  ते सदैव सुरातच हवेत .
    इतरांना दिसणयासाठी नाही तर आपल्याला जाणवण्यासाठी . " 
    " क्या बात हैं ? " 
    " अजून एक सांगू ? " 
    " विचारू नकोस . सांगत राहा . " 
    " असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात .  ते घालताना आणि काढताना घुंगरू
    आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे .  या आणि अशा
    फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ?  प्रेम असते म्हणून
    असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! " 
    " तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन
    . " 
    " त्याची royalty म्हणून् नाही . पण एक विनंती आहे . " 
    " मी हे delete करणार नाही . " 
    " मी काहीही delete करायला सांगत नाहीये . " 
    " मग ? " 
    " या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच . साहजिकच आहे ते .  पण या फोटोची निदान एक
    तरी Black - white अशी प्रत काढ . " 
    " का रे ? " 
    " रंगीत फोटो मधे सौंदर्याचे सौष्ठव आले तरी भावनेच मार्दव येत नाही . त्यासाठी कृष्ण -
    धवल च फोटो हवा " 
    " I see ! आता लक्षात येतय माझ्या ! ! सोनचाफ्याचा , बकुलिचा सुवास आवडता असूनही
    पहिल्यापासून  प्राजक्त आणि मोगरा ही  तुझी नम्बर एकची आवड का ?  आणि मी एकदा तुला
    वेड्यासारखे म्हणले होते की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो . " 
    " तेंव्हा नाही सांगितले काहि . पण आज सांगतो . ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत .
    भावविभोर मनाने त्या क्षणाचा , त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो . प्राजक्ताचा देठ
    म्हणून लाल असतो .  हिरवा नसतो . हिरवा रंग असोशीचा असतो ; लाल सन्त्रुप्तीचा . ज्या
    व्यक्तीच्या सहवासाने आपण त्रुप्त होतो , त्याच्या आठवणीने गालावर , मनावर लाली येते .
    त्या स्म्रुतीन्च्या उजळणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त . प्राजक्त ही ओलसर आणि भावना ही
    . " 
    " किती वेडा आहेस रे " 
    " नाही . दिवसाची खरी यथार्थता तिन्हिसान्जेलाच कळते .  आकाशात मावळतीचे रंग पखरलेले
    असतानाच मनाच्या कॅमेरयात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरु असते .
    म्हणून् तर त्याला कातरवेळ म्हणतात . " 
    " हा फोटो नाही विसरू शकणार " 
    " अग , असे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथी सारखे असतात . नाकाचा शेनडा
    पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडनारा . नथीचा हेवा वाटतो असे मोकळेपणाने
    सांगत राहतात हे फोटो " 
    " तूच एक . . . " 
    
    -- चंद्रशेखर टिळक 
    २ डिसेंबर  २०१६
    

    9820292376
    Email: tilakc@nsdl.co.in

  • दक्षिण आफ्रिकेतले दिवस – प्रास्ताविक

    ….. तोपर्यंत दक्षिण आफ्रिका म्हणजे नेल्सन मंडेला ही व्यक्ती तसेच, जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, डर्बन आणि केप टाउन या शहरांची नावे, इतपतच माहिती होती. माझी नोकरी पिटरमेरीट्झबर्ग शहरात होती. हे शहर कुठे आहे, याबाबत संपूर्ण अनभिज्ञ होतो. 

  • गॊष्ट एका राणीची.. (निवड)

    अकरावी प्रवेश सुरु झाले. त्यावेळी नवीनच ओनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू होती म्हणून शाळेतून अर्ज भरून दिले जात होते. अर्ज भरायचा आहे, ठीक आहे पण कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे काही राणीला कळत नव्हते. तिला काय बनायचं आहॆ याचा तिने कधी गहन विचार केलाच नव्हता.शाळेत जेव्हा शिक्षक विचारायचे, कोणाला पुढे जाऊन वैज्ञानिक बनायचे आहे तेव्हा राणीचा हात पहिला वर असायचा,कधी शिक्षकांनी विचारल पत्रकार बनायला कोणाला आवडेल पुढे जाऊन.. तरी पहिला हात राणीचाच वर. तात्पर्य काय तर राणीने विचार केलाच नव्हता तिला पुढे जाऊन काय करायच आहे त्याचा.

