नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
दैनंदिन आयुष्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतो. कोण नोकरी करतो, कोण व्यवसाय, तर कोण धर्माची कामे देखील करतो.
October 17, 2021
गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता.
February 2, 2026
नोव्हेंबर चे कालनिर्णय चे पान उलटले आणि चाहूल लागली ती माझा पन्नाशीचा उंबरठा ओलांडण्याची.
Age is जस्ट a number, all is in your mind..
असं अनेकदा ऐकलेलं असतं आणि ते खरं आहे.
तरीही मागे वळून पाहिलं की आपलाच प्रवास आपण कसा केला याचं चित्र समोर उभं राहतं.
अनेक आनंदाचे क्षण, यशाची शिखरे, संघर्ष आणि काय असतं प्रत्येकाच्या आयुष्यात? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो इतकंच बाकी सुख दुःख असा ऊन पावसाचा खेळ काही जीवनभर सुटत नाही. आपण खेळत राहतो.. कधी जित कधी हार असणार.. असू देत...
पन्नाशी म्हणजे आयुष्यातली लख्ख दिसणारी दुपार.
अनेक अनुभवातून, कर्तृत्व सिद्ध करून आपण उभे असतो.
एव्हाना उन्हाचे चटके सोसण्याची सवय झालेली असते.
आपले कोण, परके कोण याची अनुभूती घेतलेली असते.
कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडे पाहुन जीवनातल्या संध्याकाळची जाणीव रोज होत असते.आपल्या सतत कार्यरत असलेल्या लोकांना थकलेलं पाहणं खुप वेदना देणारं असतं.
त्याचवेळी आपली मुलं यशस्वी होत असतात. त्याचं समाधान असतं.आता थोडी आपली सुखाची परिभाषा बदलललेली असते. दुसऱ्यांना आनंद देत आपण स्वतःचा आनंद शोधत असतो. व्यवहार दूर ठेवत आपण थोडे हळवे होत जातो.
आता कुणाशी बाजारात काही खरेदी करतांना पैसे कमी करा यासाठी भांडत नाही की कुणाला फार उपदेशाचे डोस ही देणं योग्य समजत नाही. जीवन हा ज्याचा त्याचा प्रवास.. तो प्रत्येकाचा वेगळा हे पटलेलं असतं.
येणाऱ्या संध्याकाळची तयारी दुपारीच केली की
संध्याकाळ रम्य होते.दिवे लख्ख स्वच्छ करायचे. त्यातली तेल, वात, आणि सोबत समाधानाचे अत्तर जागेवर आहे ना?सगळं ठीक आहे का हे बघून ठेवायची असते ती दुपारीच..
कधी सोनपावलानी कातर वेळ येईल तेंव्हा आपणच आपले आनंदाचे दिवे लावायचे असतात. आणि कृतज्ञतेच्या अत्तराने गंधित व्हायचे दिवस येणार असतात.
सोबत कुणी असेन. नसेन.. माहीत नसतं. आयुष्याची रेषा पुढे जात असतेच...
कारण प्रत्येकालाच मालकंस आळवायचा असतो पण भैरवीची चाहूल नकळतपणे मनात असतेच ना?
फार सेंटी बिंटी लिहिण्याचा माझा उद्देश मुळीच नाही. परवा डॉ. कडे गेलो म्हटलं बघा दिवाळीच्या गोडा धोडानी जरा दोन चार किलो वाढलंय (वजन ). बीपी गिपी, शुगर चेक करा. डॉक्टर निर्वीकार.
बसा. नाव, वजन नोंदी केल्या, वय म्हटलं 50,
काय? त्यांचा प्रश्न.
म्हणजे? जास्त वाटलं का?
No मला वाटले 40 असेन!
माझ्या अंगावर पुन्हा मूठभर मास चढलं.
सगळं नॉर्मल आहे. साखर 105 म्हणजे ओक्के.
पण वजन जरा कमी करा बरं.व्यायाम वाढवा.
नक्कीच! असं म्हणुन मी परतलो.असो...
जगण्याचं नवे भान पन्नाशी देते.
कुणी uncle, सर, काका, दादा काही म्हटलं तर छान स्माईल द्यायचं...
रफी लता यांच्या गाण्यासोबत अर्जितला पण ऐकायचं..
पुरणपोळी सोबत पिझ्झाचा बाईटपण घ्यायचा...
मंदिरात सोवळं आणि सिंगापूरात जीन्स वर मिरवायचं..
रोज नवीन काहीतरी वाचायचं.. जुन्या मित्रांना बोलायचं..
पैश्यापेक्षा आनंद कमवायचा..
असेल तो पैसा जरा जपून वापरायचा..
बाकी इन्शुरन्स बक्कळ काढुन ठेवायचा..
स्वतःला आणि जोडीदाराला नाही दुखवायचं..
पुन्हा तारुण्यात जायचं..
रोज मोगरा तिच्या केसात आणि
सुख आपल्या ओंजळीत साठवायचं..
दुखावलं असेन कुणी आपल्याला त्यांना मनापासून माफ करायचं..
काहीच मनात नाही ठेवायचं.
रोजच सकाळी मनाची पाटी स्वच्छ करायची..
नवे अनुभव त्यावर लिहायचे.. संध्याकाळी वाचायचे,
भरून आले डोळे तर थोडं मोकळं व्हायचं...
आपलं आनंदाचे झाड रोज नव्याने बहरत ठेवायचं..
आलेला क्षण देवाचा प्रसाद म्हणायचा आणि गोड मानायचा..
बघा आयुष्य तेजाळणार हे नक्कीच...
गद्धे पंचविशी,चाळीशी झाली आणि आता साठी बुद्धी नाठी होण्याअगोदर पन्नाशीत एवढं जमलं तरी पावलो बुवा!
म्हणजे जिंदगी लंबी नही उंची होनी चाहिये असं पटतं!
Lots of Love to All.....
ता. क. हे मी सर्व सवाई महोत्सव ऐकताना लिहतोय..
अभिजीत कोळपे
चिंचवड पुणे 33
फोन 7350005813
January 18, 2024
आता या कथेतील सर्वांचाच प्रेमाच्या वाटेवर सुरु केलेला प्रवास थांबला होता म्हणून ही वाट कधीच मोकळी राहणार नव्हती.
September 9, 2021
पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट सई परांजपे यांनी बनवला होता. त्या बद्दल बोलताना सई परांजपे म्हणतात....
पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट मी प्रस्ताव मांडला. त्या वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझ्या प्रस्तावाला लगेचच मान्यता मिळाली. पण स्वत: पंकज मलिक या सिनेमासाठी मुळीच राजी नव्हते. किंबहुना, ते मुळात कुणाला भेटायलाच तयार नव्हते. त्यांना मनापासून हा सोपस्कार नको होता. भाव खाण्याचा त्यात लवलेश नव्हता. पण एकदा कशीबशी त्यांची भेट घेऊन, त्यांना रूपरेषा समजावून त्यांचे मन मी वळवू शकले. पुढचे सोपे होते. एकदा ‘हो’ म्हटल्यावर मग हवे ते सहकार्य आनंदाने द्यायला ते तयार झाले.
त्यांचे घर केवळ शूटिंगसाठी नव्हे, तर ‘अड्डा’ म्हणून आमचे हक्काचे ठिकाण झाले. पंकजदा मला नेहमी ‘माय डियर सिस्टऽर’ अशी छान हाक मारीत. ते हाडाचे कलावंत होते. नट होते. झकासपैकी ‘शोमन’ होते. त्यामुळे त्यांच्या मुलाखती, त्यांचे किस्से बहारदार होत. मधे मधे ते गाणे गुणगुणत, एखादी नक्कल करीत, एखादा संवाद रंगवून सांगत.
त्यांच्या गच्चीवर चित्रित केलेला एक प्रसंग : दादा कट्टय़ावर रेलून बसले होते. आठवणी सांगत होते. जवळच त्यांची पत्नी ऊन द्यायला कापडावर काही वाळवण पसरत होती. कॅमेरा चालू होता. बोलता बोलता दादा ‘दो नैना मतवाले’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे गाऊ लागले. आपल्या पत्नीकडे पाहत.. अगदी ‘आशिकाना अंदाजसे’! साठेक वर्षीय दीदींनी मग लटक्या रागाने असा काही मुरका मारला की बस्स!
नॅशनल फिल्म अर्काइव्हज्कडून आम्ही पंकजदांच्या काही गाण्यांचे दुर्मीळ भाग मिळवले. ‘चलो पवनकी चाल’ इ. जुन्या गीतांचे चित्रण पाहणे-ऐकणे हा थरारक अनुभव होता.
रायचंद बोराल हे प्रख्यात संगीत दिग्दर्शक न्यू थिएटरच्या संगीत विभागाचे प्रमुख होते. त्यांना बॉलीवूडच्या संगीताचे जनक मानतात. त्यांचा आणि दादांचा फार पूर्वीपासूनचा सहप्रवास. दोघांनी उभरत्या बंगाली सिनेसृष्टीत मोलाची कामगिरी केली होती. इतिहास घडवला होता. तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल पंकजदांच्या चरित्रपटासाठी अत्यावश्यक होते. पण अनेक वर्षांपासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. बातचीत बंद होती. तेव्हा या सिनेमात बोरालांच्या सहभागाविषयी ‘दुहेरी’ विरोध होता. मोठय़ा प्रयासाने दोघांची मने वळवून अखेर या धुरंधर संगीतकाराची सुंदर मुलाखत डबाबंद केली.
हेमंतकुमारांच्या बाबतीतही तोच प्रकार. दोघांचा वर्षांनुवर्षे अबोला आणि म्हणून विरोध. पण एव्हाना मी समजूत घालण्यात तरबेज झाले होते. तेव्हा हाही तिढा मी सोडवला. मग हेमंतकुमार पंकज मलिक यांच्या योगदानाबद्दल अप्रतिम बोलले. एवढेच नाही, तर दादांनी बसवलेले एक गीतही गायले.
पंकज मलिक नंतर जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते फाळके पुरस्कार घ्यायला पुढे झाले तेव्हा पाश्र्वसंगीत म्हणून मी त्यांचेच ‘आई बहार आई, आई बहार’ हे सदाबहार गाणे साऊंड ट्रॅकवर लावले. हा सिनेमा खरोखरच चांगला झाला होता. त्याला केवढे ऐतिहासिक आणि संग्राह्य़ मोल होते. अवघा काळ बोलका झाला होता. पण दुर्दैव! त्याचा दूरदर्शनवर आज मागमूसही उरलेला नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 1, 2018
औरंगाबाद जळगांव रस्ता खराब आहे, हे समजायला मोठ्या हाॅस्पीटलमधे जाऊन पैसे खर्च करून घ्यावे लागतात, ही झालेली प्रगती काय कमी आहे ?
May 15, 2019
व्यक्ती आणि समाज परस्परपूरक असायला हवेत कारण ही राष्ट्राची दोन तोंडे आहेत. व्यक्तीने समाजासाठी, समाजाने राष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. दोघांपैकी एकानेही आततायीपणा केला की राष्ट्राचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात भारुड पक्ष्याचे उदाहरण देता येईल. एका मोठ्या सरोवरामध्ये भारुड पक्षी राहतात. त्याला दोन तोंडे होती, मात्र शरीर एकच होते. एकदा भारुड पक्षी सरोवराच्या काठावर आला असता, जवळच्या झाडावरून एक फळ खाली पडले. एका तोंडाने ते लगेच उचलले व ते तो खाऊ लागला. ते फळ फारच मधुर होते, त्यामुळे फळ खाताना ते पहिले तोंड म्हणाले, '' मी आजपर्यंत एवढे सुमधुर फळ खाल्ले नाही. '' ते ऐकून दुसऱ्या तोंडालाही ते फळ खाण्याची इच्छा झाली. त्याने पहिल्या तोंडाला ते फळ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की आपल्या दोघांचे पोट एकच आहे त्यामुळे मी खाल्ले तरी ते याच पोटात जाणार आहे, असे म्हणून त्याने ते संपूर्ण फळ एकट्यानेच खाऊन टाकले.पहिल्या तोंडाच्या अशा वागण्यामुळे दुसऱ्या तोंडाला फार राग आला. त्याने पहिल्या तोंडाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी भारुड पक्षी फिरत असताना दुसऱ्या तोंडाला एक फळ सापडले. ते फळ फारच विषारी होते. दुसऱ्या तोंडाने ते खाण्यास सुरुवात केली, त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की, अरे हे फळ विषारी आहे ते पोटात गेल्यास आपण दोघेही मरून जाऊ. मात्र दुसऱ्या तोंडाने त्याचे म्हणणे मुळीच ऐकले नाही. त्याला पहिल्या तोंडाला धडा शिकवायचा होता. तो म्हणाला, ' 'मी हे फळ खाणारच. तू मला सांगणारा कोण?'' असे म्हणून त्याने ते संपूर्ण विषारी फळ खाल्ले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व थोड्याच वेळात भारुड पक्षी मरून पडला. एका तोंडाने वाईट हेतूने आततायीपणा केल्याचे फळ त्याला मिळाले होते.
January 25, 2017
विजापूर दारी चाकरी करणारे मोरे बंधु शिवाजीच्या कर्तृत्वाने चिडले होते. आपल्यापेक्षा लहान असलेल्या एका मुलाने आम्हास नोकरी द्यावी, हा त्यांचा अपमान होता आणि म्हणूनच त्यांनी शिवाजीला पकडून आणण्याचे आदेश दिले होते.
December 28, 2021
बुढा दिवस रात्र वाडीची राखण करे. बुढी गडचिरोलीच्या हाटात ( बाजारात ) भाजीपाला नि डांगरं विकून आणे. बुढ्याचं गाव नदीपासून थोड्याच अंतरावर होतं. बुढी बुढ्यासाठी रोजच सकाळ संध्याकाळ शिदोरी घेऊन यायची.
December 12, 2023
November 12, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti