(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • उम्मीद पर दुनिया कायम है

    आता हे गेल्यावर्षीचं कोरोना प्रकरण बघा ना !!.. बिचारी इतकी निर्दोष माणसं मारली गेली .. इतके संसार उद्ध्वस्त झाले .. अगदी जगभर .. पण तुम्ही-आम्ही अजून जगतो आहोतच ना ? धक्क्याने गेलो नाही .. कारण हीच “उम्मीद”

  • उखाणा नको त्याला बहाणा

    उखाणा हो नुसते म्हटले तरी लाजायला. होते. हो ना. कुणी शोधले असेल हे. पण आज तागायत उखाणा घेणे आवश्यक आहे लग्न ठरले की घरातील व बाहेरील बायका मैत्रीणी उखाणे शिकवतात. आता हल्ली म्हणे उखाण्याचे पुस्तक मिळते. कोणता उखाणा कधी घ्यायचा हे असते त्यात. आणि यातून बरेच काही शिकायला मिळाले. इतिहास लिहिताना जसे अनेक साधने असतात त्यातून त्या काळाचा संदर्भ मिळतो. पण उखाण्यातून तर अनेक शाखांचे ज्ञान मिळते. नंतर काही काळानंतर पुरुष सुद्धा उखाणा घेऊ लागले. मला नक्की काय म्हणतात ते आठवत नाही पण साधारणपणे आर्या म्हणत असतील. एखाद्या बाईचा आवाज गाण्यासाठी योग्य असेल तर ती गोड आवाजात उखाणा घेत होती हे मी ऐकले आहे....
    लग्नाच्यावेळी अनेक प्रसंगात घ्यायचे उखाणे. उदा. देवाच्या मंदिरात दरवळतो उदबत्तीचा वास... घालते जिलेबीचा घास. उदबत्तीचा गुण समजला. पूर्वी लहानपणी लग्न व्हायची म्हणून सगळे काही समजले पाहिजे...
    महादेवाला बेल वाहते वाकून... मान राखून..
    श्री कृष्णाला वाहते तुळशीचे पान...
    मान राखून..
    देव व त्यांच्या साठी कोणती फुले पाने वापरायला हवेत हे सांगण्याचा उद्देश होता..
    उर्दू भाषेत दगडाला म्हणतात पथ्थर...
    लावते अत्तर.
    इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून..
    यांची सून...
    परकिय आक्रमणाचा परिणाम...
    स्वराज्य माझ जन्म सिद्ध हक्क आहे असे म्हणतात लोकमान्य टिळक...
    नावाने लावते कपाळावर कुंकू ठळक..
    इंग्रजानी दिली शिक्षा. सावरकर गेले परदेशी.... च्या दिवशी.
    स्वातंत्र्याचे पडसाद..
    आई बाबा आहेत प्रेमळ सासूसासरे आहेत हौशी... च्या दिवशी.
    नदिवरुन भरुन आणली कळशी.
    ... चे घर हीच माझी काशी.
    मोठ्या माणसांचे स्वभाव व घराला दिलेले आदराचे स्थान..
    साठ मिनिटांचा एक होतो तास
    राव आहे माझे बी ए पास..
    रुप नको पैसा नको पती असावा गुणी.
    चे नाव घेते ही नंदिनी.
    शिक्षणाचे नव वारे वाहू लागले.
    भाजीत भाजी मेथीची...
    माझ्या प्रितीची..
    तुम्ही मला का आडवला..
    माझ्या बायकोचे नाव आहे प्रमिला..
    अशीही प्रथा होती...
    ग्रामीण भागातील उखाणा दोन वाक्यात नाही तर दोन दोन पानं असतात. पण पाठांतर जबरदस्त. त्यात खोल्यांची नावे. भांडी. घरातील व्यकी आणि काय काय सगळेच विषय हाताळले जात... आता उखाणा वधू वर मनाने तयार करतात. वाहवा मिळवतात. पुढे चालून एकेरी नावाने हाक मारतात पण उखाणा म्हटलं की नक्कीच लाजतात. मी लहानपणी ऐकलेले उखाणे सांगितले आहेत. त्यामुळे यातून समाजाचा इतिहास समजला गेला.