  • दोन बेडूक मित्रांची गोष्ट

    एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या पाण्यात लपून बसायचे. श्यामरावांच्या या भित्रेपणाला तळ्यातले मासे, कासव हसायचे. ‘भित्रे मंडुकराव’ म्हणून चिडवायचे. रामने श्यामला भिऊ नको म्हणून खूप वेळा सांगून पाहिले. पण त्याचा काही उपयोग होईना. तळ्यातले इतर जलचर राम बेडकाला म्हणायचे, ‘माणूस लोकात मुलांनी भिऊ नये म्हणून त्यांना हनुमान चाळीशी म्हणायला शिकवतात. तसा हा राम बेडूक श्यामला ‘मंडुकोपनिषद” शिकवतो.

  • निळू फुले

    एकदा मी आणि माझी आई लिफ्टमध्ये असताना खांगटे काका आणि निळू फुले लिफ्ट मध्ये आले. आधी आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी आईला म्हणालो आई हे निळू फुले…डायरेक्ट आई लिफ्टच्या बाहेर जायला निघाली. मग आम्ही तिला अडवले. इतका निळूभाऊंचा ‘ दरारा ‘ होता पडद्यावर .

  • माझ्या मनातले…

    ही गोष्ट आहे माझ्या मित्राची. पंधरा वर्षे होऊन गेलीत त्या घटनेला. त्या वेळी तो अन् मी एकत्र काम करीत असू. पत्रकार म्हणून त्याला अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण आले. तयारी सुरू झाली. सर्वसाधारण अमेरिकेला जायचे म्हणजे असणारा सर्वांत मोठा अडथळा या भेटीत नव्हता. अमेरिकन सरकारच्याच माहिती खात्याने दिलेले हे निमंत्रण असल्याने व्हिसाचा प्रश्न नव्हता. तयारी झाली. दौरा खूप छान झाला. खूप पाहायला मिळाले. बरेच काही समजावूनही घेता आले. या दौर्‍याच्या अनेक हकिकती आम्ही ऐकत गेलो. आमच्याही ज्ञानात भर पडत गेली.

  • ओळख नर्मदेची – भाग पाच

    आमची परिक्रमा जशी झाली तशी -

    केल्याने देशाचे पर्यटन, सभेत संचार ।
    शास्त्र न कळुजा, चातुर्य येतसे फार ॥

    या उक्ती प्रमांणे ज्ञानार्जनासाठी व दैनंदिन कार्यातुन विरंगुंळा म्हणुन आपण प्रवास/सहलीला जातो. जास्त कालावधी करता शक्य असेल तर आपण लांबच्या ठिकाणी पर्यटनाला जातो. पर्यटनाव्यतिरीक्त लांब पल्याचा पायी खडतर प्रवास, भावनेपोटी विठुरायाच्या दर्शनाला, ज्ञानदेव व तुकारामाच्या पालख्या घेऊन दर आषाढी एकादशीला वारकरी पंढरपुरला करतातच. ही झाली धार्मिक बाब . गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार ने कर्मचार्यांकरता एल टी सी योजना लागु केल्याने पर्यटनाच्या विविध सुखसोई उपलब्ध झाल्या, ज्या मुख्यत्वे सिमला, कुलु मनाली, काश्मिर, केरळ, गोवा सारख्या सुखवस्तु ठिकाणांसाठी आहेत. अजुन ही एक मोठा वर्ग धार्मिक द्रृष्टीनी यात्रा करण्या साठी जातो व तो नेमका वरिष्ठ नागरिकत्वांचा असतो. उदा: चारधाम, वैष्णवदेवी, पशुपतिनाथ, कैलास मानसरोवर, अमरनाथ, रामेश्वर व तितकीच महत्वाची समजली जाणारी नर्मदा परिक्रमा. ह्या सगळ्याच कठीण समजल्या जातात ,नव्हे, तर आहेत,कारण सगळ्यांना वेळ खुप लागतो,कष्टदायक,शरिराला क्लेष देणार्या व बर्याच प्रमाणात निसर्गाच्या मुड वर अवलंबुन असतात.बस वगैरेने प्रवास सुसह्य ,कमी वेळात,होतो,समाधान होते पण तथाकथीत अनुभव (जसे अश्वस्थामा भेटणे, तेथील लोकांचे अगत्य,मदतीचा हांत,वगैरे.)सहसा येतीलच असे नाही.समाधान ही वैयक्तीक बाब आहे,पण उद्देशपुर्ती निश्चितच होते.

    पुर्वानुभावामुळे यशोधन ट्रैव्हलस या प्रसिध्द कंपनी बरोबर जाण्याचे आम्ही उभयतांनी ठरवले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे, २५ मार्च २०१८ रोजी पुण्याहुन रेल्वेने निघालो व २६ ता ला इंदोर ला पोहोचलो, कंपनीच्या लोकांनी उतरतांच आमचे सामान पुढे जायच्या बसमध्ये ठेवले व एका हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था होती, ते आटोपुन ओंकारेश्वरसाठी प्रस्थान केले.

