नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो, तुमचा आमचा सेम असतो!’ असं कोण म्हणत? तर असं मीच म्हणतो. मंगेश पाडगावकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.’ या त्यांच्या कवितेला रट्टाऊन टाळ्या दिल्या तशी दाद माझ्या वाक्याला देणार नाही हे मी जाणून आहे. कारण तुम्ही म्हणाल, ‘याला काय माहित आमचे डॉक्टर?’ हे अगदी खरं आहे. पण मला माझे काही डॉक्टर चांगलेच माहित आहेत. ते मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही तुमचे डॉक्टर त्यांच्याशी ताडून पहा. काही साम्य सापडले तर मात्र, टाळी द्यायला विसरू नका.
November 5, 2020
एका गृहस्थांना त्यांनी नोकरी करू नकोस, कांही धंदा कर त्यात तुला नक्की यश मिळेल असं सांगितलं होतं व त्याने त्याप्रमाणे आलेल्या चांगल्या नोकऱ्या लाथाडून धंदा केला होता व कांही वर्षांतच तो लखपती झाला होता. तेव्हां श्रीमंताला लखपती म्हणत, आतांसारखं करोडपती नाही. त्यांनी पत्रिका जुळवल्यामुळे कोणा कोणाचे विवाह यशस्वी झाले होते. कुणाला त्यांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे कन्या झाली होती तर कोणी परदेशीही गेले होते. त्यामुळे शास्त्रीबुवांकडची गर्दी हटत नव्हती. एखाद दुसऱ्याचं भविष्य बरोबर नव्हतं आलं पण अशी माणसे स्वत:ला दोष देत गप्प बसत असत.
February 2, 2026
तिन्हीसांजेला मन असंच खूप हळवं झालं ….पार दूर दक्षिणेला … समुद्र किनाऱ्यावर जावंसं वाटायला लागलं …. बारदेशात …. खरं तर अति प्रबळ इच्छा झाली … इतकी की वाऱ्याच्या वेगाने धावत जावं … पण वास्तवातलं जग तेवढं सोपं नाही ना … प्रत्यक्ष जरी जाऊ शकलो नाही तरी मन मात्र शेकडो मैल दूर असलेल्या त्या किनाऱ्यावर गेलंच
July 2, 2019
प्राणी असो वा पक्षी, त्यांना आंघोळ ही फार प्रिय असते. चिमण्यां थोड्याशा पाण्यात सुद्धा डुबक्या मारुन पंख फडफडवीत आंघोळ करतात. कावळ्याला चार थेंब मिळाले तरी त्याची आंघोळ पूर्ण होते. हत्तीला डुंबायला भरपूर पाणी लागते. म्हशींना एखाद्या डबक्यात गळ्यापर्यंत डुबवून घेतले की, बाहेर यायची इच्छा नसते. मांजर ही आंघोळीच्या ऐवजी स्वतःला चाटून पुसून स्वच्छ करुन पाण्याची बचत करते.
June 25, 2021
तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच.
एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या.
सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या.
मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि ते काय करतात?” हेच दिवसभर पाहात बसायचं... टाइमपास करत.
कुणी येवो न येवो, याचं लक्ष सतत रस्त्याकडे!
कधी कधी यांच्या डोक्यावर कावळे,चिमण्या किंवा कबुतरं येऊन बसत. पण त्यांना याची पर्वाच नाही. त्या ढीम्मच!
काहीवेळा चिमण्या जाता-जाता त्यांच्या डोक्यावर दोन गरम-गरम मऊ-मऊ ठिफ टाकून जात. पण त्या दोघी बहिणी त्या चिमण्यांशी कधीही भांडल्या नाहीत. किंवा डोकं हलवून त्यांना उडवलं पण नाही. त्यांचे आपले परिसर निरीक्षण सुरूच!
संध्याकाळ झाली. अंधारुन आलं की, त्या दोघी जणी आपापल्या खोल्यात स्वत:ला बंद करुन घेत.
सकाळ झाली की पुन्हा या दोघींचा बाहेर डोकावून टाइमपास सुरू.
पण अचानक एके दवशी.. .. एक बहिण बोलेच ना. एकदम खीन्न! उदास!
दुसऱ्या बहिणीला तिची काळजी वाटू लागली. तिला कळेना हिला झालं काय?
इतक्यात ती पहिली म्हणाली,“ताई, उद्यापासून मी बाहेर डोकावणार नाही.
तुला पाहणार नाही.
तुझ्याशी एक शब्द ही बोलणार नाही.
आपण आता पुन्हा कधी-कधी भेटणार नाही ग.
आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस!! ”
हे बोलताना तिला खूप भरुन आलं.