    --सौ कुमुद ढवळेकर

  • संभ्रम

    गेल्या आठवड्यापासून पाहते दोन-तीन दिवस दुकानाबाहेर माणसांची ही लांबलचक रांग…एकीला विचारले कसली रांग आहे.. सेल-बिल आहे की काय? तशी म्हणाली.. आहात कुठे तुम्ही..अहो प्लास्टिक बंदी आहे ना…स्टीलच्या वस्तु घेण्यासाठी रांग आहे ही.. आणि माझी ट्यूब पेटली…

  • औषध

    मी खोकल्यावरील गोळ्या घेण्यासाठी एका औषधाच्या दुकानात गेलो. दुकानदाराला म्हणालो मला 2 गोळ्या दे ! त्याने मला 5 गोळ्यांच पाकीट दिल आणि पैसे सुट्टे नसल्याच कारण पुढे केलं. मी त्या गोळ्या घेणच नाकारल आणि निघून आलो. मला दोन गोळ्यांची गरज असताना मी पाच गोळ्या विकत घ्याव्याच का ?

  • मोरूचा बाप, मोरुला म्हणाला

    मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’

  • एका दिवसाची कहाणी – सोनेरी किरणे

    नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड पडलेले होते. बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून पडले असावे. गेल एकदाच हे ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी हे झाड हिरवेगार होते. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, लाल बत्ती वर चार्टर बस थांबली कि कित्येक बाबू खिडकीतून हात लांब करून, झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्याचा प्रयत्न करायचे. काही चक्क बस वर चढून, फांद्या तोडायला कमी करायचे नाही. अर्थातच, दातून साठी. बस थांबली असताना पक्ष्यांची किलबिल ही ऐकू यायची. पण वेळ सदा एक सारखा राहत नाही, काही वर्षांपूर्वी झाडाला वाळवी लागली. वाळवीने झाड पोखरून टाकले. एक-एक करून फांद्या गळून पडल्या. संसारापासून अलिप्त तपस्वी सारखे दिसायचे ते सुकलेले झाडाचे खोड. आज ते ही गेल. अचानक लक्ष्य त्याच जागेवर दीड-दोन फुट उंच एक कडू लिंबाच्या लहानश्या रोपट्याकडे गेले. अरेच्या हे कुठून आले, एका दिवसात रोपटे एवढे वाढत नाही. काही महिन्याचे हे निश्चित असेल. झाडाच्या सावलीत वाढणाऱ्या या रोपट्या कडे आपले लक्ष कसे गेले नाही. झाड गेल्याचे दुख कुठच्या कुठे पळाले. काही वर्षात ह्या रोपट्याचे ही मोठे झाड होईल. एक मोठ्या बहरलेल्या झाडाचे चित्र डोळ्यांसमोर तरळले. आनंदाने युरेका-युरेका म्हणत जोरात ओरडायचे वाटले. पण काय करणार, सभ्यतेच्या बुरख्यात राहणार्यांना, आनंद ही मोठ्याने ओरडून व्यक्त करता येत नाही.

