नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या पाण्यात लपून बसायचे. श्यामरावांच्या या भित्रेपणाला तळ्यातले मासे, कासव हसायचे. ‘भित्रे मंडुकराव’ म्हणून चिडवायचे. रामने श्यामला भिऊ नको म्हणून खूप वेळा सांगून पाहिले. पण त्याचा काही उपयोग होईना. तळ्यातले इतर जलचर राम बेडकाला म्हणायचे, ‘माणूस लोकात मुलांनी भिऊ नये म्हणून त्यांना हनुमान चाळीशी म्हणायला शिकवतात. तसा हा राम बेडूक श्यामला ‘मंडुकोपनिषद” शिकवतो.
काही माणसं ‘हृदयात’ घर करतात तर काही ‘मनात’ घर करतात… गणेशने मात्र त्याची गाणी ऐकणारांच्या ‘कानात घर’ केलंय.
वैधानिक इशारा : या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही !
कधी कधी आपल्या आयुष्यात अगदी सहजपणे एखादी फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला मिळून जाते. मी असा सुखद अनुभव अनेक वेळा घेतला आहे. त्यातलाच एक अनुभव सांगतो. एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला गेलो होतो. दुपार रिकामी होती. सहजच संगीतकार आनंद मोडकांना फोन केला. त्यांच्यामुळेच 'प्रभू-मोरे' ही हिंदी भजनांची कॅसेट कशी बनली ते यापूर्वीच सांगितले आहे. पण त्यांच्याबरोबर मी कोणतेच काम केले नव्हते. माझा फोन घेताच ते म्हणाले, 'अरे काय योगायोग आहे बघ? तुलाच फोन करणार होतो तर तुझाच फोन आला. ठाण्याहून लगेच निघ आणि पुण्याला येऊन मला तातडीने भेट.' 'अहे, मी पुण्यातच आहे,' मी म्हणालो. 'मग ताबडतोब माझ्या घरी ये की लेका!' आनंद मोडकांचे बोलणे नेहमी असेच असायचे. मी त्याला नाव ठेवले होते. प्रेमळ दटावणी. तेव्हा त्यांच्या या प्रेमळ दटावणीनंतर तात्काळ त्यांच्या घरी गेलो.
“मी या दिवाळीत प्रकाश गीतांवर आधारित नक्षत्रांचे देणे करतोय. त्यात तुला गायचे आहे.'
मला भानावर यायला काही मिनीटे लागली. झी मराठीवर होणारा 'नक्षत्रांचे देणे' हा गाण्याचा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आपल्याला गाणे मिळावे अशी अनेक दिवसांपासूनची माझी इच्छा होती. माननीय श्रीरंग गोडबोले यांच्या 'इंडियन मॅजिक आय' या कंपनीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन होत असे. या संदर्भात श्रीरंग गोडबोले यांची माझी भेटही झाली होती. कै. सुरेश भट यांच्या गझलवरील कार्यक्रमात मी गाणार होतो, पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र या कार्यक्रमात गाण्यासाठी मी कोणताच प्रयत्न केला नव्हता आणि आता आनंद मोडक या कार्यक्रमात गाण्यासाठी मला बोलावत होते. मी आनंदाने चक्क रडायला लागलो.