तिच्या काचा थंड पडल्या.
काळजीने धुरकट झाल्या.
हे पहिलीचं बोलणं सताड उघड्या तोंडाने दुसरी ऐकत होती.
भीतीने तिच्या काचा तापल्या.
कसबंसं स्वत:ला सावरत दुसरीने स्वत:ची कडी घट्ट केली.
उघड्या तोंडातून भरपूर हवा आत घेतली.
आणि.. ..धीर करुन तिने विचारलं,“मला नीट सांग, उद्या नक्की काय होणार आहे?”
“उद्या माझा मेकओव्हर आहे!
यू नो, पूर्वीची ती दिवाणखाना ही कनसेप्ट आता गेली. आता त्याचं लिाव्हिंग रुम मधे रुपांतर झालं! एव्हरीथींग इज नाऊ अल्ट्रा मॉडर्न!!..”
“काय ग, ही कुठली भाषा? काल पर्यंत तर तू ठीक होतीस! आणि हे मेक ओव्हर म्हणजे काय?”
“गेले आठ दिवस मी रोज हीच भाषा ऐकतेय.
अगं मेकओव्हर म्हणजे, सोप्या सुटसुटीत गोष्टी मोडून टाकून विचित्र अवजड गोष्टी आणायच्या!
आता त्या फोल्डींगच्या खूर्च्या किती छान आहेत! ती छोटी मुलं त्यावर उभं राहून आपल्यातून डोकावतात आणि आई बाबांना टाटा करतात तेव्हा किती बरं वाटतं ना? आता त्या मोडून त्याच्या बदली म्हणे “बीन बॅग्ज” आणणार आहेत!
ट्यूब लाइटशी गप्पा मारताना संध्याकाळ कशी निघून जायची ते कळायचं पण नाही.
पण आता म्हणे भिंतीत फिट्ट बसणाऱ्या काचेमागे दिवे लावणार आहेत.”
“अगं ताई, हे तर भयानकच बाई!! या दिव्यांची तोंडच अशी भितींत लिंपून टाकली तर घरात बोलायचं कुणी कुणाशी? आपले पंखेराव तरी आहेत ना?”
“नाही ग. माझ्या तोंडात एसी लावणार आहेत म्हणे. त्यातच असतो पंखा!”
“म्हणजे आता आयुष्यभर तू तोंडात एसी धरुन बसणार? कमाल आहे!! आमच्या तोंडात वाटेल त्या गोष्टी कोंबणारे हे कोण शहाणे?”
“रागावू नकोस ताई. उद्यापासून माझी लाइफस्टाइलच चेंज होणार आहे.”
“अगं मला नीट समजेल असं सांग गं..”
“उद्यापासून उघडणं, बाहेर डोकावणं, बिजागऱ्यांनी किरकिरणं हे सारं बंद!
आता फक्त गरगरत एका रेषेत सरकणं.
उद्यापासून मी स्लायडिंग होणारे ना!”
“व्वा! आणखी काय-काय होणारे?”
“तुला माहितंच आहे की.. या पांढऱ्या स्वच्छं काचांमुळे आपल्याला दुपारी त्या उन्हाचा किती त्रास होतो! पण उद्या मला रंगीत काचा लावणार आहेत. मस्त डार्क चॉकलेटी काचा!
आता उद्यापासून सकाळ नंतर डायरेक्ट संध्याकाळं! नो दुपार!!
एकदम कू।़।़ल!! ”
“मला सांग हे सगळं तुला आवडतंय?
अगं त्या चॉकलेटी काचांमुळे रंगांधळी होशील तू!
आणि त्या एसीमुळे घरातली माणसं जरी थंड झाली तरी तुझं डोकं नेहमीच तापलेलं असेल!
काळजी घे स्वत:ची..”
“ताई तू म्हणतेस ते खरंय!
मला बाहेरुन कुणीही कसंही बदलवलं तरी मी आतून तशीच राहीन! सकाळी सकाळी स्वत:तून बाहेर डोकावणारी! आणि संध्याकाळी अंतर्मूख होणारी!!”
हे ऐकल्यार ताई स्वच्छं काचेने हसली आणि म्हणाली,“उघडा,मिटा किंवा सरका पण स्वत:तून बाहेर डोकवा, हे ज्यांना जमलं त्यांनाच खरं जग दिसलं” ही चिनी म्हण तू ऐकलीच असशील की?”
हे ऐकताच पहिली समाधानाने हसली.
यातूनच दुसरी काय ते समजली!
-राजीव तांबे.
July 2, 2015
पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले..
December 12, 2023
१९८४ सालातील गोष्ट आहे. अजय सरपोतदार या माझ्या काॅलेजमधील मित्रामुळे त्याच्या वडिलांशी, बाळासाहेब सरपोतदाराशी माझा संपर्क आला. त्यांनी ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटाची निर्मिती करुन तो ‘प्रभात’ टाॅकीजला प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या पेपरमधील जाहिराती व प्रिमियर शो चे निमंत्रण कार्ड आम्ही केलेले होते.
June 1, 2021
प्रसन्न, उत्साही आणि सकारात्मक उर्जेची अनुभूती वातावरणात जाणवते कारण नवरात्रीस आरंभ झाला. आई अंबेच्या अनन्या रूपांना घरारात पुजल जातं कारण ती जगतजननी, विश्वनिर्माती आहे, आदिशक्ती आहे. ज्या आई अंबेचरणी आपण नतमस्तक होतो त्या आदिमायेची अनुभूती ही प्रत्येक घरात आहे ही वस्तुस्थिती आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सुध्दा ऊर्जेचा प्रथम स्त्रोत " स्त्री" आहे. स्त्री हीच आदिशक्ती, यथाशक्ती आहे. स्त्री ही ऊर्जेचा केंद्रबिंदू नसुन ती स्वतः "ऊर्जाउगम"आहे. प्रत्येक स्त्री मध्ये ही अनन्य साधारण अशी ऊर्जा सामावलेली आहे. आणि म्हणूनच फक्त स्त्री हीच सृजननिर्मिती, सजिवनिर्मिती करू शकते. ती आधिशक्ति नसुन "आदिशक्ती" आहे. म्हणून सृष्टीवर असणार्या तिच्या उपस्थित रूपाचा सन्मान केला पाहीजे.
नवचैतन्य, नवऊत्साह घेऊन जेव्हा ती कन्या म्हणून घरात जन्माला येते तेव्हा शैलपूत्री म्हणून तिचं स्वागत केलं पाहिजे. विवाहपश्चात कुणाचीतरी अर्धांगींनी होऊन संसार समतोल राखण्याच कार्य जेव्हा स्त्री करत असते तेव्हा तिच्यातलं सतिरूपी, पार्वतीरूपी अस्तित्व मान्य केलं पाहिजे.
स्वतः मृत्यूच्या मूखात जाऊन जेव्हा ती नवजिवनिर्मिती करते तेव्हा तिच्यातील जगतजननी प्रत्येकाला शोधता आली पाहिजे. इवले इवलेशे हात हातात घेऊन जेव्हा ती अक्षरे गिरवायला शिकवते तेव्हा आपल्याला सरस्वतीचा साक्षात्कार झाला पाहिजे.
स्वतःच्या गुणकौशल्याने जेव्हा ती कुटूंबाच्या अर्थाजनात हातभार लावते व विवेकबूध्दिने आर्थिक नियोजन करून सदैव संपतीत वृध्दि करते तेव्हा ती निश्चितच लक्ष्मी असते. तिचं अस्तित्व अमान्य झाल्यास , तिची अवहेलना केल्यास जाज्वल रूप धरून बाणेदारपणे समाजाला तिच्या उपस्थितीची जाणिव करून देते तेव्हा तिच्यात दुर्गा जागृत झालेली असते.
जेव्हा ती सौंदर्यवती , रूपवती होवून जगाला भुरळ घालते तेव्हा ती महामाया असते. चारही बाजूंनी दुराचाराने कुरघोडी केल्यास रौद्र रूप धारण करून संहार करते तेव्हा ती काली असते.........
घराघरात असणार्या या दैवी रूपाचा सन्मान प्रत्येक पूरूषान केला पाहीजे. देवीच्या मुर्तीसमोर नतमस्तक होताना आपल्या घरातही देवीचं मुर्त रूप आहे याची जाणीव असली पाहिजे. तसेच मीच आदिशक्ती, यथाशक्ती , ऊर्जाऊगम, सृजनकारीनी, जगतजननी, असुरसंहारनी आहे याची अनुभूती प्रत्येक स्त्री ला असली पाहिजे.
-- श्रध्दा मधुकर पाटील
October 17, 2018
त्याची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तो बालहट्ट पुरवत मुलांचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटो काढण्यात दंग होता. मध्येच आपल्या कॅमेऱ्यात मावळतीचा सूर्य आणि मुंबईचं देखणं रूप टिपत होता.
November 5, 2022
कोणी शेजारी पाजारी, पाहुणे रावळे आले की, घेणार का? असं न विचारता पहिल्यांदा चहाच होतो.. रविवारी सकाळी उशीरा उठल्यावर चहा, जेवण देखील उशीराच होतं.. दुपारी डुलकी झाली असेल तर, उठल्यावर चहाच लागतो.
January 20, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti