नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
एका गावात एक पादरी (धर्मगुरू) राहत होता. त्याने एक नोकर ठेवला होता. अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता.
एका मुलाच्या शाळेतून पालकांना चिठ्ठी येते. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकांने येऊन भेटायला सांगितले असते. आई वडील शाळेत जातात. मुख्याध्यापिकांना भेटतात. त्या पालकांना सांगतात “तुमचा मुलगा स्लो लर्नर आहे. त्याला तुम्ही दुसऱ्या शाळेत घाला.
महाराष्ट्र विद्यालयातील आठवीचा वर्ग. मराठीच्या शं. रा. देवळे सरांचा तास होता. आदल्या दिवशीच सरांनी सर्व विद्यार्थ्यांना निबंध लिहून आणायला सांगितला होता. विषय दिला होता, ‘तुमचा आवडता लेखक.’ सर वर्गात येऊन बसले. वर्गावर एक नजर फिरवली व म्हणाले, ‘प्रत्येकाने पुढे येऊन आपला निबंध वर्गाला वाचून दाखवा’.
कुटुंब हे घरातील सदस्यांनी मिळून तयार होते. आई-वडील, काका-काकू, भाऊ, बहीण आणि आजी-आजोबा. म्हणजे एकत्र कुटुंब! आई-वडील आणि मुलगा-मुलगी हे झालं छोटं कुटुंब! आपल्याबरोबरच पशु-पक्ष्यांना देखील कुटुंबात सहभागी करुन घेतले तर त्याला आपण नक्कीच ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणू शकू, यात काहीएक शंका नाही…
माझे वडील पूना हॉस्पिटलच्या आय सी यू त असतानाची, त्यांची शेवटची रात्र मी बाहेर जागवली तेव्हा ” तोच पिता साक्षात मानावा, जन्म देतो तो निमित्त केवळ ” असं मी का पुटपुटत होतो, माहीत नाही ! कदाचित वडील माझी समजूत घालत असतील त्यांच्या या आवडत्या ओळींमधून !

यथावकाश मला माझं भुत किंवा भुतं भेटली. आतापर्यंत मी लेखक बेसंट यांना पाठींबा देत होतो पण आता विरोध करतो. आपण त्या बंगल्याला ‘खटमल’ बंगला म्हणू. ज्याची कातडी नरम आहे त्याला डाक बंगल्यात रहायचा अधिकार नाही. त्याने लग्न करावं. तो बंगला जुना, घाणेरडा, दुरूस्ती न केलेला होता. भिंती खराब होत्या, खिडक्या काळ्या पडलेल्या होत्या. तिथे आसपास बरेच कचेरीतले मामुली अधिकारी, अर्थखात्यापासून ते जंगल खात्यापर्यंतचे, रहात पण कुणी गोरा साहेब नव्हता. वयाच्या दुप्पट वांकलेल्या खानसाम्याने हे मला सांगितलं. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वारा आणि पाऊस होता आणि बाहेरच्या पामच्या झाडांचा हाडे आपटावीत तसा आवाज येत होता. माझं आगमन खानसाम्याला आवडलं नसावं.
आताही रविवार येतात पण आवडत नाही कारण या दिवशी आईबाबा मुलांना घेऊन एक तर फिरायला म्हणजे गावाला जाणे. किंवा जे सकाळी जातात ते रात्रीचे जेवण करूनच येतात. घरात कामे नसतात. मुलगी जर जवळपास असेल तर तिच्या कडे पण हेच असेल कदाचित. थोडा फार फरक असेल पण रविवारी येत नाहीत.
सदोबांच प्रामाणिक मत होते – रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वत जुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. ????
लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti