नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
ते वळण माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.’ कित्येक मोठी माणसे हे वाक्य त्यांच्या आत्मचरीत्रात बिनदिक्कत छापत असतात. छापील धंदे. एकदा का तुम्ही आत्मचरीत्र लिहायच्या लायकीचे झाले तर मग तुम्ही काय लिहिता याला काही अर्थ उरत नाही. माझ्या आयुष्यात एक जरी वळण आले असते ना तर मी आतापर्यंत दोन चार आत्मचरीत्र लिहून मोकळा झालो असतो.
रेशीम धागा जेवढा ओढावा
तेवढा तो गुतंतो
मनातील विकल्पाचेही तसेच आहे
जितकी ओढाताण तितकी गुंतागुंत
मनातील विकल्प काव्यलेखन करतांना सहजपणे उमटतात. तसं तर काव्यलेखन ही मधूर समाधी आहे. काही क्षणासाठी का होईना पण जीवनातली सारी दुःखे ,दुःखाच्या सा-या जखमा आणी जखमांच्या सा-या वेदना विसरायला लावणारी ती एक प्रभावी शक्ती आहे. सुदैवाने तू त्या शक्तीशी परिचीत आहेस.
खरोखरचं तू एक ध्येयवेड़ा,प्रितीवेड़ा आहेस. तुझी माझ्याविषयीची प्रितीनिष्ठा कवितेच्या पाकळ्यात सुगंधासारखी कुप्पीत सुरक्षित ठेवली आहेस. या पाकळ्यांना जपून ठेवशील ना? नक्कीच जपून ठेवशील पण ..........कधी कधी दूर झाड़ाआड़ून झगमगत्या केशरी किरणांमूळे तेजस्वी सूर्याची किनारही दिसत नाही.
मग अशावेळी मनाला सांशकता घेरून येते .आणी मनाला वाटतं सूर्य अस्ताला तर नाही ना निघाला ?
समजतंय का तूला ...............समजायला हवचं रे
© वर्षा पतके- थोटे
7-01-2019
तीन खोल्या असलेली ही जागा आता या पुढे मात्र “गुरुजीची शाळा “, आणि गुरुजींचे घर “, म्हणून ओळखली जाणार होती. इतके दिवस या खोल्यांमध्ये शेतीचा माल -टाल साठवून ठेवलेला असायचा.
जगात चांगुलपणा ही आहे . हे कळले.. पोलीस तसेच तो टँक्सीवाला यांच्यामुळे.. नेहमी लक्षात राहील असा होता हा अनुभव.
चित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले. चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली. होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं….लेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे.
आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.
त्यादिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून जरा तावातावानेच आलो. दिवसभर प्रामाणिकपणे काम करून साला! साहेबाला त्याचं काहीच नाही म्हणजे काय? काल न सांगता रजा घेतली म्हणून टकल्याने अगदी रामादेखत माझी बिनपाण्याने केली. काल एका महत्वाच्या शोधमंडळात आमची नियुक्ती झाली होती हे त्याला सांगून काय उपयोग?
एका दिवसाने , एका पावसाने , एका प्रवासाने किती किती शिकवलं ना मला . ही कथा माझी असेल ..तुमचीही असू शकते ना ?
सातारा स्टँडवर सरवांची वर्दळ सुरू असल्यानं स्टँड बहरल व्हती,कॉलेज ची गावठी पोरं उगाचच उनाडक्या करीत इकडून तिकडं फिरत व्हतं..त्यासनी असं वाटत व्हतं जणू सगळ्या जगाची अक्कल त्यासनी आलीय…एक एका गावची एस टी येत व्हती तसं पोरा अन पोरींचा घोळका लगबगीनं गाडीकड धाव घेत एकमेकांसनी म्होर ढकलत जात व्हता.
या एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल?
Copyright © 2025 | Marathisrushti