नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन माजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसाखाली आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली, केतकी, पण होती. नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारश्या ओळखी झाल्या नव्हत्या, तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा एकात होती.
एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला आहे. ‘काव्यसुमनांजली’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून ते आता सर्व वाचकांपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्या या सेवेला मन:पूर्वक धन्यवाद!
हरिश्चंद्र कोळी हे मुळात शिक्षक असल्यामुळे शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, शाळा, सुट्टी, बालमन, सर्वधर्म समभाव, स्वच्छ भारत, साक्षरता, शिक्षकदिनासह, निरोपसमारंभ गीता पर्यंतचे सर्व विषय त्यांच्या कवितांमधून आलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांनी रुजवलेले शिक्षण प्रमाणभूत मानल्यामुळे सामाजिक मूल्ये त्यांच्या कवितांमधून आलेली दिसतात. म्हणूनच, ‘शाळा माझी माऊली’ या कवितेत ते म्हणतात -
‘शाळा आपुली माय माऊली
तिच देते तुम्हां साऊली
हसा, खेळा, पडा, धडपडा
राखा देशाचा मान
वेचा कण-कण ज्ञान’
हसत खेळत शिक्षण घेण्याचे मूल्य रुजतांनाच देशाचा मान राखण्याचा संस्कार ही ते मुलांवर करतात. साने गुरुजींचा आदर्श जपण्याचा ते प्रयत्न करतांना दिसतात.
स्वतंत्र भारतात आपण स्वतंत्र आहोत का? ‘स्वातंत्र्या नंतरही’ या कवितेमध्ये आजच्या भ्रष्ट समाजाचा आरसा तर ते दाखवतातच पण आपण या स्वतंत्र राष्ट्रात सुरक्षित आहोत का? असा प्रश्नही विचारतात. आणि मुलांना सांगतात -
‘एक दिलाने गाऊ आपण
देशाचे गुणगाण रे
श्रमातुनी आणि त्यागातुनी
घडवू भारत छान रे
घडवू भारत छान’
श्रम आणि त्यागाचे मूल्य सांगतानाच ‘कुठलंही व्यसन न करण्याचा’ आदर्श व्यक्त करतात. जीवन म्हणजे काय? जगणं म्हणजे काय? सुख - दु:ख म्हणजे काय? याची सुंदर व्याख्या ‘जीवन’ या कवितेमध्ये त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात -
‘जीवन म्हणजे केवळ जगणं नसतं तर
सुख - दुःखाच्या दरम्यान
श्वास आणि उच्छवास
यातील अंतर
म्हणजे खरं जीवन’
जीवनाची अशी व्याख्या त्यांच्या विचारांचा पोत ठरवते. ‘महिला दिन’ या कवितेमध्ये इतिहासातील अनेक क्रांतिकारी स्त्रियांचे दाखले देत असतांनाच... आजच्या स्त्रीला प्रेरणा देण्यासंबंधी भाष्य करून तिचा पाय मागे न ओढण्याची विनंती करतात.
‘शाळेतील मुलांना मला शिकवायचे आहे
समाजात जगण्यालायक बनवायचे आहे’
(आदर्श शाळा)
त्यासाठी श्रमप्रतिष्ठा, नैतिकमूल्य, अंधश्रद्धेचे उच्चाटन, साक्षरतेचा प्रसार करण्याचा मार्ग ते सुचवतांना दिसतात -
‘एका जागी राहून उभा
आला असेल वीट
विठ्ठला s s s सोड तुझी वीट’ (वारकरी)
असे विठ्ठलाला अगदी सहजपणे सांगतात. ‘उन्हं पाहून पाठ फिरवणारी माणसं’ त्यांना नको आहेत. ‘भाकरीचा चंद्र शोधणारी माणसं हवी आहेत.’ ‘मी अडाणी कसा’ या कवितेमध्ये नैतिकता ही शिक्षणावर अवलंबून नसते तर ती नैतिक वागण्यावर अवलंबून असते. हे सांगताना कवी म्हणतात, ‘निरक्षर माणसाला लिहिता वाचता येत नाही पण बाकी सगळा व्यवहार समजतो. मान - अपमान समजतो. भ्रष्ट्राचार लक्षात येतो. पाहुणचार करता येतो’ मग असा माणूस अडाणी कसा? भ्रष्ट वागणारे साक्षर शहाणे कसे?... विचार करायला लावणारा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे.