“अरे, झालं तरी काय? सगळं ठीक आहे ना? मग असा रडतोस काय?” आनंद मोडकांची प्रेमळ दटावणी सुरू झाली. मी त्यांना काय " सांगणार? पण त्यांनी सर्व जाणले. मला पुन्हा दटावणीच्या स्वरात म्हणाले,
“अरे, आता संगीतक्षेत्रातील ज्या पातळीवर तू काम करतो आहेस ना, तिथे खूपच मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धात्मक पातळीवर काम करण्यासाठी खंबीर मनाने तयार हो. प्रत्येक ठिकाणी यश मिळेलच असे नाही. कधी कधी अपयशही पचवता आले पाहिजे. चल आता पटपट गाणी लिहून घे. प्रकाशाचे, दिव्यांचे वर्णन करणारी सगळी गाणी निवडली होती. अनेक रिहल्सलनंतर शेवटची ग्रँड रिहल्सल पुण्याला झाली. २४ ऑक्टोबर २००३ रोजी 'प्रकाशोत्सव' हा कार्यक्रम मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पहाटे सहा वाजता सुरू झाला. माझ्याबरोबर गायक कलाकार म्हणून रवींद्र साठे, उत्तरा केळकर, सुरेश बापट, मधुरा दातार आणि जयश्री शिवराम यांनी गाणी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि स्वाती चिटणीस यांनी केले. अगोदरच सांगितल्याप्रमाणे श्रीरंग गोडबोले आयोजित कसलीही काटछाट न करता हा संपूर्ण कार्यक्रम 'नक्षत्रांचे देणे प्रकाशोत्सव' या शीर्षकाने ऐन दिवाळीत झी मराठीवर दाखवण्यात आला. या कार्यक्रमाने माझ्या लोकप्रियतेत खूपच मोठी भर घातली. टेलिव्हीजन माध्यमाचा प्रचंड प्रभाव जनमानसात आहे. आजही आमच्या म्युझिक अॅकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी आईवडील मुलांना घेऊन येतात. तेव्हा विचारतात, “आमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्यासारखा टीव्हीवर गाताना कधी दिसणार?” त्यांना मी नेहमी सांगतो की एखादा कलाकार केवळ टीव्हीवर गाताना दिसला की तो मोठा कलाकार होत नाही. गाण्याचा रियाज, त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत याला दुसरा पर्याय नाही. एकदा तो कलाकार चांगला गायला लागल्यावर तो एकदा का, अनेकदाही टीव्हीवर गाणे सादर करेल. पण अनेकांना झटपट लोकप्रियता हवी असते आणि मग त्यांच्या पदरी निराशा येते. मग या क्षेत्रातील राजकारण, वशिलेबाजी, स्पर्धा यावर खापर फोडले जाते. हे सगळे करण्यापेक्षा गाण्याकडे आनंद मिळण्याचे साधन म्हणून पाहिले पाहिजे. त्यातून मिळणाऱ्या पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा त्यातून मिळणारे समाधान, आनंद हा केवळ अवर्णनीय आहे. पण तो जे कलाकार गाण्याची साधना करतात त्यांनाच मिळतो.
- अनिरुद्ध जोशी
हा एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग. गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने गांवमामा झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय प्रेमळ …..
संध्याकाळी एका हॉलमधे जमून, आमच्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात लहान अशांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आमच्या बॅचमधील एकूण तिघांपैकी, जे PSI झाल्यावरही पुढे स्पर्धा परीक्षा देऊन, आय पी एस होऊन Additional Director General of Police या अतिउच्च पदावरून निवृत्त झाले, त्यापैकी उपस्थित दोन, त्याचप्रमाणे बॅचमधील पदक विजेते अधिकारी, यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यानंतर हॉटेलच्या lawn वर टेबल्स लाऊन snacks, Karaoke, गप्पा, थट्टामस्करी, रात्रीचे जेवण इ. ११.३० पर्यंत चालले.
कर्म करताना त्याचे पडसाद भविष्यात काय होणार याची सुचकता जर जाणून ते कर्म सावधानतेने केले तर परमार्थात समाधान प्राप्त व्हायला सोप्पे जाते. कर्मच जर अपचनीय केले, दुसऱ्यास त्रास होणारे केले, कोणाच्या हातचे घास पळवून स्वार्थ साधणारे केले तर परमार्थात मोक्ष मिळण्याची आशा धूसर होते.
दिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते.
मित्रा, २०१७ मी तुझा फार फार आभारी आहे..तू मला खुप काही दिलंयस.. गुडबाय, तू परत येणार नसलास, तरी माझ्या मनात सतत जिवंत असणारायस..!

IC131 दिल्ली मुंबई विमान सांताक्रूझ विमानतळा वर उतरत होते. संगीता, आजी, व विजय स्वागत कक्षातून विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रयेक प्रवाशाकडे आतुरतेने पाहात होते.
Copyright © 2025 | Marathisrushti