नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले.
तो तरूण त्याच्याच तंद्रीत होता, कल्याण आलंय आता ऊठुन उतरायला पाहिजे याचे त्याला भानच नसल्यासारखा तो बसून होता. त्याच्या खांद्यावर थाप मारून मित्रा कल्याण आलेय उतरायचे नाही का असं बोलावंसं वाटलं. त्याच्या दिशेन पुढे जाणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.
कोटा फॅक्टरी IIT बद्दल हेच अंजन आपल्या डोळ्यांमध्ये घालण्यात यशस्वी होते – फरक असला तर तो इतकाच की सनदी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या या परीक्षेपेक्षा IIT साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी उच्च शिक्षणाची स्वप्ने बघत आपले तारुण्य पणाला लावत असताना याहून अधिक तणावांना कदाचित (खरे तर नक्कीच )सामोरे जात असतील, बाकी आकडेवारी समांतर आहे.
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून जाहीर केले आहे. रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणार्या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी. जागतिक रसायनशास्त्रज्ञ लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 176 किंमत : 180 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
ग्रामीण भागातील शेतकरी जीवनातील अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्याचा एक जीवंत अनुभव….
नोव्हेंबर चे कालनिर्णय चे पान उलटले आणि चाहूल लागली ती माझा पन्नाशीचा उंबरठा ओलांडण्याची.
Age is जस्ट a number, all is in your mind..
असं अनेकदा ऐकलेलं असतं आणि ते खरं आहे.
तरीही मागे वळून पाहिलं की आपलाच प्रवास आपण कसा केला याचं चित्र समोर उभं राहतं.
अनेक आनंदाचे क्षण, यशाची शिखरे, संघर्ष आणि काय असतं प्रत्येकाच्या आयुष्यात? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो इतकंच बाकी सुख दुःख असा ऊन पावसाचा खेळ काही जीवनभर सुटत नाही. आपण खेळत राहतो.. कधी जित कधी हार असणार.. असू देत...
पन्नाशी म्हणजे आयुष्यातली लख्ख दिसणारी दुपार.
अनेक अनुभवातून, कर्तृत्व सिद्ध करून आपण उभे असतो.
एव्हाना उन्हाचे चटके सोसण्याची सवय झालेली असते.
आपले कोण, परके कोण याची अनुभूती घेतलेली असते.
कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडे पाहुन जीवनातल्या संध्याकाळची जाणीव रोज होत असते.आपल्या सतत कार्यरत असलेल्या लोकांना थकलेलं पाहणं खुप वेदना देणारं असतं.
त्याचवेळी आपली मुलं यशस्वी होत असतात. त्याचं समाधान असतं.आता थोडी आपली सुखाची परिभाषा बदलललेली असते. दुसऱ्यांना आनंद देत आपण स्वतःचा आनंद शोधत असतो. व्यवहार दूर ठेवत आपण थोडे हळवे होत जातो.
आता कुणाशी बाजारात काही खरेदी करतांना पैसे कमी करा यासाठी भांडत नाही की कुणाला फार उपदेशाचे डोस ही देणं योग्य समजत नाही. जीवन हा ज्याचा त्याचा प्रवास.. तो प्रत्येकाचा वेगळा हे पटलेलं असतं.
येणाऱ्या संध्याकाळची तयारी दुपारीच केली की
संध्याकाळ रम्य होते.दिवे लख्ख स्वच्छ करायचे. त्यातली तेल, वात, आणि सोबत समाधानाचे अत्तर जागेवर आहे ना?सगळं ठीक आहे का हे बघून ठेवायची असते ती दुपारीच..
कधी सोनपावलानी कातर वेळ येईल तेंव्हा आपणच आपले आनंदाचे दिवे लावायचे असतात. आणि कृतज्ञतेच्या अत्तराने गंधित व्हायचे दिवस येणार असतात.
सोबत कुणी असेन. नसेन.. माहीत नसतं. आयुष्याची रेषा पुढे जात असतेच...
कारण प्रत्येकालाच मालकंस आळवायचा असतो पण भैरवीची चाहूल नकळतपणे मनात असतेच ना?
फार सेंटी बिंटी लिहिण्याचा माझा उद्देश मुळीच नाही. परवा डॉ. कडे गेलो म्हटलं बघा दिवाळीच्या गोडा धोडानी जरा दोन चार किलो वाढलंय (वजन ). बीपी गिपी, शुगर चेक करा. डॉक्टर निर्वीकार.
बसा. नाव, वजन नोंदी केल्या, वय म्हटलं 50,
काय? त्यांचा प्रश्न.
म्हणजे? जास्त वाटलं का?
No मला वाटले 40 असेन!
माझ्या अंगावर पुन्हा मूठभर मास चढलं.
सगळं नॉर्मल आहे. साखर 105 म्हणजे ओक्के.
पण वजन जरा कमी करा बरं.व्यायाम वाढवा.
नक्कीच! असं म्हणुन मी परतलो.असो...
जगण्याचं नवे भान पन्नाशी देते.
कुणी uncle, सर, काका, दादा काही म्हटलं तर छान स्माईल द्यायचं...
रफी लता यांच्या गाण्यासोबत अर्जितला पण ऐकायचं..
पुरणपोळी सोबत पिझ्झाचा बाईटपण घ्यायचा...
मंदिरात सोवळं आणि सिंगापूरात जीन्स वर मिरवायचं..
रोज नवीन काहीतरी वाचायचं.. जुन्या मित्रांना बोलायचं..
पैश्यापेक्षा आनंद कमवायचा..
असेल तो पैसा जरा जपून वापरायचा..
बाकी इन्शुरन्स बक्कळ काढुन ठेवायचा..
स्वतःला आणि जोडीदाराला नाही दुखवायचं..
पुन्हा तारुण्यात जायचं..
रोज मोगरा तिच्या केसात आणि
सुख आपल्या ओंजळीत साठवायचं..
दुखावलं असेन कुणी आपल्याला त्यांना मनापासून माफ करायचं..
काहीच मनात नाही ठेवायचं.
रोजच सकाळी मनाची पाटी स्वच्छ करायची..
नवे अनुभव त्यावर लिहायचे.. संध्याकाळी वाचायचे,
भरून आले डोळे तर थोडं मोकळं व्हायचं...
आपलं आनंदाचे झाड रोज नव्याने बहरत ठेवायचं..
आलेला क्षण देवाचा प्रसाद म्हणायचा आणि गोड मानायचा..
बघा आयुष्य तेजाळणार हे नक्कीच...
गद्धे पंचविशी,चाळीशी झाली आणि आता साठी बुद्धी नाठी होण्याअगोदर पन्नाशीत एवढं जमलं तरी पावलो बुवा!
म्हणजे जिंदगी लंबी नही उंची होनी चाहिये असं पटतं!
Lots of Love to All.....
ता. क. हे मी सर्व सवाई महोत्सव ऐकताना लिहतोय..
अभिजीत कोळपे
चिंचवड पुणे 33
फोन 7350005813

सातारला प्राचीन तसेच ऐतिहासिक शिवकालीन पार्श्वभूमी आहे हे सर्वश्रुत आहे. राष्ट्रसंत प.पू. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, ब्रह्मेन्द्र स्वामी, गोपाळनाथ महाराज त्रिपुटी, गोंदवलेकर महाराज अशा अनेक संतविभूतींची साहित्य ग्रंथ संपदा लाभली आहे आणि तोच अध्यात्मिक साहित्य, कला, संस्कृतीचा देखील प्राचीन वारसा लाभला आहे हे मागील ३३ व्या भागातून प्रत्ययास येते.
साठी उलटली तरी माझ्या मित्रांना माझा मामा करण्यातच धन्यता वाटते. मी मुलाखत घ्यायची आणि ती सुध्दा एखाद्या प्रथितयश रागदारी गायकाची! संगीतातल ज्ञान तर सोडाच पण ज्या विषयात मी काठावरही पोहू शकत नाही हे माहीती असुनही मुद्दाम पुण्यातील एका प्रख्यात गवयाची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी माझी व त्यांची वेळ परस्पर बुक करुन टाकली.
फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.
एक कोल्हा होता. त्याला सगळेच मूर्ख कोल्हा म्हणून ओळखायचे. आपल्या या ओळखीने कोल्हा खूप दुःखी असायचा. तो विचार करू लागला, आपला मूर्खपणाचा शिक्का पुसून हुशार, बुद्धिमान कोल्हा ही प्रतिमा सगळ्यांसमोर येण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. लोकांनाच मूर्ख बनवून आपल्याला राजाप्रमाणे सन्मान मिळवायला हवा.
Copyright © 2025 | Marathisrushti