महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरुन ठेवाव्यात. एका पातेल्यात तूप घालून जिरे, हिंग, मोहरी घालून फोडणी करा. त्यात मिरी दाणे, हळद, दालचिनी लवंगा, हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य व आलं-लसणाचे वाटण टाकून परता. मग कांदा परता. तो लालसर होत आला की त्यात टोमॅटो घाला. त्याला वर तेल सुटायला लागलं की मग सर्व चिरलेल्या भाज्या घाला. परता. भाज्या लालसर झाल्यावर त्यात डाळ व तांदूळ घाला. परता. व पाणी आणि मीठ घालून शिजवा. अशाप्रकारे गरमागरम भाज्यांची खिचडी तयार.
थोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून मळून गोळा बनवावा. हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. सोपी पद्धत म्हणजे पेढे आणून ते कुस्करून मळून त्याचा गोळा बनवून ते भरुन भरून पोळ्या कराव्यात.
साहित्य : मोनॅको बिस्किट, पिझ्झा पास्ता सॉस, चिझ, ब्लॅक ऑलिव्ह्स
कृती : मोनॅको बिस्किटावर पिझ्झा पास्ता सॉस ( तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस किंवा चटणी वापरु शकता ), चिझ आणि त्यावर ब्लॅक ऑलिव्ह्स घालून सर्व्ह करा झटपट स्नॅक्स. हा कमी वेळात तयार होणारा चवदार पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा मुलांना डब्यात देऊ शकता.
--पूजा प्रधान
मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मला मेनू विषयी माझ मत मागितल... त्यावेळी त्यांना मी दिलेले हे उत्तर...
मेनू साधारण असा असावा
वरण- भात, तूप, मीठ, लिंबू - त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण.
मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेल खोबर आवश्यक...
पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी, सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.
पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी.
ओल्या नारळाची कोथिंबीरीची चटणी, काकड़ी-कूट दही घातलेली कोशिंबीर.
चवी पुरत पंचामृत.
गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.
मठ्ठा.
आता काही सूचना....लक्ष्य पूर्वक वाचा..
आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...
आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही...श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...
आळुच्या भाजीतील शेंगदाने आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये... तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ,साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आल, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.
वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.
पापड-कुरडई मरतुकडे नको....त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल...
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी ...तिखट नको...
त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये...
आता पान वाढावयाच्या सूचना -
पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..
पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...
पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे...
उने 90 अंशावर पापड़,त्याखाली पूरी वाढावी.
मध्यभागी भाताचा मुद असावा व सगळ वरण भसकन वाढू नये...वरणाचा ओघळ नको...
मुदाचा आकार प्रमाणशीर असावा...भसाडा नको...
वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.
मसालाभाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..
आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.
उजव्या हाताला वरच्या साइडला 45 अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.
आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.
वर नमूद केलेल्यात काही त्रुटि असल्यास दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये.
बस ऐवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या.
"काटेकोर" पुणेकर
ता.क. -वरील सर्व जास्त मनाला लावून घेवू नये , आपण सर्व मित्र आहोत...
साहित्य : चिरलेल्या कैरीच्या ४-५ कोयी. (कोयी ताज्या असाव्यात), एक मोठा चमचा बेसन, मीठ, साखर, एखादी हिरवी किंवा लाल मिरची, फोडणीसाठी थोडेसे तूप, जिरे, किंचित हळद.
कृती : दोन-तीन वाटय़ा पाण्यात कोयी घालून चांगले उकळावे. थोडे गार झाल्यावर त्यात बेसनाची पेस्ट करून घालावी व आवडीनुसार मीठ व साखर घालावी व परत गॅसवर उकळत ठेवावे. नंतर एक छोटा चमचा जिरे, किंचित हळद, मिरचीचे दोन-तीन तुकडे व ४-५ पाने कढीपत्ता अशी फोडणी करून घालावी व कोमट कोमट वाढावी म्हणजे जास्त चव लागते.
साहित्य:- १ वाटी अळीव, २ नारळ, अर्धा किलो गूळ, १० बदाम बारीक़ चिरलेले, किंवा जाडसर पूड करून, काजू आवडीनुसार बारीक किंवा जाडसर पूड करून, २ मोठे चमचे मनुके, १/२ छोटा चमचा वेलची पूड.