    जीवन पार्कच्या स्थानकावर बस थांबली, बस मधून उतरून घराकडे पायी चालत जाऊ लागलो. एका गल्लीत घराबाहेर खाटेवर एक म्हातारी झोपलेली दिसायची. आजकाल तिच्या सोबत दीड-दोन वर्षाची एक चुणचुणीत पिटुकली, बहुतेक तिची नात असावी सोबत खेळताना दिसायची. कालचीच गोष्ट, त्या गल्लीतून जाताना, ती पिटुकली आपल्या हातातले बिस्कीट म्हातारीला दाखवत म्हणत होती, दादी, आप भी लों ना चीजी (खाऊ). तिची दादी प्रेमाने तिच्या डोक्यावर फिरवीत म्हणाली, आपने खा लिया न, समझो मेरा पेट भर गया. अचानक पिटुकलीचे लक्ष्य माझ्या कडे गेले, हातानी बिस्कीट उंचावत आनंदाने ती म्हणाली, चीजी (खाऊ) आणि दुडदुड धावत धावत घरात गेली. मला हसूच आले, म्हातारीकडे पहिले. अस्ताचलच्या सूर्याचे सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिचे डोळे बंद होते. तिचा चेहरा संतुष्ट, शांत आणि आनंदी दिसत होता. काही क्षण मी तिला पाहतच राहिलो. अचानक एका आवाजाने तंद्रा भंग झाली. अंकल क्या हुआ, एका दहा एक वर्षाच्या मुलाने विचारले. कुछ नहीं, म्हणत मी तिथून पाय काढला. आज त्या गल्लीतून जाताना सदानकदा घरा बाहेर असलेली खाट दिसत नव्हती. त्या जागी घरा बाहेर एका सतरंजीवर पांढऱ्या वस्त्रात आणि पडलेले चेहरे करून लोक बसलेले दिसले. काय झाले असावे मला याची कल्पना आली. पण घरात काय घडले याची कल्पना इवल्याश्या पिटुकलीला कशी असणार. ती नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट घेऊन इकडे तिकडे दुडदुड धावत होती. तिचे लक्ष्य माझ्याकडे गेले, हातातले बिस्कीट दाखवत म्हणाली, अंकल, चीजी लोगे, मला राहवले नाही, तिच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणालो, आप के लिये है चीजी, आप ही खाओ. तेवढ्यात तिची आई बाहेर आली, तिने तिला उचलले आणि घरात नेले. मी पुढे निघालो. न जाणे का, डोळे पाण्याने डबडबले. डोळ्यावरून चष्मा काढला आणि रुमालाने डोळे पुसले. सहज वर आकाशात बघितले, अस्ताचालच्या सूर्याचे सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती. मनात म्हंटले, उद्या उगविणाऱ्या सूर्याची किरणे ही सोनेरीच असणार. संहार आणि सृजनाची दोन्हीची साक्षी ही सोनेरी किरणे.

  • चर्चेच गुऱ्हाळ

    सकाळची वेळ होती, गार वारं सुटलं होत. कॉलनीला झोपेतून पूर्ण जाग आलेली नव्हती. दाराशी उभे राहून इकडे तिकडे पाहत असतानाच पेपरवाला आला.

  • नंदराज जटयात्रा – भाग 3

    बाराव्या दिवशी यात्रा ३०४९ मी. उंचीवरील गरोली पाताळ या ठिकाणी येते. हे अंतरसुद्धा १०-११ कि.मी. आहे. तेराव्या दिवशी यात्रेकरू कैलगंगेत स्नान करतात व 'पातरनचौनिया' या मुक्कामाकडे प्रस्थान करतात. हे अंतर १२ कि.मी. असून वाट अवघड व चढणीची आहे. पातरनचौनियाची उंची ३६५८ मी. आहे.

    कोणतीही यात्रा ही संस्कृतीचे, रितीरिवाजाचे दर्शन आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वरी चरणी लीन होण्यात मिळणारे सुख, समाधान व आनंद अवर्णनीय असतो. यालाच आपण परमेश्वराची कृपा म्हणतो. पण काहीवेळा उलटे चित्र दिसते. अशा अनेक कथा गोष्टीतून, लोकगीतातून ऐकायला मिळतात. ही अशीच एक कथा आहे चौदाव्या शतकात कनोजचा राजा यशधवल आपल्या गर्भवती पत्नीसहित या यात्रेत सहभागी झाला. त्याच्याबरोबर सैन्य व नृत्यांगना पण आल्या होत्या. हरिद्वार-ऋषीकेशमार्गे ते वाणला पोहोचले व यात्रेत सहभागी झाले. प्रचंड थंडी व श्रम विसरण्यासाठी त्यांना मद्यपानाची लहर आली. सर्वजण मद्यधुंद झाले. नृत्यांगना नाचू लागल्या. व्यभिचार सुरू झाला. यात्रेचे पावित्र्य संपले.