‘आम्ही सालस प्रेमळ
निर्व्यसनी माणसं पेरली
पण निरक्षर, लाचार
पण हावरट माणसंच जन्मली’ (निर्दयी माणसे)
या काव्यसंग्रहातील ‘भारती’ ही भारत मातेची आजची अनावस्था दाखविणारी कविता मुळातूनच वाचायला हवी. शिवाय ‘गर्दी’, ‘जगणं’, ‘कलियुग’, ‘बाप’, ‘चेंडू’, ‘पोर वयात आली’, ‘विटंबना’, ‘वादळ’ सारख्या कवितांनी कवी बद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. साध्या - सोप्या सरळ भाषे मधील कविता गेय, गझल, मुक्तछंद, चारोळ्या, लावणी वगैरे प्रकारातील असून काही कविता गीतांच्या चालीवर लिहिलेल्या आहेत.
हरिश्चंद्र कोळी यांचा लिहिता हात आहे. विचारांची झेप आहे. ती अधिक खोल व व्यापक व्हावी. त्यांना त्यांची लय सापडावी. भविष्यातील अधिकाधिक कसदार लेखनासाठी त्यांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! आणि ‘काव्यसुमनांजली’ या पहिल्या कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत!
- नीलम माणगावे,
कवयित्री व लेखिका, जयसिंगपूर
Title - Kavyasumananjali (काव्यसुमनांजली)
Poet - Harishchandra Mahadev Koli (हरिश्चंद्र महादेव कोळी)
Edition - First Edition
Price - Rs. 100/- (मूल्य 100/- रुपये)
Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)
Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)
Contact - 02322 - 225500, 09975873569
Email - kavitasagarpublication@gmail.com
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला
आम्ही RCA वर पोहचलो तोपर्यंत १-१.३० वाजला होता. रिसेप्शनिस्टशी बोलून प्रियांकाची २ दिवसांची सोय गेस्ट म्हणून माझ्याच रुममधे केली. थोडेफार वरचे चार्जेस् भरले. स्वस्तात काम झालं.अर्धा दिवस असाही संपला होता. आता विम्बल्डन शक्य नव्हते. माझ्यासारखीच प्रियांका पण क्रिकेट वेडी होती आणि लॉर्ड्स बघणे तिच्यासाठी एक पर्वणी होती. मग बहुमताने लॉर्डसवर शिक्का मोर्तब झाले. बाहेरच काहीतरी खावून पुढे जावूयात असे ठरले. आज मी, प्रियांका आणि उमेश असे तिघचं होतो फिरायला. आधी ‘रिजंटस् पार्क’, मग तिथून पुढे ‘लॉर्डस्’ असा प्लॅन ठरला.
पॅडिंग्टनला KFC, Domino’s, Fish N Chips असे वेगवेगळे फूड आउटलेटस् होते. आज प्रियांकाच्या चॉइसने KFC मधे गेलो.मग पॅडिंग्टन ट्युब स्टेशनला बेकरलू लाइन्स् ने ‘रिजंट पार्कला’ उतरलो.
थोडं चालल्यावर आम्ही पार्कमधे शिरलो.विविध टोपिअरिज्, फुलांचे विविध रंगी ताटवे, सर्वत्र हिरवळ, डेरेदार व्रुक्ष ह्यांनी आमचे जोरदार स्वागत केले. जेंव्हा कधी मी नविन पार्क बघायचे मला नेहमी वाटायचे, ही जास्त चांगली आहे.आताही तीच अवस्था झाली माझी. झाडा-झुडुपांवर, ग्रीनरीवर प्रेम करणारा इंग्रज पावलोपावली जाणवत होता.
इंग्रज आपल्याच काय दुसर्यांच्या मातीवरही प्रेम करायचा असे गमतीत वाटून गेलेइतकी सुंदरकंट्री सोडून कशाला तडमडायला आले होते भारतात?अर्थात लुटलेल्या मालातूनच हे उभे राहिले असावे कदाचित,असो! उगीच भूतकाळात शिरुन वर्तमान कुठे बिघडवा?
आम्ही आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पीत, ठिकठिकाणी फोटो घेत मजेत जात होतो. आणि आमचा मार्ग रोझ गार्डनने अडवला. आधीच सौंदर्य काय कमी होत? म्हणून त्यात अजून भर? किती विविध रंगी, विविध प्रकारची, thoughtfully arranged गुलाबाची फुले!!! किती हया दोन डोळ्यात सामावून घेऊ? हे कमी पडले म्हणून की काय, थोडे पुढे गेल्यावर समोर नदीसद्रुश तलाव आणि तलावाची शान वाढवत डौलाने फिरणारे बदक, राजहंस.....
नदीच्या आसपास सुंदर ग्रीन लॅंडस्केपस्, वेगवेगळ्या आकाराची, पानांनची झाडे. सगळ्या गोष्टी स्वप्नवत!! इतके सौंदर्य एकत्र एका ठिकाणी पहायची माझी पहिलीच वेळ होती.वर्णन करायला शब्दही अपूरे आहेत.
असे अविश्वसनीय देखावे टिपत आम्ही पार्कच्या दुसर्या गेटपाशी आलो.अर्थात् सगळं कव्हर करणे, आवाक्याबाहेरचे होते. प्रचंड मोठी पार्क होती ती!