    माझ्या वाचनांत आले नव्हते त्यामुळे इथे आल्यावर कळले की इंदोर केंद्र सरकारच्या “स्वच्छता अभियान “स्कीमअंतर्गत,भारतातले सर्वात स्वच्छ शहर म्हणुन गौरव प्राप्त झाला आहे. तसा अनुभव आला पण. इंदोरला पुर्वी खुपदा आलो तेव्हा गलिच्छ नसले तरी इतके स्वच्छ नव्हते. राजनितिक इच्छा शक्ती असेल व नागरिकांचा सहयोग असेल तर काहीच अशक्य नाही ह्याचे हे सुंदर उदाहरण होय. तसाच फरक उज्जैन च्या बाबतीत पण झाला आहे. नंतरच्या पुर्ण प्रवासांत, सामानाची ने - आण त्यांनीच केली.

    १७-१८ दिवसांचा प्रवास,म्हणुन सगळ्यांचेच सामान अर्थातच ज्यास्त व ह्या वयांत आम्हाला सामान कुठेच उचलावे लागले नाही ही केवढी सोय. बसमधे बरोबरच त्यांचे किचन युनीट असल्याने यथासमय चहा, नास्ता, जेवण नीट, व्यवस्थीत, घरच्यासारखे (तेलकट,तुपकट नाही) मिळाले ही दुसरी मोठ्ठी बाब. कंपनीचे मालक श्री प्रकाश मोळक स्वत: बरोबर असल्याने ते सगळ्यांचे हवे नको बघायचे त्यामुळे मोठ्ठा आधार वाटायचा हे सांगणे न लगे. मुख्य म्हणजे खुपच महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोचण्याच्या आधी ते स्वत:स्थानाचे महत्व, पौराणीक संदर्भ, इतिहास, स्थानिक भुगोल, इतकी अद्यावत माहिती सांगायचे की एखादा गाईड काय सांगेल. आम्ही १९ जण प्रवासी होतो त्यांना ते परिक्रमे संदर्भात म्हणतात तसे “मुर्ती” म्हणुन संबोधायचे. आम्ही “मैया”, ”माताजी “अगर “बाबाजी “नाही झालो हे नशिब. तिकडच्या भागांत अख्ख आयुष्य गेल्याने तिकडच्या चालीरिती, हवामान, भाषा काही नवीन नव्हते. पुर्ण प्रवासात रुटीन असे होते की सकाळी पहाटेच उठायचे (वेक अप कौल विथ tea), लगेच तयार होऊन निघायंच, निजताना चहा, बिस्कीट वगैरे, ७ते८ दरम्यान प्रवास सुरू,मोक्याच्या जागी थांबुन ब्रेकफास्ट,वाटेत कुठेतरी घाटावर थांबुन नर्मदेत कुणाकुणाच्या आंघोळी, आरती, मग पुढे जायचे. दुपारी १-२ च्या सुमारास ढाबा/हॉटेल ला थांबुन inhouse बनवलेले जेवण,मग पुन्हा प्रवास,५-६ वाजता चहा व बरोबर काहीतरी. संध्याकाळी कुठेतरी नर्मदा दर्शन, आरती (सकाळी झाले नसेल तर) आणि मुक्कामा साठी हॉटेल .तिथे जेवण व झोपायचे.संध्याकाळी आरती झाली नसल्यास सगळ्यांनी बाटल्यांमधे भरून आणलेली नर्मदा टेबलावर ठेऊन क्रमवार एका -एका मुर्तीतर्फे आरती व प्रसाद .स्तुतिपर आरती खुपच सुंदर आहे व तितकेच श्रवणीय नर्मदाष्टक.

    असे रोजचे रुटीन जमले होते. नर्मदेची क्रृपा म्हणायची की वाटेत कुणाचीच तब्येत बिघडली नाही, बस व्यवस्थीत चाल, एक पंक्चर पण नाही इ. वाटेत तर खुपच देवळ आहेत, त्यापैकी ऐतिहासीक पौराणीक महत्वाची मंदिरे बघितली व नदीमध्ये फुलवातींचे दिवे सोडले. संध्याकाळी ते द्रृष्य विहंगम वाटायचे.पुर्ण प्रवासात नदी न ओलांडण्याची खबरदारी घेतलीगेली.इंदोर हुन via बडवाह, मोरटक्का ओंकारेश्वरला आलो.

    -- सतीश परांजपे