(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सोनेरी फुलं आणि म्हातारा

    म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान न!. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न म्हणत मोबाइल आवाज वाढवायचा. कधी फुलांना गाणे ऐकवायचा, कधी गोष्टी सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.

  • कोटी कोटी उड्डाणे तुझी…………

    खरे रूप माणसा तुझे

    कोणते कळेना?

    तूच नगरपालिकेतही तूच

    तुझा सरकारी देखील बाणा……….

  • आनंदी किटक.

    सहसा घर सोडून जाण्याचा प्रसंग येत नसे. त्यामुळे दैनंदिन चालणारय़ा गोष्टीमध्ये बाधा येते ही खंत. असेच १५ दिवस घर बंद करुन सर्वानाच गांवाकडे जाणे भाग पडले. आज घरी परत आलो. घर सारे कड्या कुलपे लाऊन बंद करुन गेलो होतो. दारे उघडताच एक उग्र वास दरवळत असल्याचे जाणवले. थोडीशी मोकळी हवा येताच सर्व हवेचे वातावरण पूर्ववृत होऊ लागले.

    वयानुसार दररोज देवपूजा हा एक परिपाठ होता. जीवनाच्या व्यवहारामध्ये अर्धातास देवपूजेसाठी राखून ठेवला होता. केवळ समाधान व मनःशांती मिळण्यासाठी. हा एक मनाच्या विश्वासाचा व श्रद्धेचा प्रश्न. मनाची एक धारणा झाली होती की कोणती तरी शक्ती, उर्जा शक्ती असते, जीच्यामुळे जगातल्या सर्व व्यवहारांचे नियमन होत असते. निसर्ग म्हणा वा ईश्वर. नांव, वर्णन हे मला सदैव गौण वाटले. मात्र परिणाम दृष्य वा अदृष्य स्वरुपांत जे सतत होतात, ते तर मान्य करावयांसच हवे. त्या शक्तीमान अस्तित्वाला अभिवादन करणे, सन्मानित करणे मनास समाधान देणारेच असेल. ती शक्तीस्वरुप म्हणून जाणने जास्त महत्वाचे. मात्र तीच्या आकार, रंग रुप इत्यादी मार्गाने गेल्यास मन सतत शासंक व अशांत असणार.

    संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजानी म्हटल्याप्रमाणे --

    कांसेची केली अंबा परी कांसे नव्हे जगदंबा

    अंबेची पूजा अंबे घेणे कांसे राही कासेपणे. //

    पाषाणाचा केला विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू

    विष्णूची पूजा विष्णूसी अर्पे पाषाण राहे पाषाण रुपे //

    केला मातीचा पशुपती परी मातीची काय महती

    शिवपूजा शिवासी पावे माती मातीत समावे //

    देवघरांत डोकावले. सर्व देवाना नमस्कार केला. देवघरांतील वातावरण बघून मन त्या क्षणी खिन्न झाले. सर्वत्र जाळे, जळमटी, दिसत होते. किडे मुंग्या झुरुळे, कोळी यांच्या हलचाली सर्वत्र दिसत होत्या. दोन आठवडे तेथे झाड झुड नव्हती. वरदळ नव्हती. स्वच्छतेची कोणतीच मोहीम नव्हती. छोट्य़ा छोट्या त्या प्राण्यासाठी एक रान मोकळे केलेले होते. अनेकांनी जसे जमेल व जसे निसर्गाने शिकवले असेल त्याप्रमाणे आपापली घरटी बांधलेली होती. स्वैर आनंदी जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

    माझ्या दृष्टीने एक अस्वच्छ वातावरण. सर्वत्र कचरा घुळ, घाण यांचेच साम्राज्य. एका पवित्र अशा देवघरांत ईश्वराचे जेथे सान्निध्य असल्याची भावना, श्रद्धा तेथे अस्वच्छ परिसर ह्या कल्पनेने मन निराश झाले. स्नान करुन शुचिर्भूत झालो. व देवघरांत गेलो. हाती केरसुनी घेऊन सर्व स्वच्छ केले. जाळी जळमटी काढून टाकली. ओल्या फडक्याने पुसून घेतले. नंतर नेहमीच्या पद्धतीने देवांची पूजा केली. उदबत्ती दिवा लावला. नेहमीप्रमाणे पूजा झाल्यानंतर दाराशी पाटावर बसून चिंतन करणे, मंत्र श्लोक म्हणने ही सवय. एकाग्र चित्त करण्याच्या प्रयत्न्यात होतो. पण मन शांत होत नव्हते. देव घरांत सर्वत्र बघत होतो.