    भाविक नाराज झाले. राजाला सांगणार तरी कोण? या व्यभिचारी व भ्रष्ट आचरणाने नंदादेवीचा कोप झाला. नृत्यांगनांचे रूपांतर दगडात झाले. आजही या ठिकाणी मोठे मोठे दगड विखरून पडलेले दिसतात. या ठिकाणचे नाव निराली धार होते ते बदलून पातर नचौनिया (वेश्यांचे नृत्यस्थान) असे पडले.

    यात्रा पुढे चालू लागली. पण आलेल्या अनुभवाने सैनिकांना शहाणपण आले नाही. त्यांचे कामुक चाळे सुरूच होते. नंदादेवी रूष्ट झाली. निसर्गाने आपले रूप बदलले. यात्रा रूपकुंडला पोहोचली. पाऊस सुरू झाला. प्रचंड वादळ सुरू झाले. हिमपात सुरू झाला. पाहता पाहता सर्व सैन्य बर्फात गाडले गेले. आता फक्त त्यांचा आक्रोश कानी येत होता. काही वेळाने सर्व काही शांत झाले. भेदरलेले लोक तसेच स्तब्ध उभे होते. काय होत आहे, ते समजतच नव्हते.

    क्रुद्ध नंदा शांत झाली. निसर्ग शांत झाला. निसर्गाचे हसरे रूप सर्वांना सुखावत होते. या मार्गावर वैतरणाकुंड म्हणून छोटे सरोवर आहे. सरोवराच्या काठावर नंदादेवीचे मंदिर आहे. या ठिकाणी यात्रेत मोक्ष पावलेल्या भाविकांना पिंडदान केले जाते. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते.

    चौदाव्या दिवशी यात्रा १६५०० फूट उंचावरील रूपकुंडला पोहोचते. हा मार्ग पूर्ण चढणीचा व बिकट आहे. नंदा व शिवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी! सर्व परिसर हिमाच्छदित! सरोवराचे पाणीसुद्धा बर्फाळ! पण सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघतात. आत्मशांतीचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. स्वर्गीय आनंदाची सर्वांना अनुभूती होत असते. रूपकुंडजवळ नंदादेवीची व मेंढ्याची पूजाअर्चा होते. आरती होते. प्रार्थना होतात. प्रसाद वाटला जातो. सर्वजण आपले प्रतिबिंब सरोवराच्या पाण्यात पाहतात व शरीर देवतेला वंदन करतात.

    या सरोवराच्या परिसरात व सरोवरात मानवी सांगाडे व हाडे मिळाली आहेत व अजूनही मिळतात. १९५५ साली काही अलंकारही या परिसरात मिळाले. यामुळे सर्व जगाचे लक्ष या सरोवराकडे वेधले गेले. खूप संशोधकांनी संशोधन केले. लेख व पुस्तके प्रसिद्ध झाली. १९५६ साली ही हाडे संशोधनासाठी अमेरिकेला पाठवली होती. डॉ. ग्रिफन यांनी निरनिराळ्या कसोट्या व कार्बन परीक्षणाद्वारे ही हाडे ५०० ते ६०० वर्षांपूर्वीची असावीत असे निदान काढले. पण ही हाडे व सांगाडे कुणाची आहेत व ती इथे कशी आली हे आजही समजलेले नाही. हे गूढ आजही उकललेले नाही. या सरोवराबद्दल बीबीसीने सुद्धा माहितीपट बनवले आहेत. जगात आज हे सरोवर 'लेक ऑफ मिस्ट्री' म्हणून ओळखले जाते.

    पंधराव्या दिवशी यात्रा १७५०० फूट उंचीवरील ड्यूरांगली धार व शैलसमुद्र ग्लेशिअर ओलांडून होमकुंडला पोहोचते. हा या यात्रेतील अखेरचा व सर्वांत उंचीवरचा अवघड टप्पा आहे. प्रचंड वारा व थंडी, बेभरवशाचा निसर्ग! या सर्वावर नंदादेवीवरील प्रेम व श्रद्धा मात करते. हा दिवस नंदाष्टमीचा असतो.

