(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • आठवणी गावाकडच्या..।

    ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

  • दिवाळी अंक

    लाडू-करंज्या-शंकरपाळी-उटणं-मोती साबण आणि दिवाळी अंक एवढ्या भांडवलावर मराठी मध्यमवर्गीयांची दिवाळी हमखास आनंदातच जायची.दिवाळी अंक वाचणारे लोक ‘सांस्कृतिक’ समजले जायचे. बऱ्याच अंशी ते खरंही होतं. दिवाळी अंक काढणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना किमान ‘समज होती. आता कुणीही उठून चार जाहिराती, हौशी बोरुबहाद्दरांचा मजकूर जमवतो आणि संपादक अमुक तमुक, असं बिरुद मिरवत दिवाळी अंक काढतो.

  • झाडावारले निर्माल्ये !

    रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने, हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध रंगांची अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव यांची भेट झाली. हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते. माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो.

    ” काय पूजेसाठी फुले गोळा करीत आहात वाटते? परंतु ही फुले देवाला कशी चालतील? “ माझ्या विचत्र वाटणाऱ्या वाक्याने त्यांना एकदम आश्चर्य वाटले. काहींच उलगडा न झाल्यामुळे त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ विचारला. मी म्हणालो ” थोड्या वेळापूर्वी मी समोर बसून मानस पूजा केली होती. ही सारी उमललेली टपोरी फुले स्पर्श न करता, त्या ईश्वराचे चरणी अर्पण केली. मनानेच वाहिली. आता माझ्या द्रीष्टीने ती निर्माल्य झालेली आहेत. ही फुले तुम्ही कशी देवाला वाहणार? “ विचित्र आणि न पटणारे. परंतु तर्कज्ञानाच्या विश्लेषणाने मान्य होणारे हे तत्वज्ञान. एकनाथरावनी क्षणभर विचार केला व ते किंचित हसले. ” मी पण मानस पूजेचा विचार करीन. कदाचत निसर्गाच्या फुलण्यातल्या आनंदात, मला पण सहभागी होता येईल.” असे काहींसे पुटपुटत ते निघून गेले.

    मला अचानक माझ्या अमेरिकेतील काही दिवसाची आठवण झाली. मी मुलाकडे गेलो होतो. अतिशय स्वछ आणि सुंदर वातावरण होते. मनाला प्रसन्न व आनंदित करणारे. मोठे व अरुंद सिमेंटचे रस्ते. मध्य भागात Devider असून रंगी बिरंगी फुलांनी सुशोभित केलेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गवताचे मखमली गालिचे असून विविध रंगांची मनोहर फुले फुलली होती. गुलाबांची टवटवीत मोठी फुले भरपूर प्रमाणात फुललेली होती. रस्त्याच्या कडेला आपल्यासारखी काश्मिरी गुलाबांची ताटवे ह्याचे मानस आश्यर्य वाटत होते. असे चित्र भारतामध्ये केव्हांच बघण्यात आले नव्हते. गुलाबाची टपोरी फुले, कुणाच्या घरातील बागेमध्ये किंवा एखद्या सार्वजनिक बागेमध्ये असतीलही. परंतु त्याच्यावर नजर ठेवणारे, निगा राखणारे असतीलही. अमेरिकेत कुणीही केव्हाही फुले तोडताना बघितले नाही. किंवा ” फुले तोडू नका ” ही सूचना देणारी, सूचनाफलक कोठेच दिसला नाही. इकडील सर्व सामान्या मध्ये ही जाणीव इतकी रुजली आहे कि कुणीही रस्त्याच्या कडेलगतची फुले सार्वजनिक बागेतील फुले किंवा घरातील फुले देखील झाडावरून काढीत नसतात. झाडावरच फुलाने उमलणे, बहरणे, आणि गळून पडणे ही नेसर्गिक प्रक्रिया त्यांच्यात घडताना दिसते.

    मला ठाण्यात सकाळी फिरावयास गेलो असताना जे दृश दिसत होते ते आठवले. बरीचशी वयस्कर मंडळी सकाळी फिरण्यास जाताना दिसते. काही घरामधली बागेमाधली जास्वनदिची, कन्हेरीची, पारिजातकाची, गुलाबाची वा इतर काही मोठी झाडे, घर कुंपणाच्या बाहेर फांद्या वाढून बहरलेली दिसत. कित्येक महाभाग हाताला येतील तेवढी सर्व फुले तोडून पिशवीत जमा करतात. त्यांना त्यात आनंद वा धन्यता वाटते. पुजेसाठी ती सर्व फुले कशी मिळतील हे बघण्यातच ती प्रयत्नशील होती. मला अद्याप कळले नाही कि आपण निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते. भावनेला जर विचाराची साथ मिळाली तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतील. ईश्वरावर नितांत श्रधा असावी हे सत्य आहे. त्याच्याशी जवळीक साधण्याच्या मार्गावर चिंतन व्हावे ही अपेक्षा.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पद्य आणि मृत्युविचार : भाग-४/११

    आधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात  मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्‍याच anthologies जपानीत आहेत.

  • रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

    आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल).

  • दर्जा

    मी त्यावेळी जपानच्या दौर्‍यावर होतो. भारत आणि जपानच्या सांस्कृतिक विभागांनी एकत्रितपणे त्याचं आयोजन केलं होतं. दहा-पंधरा दिवसांच्या कालावधीत हा देश भौगोलिकदृष्ट्या पाहणं शक्य होतं; पण सांस्कृतिकदृष्ट्या त्याचा परिचय होणं हे कठीण होतं. तरीही प्रयत्न सुरू होता. रोज किमान तीन भेटी असा कार्यक्रम असायचा. त्यातही प्रामुख्यानं संग्रहालये असत. काही भेटी मी भारतात असतानाच निश्चित केलेल्या होत्या अन् त्या ठरल्यावेळी पार पाडण्यावर तिथल्या लोकांचाही भर होता. आम्हा चौघा भारतीय पत्रकारांसाठी एका महिला गाईडची योजना होती. बुटकीशी पण लाघवी अन् भरपूर माहिती असणारी. चार दिवस होऊन गेले होते. हॉटेल ओतानी हे किती महागडं हॉटेल आहे, याची जाणीव झाली होती आणि विशेष म्हणजे या चार दिवसांत घरच्या जेवणाचं निमंत्रण कोणाकडूनही मिळालेलं नव्हतं. आता आपल्या गाईडलाच पकडायचं असं आम्ही चौघांनी ठरविलं. ‘‘आम्हाला तुझ्या घरी जेवायला यायचंय’’ असं स्पष्ट सांगितलं; पण ती सहजी तयार नव्हती. ‘‘मी माझ्या वतीनं तुम्हाला मेजवानी देते, बाहेर कुठे जाऊ,’’ असं तिचं म्हणणं होतं. जपानमध्ये पाहुण्यांना घरी बोलवायचा फारसा प्रघात नाहीये; अशी माहितीही तिनं दिली; पण आम्ही पिच्छा सोडायला तयार नव्हतो. अखेर संध्याकाळचं भोजन तिच्या घरी घ्यायचं ठरलं. ‘सुशी’ हा प्रकार तिनं केला होता. रॉ फिश असं त्याचं स्वरूप होतं. आमच्या जेवणाच्या तपशिलात जात नाही; पण त्यावेळी गप्पा चांगल्या रंगल्या. त्या ओघात तिनं सांगितलं की, मी राहते त्याच इमारतीत जपानची एक ज्येष्ठ अन् श्रेष्ठ कॅलियोग्राफर राहते. खूप छान आहे ती. तिचे अक्षरलेखन जपानच्या अभिमानाचा विषय आहे.म्हा चौघात एक चित्रकार होता सतीश गुप्ता. तो म्हणाला, ‘‘आपली भेट होईल? आता? आम्ही त्यांना भेटलंच पाहिजं. इतक्या जवळ आल्यानंतर तर ही भेट व्हायलाच हवी.’’ जपानमध्ये व्यक्तिगत जीवनाला, खासगी जीवनाला विशेष महत्त्व आहे. कोणीही कोणाला असं ऐनवेळी भेटत नाही अन् घरी तर सहसा नाहीच, असं बरंच काही सांगण्याचा आमच्या गाईडनं प्रयत्न केला; पण आमचा आग्रह मोठा होता. अखेर तिनं त्या अक्षरकलावंत महिलेला फोन करायचं ठरविलं. ती फोनवर बोलत होती तेव्हा आमची उत्सुकता ताणली गेली होती. भाषा कळत नव्हती; पण बहुधा काम झालं असावं, असं वाटत होतं. झालंही तसंच. ती म्हणाली, ‘‘आणखी वीस मिनिटांनी तुम्ही भेटू शकता असं म्हणालीय ती. खरंच हे आश्चर्यच आहे, की कोणी जपानी व्यक्तीनं इतक्या झटपट भेटीची वेळ द्यावी. पुढची वीस मिनिटे अन्य विषय बाद झाले. आम्ही त्या कलाकार महिलेचीच माहिती घेत राहिलो. वयाची सत्तरी तिनं पार केलेली आहे. तेव्हा तुमची भेट लवकर संपवा, अशी सूचनाही पुढे आली. अखेर आम्ही तिथं पोहोचलो.
    छोटंसं घर, त्यात दहा बाय बाराचा हॉल. त्यांनी मोठ्या आदबीनं अन् सुहास्य वदनानं स्वागत केलं. उंची फार तर चार फूट दहा इंच. रंग पिवळसर गोरा. चेहर्‍यावर तांबूस चट्टे. कमरेत थोडा बाक आलेला आणि स्वागतासाठी, बोलण्यासाठी थोडंस वाकणं. सत्तरी पार केलेली, थकलेली तरी उत्साहानं भरलेली मुद्रा. हॉलमध्ये एक आयताकृती पाट आणि त्यावर कागद ठेवलेले. त्याभोवती आम्ही बसलो. अक्षरकलेच्या गप्पा सुरू झाल्या. शब्द, त्यामागचा वेग, ब्रशचा आकार, कलाकाराची मानसिक स्थिती, या सर्वांचा अक्षरांवर होणारा परिणाम या तुलनात्मक नव्या विषयावर ही चर्चा होती. अक्षरं काढतांना त्यामागचा कलाकार काय असू शकतो, कसा असावा याची जाणीव होत होती. गप्पांच्या ओघातच ‘काहीतरी प्रात्यक्षिक दाखवा,’ असा