नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
लाडू-करंज्या-शंकरपाळी-उटणं-मोती साबण आणि दिवाळी अंक एवढ्या भांडवलावर मराठी मध्यमवर्गीयांची दिवाळी हमखास आनंदातच जायची.दिवाळी अंक वाचणारे लोक ‘सांस्कृतिक’ समजले जायचे. बऱ्याच अंशी ते खरंही होतं. दिवाळी अंक काढणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना किमान ‘समज होती. आता कुणीही उठून चार जाहिराती, हौशी बोरुबहाद्दरांचा मजकूर जमवतो आणि संपादक अमुक तमुक, असं बिरुद मिरवत दिवाळी अंक काढतो.
रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने, हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध रंगांची अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव यांची भेट झाली. हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते. माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो.
” काय पूजेसाठी फुले गोळा करीत आहात वाटते? परंतु ही फुले देवाला कशी चालतील? “ माझ्या विचत्र वाटणाऱ्या वाक्याने त्यांना एकदम आश्चर्य वाटले. काहींच उलगडा न झाल्यामुळे त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ विचारला. मी म्हणालो ” थोड्या वेळापूर्वी मी समोर बसून मानस पूजा केली होती. ही सारी उमललेली टपोरी फुले स्पर्श न करता, त्या ईश्वराचे चरणी अर्पण केली. मनानेच वाहिली. आता माझ्या द्रीष्टीने ती निर्माल्य झालेली आहेत. ही फुले तुम्ही कशी देवाला वाहणार? “ विचित्र आणि न पटणारे. परंतु तर्कज्ञानाच्या विश्लेषणाने मान्य होणारे हे तत्वज्ञान. एकनाथरावनी क्षणभर विचार केला व ते किंचित हसले. ” मी पण मानस पूजेचा विचार करीन. कदाचत निसर्गाच्या फुलण्यातल्या आनंदात, मला पण सहभागी होता येईल.” असे काहींसे पुटपुटत ते निघून गेले.
मला अचानक माझ्या अमेरिकेतील काही दिवसाची आठवण झाली. मी मुलाकडे गेलो होतो. अतिशय स्वछ आणि सुंदर वातावरण होते. मनाला प्रसन्न व आनंदित करणारे. मोठे व अरुंद सिमेंटचे रस्ते. मध्य भागात Devider असून रंगी बिरंगी फुलांनी सुशोभित केलेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गवताचे मखमली गालिचे असून विविध रंगांची मनोहर फुले फुलली होती. गुलाबांची टवटवीत मोठी फुले भरपूर प्रमाणात फुललेली होती. रस्त्याच्या कडेला आपल्यासारखी काश्मिरी गुलाबांची ताटवे ह्याचे मानस आश्यर्य वाटत होते. असे चित्र भारतामध्ये केव्हांच बघण्यात आले नव्हते. गुलाबाची टपोरी फुले, कुणाच्या घरातील बागेमध्ये किंवा एखद्या सार्वजनिक बागेमध्ये असतीलही. परंतु त्याच्यावर नजर ठेवणारे, निगा राखणारे असतीलही. अमेरिकेत कुणीही केव्हाही फुले तोडताना बघितले नाही. किंवा ” फुले तोडू नका ” ही सूचना देणारी, सूचनाफलक कोठेच दिसला नाही. इकडील सर्व सामान्या मध्ये ही जाणीव इतकी रुजली आहे कि कुणीही रस्त्याच्या कडेलगतची फुले सार्वजनिक बागेतील फुले किंवा घरातील फुले देखील झाडावरून काढीत नसतात. झाडावरच फुलाने उमलणे, बहरणे, आणि गळून पडणे ही नेसर्गिक प्रक्रिया त्यांच्यात घडताना दिसते.
मला ठाण्यात सकाळी फिरावयास गेलो असताना जे दृश दिसत होते ते आठवले. बरीचशी वयस्कर मंडळी सकाळी फिरण्यास जाताना दिसते. काही घरामधली बागेमाधली जास्वनदिची, कन्हेरीची, पारिजातकाची, गुलाबाची वा इतर काही मोठी झाडे, घर कुंपणाच्या बाहेर फांद्या वाढून बहरलेली दिसत. कित्येक महाभाग हाताला येतील तेवढी सर्व फुले तोडून पिशवीत जमा करतात. त्यांना त्यात आनंद वा धन्यता वाटते. पुजेसाठी ती सर्व फुले कशी मिळतील हे बघण्यातच ती प्रयत्नशील होती. मला अद्याप कळले नाही कि आपण निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते. भावनेला जर विचाराची साथ मिळाली तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतील. ईश्वरावर नितांत श्रधा असावी हे सत्य आहे. त्याच्याशी जवळीक साधण्याच्या मार्गावर चिंतन व्हावे ही अपेक्षा.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्याच anthologies जपानीत आहेत.
आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल).
-- किशोर कुलकर्णी
घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. प्रत्येक ” ईशान अवस्थी “ला निकुंभ सर भेटत नाही इथे! दिवसरात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथे मुले एज्युकेशनल ऍप वरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधून-मधून प्रयोग करायला जात असतात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कोठे? आणि तसही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच.
पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
मागच्या लेखात सेल्फी बद्दल लिहिले तेव्हा अनेक लोकांनी प्रतिक्रिया भेटल्यावर दिल्या , तर कोणी फोन केला. विशेषतः तरुण मुलांना बरे वाटले निदान सेल्फिची थोडी तरी बाजू कोणी मांडणारा आहे. काही सत्य असतात ती कधीच लपवता येत नाही प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो किवा समर्थन-विरोध काहीही असू शकतो.
सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला.
Copyright © 2025 | Marathisrushti