    होमकुंडापाशी श्रीयंत्राची व नंदाचे प्रतीक असलेल्या मेंढ्याची पूजा व आरती होते. यापुढे नंदा सर्वांना सोडून एकटीच आपल्या पतीच्या घरी जाणार असते. तिची जाण्याची वाट फक्त तिलाच माहिती आहे. मेंढ्याच्या पाठीवर नंदाचे अलंकार, वस्त्रभूषणे, भेटी, खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. नंदालापण माहेरचा विरह सहन होत नसतो. सर्वांचे डोळे भरून येतात. नंदा आपली वाटचाल सुरू करते. परत परत थांबून ती मागे वळून बघत असते. शून्य नजरेने सर्वजण हात जोडून उभे असतात. दूर जाणाऱ्या मेंढ्याकडे पाहत असतात. दूरवर लहान होत जाणारी ही आकृती शेवटी अदृश्य होते. अश्रूंचे बांध फुटतात. सर्वांचे सर्वकाही हरवलेले असते. नंदा आता परत कधी भेटणार हे फक्त नंदालाच माहीत आहे. सर्व वातावरण हृदयस्पर्शी झालेले असते.

    गढवाल व कुमाऊँमध्ये नंदादेवी हे लोकमान्य दैवत आहे. खूप गावात नंदादेवीची मंदिरे आहेत. राजघराण्यांनीसुद्धा नंदादेवी हे आपले कुलदैवत मानले आहे. नंदादेवीला काली, कालिका देवी, पार्वती, शाकंबरी, चंद्रवदनी इ. नावांनीसुद्धा ओळखले जाते. नंदादेवीच्या कोणत्या न कोणत्या रूपाचे पूजन उत्तराखंडामध्ये कायम सुरू असते. विशेष उत्सव हा नंदाष्टमीला व नवरात्रात खूप उत्साहात साजरा केला जातो. नंदा ही आदिशक्ती आहे. ती उमा आहे. दुर्गा आहे. पार्वती आहे. शिवशक्ती आहे. अशा नंदाच्या सासरी पाठवण्याच्या यात्रेत सहभागी होण्याची संधी फक्त भाग्यवंताला, पुण्यवंताला लाभते. ही यात्रा धार्मिक, रोमांचकारी, साहसी व अत्यंत प्रतिष्ठेची आहे. पण ही यात्रा कधी सुरू झाली याचे नीट संदर्भ मिळत नाहीत. १५ व्या शतकात चंदराजा अजयपाल याने ही यात्रा सुरू केली असे सांगतात. काही लोकगीतांच्या आधारे ६ व्या शतकात ही यात्रा सुरू झाली असा निष्कर्ष निघतो. तर काही लोकगीते सांगतात की नवव्या शतकात चांदपूर गढीचा राजा शालीपाल याने आपले राजगुरू नौटियाल यांच्या गावी म्हणजे नौटी या ठिकाणी आपल्या इष्टदेवीचे म्हणजे नंदादेवीचे श्रीयंत्र स्थापन करून मंदीर बांधले व पूजेचे सर्व हक्क त्यांना देऊन या यात्रेचे सर्व नियम सांगितले. तसेच यात्रेची रूपरेषा ठरवली. त्यावेळपासून या यात्रेचे आयोजन नौटीहून केले जाते. नौटीच्या यात्रा कमिटीकडे २०० वर्षापासूनचा या यात्रेचा इतिहास उपलब्ध आहे.

    आध्यात्मिक चेतना, सांस्कृतिक विरासत यांचे प्रतीक असलेली ही नंदराज जट यात्रा म्हणजे विशाल हिमालयाचे सुरम्य दर्शन घडवणारी हिंदू धर्मावरील श्रद्धा व विश्वास प्रगट करणारी यात्रा आहे. एकवीस दिवसात जवळजवळ २८० कि.मी. अंतर प्रतिकूल वातावरणात सुद्धा होणारी ही पदयात्रा जगातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा असेल. या यात्रेवर सुद्धा बीबीसीने माहितीपट बनवले आहेत. ही यात्रा हिमालयाच्या दुर्गम पर्वतराजीतील महाकुंभ म्हणून सुद्धा ओळखली जाते.

