नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
इयत्ता नववी मध्ये ८६% मिळवून सईने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला.राणीला एवढ वाईट वाटलं नव्हत तसं, कारण नववीच्या वर्षाचा शेवटचा गणिताचा पेपर तिला खूप कठीण गेला होता तेपण फक्त एका गणितामुळे.
झाड म्हणजे… पाखरांची वसाहत! झाडं म्हणजे हिरवळ! जीवन प्रसन्न करणारा निसर्गातील एक अविभाज्य घटक…! रेल्वेत बसल्यावर झाडं पळताना दिसतात… मुलांसोबत खेळताना दिसतात… माणसांसोबत जळतांना दिसतात जसे वळविले तसे वळतानाही दिसतात…झाडं! पानांसोबत गळतांना दिसतात कधी झाडं.. सर्वांसोबत रुळताना दिसतात झाडं पण माणसांसारखी मळतांना दिसत नाही कधीच झाडं …पण माणसांसारखी मळतांना दिसत नाहीत कधी झाडं…..!!

माझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत .
शुभा आणि शाम बड़ोदा सोडून मुंबईत स्थाईक झाले. दोघांचा राजा राणीचा संसार सुरु झाला. दोघही आपल्या आई वडिलांची एकुलत एक अपत्य होती. दोघांची घर बडोद्याच्या दोन टोकाला होती.
एक जंगल होते. जंगलात अनेक प्राणी राहत होते. वाघ, कोल्हा, लांडगा, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य तिथे होते. एके दिवशी कोल्हा जंगलात फिरत असताना खूप जोरात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. कोल्हा घाबरला. पळत सुटला.
एक माणूस स्वच्छतेचा फारच भोक्ता होता. मात्र त्याचा अतिरेक एवढा वाढला की, या स्वच्छतेच्या नादापोटी त्याला सगळ्या गोष्टी अमंगळ वाटू लागल्या. घरामध्ये दैनंदिन कामे करताना जी अस्वच्छता व्हायची तिलाही तो कंटाळला व एके दिवशी स्वतःचेच घर सोडून तो दुसऱ्या गावी गेला. परंतु तेथेही त्याला जिकडेतिकडे घाण दिसू लागली म्हणून तो जंगलात गेला. तेथे एका झाडाखाली बसला असता पक्ष्यांनी वरून त्याच्या अंगावर घाण केली. जंगलही घाण म्हणून तो मनुष्य नदीवर गेला. नदीतील पाण्याचा प्रवाह संथ होता म्हणून तो त्याच्यात पाय सोडून बसला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की, त्यातही घाण पाणी आहे व त्यामुळे आपले पाय खराब झाले आहेत.
जिथे जाईल तेथे घाण या कल्पनेने तो फारच वैतागला व जगण्यात काही अर्थ नाही म्हणून त्याने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने होळी पेटविली. त्या होळीत तो शिरणार तेवढ्यात आजूबाजूला राहणारे काही लोक तेथे आले. त्यांनी त्या माणसाला विचारले की, हे काय चालले आहे? त्यावर तो माणूस म्हणाला, घाणीला वैतागून मी जीव देत आहे. त्यावर ते लोक म्हणाले, तू जाळून घेतले तर येथे किती घाण सुटेल? आम्ही जवळच राहतो. आम्ही जायचे तरी कोठे? तो मनुष्य पुन्हा वैतागला व म्हणाला, “या जगात सगळीकडेच घाण दिसते; मग मी एकट्याने मरून ही घाण दूर होईल असे वाटत नाही.”
त्याने थोडा वेळ विचार केला. जगात घाण जरी असली तरी इतर बऱ्याच गोष्टी चांगल्याही आहेत, असा विचार करून तो आपल्या घरी निघाला.
काही वेळाने जोरदार पाऊस सुरू झाला. सगळीकडे चिखल झाला. त्या चिखलातून तो वाट काढीत निघाला. त्यामुळे तो पुन्हा वैतागला होता. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि समोर त्याचे लक्ष गेले. आकाशात छान इंद्रधनुष्य तयार झाले होते. चिखलात थांबूनच इंद्रधनुष्य पाहताना त्याचे भान हरपून गेले होते. आता त्याला चिखलाचे काहीच वाटत नव्हते. कारण त्याने आपले मन कधीच स्वच्छ करून घेतले होते. त्या चिखलातच तो आनंदाने वाट तुडवित आपल्या घरी गेला.
तेजस्वी कोहिनूर आणि मोहक थेम्स ह्यांच्या आठवणीतच प्रसन्न सकाळ उजाडली. फ्रेश होवून निलेशच्या रूम मध्ये आले. उमेशसुद्धा माझ्या फ्लॅटवरून तोपर्यंत आला होता. चहा नाश्ता करताना पुढचं प्लॅनिंग सुरू झालं.
दिल्लीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्राचा चित्ररथ करण्याची अनेक वर्षे संधी मिळाली. त्यात अकरा वेळा सर्वोत्कृष्ट चित्ररथाबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली.
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
जळतं आहे प्रजासत्ताक आणि मी जिवंत आहे त्या आगीच्या झळया खात
मेले आहेत माझे मित्र आणि माझं आयुष्य बनलंय एक आफत.
माझ्या मातेचा पदर भिजलाय रक्तानं आणि अश्रूंनी
माझी प्रियतमा आणि माझे लोक वाहून गेलेत, जळून गेलेत
मी कसा वेड्यासारखा म्हणतोय, अजूनही ते दिवस येतील
डोंगराला वेढणारा प्रकाश आगीचा नसेल, सूर्याचा असेल…
Copyright © 2025 | Marathisrushti