(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • वेदांच्या वेदीवरुन

    जगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे.

  • भारतीय संतांचे योगदान

    भारत भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते डॉक्टर स्नेहल तावरे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात संतांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे संतांचे योगदान आणि संत साहित्याची समीक्षा या डॉक्टर नीला पांढरे यांच्या लेखाने या पुस्तकाचा प्रारंभ होतो

  • एक असतो बिल्डर

    एखाद्या बिल्डर कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो? बिल्डर म्हणजे जमीन आणि पैशाच्या राशी असे आपले समीकरण असते. मात्र, या व्यवसायामागे किती मेहनत असते, किती परिश्रम आणि चिकाटी असते याची प्रचीती या पुस्तकातून येते.

  • वाचन संस्कार

    वाचाल तर वाचाल, असे आपण नेहमी ऐकतो. या उक्तीची कृती करण्याची कशी गरज आहे, हे या पुस्तकावरून समजते. लेखक सतीश पोरे यांच्या या पुस्तकातील एकूण ९ भागांतून वाचन संस्कृतीचा वेध घेतला आहे.

  • शेतीमातीची सल ‘ करपलं रान सारं’

    शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे 'करपलं रान सारं' या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड होम अशी शब्दरचना ग्रामनात्याची साक्ष देतात. धान्य पिकविले जाते. ते विकले जाते. शेतकऱ्यांची पदोपदी पिळवणूक होते.हे सांगताना ते म्हणतात.
    करपलं रान सारं,झाला डागीनचा वाडा
    गाव वेशीला टांगला,ह्यो ग जन्माचा ख्वोडा
    गावचं गावपण हरवत चाललय. शहराच्या ओढीनं माणसं जास्त व्यावहारिक बनत आहेत.गाव, गावचा मळा, माणसाचा लळा ओसाड होतो की काय ?अशी अनामिक भिती कवीला सतावते आहे. 'गेला गावकुस' या कवितेत ते खंत व्यक्त करतात.
    गेला गावकुस गेला लपंडाव
    व्यसनाचे पेव आता गावांमध्ये
    अध्यात्माची वाटचाल पुर्वीइतकी निर्मळ आता राहिलेली नाही. देवाच्या वाटेवर भक्तीमार्गाचा वास असतो तरी अपघातात मरण येते. तोंडामध्ये ईश्वराच्या नामोच्चार असतो मग असे का घडावे? देवाच्या नावाने धर्मभोळेपणा जपला तर जात नाही ना? हे विचारण्याचे धाडस कवीने दाखविले आहे.
    असं दिंडीचं मरण
    उभ्या जन्माची जिभाळी
    सवसांज आहेवाची
    कशी रडते आभाळी
    'करपलं रानं सारं ' हा कवितासंग्रह वाचताना काही प्रश्न उभे केले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.ते म्हणतात काळ्या आईच्या प्राक्तनातून माझ्या भूमियांच्या वेदनेचे कढ मला नेहमीच अस्वस्थ करत आले. खरेतर अस्वस्थताच लेखनाची उर्जा असायला हवी. आजची गावखेड्याची अवस्था पाहून कवी गलबलतो. कुणब्यांची दु:खसल कुणबावा असल्याशिवाय मांडता येत नाही. अनुभवाची शिदोरी पाठीशी लागतेच.
    कुणबी कर्जात बुडाला
    सालदार घेई झोके
    मोंढ्यामंदी टपलेले
    त्यांच्या मालावर बोके
    साध्या शब्दात समर्पक आशय कवीने मांडला आहे. जालना हा मराठवाड्यातील जिल्हा. तेथील बोलीभाषेचा शब्दपरिपोष कवितासंग्रहात जाणवतो.तो स्वाभाविक आहे.करपलं रान सारं मध्ये पाच श्रृंगारिक लावण्यादेखिल आहेत. हायकू हा काव्यप्रकार कवितासंग्रहात आला आहे. बेकारीचे चटके उद्धृत केलेले आहेत. ही प्रचंड मोठी समस्या आहे. खेड्यातील तरूण युवक शहरांकडे धावत आहे. पोटाचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या बाबतीत हा संग्रह नाविन्याचा शोध घेत आहे.एकूण बासष्ट कवितांचा समावेश यात आहे. सरदार जाधव यांनी केलेले मुखपृष्ठ बोलके आहे. कुंडलिक अतकरे यांनी देखणा कविता संग्रह बनविला आहे.फक्त एकाच विषयावरील कवितांचा समावेश होणे शक्य झाले असते तर वेगळी झालर प्राप्त झाली असती. सर्वच कविता गेय आहेत. नादनिर्मितीमुळे हृदयापर्यंत भिडतात.
    करपलं रान सारं (कवितासंग्रह​)
    डॉ. प्रभाकर शेळके
    कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद
    पृष्ठे;७१ मुल्य ; ७०₹

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार,बीड
    सं.९४२१४४२९९५

  • बाप – शोध आणि बोध

    अलीकडील काळात फादर्स डे साजरा केला जातो ते मुलांच्या भावविश्वात पित्याचे स्थान मात्र तेवढीच महत्त्वपूर्ण असते म्हणूनच आई हा विषय घेऊन मराठीत जेवण साहित्य निर्माण झाले तेवढ्या प्रमाणात वडिलांवर झालेले नाही मात्र वडिलांवर जे काही लिहिले गेले त्याची खूप प्रशंसा झाली दुर्लक्षिलेल्या बाप या नात्याचे कंगोरे शिरीष पै नरेंद्र जाधव सुधा मूर्ती आदींनी उलगडले आहेत

  • सुमनसुगंध

    प्रसन्न मुद्रा, स्नेहाळ हास्य आणि मधासारखा गोड गळा लाभलेल्या सुमन कल्याणपूर यांचे नाव आजही संगीत क्षेत्रात अदबीने घेतले जाते. कोणत्याही वादात न पडणाऱ्या सुमनताई मितभाषी असून, त्यांचे जीवन साधे, सुंदर आहे.

  • महाराष्ट्र देशातील किल्ले

    आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी मराठी भाषेत गड किल्ल्यांच्या माहितीवरील ग्रंथ प्रकाशित केले आहेत त्यामध्ये चिं. ग. गोगटे यांचे नांव सर्वप्रथम येते. त्यामुळे चिंतामण गंगाधर गोगटे यांना आद्य दुर्ग अभ्यासकच म्हणले पाहीजे. इ.स. १८९६ पर्यंत महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयीच्या माहितीचे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक लिहिले गेले नव्हते. गोगटे यांच्या ग्रंथाचा काळ हा इतिहासाचार्य राजवाडे यांचे ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीचा होता.

  • काटेरी केनियाची मुलायम सफर

    आफ्रिका खंडात पर्यटनाला जाण्याची कल्पना आपल्याला युरोपात जाणे इतकी आकर्षक वाटत नाही मात्र डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या या पुस्तकातील केनियाच्या सफरीचे वर्णन वाचून आफ्रिकेत जाण्याचे वेध लागले नाहीत तरच नवल!

  • खाद्याविष्कार

    प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या खास पाककृतींचा हा संग्रह आहे. पुस्तकाचं वेगळेपण हे, की त्यांनी विविध फळांचा वापर करून पदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन केलं आहे.