    आजपर्यंत या यात्रेच्या आयोजनाचा निश्चित असा काळ नव्हता. विसाव्या शतकात ही यात्रा १९०५, १९२५, १९५१, १९६८, २००० साली आयोजित केली होती. १९६८ सालची यात्रा प्रतिकूल हवामानामुळे पूर्ण होऊ शकली नाही. हल्लीच्या काळात १८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१४ या दरम्यान या यात्रेचे आयोजन केले होते. आता मात्र कुंभमेळ्याप्रमाणे दर बारा वर्षांनी या यात्रेचे आयोजन करण्याचा एक प्रस्ताव यात्रा कमिटीपुढे आहे.

    नंदादेवी हे उत्तराखंड राज्यातील लोकदैवत आहे. नंदादेवी हा पार्वतीमातेचा अवतार असेच तिचे रूप पाहिले जाते. तिने हिमालयाची पत्नी 'मेना' हिच्या उदरी जन्म घेतला म्हणून तिला शैलपुत्री असेही ओळखले जाते. उत्तराखंडातील लोक तिला आपल्या मुलीसारखे मानतात. नौटी, चांदपूर, करूड, कुलसारी, हेलंग, लाट, निती इ. ठिकाणी नंदादेवीची पुरातन मंदिरे आहेत. भारतातील हिमालयाचे सर्वोच्च उंचीचे दुसरे शिखर नंदादेवी म्हणून ओळखले जाते.

    पण भारतात इतरत्र कुठेही नंदादेवीची मंदिरे पहायला मिळत नाहीत. पुराणानसुद्धा नंदादेवीचे उल्लेख कुठेही मिळत नाहीत. तसेच नंदादेवीच्या मूर्तीसुद्धा कोणत्याही पुरातन मंदिरात दाखवल्या जात नाहीत. मथुरेत आढळलेल्या काही देवीच्या मूर्तीपैकी एक मुर्ती 'एकनांश' देवी म्हणून दाखवली जाते. काहींच्या मते हीच देवी नंदादेवी म्हणून ओळखली गेली. तर काहींच्या मते मथुरेत जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा योगमायेने गोकुळात नंदराजाच्या पोटी जन्म घेतला. भगवंताने वसुदेवाला दोघांची अदलाबदल करायला सांगितली. त्याप्रमाणे वसुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळात ठेवून नंदपुत्रीला मथुरेला घेऊन आला. जेव्हा कंस या मुलीला मारायला आला तेव्हा ती कंसाच्या हातून सुटली व तिने आपले मूळ स्वरूप प्रगट केले. योगमायेचे हे रूप म्हणजेच नंदादेवी! तर काही लोककथा सांगतात की नंदा ही अल्मोड्याच्या चांद घराण्यातील राजकन्या होती.

    एकूणच नंदादेवी या देवतेबद्दल नीट माहिती किंवा तिचे माहात्म्य समजत नाही. काहीही असो, श्रद्धेपेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही.

    नंदादेवी गढवाल-कुमाऊँ क्षेत्रात इष्टदेवी म्हणून पुजिली जाते. तिचे जागर साजरे केले जातात. काही मिळालेल्या ताम्रपटावरून कत्युरी राजाची ही इष्ट देवता होती, असे स्पष्ट होते. आजही गढवाल-कुमाऊँमध्ये भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात गावोगावी, घरोघरी नंदादेवीचे उत्सव साजरे होतात. सलग सात दिवस हा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी नंदाचे माहेराविषयीचे प्रेम व सासरी जाताना होणारे दु:ख गाण्यातून प्रगट केले जाते. हे ऐकताना लोक विशेषत: स्त्रिया व मुली खूप भावनाविवश होतात. हा जागर ‘भित्तलपत्ती' म्हणून सुद्धा ओळखला जातो.

    नंदादेवी व हिमालयाच्या दुर्गम भागात १५-२० वर्षांनी होणारी ही नंदराज जाट यात्रा खूपजणांना माहीतही नाही. पण संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा सर्वांना समजला पाहिजे, म्हणूनच हा प्रपंच!

