नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कौन बनेगा करोडपती ? हा प्रश्न विचारला जाताच करोडपती नसलेल्या जवळ – जवळ सर्वच लोकांचे हात वर जातात. याचा अर्थ करोडपती होण हे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच स्वप्न असत. त्या स्वनाच्याच मागे काही लोक आयुष्यभर धावत असतात त्यातील काही हार मानून गप्प् बसतात तर काही आपल्या शेवटच्या श्वासापर्यत त्या स्वप्नाचा पाटलाग करीत राहतात.
माझ्या ३५ वर्ष्याच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत असंख्य बक्षिसे व प्रशस्ती पत्रे मिळाली पण नताशाच्या वडिलांनी कृतज्ञतेचे गाळलेले दोन अश्रुंचे मोल त्या सर्वांहून माझ्यासाठी फार मोठे आहे.
आमचा दीपावली विशेषांक कारण तो आंम्हा सर्वाच्या सहभागातून संपन्न झालेला आहे. मी जरी ‘साहित्य उपेक्षितांचे’ या मासिकाचा संपादक असलो तरी आमच्या मासिकाचा दिपावली विशेषांक मात्र माझ्या साहित्यिक मित्र-परिवाराच्या मदतीशिवाय काढणं मला शक्यच होणार नाही.
महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला.
द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानी त्याना कचाट्यात पकडले. शकुनी लबाडीने खेळला. पांडव खेळांत सर्व गमावून बसले. इतके की भावनीक बेभान होऊन त्यानी जींकण्याच्या अपेक्षेने पत्नी द्रौपदी हीलाही पणाला लावले. कौरवानी द्रौपदीची विटंबना सुरु केली. हारलेले पांडव मुकपणे सारा भयावह प्रकार बघत बसले.
द्रौपदी असाहय्य झालेली होती. तीला कुणीही मदत करण्यास सरसावत नव्हते. शेवटी तीने मानलेला भाऊ श्रीकृष्णाचा धावा केला. तो धाऊन आला. त्याने तीला त्या वस्रहरण प्रसंगातून सोडवले. सारे वातावरण शांत होऊ लागले होते.
द्रौपदी मात्र मानसिक निराशेने ग्रस्त झाली होती. ती कृष्णावर देखील रागावली. तीला एक आधीकार व प्रेम प्राप्त झाले होते.
" कृष्णा हे सारे विक्षीप्त घडत असताना, मी तुझा धावा केला. तू आलास, परंतु तू येण्यास उशीर कां केलास ? " प्रेमाने परंतु निराशेच्या स्वरांत द्रौपदीने कृष्णाजवळ तक्रार करीत विचारणा केली. श्री कृष्णानी हासून उत्तर दिले.
" तू माझा धावा केलास. मदतीची अपेक्षा केली. "
तू त्या क्षणी काय म्हणालीस ते आठव. तू म्हणाली होतीस " हे द्वारकेच्या कृष्णा मी संकटात आहे. तू त्वरीत येऊन माझी सोडवणूक कर. "
तू जेव्हां मला हांक दिली की " हे द्वारकेच्या कृष्णा, तेंव्हा त्याक्षणी मी तर तुझ्याच ह्रदयांत बसलो होतो. "
जर तू मला " माझ्या ह्रदयातील कृष्णा संबोधून हाक दिली असतीस, तर मी तुझ्याजवळच होतो. त्याचक्षणी मला येता आल असत. परंतु तु मला द्वारकेच्या कृष्णा संबोधल्यामुळे मला प्रथम द्वारकेस जावे लागले व तेथून तुजसाठी आलो. त्यामुळे वेळ लागला. "
आपण देखील जीवनांत ह्याच रीतीने आपली वाटचाल करतो. अशी समज आहे की तो ईश्वर हा तुमच्या आमच्यामध्येच असतो. अहं ब्रह्मास्मि अर्थात मीच ब्रह्म वा परमेश्वर आहे म्हणतात. मात्र आपण त्याला जाणत नसतो. समजत नसतो. "मी " ला ओळखत नसतो. त्याला आम्ही बाह्य जगांत शोधण्याचा सतत प्रयत्न करतो. देवस्थळे, मंदिरे, चर्च, गुरुद्वारे, मशिदी, इत्यादी मध्ये त्याच्या अस्तित्वाचा शोध बोध घेण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण आयुष्य खर्च करतो. आम्ही ईश्वराला आमच्यातच म्हणजे "मी " चा शोध घेण्यात कमी पडतो. त्यात वेळ खर्ची होते. ह्रदयातील त्या ईश्वराला श्री कृष्णाला जर द्वारकेत न्याल तर आयुष्याची वेळ वाया जाईल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
काशी मधी गेली
दिल्लीची बिल्ली. ….
बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्या वर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नाही. सकाळची वाट पाहण्या शिवाय गत्यंतर काय?
कोलाहला पासून दूर दूर शांत सागर किनारा. संध्याकाळची वेळ आणि ओलसर वाळूची बैठक. समुद्रातून ये-जा करणारा एखाद दुसरा पडाव. मधेच निरव शांततेचा भंग …..
शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो. तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल.
मला तेथे प्रत्यक्षात आला. माझ्या मित्राने सोबत आणलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन वगैरे झाल्यावर आंम्ही आमची प्रकाशित पुस्तके त्यांना भेट म्ह्णून दिली आणि दुसर्या पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी ही घेतली त्यांच्या भेटीची आठवण म्ह्णून . त्यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली या चर्चे दरम्यान त्यांनी आंम्हालाही बोलत केल. सुरूवातीला आंम्ही त्यांच्याशी बोलताना चाचपडत होतो पण नंतर त्यांनीच आंम्हाला बोलतं केलं.
Copyright © 2025 | Marathisrushti