कृती:- नारळाच्या पाण्यात किंवा १ वाटी दुधात अळीव २ तास भिजत ठेवा. अळीव भिजल्यावर अळीव, ओले खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवावे. नीट मिसळले की काजू पूड, बदाम पूड व वेलची पावडर घालून ढवळावे. पाण्याचा अंश आटून खुटखुटीत होईपर्यंत शिजवावे.
गोळा झाला की मिश्रण गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ दयावे. थंड झाल्यावर हव्या त्या आकारात लाडू वळावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कणीक, मीठ, फेसलेली अंडी घालून घट्ट पीठ भिजवावे. (कणीक लागल्यास जास्त घालावी) पाणी फार घालू नये. चार-पाच पातळ पोळ्या लाटा, पिठी म्हणून भरपूर कॉर्नफ्लोअर वापरावं. पोळीचा चपटा रोल बनवून कात्रीने नाजूक रिबिनीप्रमाणे पट्ट्या कापाव्या.
१ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल/गोडं तेल, २ चमचे भाजलेले शेंगदाणे, ५० ग्रॅम पनीर, २ हिरव्या मिरच्या, १० लसणीच्या पाकळ्या, ३ पातीचे कांदे (पातीसह), अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.
छोले
साहित्य : १ कप पांढरे काबुली चणे (White Chickpeas), १ कप बारीक चिरलेला कांदा, अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो, दिड टिस्पून छोले मसाला.
फोडणीसाठी : १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पून आले पेस्ट, ३ लसूण पाकळ्यांची पेस्ट, १ टिस्पून आमचूर पावडर, १ टिस्पून धणेपूड, २-३ टिस्पून तेल, कोथिंबीर, लिंबू, मीठ.
कृती : चणे ९-१० तास भिजत घालावे. नंतर कूकरमध्ये ४ शिट्या करून चणे शिजवून घ्यावे, शिजवताना पाण्यात थोडे मिठ घालावे. चणे मऊसर शिजवावे. अगदी जास्त शिट्ट्या केल्या तर चणे फुटतात. त्यामुळे प्रत्येकाने घरातील कूकरचा अंदाज घेउन चणे शिजवावेत. कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरावेत. चणे शिजले कि कढईत २-३ टिस्पून तेल गरम करावे. जिरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी, आले-लसूण पेस्ट घालून परतावे, कांदा परतावा. कांदा परतला कि त्यात टोमॅटो घालावा. थोडी धणेपूड घालावी. मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. टोमॅटो अगदी नरम झाला कि शिजलेले चणे घालावेत, चवीपुरते मीठ घालावे म्हणजे चणे शिजताना मीठ आत मुरते. आवश्यक तेवढे पाणी घालावे. मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. २-३ मिनीटांनी छोले मसाला आणि आमचूर पावडर घालून ढवळावे. जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर वरून घालावे. थोडावेळ मंद आचेवर उकळू द्यावे.
भटुरे
साहित्य: १ वाटी दही, २ वाटी मैदा, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ भिजवावे. दही आणि मीठ एकत्र केल्याने दह्याला किंचित पाणी सुटते त्यामुळे १-२ चमचे मैदा अधिक लागू शकतो. थोडे तेल घालावे. पिठ मळून घ्यावे. पिठ ४-५ तास झाकून ठेवून द्यावे. ४-५ तासांनंतर परत एकदा पिठ मळून घ्यावे. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करावे (२ ते अडीच इंच आकाराचे). तेल तापत ठेवावे. पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पुर्या लाटाव्यात. खुप पातळ लाटू नये.
हे भटूरे तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. छोल्यांबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.
तुपावर कणीक खमंग भाजावी. गॅस बंद करून गूळ घालावा. एकजीव झाल्यावर खसखस बडीशेप पेरून थापावं, कापावं. तिखट पदार्थ (देशी – विदेशी) खमीरी रोटी कणकेच्या घरगुती केकमध्ये दिल्याप्रमाणे, कणीक आंबवून घ्यावी.
Copyright © 2025 | Marathisrushti