    -प्रकाश लेले

  • माझा बालवाडीत प्रवेश

    छे हो मला बालवाडी हे माहित नव्हते. पाच वर्षे पूर्ण झाली की थेट पहिल्या इयत्तेत. आणि पु. ल. यांच्या भाषेतील पालक केजी वगैरे काही नव्हते. चार मैत्रीणीसोबत शाळेत जायचे आणि यायचे. रडले नाही कधीच. पण नोकरी करत असताना मात्र बालवाडीत बसण्याची संधी मिळाली होती ती अशी. माझी नगर परिषदेची शाळा. त्यामुळे पहिल्या इयत्तेत मुलांना प्रवेश मिळणे सोयीचे व्हावे आणि शाळेची सवय व्हावी म्हणून बालवाडी सुरू करण्यात आली होती. ती ही बऱ्याच वर्षांनी. एकदा एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन शाळेत आले. बालवाडीत नांव घातले. आणि सांगितले की या मुलाची आई मानसिक दृष्ट्या बरोबर नाही म्हणून तो घाबरतो. मोकळ्या पणाने रहात नाही आणि हट्टी स्वभाव आहे त्याचा. हात जोडून विनंती करतो की कृपया त्याला समजून घ्या आणि रागवू नका. ते स्वतः निवृत्त शिक्षक होते. पहिल्याच दिवशी वर्गात गेला मी सोबत होते त्याच्या. आणि माझा मुलगाही त्याच बालवाडीत होता म्हणून मी त्याला मुलाकडे जा असे सांगितले. पण तो माझा पदराला घट्ट धरून उभा होता. पद्धतीप्रमाणे मुलांनी नवीन मित्र आला आहे म्हणून टाळ्या वाजवल्या तरीही तो ढिम्म जागचा हलला नाही. आणि कावराबावरा झाला घाबरून थरथर कापत डोळे भरून आलेले. मला समजले की याची काय अवस्था आहे. त्यामुळे मी त्याला घेऊन मुलांच्या रांगेत सतरंजीवर त्याला जवळ घेऊन बसले. तसा तो शांत झाला. आता शिक्षिकेची परिस्थिती बिकट झाली. कारण मुख्याध्यापिका खाली मुलात बसल्या आहेत. त्यामुळे त्याच गोंधळून गेल्या. मग मुलांच्या मधल्या सुट्टीत एकत्रित जेवण. गाणी. गोष्टी यात रमला आणि मी हळूच बाहेर पडले. शाळा सुटायची वेळ झाली होती म्हणून. त्याचे आजोबा आले तेही वेळेपूर्वीच. काळजीनं घामाघूम झाले होते म्हणून मी त्यांना घेऊन बाहेरुन नातवाला दाखवले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला होता.

    नंतर त्यांनी वर्ग शिक्षिकेला विचारले होते की काय जादु केली तुम्ही आता तो रोज शाळेत जायला लवकरच तयार होतो. बाईंनी सांगितले की माझी नाही मु. अ. बाईंची जादू आहे ही आणि सगळे सविस्तर माहिती दिली. आजोबांना जे वाटले होते ते त्यांना बोलून दाखविता आले नाही पण त्यांच्या डोळ्यातील पाण्याची भाषा मला समजली. त्यामुळे मला बालवाडीत प्रवेश मिळाला याचा जास्त आनंद झाला. एका अंकुरणाऱ्या छोट्याश्या जीवासाठी मी काही तरी करु शकले. पण आता अंगणवाडी बालवाडीत मुलांना रमण्यासाठी खूप खेळणी असतात. प्रशिक्षण घेतलेल्या बाई टिचर. मदतनीस. रिक्षा. पालक यांची मदत असते. हे सगळे पाहून वाटत की आमच्या काळी का नव्हते हे. असो काही का होईना बालवाडीत मुलांच्या समवेत एक दिवस घालवला तिथे.

    -- सौ. कुमुद ढवळेकर.

  • सिंह आणि चर्मकार

    फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.