महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ, २ टेस्पून शाबुदाना पीठ, चवीपुरते मिठ, क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा), तळण्यासाठी तेल.
कृती:
१) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यावा. भिजवलेला गोळा या कपड्याने १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावे.
२) नंतर भिजवलेल्या पिठाचे करवंदाएवढे छोटे गोळे करावे आणि ते गोळे कोरडे पडू नयेत म्हणून ओल्या फडक्याखाली ठेवून द्यावे.
३) तेल मध्यम आचेवर तापवावे. गोळे लाटून पुर्या तळाव्यात. तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. मध्यम आचेवर तेल तापवावे.
४) पुर्या तळल्यावर जाळीच्या रॅकवर तेल निथळण्यास ठेवाव्यात. या रॅकच्या खाली एकादे ताट ठेवावे म्हणजे निथळलेले तेल ताटात जमा होईल.
५) पुर्या शक्यतो कुरकूरीत राहातील. पण जर राहिल्या नाहीत तर बेकिंग ट्रे मध्ये पुर्या पसरवाव्यात. ओव्हन २०० F (९३ C) वर प्रिहीट करावा, बेकिंग ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा आणि साधारण १० मिनीटे पुर्या बेक कराव्यात. बेक केल्यावर पुर्या नक्की कुरकूरीत राहतील.
स्टफिंग साठी: उकडलेला बटाटा त्यात मीठ हिरवी मिरची जिरे पेस्ट घालून कालवून घालावे. खारे शेंगादाणे. उपासाची शेव.
पाणी पुराचे पाणी
साहित्य: अर्धा कप चिंच, ४-५ टेस्पून किसलेला गूळ, १०-१२ खजुर, ६-७ हिरव्या मिरच्या, २ टिस्पून जिरेपूड, मीठ.
कृती:
१) चिंच पाण्यात भिजत घालून चिंचेचा कोळ करावा. खजूर ४-५ तास कोमट पाण्यात भिजवावे. बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे.
२) हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक कराव्या.
३) ४-५ भांडी पाण्यात चिंचेचा कोळ, गूळ, खजूराची पेस्ट, मिठ, मिरचीची चटणी, जिरेपूड सर्व मिक्स करावे.
तामिळ पद्धतीचे जेवण म्हणजे तांदुळ, विविध डाळी,शेंगा यांचा सुरेख संगम आहे. तामिळनाडूला डोसा, पोंगल ,इडली आणि सांबर ,मसालेदार पुलिओगरे, यांची भूमी समजले जाते .तामिळ लोकांना भात खूप आवडतो. दिवसातील प्रत्येक जेवणासाठी ते भाताचा वापर करतात. भाता सोबतच मसुरीची डाळ आणि शेंगाचाही वापर केला जातो. चिंच ,मिरे ,हिरवी ,लाल मिरची ह्यांचा जेवण स्वादिष्ट आणि मसालेदार करण्यासाठी वापर केला जातो. सढळ हाताने कढीपत्याचा वापर तमिळ जेवणात केला जातो मिरची आणि मसाल्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच पदार्थ पचनास सुलभ व्हावेत म्हणून दह्याचाही खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोहरी,लसूण,जिरे आणि मसाले ह्यांचा फोडणीसाठी वापर केला जातो.नारळा चा प्रत्येक पदार्थात वापर आणि लवंग जायफळ कोशिंबीर गुलाब पाण्याचा जेवणात वापर होतो इडली डोसा आदि मेदू वडा या तिन्ही पदार्थानी भारताच्या सीमाही पार केल्या आहेत.
तामिळनाडू म्हटलं की समोर येतात ते वेगवेगळया नावाचे भात. तांदळाच्या राज्यामध्ये आपल्याला मुरुक्कू, इडिअप्पम असे तांदळाचे विविध पदार्थ पाहायला मिळतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हिरव्या पालेभाज्या असे नुसते नाव घेतल तरी मुलांच्याच काय पण मोठ्यांचे चेहेरे पण जरा तिरकेच होतात. कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये नसतील एवढी पोषणतत्वे या पालेभाज्यांमध्ये असतात. हिरव्या रंगामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, ई जीवनसत्त्व आढळून येतात. यात लोह, खनिजे, झिंक मुबलक प्रमाणात असल्यामुळे डॉक्टर आपल्या रोजच्या जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा वापर करा असे सांगतात.
साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, दोन वाट्या किसलेला कोबी, दोन वाट्या किसलेले गाजर, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, मीठ व साखर चवीप्रमाणे, तेल, हिंग, मोहरी.
कृती : मेथी, गाजर, कोबी, खोबरे व कोथिंबीर एकत्र करावे. त्यात चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस घालावा. वरून हिंग, मोहरीची फोडणी द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
दूध आटवून मंद आचेवर ठेवा व एक वाटी साखर टाकून घ्या. थंड फ्रेश क्रीममध्ये १ वाटी साखर घालून फेटून घ्या, एकदम हलकं व्हायला हवं, मग फ्रीजमध्ये ठेवा. ३ ते ४ चमचे दुधामध्ये कस्टर्ड पावडर घोळून मग आटवलेल्या गरम दुधात ओता. सारखे हलवत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दूध गॅसवरून काढून थंड करायला ठेवा व मधून मधून हलवत राहा.
चार टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यात मटकीची डाळ घाला. त्यात मीठ व साखर घाला. वरून तेलाची जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यावर ओता. टोमॅटोच्या रसात मटकीची डाळ छान भिजेल. ही कोशिंबीरसुद्धा चवीला छान लागते.
केळीच्या कालाची भाजी
(केळीच्या खुंटाची वरची सोपं काढून टाकल्यावर आत जो कोवळा गाभा राहतो, त्याला ‘काल’ असं म्हणतात. कालाची भाजी आयत्या वेळी करायला घेऊ नये. तसंच काल चिरताना आत दोर आहेत का पहावं. असल्यास ते काढून टाकावेत .)
साहित्य :- केळीचा काल चार वाटया, भिजवलेली मुगाची डाळ अर्धी वाटी, तिखट अर्धा चमचा, गोडा मसाला, ओलं खोबरं, मीठ, गुळ, तेल, फोडणीचं साहित्य.
कृती :- केळीच्या आतला काल , गोल चकत्या काढून पुन्हा बारीक चिरावा. तो पाण्यात टाकावा. दोन-तीन वेळा पाण्यातून चांगला चोळून, धुवून घ्यावा. म्हणजे राप निघून जाईल. घट्ट पिळून त्याला हळद चोळून काही तास दाबून ठेवून द्यावं. त्यानंतर फोडणी करून त्यात भिजवलेली मुगाची डाळ व चिरलेला काल टाकून वाफ आणावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारून डाळ व भाजी नीट शिजू दयावी. त्यानंतर तिखट, गोडा मसाला, चवीनुसार गुळ, मीठ घालून एक-दोन वाफा आणाव्यात. वरून ओलं खोबरं घालावं.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
केळफुलाचे कटलेट
साहित्य : केळफूल निवडून, बारीक चिरून, 4-5 चमचे तेल, 1 मोठा बटाटा उकडून, अर्धा गाजर बारीक चिरून, गव्हाचा ब्रेड - 2 स्लाईस, आले, लसूण, मिरची पेस्ट, धने, जिरे पूड, मीठ.
कृती : चिरलेल्या केळफुलाला कुकरमध्ये हळद व मीठ घालून छान वाफ आणावी. वाफवल्यावर पाणी काढून टाकावे. वाफवलेले केळफूल हाताने बारीक करून त्यात गाजर व उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. आले, मिरची, लसूण पेस्ट, मीठ, धने-जिरे पूड घालावी. ब्रेडचा बारीक चुरा घालून मळून घ्यावे. गोल चपटे कटलेट तव्यावर तेल टाकून खमंग भाजावेत व गरम गरम सर्व्ह करावेत. बरोबर सॉस अथवा हिरवी चटणी छान लागते. चविष्ट , फायबरयुक्त, करण्यास सहज सोपा पदार्थ.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
केळफुलाची भाजी
साहित्य : केळफूल निवडून चिरून, अर्धी वाटी बारीक चवळी (कडधान्य) 8-10 तास भिजवून, ओले खोबरे, कोथिंबीर, 1 कांदा बारीक चिरून, चिंच, मीठ, धने-जिरे पूड, फोडणीसाठी तेल, मोहरी, लाल ओली मिरची 2, लाल तिखट 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, गूळ चवीप्रमाणे.
कृती : केळफूल निवडून, धुऊन, बारीक चिरून घ्यावे. कुकरमध्ये 2-3 चिंच बुट्टके घालून केळफूल वाफवावे. भिजलेली चवळी कुकरमध्ये वेगळी वाफवावी. केळफुलातील पाणी काढून टाकावे. पातेल्यात फोडणी करून कांदा परतावा व लाल मिरची/ लाल तिखट घालावे. केळफूल व वाफवलेली चवळी घालून परतावे. चवीप्रमाणे धने-जिरे पूड, काळा मसाला, गूळ, मीठ, खोबरे, कोथिंबीर घालून परतावे. झाकण ठेवून 1 वाफ आणावी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
कांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून कुरमुरे घालावेत व ओली भेळ करावी.
साहित्य:
२ वाट्या - जुने, सुवासिक आंबेमोहोर तांदूळ
थोडे तूप
मीठ
अर्धा टी स्पून - जिरे पूड
२-३ मिरी दाणे
कृती:
तांदूळ स्वच्छ धुवुन घ्या. फडक्यावर पसरा व सावलीत वाळवत ठेवा. वाळल्यानंतर अर्धवट कुटा. एका पातेल्यात तूप गरम करा. त्यात मिरी दाणे घालून तांदूळ, मीठ, जिरे पूड व पाणी घालून उकळी काढा. मऊसर शिजवा.
आजारी व्यक्तीसाठी कण्हेरी हे उत्तम व पचायला हलके अन्न आहे.
सर्व जिन्नस लोण्यामध्ये मिसळून जरुरीपुरते थंड पाणी घालावे व छोटे चपटे गोळे करून वर एक एक काजूचा तुकडा लावावा. १८० डिग्रीवर ८ ते १० मिनिटे बेक करावे.
Copyright © 2025 | Marathisrushti