नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आज ऐन सनासुदीचं आभाळ आलं व्हतं, तळहाताच्या फाॅडावाणी जपलेलं आमच्या रानातलं ह्ये पिवळं सोनं उघड्यावरच व्हतं, आमच्या रानातला समदा कारभार हाकणारं आण्णा आन् दादा ह्येन्ला एकच चिंता पडली. आता सनासुदीमुळं लेबर मिळायचंबी आवघड झालतं मग काय तोंडातला घास पावसात भिजुनी म्हणुनशान घरातल्या समद्या पावण्या रावळ्यांसहीत मी आन माझं भाऊबंद निघालोकी रानात. आमचं दादा आन् आण्णा सकाळपसुनच रानात व्हतं, सोयाबिनिची रास लाल तळवटावर शिग लावुन बसली व्हती. सुतळी गोण्या, चार घमेली, रूपेश, सुजित, युवराज, स्वप्निल ही पोरं गवतावनी झटली आन् समदं सोयाबिन आवघ्या तासाभरात शिलपॅक करून टाकलं. ऊशिराची पेर आसल्यानं मधल्या पावसाच्या रपाट्यातुन आमचं सोयाबिन थोडक्यात वाचलं व्हतं. चार एकरात ईनबिन ईस किंटल सोयाबिन पदरात पडलंय, शेतकऱ्याचं ह्ये पिवळं सोनं बाजारात मातुर कवडीमोल किंमतीनं ईकलं जाणाराय ह्यजी खंत वाटतिया.
रानातलं ह्ये सोयाबिन ईकल्यावर ह्यज्यापसुन सोया दुध, सोया पनिर, सोया टिक्का, सोया चिल्ली, सोया ऑईल आसली डझनभर उत्पादनं तयार व्हत्याली पण ह्ये सोयाबिन मातीत पिरून त्याला कोरड्या आन् वल्या दुष्काळाच्या हाबाड्यातुन वाचवुन, घरातल्या समद्या माणसानी जे जिवाचं पाणी केलंय त्याचा दाम मातुर त्येन्ला मिळणार नाय ह्यजंच वाईट वाटतंय. माझ्या फिरस्तीमुळं मला शेताकडं जास्तीचं लक्ष देता येत नाय पण जितबी कुठं कोणत्याबी ईषयावर बोलायला जातो तवा शेतकऱ्याचं दुःख मांडल्याबिगीर माझं व्याख्यानच पुरं व्हत नाय. शिवटी समदं ईषय रानातल्या मातीत सुरू हुन मातीतच संपत्यात मग त्या मातीला माझ्या बोलण्यातुन आन् लिव्हण्यातुन जित्तं करणं ह्ये तर माझं कर्तव्यच हाय की.
ईस किंटल सोयाबिन पोत्यात भरणं म्हंजी माज्या सारख्या कधीतरी शेतात राबणाऱ्या माणसासाठी जरा ओव्हरलोडंच काम म्हणायचं. उद्या व्याख्यानाला उभा राहील्यावर आंगतला ह्यो दर्द शब्दांच्या रूपानं भाहीर पडलं हे नक्की. आज बऱ्याच दिसानं माझ्या आंगातुन कष्टाचा घाम आलता. गेल्या कित्येक दिसापासुन मोबाईल पेक्षा जास्त वजन कधी उचलण्यात आलं नाय पण आज साठ किलोच्या गोण्या दादांसोबत उचलताना माझ्यातला पैलवान जागा झालता. वडीलांच्या हातात हात दिऊन शेतात राबताना येगळाच आभिमान वाटत व्हता. खरं सांगतु आपल्या बापासोबत काम करण्यासारखा दुसरा आनंद नाय राव. दुपारपसुनचं ह्ये आमचं कष्टाचं काम सांच्याला समदी पुती शेडमदी टाकुनच संपलं. शेततळ्यावर हात पाय तोंड धुवुन आमच्या टॅक्टरवर बसुन ह्यो सगळा परसंग टाईपीत बसलोय. दिवस मावळलाय, रानातली पाखरं घराकडं निघाल्याती म्या बी फोर्डमधी बसलुय, पोटात मरणीची आग पडलीया; कधी एकदा आईच्या हातची चुलीवरची भाकरं म्हशीच्या घट्टबंड्या दुधात चुरून खातुय आसं झालंय.
लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० ऑक्टोंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६:३० वाजता (रानात)
त्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही.
व्यक्ती आणि समाज परस्परपूरक असायला हवेत कारण ही राष्ट्राची दोन तोंडे आहेत. व्यक्तीने समाजासाठी, समाजाने राष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. दोघांपैकी एकानेही आततायीपणा केला की राष्ट्राचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात भारुड पक्ष्याचे उदाहरण देता येईल. एका मोठ्या सरोवरामध्ये भारुड पक्षी राहतात. त्याला दोन तोंडे होती, मात्र शरीर एकच होते. एकदा भारुड पक्षी सरोवराच्या काठावर आला असता, जवळच्या झाडावरून एक फळ खाली पडले. एका तोंडाने ते लगेच उचलले व ते तो खाऊ लागला. ते फळ फारच मधुर होते, त्यामुळे फळ खाताना ते पहिले तोंड म्हणाले, '' मी आजपर्यंत एवढे सुमधुर फळ खाल्ले नाही. '' ते ऐकून दुसऱ्या तोंडालाही ते फळ खाण्याची इच्छा झाली. त्याने पहिल्या तोंडाला ते फळ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की आपल्या दोघांचे पोट एकच आहे त्यामुळे मी खाल्ले तरी ते याच पोटात जाणार आहे, असे म्हणून त्याने ते संपूर्ण फळ एकट्यानेच खाऊन टाकले.पहिल्या तोंडाच्या अशा वागण्यामुळे दुसऱ्या तोंडाला फार राग आला. त्याने पहिल्या तोंडाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी भारुड पक्षी फिरत असताना दुसऱ्या तोंडाला एक फळ सापडले. ते फळ फारच विषारी होते. दुसऱ्या तोंडाने ते खाण्यास सुरुवात केली, त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की, अरे हे फळ विषारी आहे ते पोटात गेल्यास आपण दोघेही मरून जाऊ. मात्र दुसऱ्या तोंडाने त्याचे म्हणणे मुळीच ऐकले नाही. त्याला पहिल्या तोंडाला धडा शिकवायचा होता. तो म्हणाला, ' 'मी हे फळ खाणारच. तू मला सांगणारा कोण?'' असे म्हणून त्याने ते संपूर्ण विषारी फळ खाल्ले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व थोड्याच वेळात भारुड पक्षी मरून पडला. एका तोंडाने वाईट हेतूने आततायीपणा केल्याचे फळ त्याला मिळाले होते.
कोणता उद्देश असतो जीवन चक्राचा. काय योजना आहे त्या ईश्वराची वा निसर्गाची ? खरय़ा अर्थाने त्याची उकल आज पर्यंत निश्चीत व सर्वमान्य झालेली नाही. मानवाला बुद्धी, प्रगल्भता मिळालेली आहे.

यथावकाश मला माझं भुत किंवा भुतं भेटली. आतापर्यंत मी लेखक बेसंट यांना पाठींबा देत होतो पण आता विरोध करतो. आपण त्या बंगल्याला ‘खटमल’ बंगला म्हणू. ज्याची कातडी नरम आहे त्याला डाक बंगल्यात रहायचा अधिकार नाही. त्याने लग्न करावं. तो बंगला जुना, घाणेरडा, दुरूस्ती न केलेला होता. भिंती खराब होत्या, खिडक्या काळ्या पडलेल्या होत्या. तिथे आसपास बरेच कचेरीतले मामुली अधिकारी, अर्थखात्यापासून ते जंगल खात्यापर्यंतचे, रहात पण कुणी गोरा साहेब नव्हता. वयाच्या दुप्पट वांकलेल्या खानसाम्याने हे मला सांगितलं. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वारा आणि पाऊस होता आणि बाहेरच्या पामच्या झाडांचा हाडे आपटावीत तसा आवाज येत होता. माझं आगमन खानसाम्याला आवडलं नसावं.

मी आधी सही करणार ., ती म्हणाली .. नाही मी आधी सही करणार मी म्हणालो.. दोघेही हसत म्हणालो.
गुलज़ार महोदय “खामोशी” त म्हणून गेले- ” प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो I” लताने आपल्या तलम आवाजात त्याचं भरजरी सोनं केलं. पण हे आख्ख गाणं चक्क एक नितांतसुंदर, हळुवार चित्रपट बनून पडद्यावर येईल हे त्याकाळी गुलज़ार /लता /वहिदा /हेमंतकुमार यांच्या दूरवरच्या स्वप्नातही आलं नसावं.
-- सूर्यकांत डोळसे
नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल.
त्या वेळी मी पुण्यातल्या एका मोठ्या वृत्तपत्रासाठी काम करीत होतो. अर्थात, माझ्या कामाची जागा पुणे नव्हे, तर कोल्हापूर होती. या शहरात या दैनिकाची नवी आवृत्ती सुरू झाली होती. ती अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, यशस्वी व्हावी, असं मला वाटणं स्वाभाविक होतं. या आवृत्तीच्या पहिल्या टप्प्यात तर संस्थेचा असा मी एकमेव प्रतिनिधी होतो. त्यामुळं आपलं काम केवळ बातमीशी संबंधित आहे, असं वाटलं नव्हतं. तसं वाटावं असं संस्थेतही वातावरण नव्हतं. एकूण माझं कोल्हापुरात व्यवस्थित चालू होतं. याच काळात निपाणी इथं शेतकरीनेते शरद जोशी यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू झालं. मी आंदोलनाच्या वृत्तसंकलनासाठी रोज निपाणीला जाऊ लागलो. सकाळी निपाणीला जायला निघावं अन् सायंकाळपर्यंत परत यावं, असा तो शिरस्ता होता. निपाणी शहराच्या अलीकडेच शेकडो बैलगाड्या रस्त्यात उभ्या करण्यात आलेल्या असायच्या. बैल विश्रांती घेत, तर आंदोलनकर्ते रस्ता पूर्ण बंद कसा राहील, याच्या विवंचनेत असायचे. दुचाकीसुद्धा या बंदोबस्तातून बाहेर पडणं कठीण झालं. कोल्हापूर-बेळगाव मार्गावरचे अनेक व्यवहार बंद पडायची वेळ आली. काही आडमार्ग, काही लांबचे मार्ग शोधण्याचाही प्रयत्न झाला; पण अशा ठिकाणीही अचानक ‘रस्ता बंद’ आंदोलन केलं जायचं. या आंदोलनाचा जो परिणाम व्यावसायिकांवर व्हायचा, तसाच तो वृत्तपत्रांवरही होत होता.
निपाणीला तीस-पस्तीस हजारांचा जमाव असतानाही तिथं वृत्तपत्र येऊ शकत नव्हतं. आंदोलनाच्या प्रारंभीच माझ्या दैनिकानं या आंदोलनाच्या सविस्तर बातम्या दिल्या होत्या; पण आंदोलकांपर्यंत त्यातलं काही पोहोचत नव्हतं. बातमी द्यायची; पण ती आवश्यक त्या वाचकापर्यंत जात नाही, याची खंत वाढत होती. काही तरी करायला हवं होतं. बातमीसाठी मी रोज येतच होतो. निपाणीच्या एजंटनं एक माणूस रोज माझ्याकडे पाठवायचा आणि मी कोल्हापूरहून अंक घेऊन यायचं, असा तोडगा त्यावर काढला. शरद जोशींनाही त्याची कल्पना दिली. आपण दिलेली बातमी संबंधित माणूस वाचतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो, हा मोठ्या आनंदाचा भाग असतो. तो आनंद मिळवायला पत्रकारच व्हायला हवं; पण हा आनंद मी घेऊ लागलो. माझ्या स्कूटरला रोज दोन-तीनशे अंकांचा गठ्ठा बांधायचा आणि तो निपाणीला एजंटकडे द्यायचा, असं सत्र सुरू झालं. आपण संस्थेसाठी वेगळं काहीतरी करीत आहोत, असं काही वेळा वाटायचं, तर काही वेळा हे तर माझं कर्तव्यच आहे, असं वाटायचं. काही वेळा या आनंदाची तुलना कराविशीही वाटत नसे. माझं काम वाढलं होतं; पण त्याचं काही वाटत नव्हतं. रोजच्या रोज अंकाचा हिशेब व्यवस्थापकाला दिला जायचा. एक दिवस असा आला की, या यंत्रणेत काही बिघाड झाला. मी दोनशे अंक घेऊन आलो; पण ते घ्यायला कोणी फिरकलं नाही. आता काय करायचं? दुपारचे बारा वाजत आले होते. एका कार्यकर्त्यास बसवलं अंक विकायला. त्यानं ते काम केलंही; पण त्याला काही सर्व अंक विकता आले नाहीत. १००-१२५ अंक उरले असावेत. सायंकाळी चार वाजता मी कोल्हापूरला जाण्यासाठी परतत असे. आता या अंकांचं ओझं घेऊन परत जायचं? विचार केला, ज्यांच्यासाठी हे अंक आणले होते त्यांनाच वाटून टाकले तर? नाहीतरी आता चार वाजता त्याला कोण घेणार आहे? विचार पक्का झाला अन् त्याच कार्यकर्त्याला सांगितलं अंक वाटून टाक. मी कोल्हापूरला निघे पर्यंत अंक वाटले गेले होते. इतकच नव्हे, तर वाचनासाठी जागोजागी गटही पडले होते. खूप बरं वाटलं. मी कोल्हापूरला निघालो. ऑफिसमध्ये आलो. अंकाचा हिशेब दिला. १२० अंकांची रक्कम नव्हती. मी म्हटलं, एजंटला जसा तुम्ही क्रेडिट मेमो देता तसा द्या; पण इथं प्रश्न आला होता, मी एजंट नव्हतो अन् अंक एजंटला न देता मी तो विकला होता. एवढच नव्हे, तर वाटलाही होता. सकाळी काय ते पाहू, असं ठरलं आणि सकाळी जे झालं ते मला त्या वेळी तरी धक्का देणारच होतं. व्यवस्थापकांनी सांगितलं, ‘‘१२० अंकांचे पैसे भरा; अन्यथा तुमच्या वेतनातून ते कापून घेण्यात येतील.’’ गेले काही दिवस मी करीत असलेलं काम, निष्ठा, अंक वाटण्यामागची भावना, यांना असलेलं मूल्य शून्य तरी होतं किवा ते अमूल्य तरी होतं. ज्या काळामध्ये पत्रकाराला आपलं वेतन सांगायचीही लाज वाटायची, त्या काळात त्या १२० अंकांची रक्कम भरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी पैसे भरले. त्याची पावती माझ्या नावावर घेतली. तो दिवस माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारा, निराश करणारा होता. आज जेव्हा मी माझ्या पत्रकारितेतल्या कामाचं दप्तर काढून बसतो तेव्हा त्या पावतीचं पाकीट मला खुणावतं. आज त्यानं मला अस्वस्थता नाही येत. मी त्या काळातही ती रक्कम भरल्याचा अभिमान वाटतो. कोणत्याही प्रमाणपत्रापेक्षा ती पावती मला माझ्या वाचकांबरोबरच्या नात्याची आठवण देते. ते नातं अधिकच दृढ होत जातं.
-- किशोर कुलकर्णी
Copyright © 2025 | Marathisrushti