    अचानक कांही कोळी, एक दोन झुरुळ कोठून तरी तेथे आल्याचे दिसले. कदाचित् त्यांची घरे जी स्वच्छता मोहीमेत काढून टाकली गेली, त्याचा आढावा ती घेत असावी. त्यांच्या भावना, त्यांचे विचार कळण्यास मार्ग नव्हता. मात्र त्यांच्या हालचालीवरुन त्यांच्या खिन्न तगमगीचा अंदाज येत होता.

    माझ्या मनासाठी ते देवघर, एक मानवनिर्मित थोडीशी वेगळी व स्वतंत्र जागा. तेथे पुजेशिवाय शांत बसून ध्यान घारणा करणे, भजन करणे, नामस्मरण करणे, पाठ केलेली वा वाचलेले मंत्रविधी करणे, हे प्रमुख चालायचे. सत् चित् आनंद मिळविण्याचा प्रयत्न असायचा. समाधान आणि शांतता हे मनाचे गुणधर्म. त्यातील आनंद हेच ईश्वरी प्रतीक असते. आनंद हा लाटेत वा लहरीमध्ये वातावरणांत उत्पन्न होतो. त्या जागेत शिरताच त्याची अनुभूती येते. तो सर्वासाठी अर्थात प्रत्येक जीवांसाठी तसाच असतो. आनंदी वातावरणांत शिरतांच त्या आनंदी लाटा तुम्हास आनंदी करतातच. कारण आनंद चैतन्यस्वरुप असतो. मग तो आनंद जसा मला मिळत होता, तसाच त्या किटकांना, क्रिमीना देखील निश्चीत मिळत असावा. म्हणूनच त्या आनंदमय वातावरणांत ते सर्व तेथेच आपापली घरे, संसार त्यांच्या पद्धतीने साजरे करु इच्छीत असावे. कदाचित् त्यांच्या आनंदाला मी माझ्या स्वार्थबुद्धीने अडकाठी आणत होतो. त्याचमुळे मी समाधानाला, शांततेला वंच्छीत राहीलो असेल. मज जवळ त्याचे उत्तर नव्हते. डोळे मिटून मी त्या वातावरणामधील मिळणारय़ा आनंदाप्रमाणेंच मनास शांत करण्याचा प्रयत्न करीत बसलो.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान नागापूरकर

  • गोवा – माझ्या नजरेतून

    मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. पर्यटनासाठी महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्याचा विचार करायचा म्ह्टल तर आमच्या नजरे समोर येणार पहिल राज्य म्ह्णजे गोवाच असायच. आंम्ही मित्र बरेच दिवस नाही बरीच वर्षे गोव्याला सहल काढण्यासाठी प्रयत्नशील होतो पण हया ना त्या कारणाने ते शक्य होत नव्हत. माझ्या मनात गोव्याला कोकण रेल्वेने जाण्याच होत कारण रत्नागिरीच्या पुढचा कोकण मी अजून पाहिला नव्हता तो मला पाहायचा होता.

    माझ्या आयुष्यात गोव्याला जाण्याचा योग आला पण तो विमानाने. गोवा पाहणे हे माझे स्वप्न होते. पण सध्यातरी विमानप्रवास हे स्वप्न नव्ह्ते कारण आपल्या अवाक्या बाहेरची स्वप्ने विनाकारण पाहण्याची मला सवयच नव्हती. नशिबाने साथ दिल्यामुळे माझे दुसरे स्वप्नही सहज पुरे झाले. विमानाने गोव्याला जाण्याचे समजताच माझ्या पोटात गोळा आला होता. प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात कधी ना कधी पहिल्यांदा घडतच असते. ती गोष्ट घडली की तिची तिव्रता आणि महत्व दोन्ही अचानक कमी होते. आता विमान प्रवास करून आल्यावर मला पटतय की विमान प्रवास करणे म्ह्णजे फार काही कौतुकाची गोष्ट नाही. पण या प्रवासा दरम्यान आलेले अनुभव आणि मी टिपलेली निरीक्षणे माझ्यासाठी फारच मोलाची होती. एरवी मुंबईहून गोव्याला जायला कित्येक तास लागतात पण माझा तोच प्रवास अवघ्या एका तासात पार पडला होता. विमानप्रवास करण्याचे एक तंत्र आहे ते तंत्रही माझ्या लक्षात आले. विमानप्रवासा दरम्यान काय सोबत घ्यावे, काय सोबत घेऊ नये आणि काही सोबत घेतल्यास ते किती आणि कसे घ्यावे या सर्व गोष्टींचे ज्ञानही औगत झाले. चार तारांकीत हॉटेलात राहण्याचा तिथे वागण्या- बोलण्याचा आणि तेथील सुख- सुविधांचा वापर करण्याचा अनुभवही गाठीशी जमा झाला. संपूर्ण गोवा पादाक्रांत केल्यावर माझा या पूर्वीचा पूर्वग्रह दुषित गैरसमजही दूर झाला की गोवा हे पर्यटनस्थळ समुद्रात पोहणार्यांलना, मधिरा पिणार्यांरना आणि जीवाची मुंबई करणारयांसाठीच आवडीचे पर्यटन स्थळ आहे. आमच्या सारख्या र्निव्यसनी आणि शाकाहारी माणसाचे तेथे कामच नाही. पण आता माझा हा गैरसमज कायमचाच दूर झाला आहे.
    गोवा विमानतळ ते हॉटेल या दरम्यानच्या एक तासात एसी बसने केलेल्या प्रवासा दरम्यान बसच्या खिडकीतून समुद्र किणारे सोडून जो गोवा दृष्टीस पडला त्याच सौंदर्यही काही कमी नव्हत. गोव्यामधील चार दिवसांच्या वास्तव्यात मधल्या दोन दिवसात जो गोवा मी पाहिला त्यातील समुद्र किणारे वजा करूनही मी जो गोवा पाहिला तो ही मला अतिशय भावला कारण त्यामुळेच मला गोव्यातील नैसर्गिक संपत्तीच खर्याध अर्थाने दर्शन झाले. मला वाटत गोव्याला येणार्याल बहूसंख्य पर्यटकांची गोव्याला समुद्र किणारे वजा करून पाहण्याची इच्छाच नसते. नेमक तेच पाहण्याचा मी प्रयत्न केला. समुद्र किणार्यामवर लोळत पडलेल्या अर्धनग्न स्त्रिया हा काही माझ्यासाठी आकर्षणाचा विषय नव्हता. पण त्यांना मी असभ्य असंस्कृत म्ह्णणार नाही कारण त्यांच्या ठायी मला सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा बराच असल्याचेही लक्षात आले. सभ्यता आणि सुसंस्कृतपणा म्ह्णजे काय ? आपल्या कोणत्याही कृतीचा इतरांना त्रास न होऊ देणे. समुद्र किणार्याकवर फेरफटका मारताना मी त्यांची छायाचित्रेही टिपली त्याबाबत त्यांची काहीच तक्रार नव्हती. कोणाला वाटेल मी माझ्या कॅमेरयात त्यांची अर्धनग्नता बंधिस्त केली. पण तस नाही मी त्यांची त्या वेशातही वावरण्याची सहजता बंधिस्त केली जी मला आपल्या या भारतीय लोकांत दिसत नाही. आपल्या शरिरापेक्षाही आपल्या आवडीनिवडींना अधिक प्राधान्य देण्याची शिकवणच जणू ते आपल्याला देतात. गोव्यात दारूची दुकाने सताड उगडी असतात लोक पाणी पितात तशी दारू पितात की काय अशी शंका मनात निर्माण व्हावी इतकी. पण तरीही माझ्या वास्तव्या दरम्यान मला कोणीही दारू पिऊन रस्त्यात पडलेला, शिवी गाळ करणारा अथवा हाणामारी करणारा एकही दिसला नाही. आपल्या जीवनातील जगण्याचा आनंद घेण्यात मग्न असणारा माणूसच मला अधिक दिसला. समुद्र किणारे सोडले तर बाकी गोवा तसा शांतच म्ह्णावा लागेल. उंच-उंच गगणाला भिडणार्या् इमारती नाहीत, गोधंळ करणार्याह जास्तीच्या गाड्या नाहीत. सगळीकडे छान मनमोहक बंगळे पण तेथील कौलारू घरे ही आजूबाजूच्या निसर्गामुळे आकर्षक दिसतात. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवळ आणि नारळाची झाडे. समुद्र किणार्याावर फेरफटका मारताना एका युक्रेनवरून गोवा पाहण्यासाठी आलेल्या एका सुंदर तरूणीसोबत आंम्ही फोटो काढले. माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी ती तरूणी किती सहज आणि आनंदाने उभी राहिली होती. हे तिच्यासोबत काढलेला फोटो पाहिल्यावर माझ्या लक्षात आले. तो फोटो पाहतानाही तिच्या अर्धनग्नतेकडे माझे अजिबात लक्ष गेले नाही कारण तिच्या चेहर्या वरील समाधान आणि निरागस हस्यच कोणाचही मन मोहून टाकायला पुरेस होत. त्या उलट विचार करता विमानातील हवाई सुंदरी असणार्या तरूणी दिसायला तिच्यापेक्षाही सुंदर होत्या पण त्यांच्या चेहर्याीवर चढविलेला आनंदाचा मुखवटा मला स्पष्ट दिसत होता कारण लेखक असल्यामुळे प्रत्येक माणसाचा मुखवट्या खालील चेहरा वाचण्याची मला सवयच होती. स्वतः कितीही दुःखी त्रस्त असतानाही इतरांना आनंद देण्यासाठी चेहर्याचवर उसण ह्सू ठेवण सोप्प काम नसत बहूदा त्याबद्द्ल त्यांचे कौतूक करावेच लागेल. नाहीतर आंम्ही आनंदी असताना रागवलेलो असल्याचा साक्षात्कार विनाकारणच कित्येकांना होत असतो. विमानप्रवासा दरम्यान मला एका गोष्टीचे वाईट वाटले येता- जाताना दोन्ही वेळा मला खिडकी जवळ बसता आले नाही. त्यामुळे विमानातून खाली जमिनिवरील दिसणारे मनोरम दृष्य पाहण्याची संधी सध्यातरी हुकली असंच म्ह्णावे लागेल.
    गोव्याला जाऊन साधी बिअरही न पिता शाहाकारी जेवन खाऊन सोबत येताना एकही दारूची बाटली न आणणारा मी अपवादाच असेन पण गोव्याचे निसर्ग सौदर्य मी माझ्या कॅमेर्याूत मोठया प्रमाणात साठवून आणले होते. जे फोटो पाहिल्यावर गोव्याला न गेलेल्यांना एकदा गोव्याला जायला हवे असे वाटल्याखेरीज राहणार नाही. गोव्यात दारू सोबतच इतरही बर्या च वस्तू विकत घेण्याजोग्या आहेत. त्यात खाण्याच्या वस्तूंचा समावेश अधिक आहे. मी गोव्याला टी-शर्ट , कोकम सरबत, सुके काजू वगैरे वस्तू विकत घेतल्या. गोव्याच्या सानिध्यात घालविलेले ते चार दिवस माझ्या आयुष्यात मी घालविले अविस्मरणीय दिवसच म्ह्णावे लागतील. गोव्याच्या समुद्रात मी मला पोहता येत नसल्यामुळे फार डुंबलो नाही पण गोव्यातील समुद्रात संगीत- नृत्य याचा आनंद उपभोगत रात्रीच्या समुद्राच आणि रात्रीच्या गोव्याच सौदर्य नजरेत भरत क्रूजवरून मारलेला एक तासाचा फेरफटकाही खूपच आनंदायी होता. मुंबईतील समुद्र किणार्यांरबाबत मला असे आकर्षण कधीच वाटले नाही. मुंबईच्या समुद्र किणार्या वर सहलीसाठी म्ह्णून मी मोजून तीन- चार वेळा गेलो असेन. या सहली दरम्यान मी काही लोकांशी चर्चा केली असता माझ्या असे लक्षात आले की गोव्यात केरळ आणि महाराष्ट्रातील सिधूदूर्ग भागातील लोक रोजगारानिमित्त तेथे वास्तव्यास जात असतात पण तेथे स्थायिक होत नाहीत. गोव्याला मुंबईसारखी मराठी बोलणारे स्थानिक लोक मला दिसली नाहीत पण तशी नसतीलच अस मी खात्रीने म्ह्णू शकणार नाही. गोव्यात आणखी एक गोष्ट मला कचर्याकचे ढिगारे कोठे ही दिसले नाहीत. गोवा बर्या पैकी सुंदर स्वच्छ, मोकळा आणि निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असल्याचे दिसले. गोव्याचा पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असल्याचे ही स्पष्टपणे जाणवले. गोव्यातील समुद्र किणारे आणि काही पर्यटनस्थळे वगळली तर त्या व्यतिरीक्तही गोव्यात पाहण्यासारखे बरेच काही असणार याची मला खात्री आहे. वेळे अभावी गोव्याचा प्रत्येक कोपरा पाह्णे शक्य नव्ह्ते पण समुद्र किणारी सहलीला जाण्याचे ठरलेच तर गोवा मला पुन्हा- पुन्हा नव्याने पाहायला आवडेल हे नक्की.

    -- निलेश बामणे

  • शब्दकोडे

    वर्तमानपत्र ,शब्दकोडे आणि वाचक यांचे काही वर्षापुर्वी त्रिकूटच तयार झालेलं होत असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. पुर्वी काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांमुळेच ओळखली जात होती अस म्ह्णा अथवा काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांसाठीच विकत घेतली जात होती असे ही म्ह्णता येईल . 

  • सणांचा महिना

    या वर्षीचा हा ऑगस्ट महिना म्हणजे खर्याप अर्थाने सणांचा महिना म्हणता येईल. या एकाच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला आणि श्री गणेश चतुर्थी इ. सण साजरे होत आहेत. भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्व सार्याल जगालाच परिचित आहे पण आज होत चाललेला भारतीय सांस्कृतीचा र्हातस हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होण्यास कारणीभूत होत आहे. त्यातील काही बदल स्वागतहार्य तर काही बदल आक्षेपाहार्य आहेत.

  • ट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………!!!

    ट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………

    (शरमले ट्रेकर्सचे बुरुज ! म टा दिनांक : १२ सप्टेम्बर १४ रोजी प्रसिद्द झालेल्या बातमीवर आधारित)

  • मनसेचा पराभव की नवी सुरूवात…

    पुढे होणार्‍या निवडणुकात मनसेला इतक्या दारून पराभवाचा सामना करावा लागणारच नाही. राजकीय अभ्यासक जे आता मनसेला कोपर्‍यात पाहता आहेत त्यांच्यावर भुवया उंचावण्याची वेळ आल्यावाचून राहणार नाही इतकी ताकद राजसाहेबांच्या महाराष्ट्राच्या विकासाबाबत पाहिलेल्या स्वप्नात आहे. 

  • आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ?

    प्रत्येक साहित्य हे कोणत्या ना कोणत्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले असते. ती प्रेरणा कधी रागातून, प्रेमातून, तिरस्कारातून अथवा अहंकारातूनही मिळालेली असते. काहीचे व्यक्तीगत आयुष्य त्या आयुष्यात आलेले चांगले – वाईट अनूभवही काहींच्या साहित्याची प्रेरणा ठरत असतात. त्यामुळे ढोबळ्मानाने विचार करता एखाद्या प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य वाचकांना कोणती ना कोणती प्रेरणा देतच असतात चांगली अथवा वाईट. त्यामुळे आजचे साहित्य ही प्रेरणादायी आहे असेच म्ह्णावे लागेल नाही का ?

    एखादे प्रेमावर आधारित साहित्य वाचून प्रेमात धोका खाल्लेल्याला आत्मह्त्या करण्याची प्रेरणा मिळाली तर त्या साहित्याला प्रेरणादायी साहित्य म्ह्णता येईल का ? नाही म्ह्णता येणार. जे साहित्य मणूष्यास उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरीत करते अथवा समाजासाठी, देशासाठी अथवा जगासाठी काही मोठे कार्य करण्यासाठी प्रेरीत करते ते साहित्य प्रेरणादायी मानले तर आजचे साहित्य किंचितही प्रेरणादायी नाही असच म्ह्णावं लागेल. मागच्या काही दशकात एक – दोन पुस्तके सोडली तर ज्याला फार प्रेरणादायी म्ह्णावे असे पस्तक वाचनात आले नाही. ज्याला अल्प प्रमाणात प्रेरणादायी म्ह्णावे असे साहित्य निर्माण झाले ही असेल पण त्यातून प्रेरणा घेऊन कोणी फार मोठे कार्य केल्याचे वाचनात अथवा पाहण्यात आले नाही.

    आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा फक्त पैसा, धन-संपत्ती आणि सुखसाधने मिळविण्यासाठीच चाललेली आहे. या स्पर्धेतून वेळ काढून आजची पिढी स्वतःच मनोरंजन करण्याचा थोडासा प्रयत्न करते. त्यासाठी त्यांना आवश्यक असते मनोरंजन करणारे साहित्य. आजच्या जगात प्रेरणादायी साहित्य वाचण्याची गरज पडते ती जीवनात अपयशी ठरलेल्या लोकांना . अशाही लोकांना झटपट पैसा मिळविण्याचे मार्ग सांगणारे साहित्य हे प्रेरणादायी साहित्य वाटते. सर्वाधिक लोकांचा मनोरंजनाकडे कळ लक्षात घेता आता जगभरात साहित्यनिमिर्ती ही मनोरंजनाला डोळ्यासमोर ठेऊनच होऊ लागली आहे. सध्या आपल्या देशात प्रकाशित होणारे साहित्य पाहिल्यास ते सहज लक्षात येते. खर्‍या अर्थाने प्रेरणादायी साहित्य निर्माण करणारे तुरळ्क आहेत आणि त्यांचाही असं साहित्य निर्माण केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कंबरटा मोडलेला आहे. अगदी इंटरनेटवरही एक प्रेम कविता शेअर केल्यावर तिला हजारो लाईक मिळतात पण त्याउलट प्रेरणादायी कवितेला मोजून दहा- वीस लाईक मिळतात. आज प्रेरणादायी साहित्य वाचण्याची वाचकांचीच इच्छा नाही त्यामुळे ते निर्माण करण्याच्या भानगडीतच हल्ली कोणी पडताना दिसत नाही. पूर्वी लिहिल्या गेलेल्या प्रेरणादायी साहित्यालाच आजही बाजारात बर्‍यापैकी मागणी असल्याचे दिसते. त्यामुळे आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ? या प्रश्नाचे ठोस उत्तर आज कोणालाही देता येणार नाही.

    -- निलेश बामणे

  • माशी ग माशी…….!!!

    माशी ग माशी

    मानू तुझे आभार कसे?

    अशीच बसत जा तू,

    सगळ्यांना कर वेडे-पिसे…………!!!