(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • विश्रब्ध

    जे जे म्हणून हातचे सुटून गेले ते ते पून्हा नव्याने जगता आले असते. एकाच जन्मी पूनर्जन्म ……झाड़ासारखा …..

  • आ ई

    सायंकाळची वेळ होती .

    आई रोजच्यासारखी घरातील कामं करीत होती .

    रविवार असल्यानं बाबा बाहेरगावी काही कामानिमित्त गेले होते .

    दिवसभर निवांतपणे ती तिची कामे करत होती .

    मुलांना आज खेळायला मुभा होती .पण झोपण्यापूर्वी दोन तास तरी अभ्यास करून घ्यावा असा आईचा नेहमीची शिस्त होती .

    परीक्षाही जवळ आlल्या होत्या .

    तिने मुलांना हाक मारली .

    " मधू, रवी चला आता. खूप झालं खेळणं. हातपाय धुऊन या जेवायला."

    मधू असेल सहा सात वर्षाचा तर रवी त्यापेक्षा मोठा दहा वर्षाचा . दोघेही मुलं फार चुणचुणीत होती . आई बाबाचे सर्व ऐकणारी . शिवाय शेजाऱ्यापाजारऱ्याचं बारीकसारीक काम ऐकणारी .त्यामुळे सगळ्यांची लाडकी होती .वर्गातही पहिला -दुसरा नंबर नेहमीच आणणारी .

    आईच्या हाके मधू आत आला .

    " आई, आई"

    मधु सांगू लागला, " तुला माहिती नाही. रविदादा कधीचा अंगणात उभा आहे.दिवसभर काही खाल्लेल नाही.अन तू म्हणते पुरे झालं..खेळणं म्हणूंन .."

    आईच्या लक्षात आलं .हातातील कामं सोडून ती बाहेर आली .

    मधुही पाठोपाठ आला .

    " बापरे, देवा गा...." करीत आई रवीजवळ आली. बाहेर सर्वत्र अंधाराल होतं. रवी डगमगत उभा होता. तिने त्याला उचलू कडेवर घेतले.रडत रडत आई त्याचे मुके घेऊ लागली.

    " वेडा कुठला ? असं कुणी करतं होय?" म्हणत घरात घेऊन आली.

    रवीच्याही डोळ्यातून आसवं येऊ लागली .पण ती आनंदाची होती . आईनं आपल्याला माफ केलं .प्रेमाने जवळ घेतलं ..याचंच त्याला फार आनंद झालं होता ..रवीला.

    दोघंही रडत होती .

    आई मधूला व रवीला पोटाशी धरून स्वयंपाक घरात बसली .

    " माझी गुणांची पोरं, शहाणी बाळं" असे म्हणत दोघांनाही कुरवाळू लागली.

    मधू सांगू लागला , " आई सांगू का ? दुपारपासून रविदादा अंगणात उभा आहे. मी त्याला सावलीत यायला सांगितलं . तरीही तो आला नाही . तुझं लक्ष नसताना मी त्याला खाऊ नेऊन दिला तर तोही दादाने खाल्ला नाहीच .

    उलट आई रागावेल म्हणून घरात परत ठेवायला सांगितलं . काही बोलतही नव्हता . नुसता रडत होता .तू त्याला घराबाहेर काढलं आन विसरलीही . दादा नुसता एका जागेवर उभा होता . उन्हामुळं जागा किती गरम होती ..तरी एक पाय भाजला की दुसऱ्या पायावर उभा राहायचा .

    मी त्याला सॅंडल नेऊन दिलि तरी नाहीच घातली त्यांन. मी येथे दरवाज्यात बसून त्याला गोष्टी सांगत होतो ..पण हसत नव्हता . तू मात्र खुशाल दुपारी झोपली ..विसरली दादाला शिक्षा दिल्याचं ...दुष्ट कुठली ?"

    मधुच्या दुष्ट कुठली या शब्दानं तिला जोराचा हुंदका आला .

    रवीला अधिकच जवळ घेत ती रडू लागली . आसवं रवीच्या गालावर पडल्यानं पडल्यानं वेळ अबोल असणारा रवी आईचे अश्रू पुसत म्हणाला ," आई , तू दुष्ट नाहीच , त फार छान आहेस . दुष्ट आहे तो मी , मी तुझं ऐकलं नाही . प्लिज आई रडू नकोस गं .''

    रवीच आईचेआसवं पुसत समजावत होता .

    कुठल्याशा कारणानं चिडून आई रवीवर रागावली होती ." जा घराबाहेर..दिवसभर तुला जेवणचं बंद..अंगणातच उभं राहायचं...हीच तुला शिक्षा."

    रवी खरंच निमूटपणे अंगणात भर उन्हात उभा राहिला .. अनवाणी.उपाशी ..

    छोटा मधू विनवणी करत होता तरी नाही ऐकलं त्याचं .आई स्वतःयेईल. मला बोलावेल.याची वाट बघत बसला.

    इकडे आईला विसरून गेली होती शिक्षेचे .

    मुलं असावीत खेळत ..असं समजून ....

    तिला पश्चाताप झाल्यासारखे झाले . दोघांनाही आपल्या हाताने घास भरवू लागली .

    मधू त्याला भरवता असलेला घास आईचा हात रवीच्या दिशेन नेत होता .

    ज अभ्यास नको म्हणून आईने दोघांनाही झोपायला नेलं .

    आई खूप वेळ जागीच होती .

    रवीच्या पायाला तेल लावीत , मालिश करीत .

    झोपेतही रवी मात्र हसल्या सारखा दिसत होता ... त्याला आईने माफ केले ..जवळ घेतले म्हणून .

    आई मात्र रात्रभर जागीच....

    स्वतःला म्हणत ....

    "मी खरंच दुष्ट आहे, दुष्टच आहे मी"

    -- श्रीकांत पेटकर

  • मी व्यायाम करतो

    ते वळण माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.’ कित्येक मोठी माणसे हे वाक्य त्यांच्या आत्मचरीत्रात बिनदिक्कत छापत असतात. छापील धंदे. एकदा का तुम्ही आत्मचरीत्र लिहायच्या लायकीचे झाले तर मग तुम्ही काय लिहिता याला काही अर्थ उरत नाही. माझ्या आयुष्यात एक जरी वळण आले असते ना तर मी आतापर्यंत दोन चार आत्मचरीत्र लिहून मोकळा झालो असतो.

  • विश्रब्ध

    रेशीम धागा जेवढा ओढावा
    तेवढा तो गुतंतो
    मनातील विकल्पाचेही तसेच आहे
    जितकी ओढाताण तितकी गुंतागुंत

    मनातील विकल्प काव्यलेखन करतांना सहजपणे उमटतात. तसं तर काव्यलेखन ही मधूर समाधी आहे. काही क्षणासाठी का होईना पण जीवनातली सारी दुःखे ,दुःखाच्या सा-या जखमा आणी जखमांच्या सा-या वेदना विसरायला लावणारी ती एक प्रभावी शक्ती आहे. सुदैवाने तू त्या शक्तीशी परिचीत आहेस.

    खरोखरचं तू एक ध्येयवेड़ा,प्रितीवेड़ा आहेस. तुझी माझ्याविषयीची प्रितीनिष्ठा कवितेच्या पाकळ्यात सुगंधासारखी कुप्पीत सुरक्षित ठेवली आहेस. या पाकळ्यांना जपून ठेवशील ना? नक्कीच जपून ठेवशील पण ..........कधी कधी दूर झाड़ाआड़ून झगमगत्या केशरी किरणांमूळे तेजस्वी सूर्याची किनारही दिसत नाही.

    मग अशावेळी मनाला सांशकता घेरून येते .आणी मनाला वाटतं सूर्य अस्ताला तर नाही ना निघाला ?

    समजतंय का तूला ...............समजायला हवचं रे

    © वर्षा पतके- थोटे
    7-01-2019

  • चंदर – बालकुमार कादंबरी – भाग ३

    तीन खोल्या असलेली ही जागा आता या पुढे मात्र “गुरुजीची शाळा “, आणि गुरुजींचे घर “, म्हणून ओळखली जाणार होती. इतके दिवस या खोल्यांमध्ये शेतीचा माल -टाल  साठवून ठेवलेला असायचा.

  • चांगुलपणाचा अनुभव

    जगात चांगुलपणा ही आहे . हे कळले.. पोलीस तसेच तो टँक्सीवाला यांच्यामुळे.. नेहमी लक्षात राहील असा होता हा अनुभव.

  • हिंदी चित्रपटातील  दिपावली गीते…….

    चित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले. चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली. होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं….लेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे.

  • बालकुमार -कथा – मोन्या

    आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.

  • थोडं गोड, थोडं आणखी गोड

    त्यादिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून जरा तावातावानेच आलो. दिवसभर प्रामाणिकपणे काम करून साला! साहेबाला त्याचं काहीच नाही म्हणजे काय? काल न सांगता रजा घेतली म्हणून टकल्याने अगदी रामादेखत माझी बिनपाण्याने केली. काल एका महत्वाच्या शोधमंडळात आमची नियुक्ती झाली होती हे त्याला सांगून काय उपयोग?

  • पावसातला प्रवास

    एका दिवसाने , एका पावसाने , एका प्रवासाने किती किती शिकवलं ना मला . ही कथा माझी असेल ..तुमचीही असू शकते ना ?