आग्रह सुरू झाला. तसा तो होणारच याची त्या कलावतीला जाणीव असावी. तो पाट आणि त्यावरील कागद त्याचीच साक्ष होते. अवघ्या मिनिटाभरता तिनं ब्रशनं त्या कागदावर ओणवं होऊन अक्षरं काढायला सुरुवात केली. एखादी ओळ झाली, की तो कागद टर्रकन फाडला जाई. त्याचा बोळा कोपर्‍यात भिरकावला जाई. एक-दोन-तीन असे दहा-बारा बोळे कोपर्‍यात जमा झाले होते. त्यानंतर मात्र सहा कागद लिहून बाजूला ठेवण्यात आले. आधीच्या कागदात काय कमतरता होती कोण जाणे? पण हे सहा कागद मात्र देखण्या चित्रासारखे होते. शब्दांचा अर्थ कळत नव्हता, तरी त्यांचा भाव लक्षात येत होता. आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सूर्यदेवतेला केलेली ती प्रार्थना होती. ‘आता उठायला हवं,’ असं आमच्या गाईडनं सुचविलं; पण त्या उत्साहमूर्ती वृद्धेच्या ऊर्जा अनुभवण्यात एक वेगळाच आनंद होता. ‘‘हे जे अक्षरलेखन केलंय ते आम्हाला मिळेल का?’’ एकाच वेळी दोघांनी प्रश्न केला. हाप्रश्नही तिला अभिप्रेत असावा. ती म्हणाली, ‘‘हो, थांबा हं मी त्यावर माझं सील लावून देते.’’ एका अर्थानं त्या कलाकारानेआपल्या कलेविषयी समाधान पावल्यानंतर उठविलेली मोहर म्हणजे हे सील. या कलाकाराच्या दर्जा परिमाणाचा एक अविष्कार त्याला जपानमध्येच नव्हे, तर अन्यत्रही तेवढीच मान्यता. तिनं सील घेतलं खरं, पण त्यापैकी चार कागदांवरच ते उमटविलं.
    एकेक कलाविष्कार आमच्या हाती ठेवला. ‘‘...आणि ती उरलेली दोन?’’ आमच्यापैकी एकानं विचारलंच. ती म्हणाली, ‘‘अक्षरकला म्हणून तीही छान जमलीत. ती तुम्ही घेऊनही जाऊ शकता; पण त्यावर सील नाही करणार. कारण जो दर्जा अपेक्षित आहे तो त्यात नाही देता आला.’’ आपली कथा, कविता, चित्रपट, गीत याविषयी बोलतांना कलाकार त्यांना अपत्याचं नाव देतो अन् त्यात भेदभाव कसा करणार? असा प्रश्न विचारतो. ... मला हे त्यावेळी आठवलं. खरंच, कलाकार आपल्या कलाकृतीमधल्या दर्जाची चिकित्सा करू शकतो? तशी करता येत नाही, असं म्हणणारे खरोखर किती प्रामाणिक असतात? वयाची सत्तरी पार केलेली, स्पर्धेतून बाजूला झालेली ही कलाकार मात्र अजूनही आपल्या सीलचा दर्जा कायम राखण्याबद्दल तत्पर होती. त्यासाठी तिनं दोन चित्र बाजूला काढली होती. अक्षरकला, त्यामागचे कष्ट, त्यातलं कसब याविषयी फारसं ज्ञान नसलेल्या मला तिचं ती दर्जाविषयीची प्रामाणिक आत्मीयता खूप काही सांगून गेली. ती कलाकार तर मोठी होतीच; पण स्वतःवर टीका करण्याचं धाडस, क्षमताही तिच्यातल्या कलाकाराला अधिक मोठं करीत होती.

    -- किशोर कुलकर्णी

  • कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ६

    घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. प्रत्येक ” ईशान अवस्थी “ला निकुंभ सर भेटत नाही इथे! दिवसरात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथे मुले एज्युकेशनल ऍप वरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधून-मधून प्रयोग करायला जात असतात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कोठे? आणि तसही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच.

  • एकाकीपणा

    पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

  • ८ वी ड – भाग १७

    मागच्या लेखात सेल्फी बद्दल लिहिले तेव्हा अनेक लोकांनी प्रतिक्रिया भेटल्यावर दिल्या , तर कोणी फोन केला. विशेषतः तरुण मुलांना बरे वाटले निदान सेल्फिची थोडी तरी बाजू कोणी मांडणारा आहे. काही सत्य असतात ती कधीच लपवता येत नाही प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो किवा समर्थन-विरोध काहीही असू शकतो.

  • हॅप्पी दिवाळी!!

    सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला.