(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दळिता कांडिता

    संसारात पण घरच्या कर्त्या माणसाने अगदी घट्टपणा म्हणजेच खबींर मजबूत मनाचा असेल तरच वरच्या पाळी प्रमाणे आपल्या सर्वांच्या सुखासाठी. समाधानासाठी राबणारी मरमर करणारी उसंत न घेता न दमता भिंगरी प्रमाणे फिरणारी तिला साथ दिली तर सर्वांचे कल्याण. आणि नंतर पण निगुतीने पीठ एकत्रित करून भरावे लागते. सर्वांना बांधून ठेवले तरच. वेग. स्पर्धा. गरजेपेक्षा जास्त. योग्य वेळी योग्य निर्णय असे शिकवतात दळण. त्यामुळे कस दळाव हे कळायला हवे.नाही तर काय होईल ते तुम्ही ठरवा पीठा ऐवजी सगळेच अर्धवट. श्रम करताना दमणे आलेच अशा वेळी चिडचिड. त्रागा. दुसर्‍यांना दोषी ठरवणे हे मात्र होऊ नये म्हणून दळिता कांडिता तुज गायीन अनंता यासाठी ओवी.चांगले विचार. अजून बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासाठी..

      September 7, 2022


  • अजब न्याय नियतीचा – भाग २१

    आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते.

      October 6, 2019


  • उगाच काहीतरी – १९

    माझ्या घराजवळच्या बाजारात एक फेरी वाली बाई बसते. घरगुती वापराचे छोटे-मोठे सामान विकायला ती बाई तिथे जमिनीवर मांडून बसते. तिच्या सोबत नेहमी तिची एक चार-पाच वर्षांची लहान मुलगी असते. नवरा क्वचित काहीतरी सामान आणताना नेताना दिसतो पण शक्यतो ही बाई आणि मुलगी या दोघीच असतात.
    एकंदर वागण्या बोलण्यावरुन ती चांगली सुशिक्षित आणि चांगल्या घरातली वाटते. माझी पत्नी नेहमी काही घ्यायचं असेल तर तिच्याकडं घेत असते त्यामुळे त्यांच्या थोडासा परिचय आहे.
    त्या दिवशी असंच आम्ही दोघं बाजारात गेलो असताना माझी पत्नी तिच्याकडून काही सामान घेण्यासाठी थांबली. त्या दिवशी त्या बाईचा मुड अतिशय खराब वाटत होता. तिचं धंद्याकडे लक्षच नव्हतं. असं वाटत होतं की तिला कोणाची काही पडलेलीच नाही. तिला मी काही विचारले तर "लेना है तो लो नही तो रहने दो" टाईपचे उत्तरं देत होती.
    तिचं असं वागणं पाहून माझ्या जीवावर आले मी पत्नीला म्हटलं की तिच्याकडे राहू दे. पुढे मिळून जाईल ती वस्तू तिथून घेऊ या.
    पण माझ्या पत्नीने तिच्याकडूनच वस्तू घ्यायचा हट्ट धरला म्हणून मग नाईलाजास्तव मी पुढे इतर बाजार करायला गेलो. मला तिचं ते तुसडेपणा वागणं जराही सहन झालं नव्हत.
    काही वेळाने मी परत आलो तेव्हा माझी पत्नी आणि ती बऱ्यापैकी गप्पा मारत होत्या आणि ती बाई पण व्यवस्थित बोलत होती.
    पण माझ्या डोक्यात अजूनही तिचं ते वागणं भिणभिणत होतं म्हणून मी पत्नीला म्हटलं " तू पण काय हट्ट करून बसते तिच्याकडून च वस्तू घ्यायच्या?? बोलणं बघितलं का तिचं? गिऱ्हाईकांशी असं कोण बोलतं? आपण काय फुकटात वस्तू घेतो क??"
    त्यावर माझ्या पत्नीने सांगितलं की तिलाही आज त्या बाईचं वागणं खटकल पण ती नेहमीच असं वागत नाही म्हणून हिला वाटलं की नक्की काहीतरी चुकलं आहे म्हणूनच मुद्दामच ही तिच्याशी बोलत थांबली तेंव्हा कळलं की आज जेव्हा ती सामान घेऊन आली आणि लावत होती त्यावेळेस जरा फक्त काही कारणास्तव मागे वळली तितक्या वेळात कोणीतरी मोटरसायकवर येऊन तिचं एक गाठोडे घेऊन पळाला. हिच्या लक्षात येई पर्यंत तो बऱ्याच दूर निघून गेला होता.
    जवळ जवळ २-३ हजाराचे सामान होते. एका समानामागे ५-१० रुपये सुटणाऱ्या तिच्यासाठी ती रक्कम खूप होती. नफा तर सोडूनच द्या पण आता पदरचेच २-३ हजार गेले होते. म्हणून तिचं मनच लागत नव्हतं आणि चिडचिड होत होती आणि तिचं ते छोटं लेकरू बिचारं आज आई असं का वागते आहे या विचाराने कावरंबावरं होऊन बसलं होतं.
    माझ्या पत्नीशी बोलल्यानंतर तिला जरा बरं वाटलं. नंतर तिने तिच्या नवऱ्याला फोन करून सगळं सांगितलं. तो ही समजदार होता. त्यानेही तिला समजावून सांगितलं तेव्हा ती थोडी शांत झाली होती.
    आणि हे सगळं समजेपर्यंत उगाच आपला गैरसमज करून बसलेला मी आता त्यांना कशी मदत करता येईल यावर चर्चा करू लागलो.
    एकूण पुढे लक्षात ठेवायचं ठरवलं की जर एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल दिसत असेल तर नक्कीच त्यामागे काही महत्वाचे कारण असणार उगाच त्यावरून त्या व्यक्तीची पारख करणं योग्य नाही.
    --अमोल पाटील

      November 21, 2022


  • आठवण चाळवणारे अनामिक !

    ज्यांनी माझ्या स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या चालण्याची पद्धत देखील हुबेहूब तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती जुळती होती.

      September 25, 2013


  • त्रासाचे झाड 

    मामांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. मामांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत मामा निघाले.

    संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. मामांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’

    भाचा मामांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २० मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता.

    घरी पोहोचल्यावर भाच्याने मामांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी मामा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून मामा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले.

    घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. मामांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. मामांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले.

    मामांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद ? मामांना प्रश्‍नच पडला.

    चहा घेऊन मामा निघाले. भाचा मामांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता मामांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’

    त्यावर भाचा म्हणाला, ‘‘मामा, मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत.

    हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.

    ‘तुमच्या घराबाहेर आहे का ‘‘त्रासाचे झाड?’

      February 11, 2018


  • बालकुमार साहित्य संमेलनाचे जनक – अमरेंद्र गाडगीळ

    मुले हेच घराचे बहुमोल अलंकार ,मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती ,मुले म्हणजे देवाघरची फुले अशा अनेक घोषणा आपण आज पर्यंत एकात आलो आहोत. पण बालसाहित्य निर्माण करून मुलांच्या सर्वांगीण विकास होऊन वाचनाची गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून बालकुमार साहित्य चळवळ निर्माण करणारे थोर बालसाहित्यिक म्हणजे अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ !

      July 26, 2020


  • मानसकोंड-मासा

    त्यांना मदत करणाऱ्या वाहन चालकांना हे ठाऊक नव्हतं , की हाही एक धंदा आहे . कारण ते पाणी पैसे देऊन निघून जात होते .
    मनातून सुखावत होते . आपण माणुसकी दाखवली या आनंदात ते जात होते . लोकांच्या भावनेचा धंदा करता येतो आणि लोक फसत राहतात , हे पुन्हा पुन्हा जाणवत होतं .

      February 4, 2026


  • ठाण्यात भरलेली साहित्यसंमेलने

    संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते.

      April 12, 2022


  • देव’ दीनाघरी धावला

    पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले..

      December 12, 2023


  • जादूगार रघुवीर

    जादूगार रघुवीर यांनी, त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये ७,०२३ जादूचे कार्यक्रम केल्यानंतर १९७७ साली निवृत्ती स्वीकारली. त्याआधी त्यांनी १९६७ साली, भिकारदास मारुती जवळ ‘जादूची शाळा’ नावाचा, वरती जपानी पॅगोडा असलेला तीन मजली बंगला बांधला. तिथे जादूचे प्रयोग शिकविणारी संस्था सुरु केली. देशातील व परदेशातील कित्येकांनी इथे जादू शिकून घेतली.

      June 13, 2022