आम्ही ज्या गेटने बाहेर आलो,तिथून लॉर्डस् फक्त १० मिनिटांवर होते.आता आम्हाला लॉर्ड्सचे वेध लागले. आमच्या अधिरतेमुळे आम्हाला ते डिस्टन्स खूप वाटत होते. पार्कमधे रेंगाळणारी आमची पावले आता झपाझप पडायला लागली. आणि समोर ‘लॉर्ड्स’ अशी पाटी दिसली.
डाव्या हाताला मिडिया सेंटरचा थोडा भाग दिसत होता. दुसऱ्या बाजूला नेहमी टीव्ही वर दिसणारा तो उंच ब्राऊन टॉवर दिसला. ते हॉटेल आहे असे आम्हाला नंतर कळले.
आम्ही नेमके मागच्या बाजूला आलो होतो. एक अर्धवर्तुळाकार वळसा घेवून मेन एन्ट्रन्स्पाशी आलो.
‘रिजंट पार्क’ची हिरवळ बघूनही आमचे डोळे लॉर्ड्सच्या हिरवळीसाठी तरसत होते आणि मुख्य दारातून प्रवेश केल्यावर समोर हिरव मोठ्ठं ग्राउंड... डोळेभरून दर्शन घेतलं. तिथे तुम्हाला एक गाईड मिळतो. आम्ही तिकिटे काढून, एक छोटा टुरिस्ट ग्रुप आणि गाईड उभा होता तिथे गेलो. ते आमच्यासाठीच थांबले होते. आता आमची गाईडेड टूर सुरू झाली.
सगळ्यात आधी डोळे त्या ‘बोर्ड ऑफ ऑनर्स’ वर स्थिरावले, या ग्राऊंडवर शतक केलेल्यांची नावे होती तिथे. त्यात बरीच ओळखीची, अनोळखी नावे दिसली. मी आपली वेंगसरकर, अझरुद्दीन, गांगुली, आगरकर ही नावे डोळे भरुन पाहिली.
तिथेच MCC (Merlyborn Cricket Club) Museum चा डिस्प्ले होता. ट्रॉफिज्, जुने फोटोज्, बॅटस्, टी-शर्टस् अशा विविध गोष्टी त्या त्या प्रसंगाची आठवण म्हणून ठेवल्या होत्या.
एका ठिकाणी आम्ही एका बॉलवर एक भुसा भरून ठेवलेली चिमणी पहिली. ज्या बॉल वर ती ठेवली होती, तोच बॉल लागून तिचा ग्राऊंडवर मृत्यू झाला होता.आता ती तिथेच अमर झाली होती.
ऍशेस सिरीज तर नेहमी उत्साहाने बघितल्या जातात. त्याच्या मागची स्टोरी आणि प्रत्यक्ष एशेस अर्न(Urn) बघायला खूप थ्रिलिंग वाटले. इंग्लंड जेंव्हा होम ग्राऊंडवर हरली तेंव्हा लोकांनी स्टंम्पस् आणि बेल्स जाळल्या.आणि त्याची राख ही त्या जार मध्ये भरून ठेवली, जी आता MCC Museum चा हिस्सा बनली आहे.जे सगळं आत्तापर्यंत ऐकलं होतं ते प्रत्यक्ष बघण्यात एक वेगळचं थ्रिल वाटत होतं.
मग आम्ही फेमस ग्रँड पॅवेलिऑनला भेट दिली.तिथे बसून मॅचचा फील घेतला. तिथून आम्ही ज्या गॅलरी मध्ये बसून सौरव गांगुलीने शर्ट काढून विजयाचे सेलिब्रेशन केले त्या गॅलरीत गेलो. सगळ बघूनच इतकं एक्साईट व्हायला होत होते. तर ते प्रत्यक्ष ते अनुभवताना एखादी अशी कृती होवू शकते.त्याचा इतका इश्यू करायची गरज नाही, असे वाटले..
आम्हाला आता मीडिया सेंटरला जायचं होतं. तिथे जाता येत हे कळल्यावर आम्ही अक्षरशः वार्याच्या वेगाने तिथे पोहचलो. जिथे सुनील गावसकर, हर्षा भोगले बसतात तिथे आम्ही बसलो. खूप खूप धन्य वाटले. आता आम्ही मेन ग्राउंड एन्ट्रन्स्पाशी उभे होतो. तिथले गेट बंद होते. आम्हाला ग्राऊंडवर जायचे होते. पण ग्राऊंडवर पाय ठेवायला बंदी होती.आम्ही एक दोनवेळा रिक्वेस्ट केली, पण त्याने ऐकले नाही. खूप विरस झाला. पण प्रियांकाने प्रयत्न सोडले नाहीत.तिने खूपच विनवण्या केल्या आणि अहो भाग्य आमचे!!...
फक्त आम्हाला दोघींना ग्राऊंडवर एक मिनिटसाठी परवानगी मिळाली. तो क्षण म्हणजे मरणाऱ्याला जीवनदान मिळाल्या सारखा होता.
पटकन गेट उघडून दोघी ग्राऊंडवर गेलो. जाण्यापूर्वी दोघींनकडून न ठरवता एकदमच एक क्रुती केली गेली. आम्ही आमचे शूज बाहेर काढले.अनवाणी चालत ग्राऊंडवर थोडे पुढे गेलो. खाली वाकून ग्राउंडला नमस्कार करून, ती माती कपाळाला लावली. ह्याच मातीला सर डॉन ब्रॅडमन पासून लिटिल मास्टर सचिन तेंडुलकरचे पाय लागले होते.त्यांच्या चरणांची धूळ आम्ही मस्तकी धारण केली.
ह्याच मैदानावर कपिल देव आणि त्याच्या टीमने भारताचा पहिला वहिला विश्वचषक उंचावला होता. त्या आठवणींमधे आम्ही न्हाऊन निघालो.
त्या क्षणी मला बाबा, नरेन आणि शैलेशची प्रचंड आठवण झाली. जणू काही ते इथेच आहेत,माझ्याबरोबर!
क्रिकेटचे अनेक मोलाचे क्षण, अगदी 1983च्या विश्वचषकपासूनचे, आम्ही एकत्र जगलो होतो.आताही ते मनाने माझ्या बरोबर होते. एका वेगळ्याच धुंदीत आम्ही होतो. उमेशने बोलवल्यावर आम्ही भानावर आलो.
लंडनच्या माझ्या वारीचे हे पंढरी होते. ग्राउंडला नमस्कार करताना, वारकऱ्यांच्या मनात पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवल्यावर जे भाव उमटत असतील तेच भक्ती भाव माझ्या मनात आत्ता होते. निःशब्द भारावलेल्या अवस्थेत, आम्ही लॉर्ड्स मधून बाहेर पडलो.
परतीच्या प्रवासात मनात एकच शब्द रुंजी घालत होता, ‘THE LORDS…. THE LORDS..’
-- यशश्री पाटील
कुणा कडे दुर्लक्ष करायचे. घासाघीस कुठे करायची. हे सगळे आम्हाला पण समजते. आमच्या काळी तर बाहेर जायचे नव्हतेच पण आम्ही मात्र मुलांना सातच्या आत घरात अशी समज दिली होती.
त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले.
विधात्याने ही सृष्टी , हे जग खूप सुंदर बनविले आहे. मानवाला संस्कारक्षम विवेकबुद्धी दिली आहे .सर्वांगसुंदर दृष्टी दिली आहे हे निर्मळ सत्य आहे.
मला पहिल्यापासूनच कलेची आवड होती. विशेषतः, चित्रपट, चित्रकला आणि कविता याबद्दल मला विशेष आकर्षण वाटायचं. वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षांपासून कविता सुचायला लागल्या. तेव्हा मी आचार्य अत्रेंचे मी कसा झालो? ‘ हे पुस्तक वाचले.
कैरोमधल्या पिरॅमिडबद्दल शाळेत असल्यापासून कुतूहल होतंच. Chariots of Gods आणि इतर काही पुस्तकांमधून पिरॅमिड व तत्सम इतर अवाढव्य कलाकृतींबद्दल वाचून त्याविषयीचे आकर्षण वाढले. एवढे अवाढव्य काम कोणी केले असेल, कशासाठी केले असेल याची उत्सुकता निर्माण झाली. ‘चॅरिएट्स ऑफ गॉड’ मध्ये ब-याच आश्चर्यकारक जागांचा व बांधकामांचा उल्लेख आहे. हिस्ट्रीचॅनलवर तेंव्हा एक‘ एनशियंट एलियन्स ’म्ह्णून एक मालिकाही बघण्यात आली व नास्काच्या रेषा, पिरॅमिड्स, चीनची भिंत वगैरे ब-याच माहितीची भर पडली.त्यातल्या त्यात पिरॅमिडस हे जरा जवळचे वाटले. म्हणून पिरॅमिडच्या तीव्र ओढीने आम्ही इजिप्तचा विचार करू लागलो म्हटले तरी चालेल.
पूर्वी ‘ती फुलराणी’ सारख्या नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षागृहात, मोगऱ्याचा दरवळ सुटायचा. आता तशी नाटकंही नाहीत आणि प्रेक्षकही.. काही समारंभाना, सोहळ्यांना आयोजकच प्रेक्षकांना दरवाजाशीच गजरे देत असत. सहाजिकच तेथील वातावरण सुगंधित होत असे..
Copyright © 2025 | Marathisrushti