(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अहं ब्रह्मास्मि

    एके काळीं हवे होते,

    मजलाच सारे कांहीं

    आज दुजाला मिळतां

    आनंद मनास होई

    माझ्यातील 'मी ' पणानें

    विसरलो सारे जग

    तुझ्यामध्येंही ' मी ' आहे,

    जाण येई कशी मग

    जेंव्हा उलगडा झाला

    साऱ्या मध्ये असतो 'मी'

    आदर वाटू लागला,

    जाणता 'अहं ब्रह्मास्मि'

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • त्यांची शाळा

    आंस लागली मजला,
    बघून याव्या त्या शाळा,
    देहू, आळंदी, परिसर,
    जाऊनी तो धुंडाळला ।।१।।

    कोठे शिकले तुकोबा,
    कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले,
    साधन दिसले नाहीं,
    परि तेज आगळे भासले ।।२।।

    विचार झेंप बघतां,
    आचंबा आम्हां वाटतो,
    कोठून शिकले सारे,
    मनी हा प्रश्न पडतो ।।३।।

    त्यांची शाळा अतर्मनीं,
    गंगोत्री ज्ञानाची ती,
    वाहात होती बाहेरी,
    पावन करी धरती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • नुरली नाती जगती

    नुरली ,जगती कुठलीच नाती आता
    प्रेम जिव्हाळा वात्सल्य संपले आता

    सारासाराच आता भासतो दिखावा
    सुंदरताही , रमली कृत्रिमतेत आता

    खरी सुखदा , खरे सौन्दर्य संभ्रमात
    कलियुगी, मृगजळाचीच ओढ आता

    माणुस ! माणसाचेच निर्दयी खेळणे
    निर्माल्य ! कोवळ्या फुलांचेही आता

    कुठल्या रूढी आणि कुठल्या परंपरा
    निर्बंधीच साऱ्यांचेच इथे जगणे आता

    स्वार्थी ! बेछूट प्रीतभावनांची दुनिया
    नको कुणीच मी एकटाच सुखी आता

    नुरले नाते आता वेलीचे अन फुलांचे
    साऱ्या संवेदना जाहल्या शुष्क आता

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१५४.

    १६ - १२ - २०२१.

  • विसरण्यातील आनंद

    विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा,
    आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा ।।१।।

    दृष्य वस्तूंचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं,
    आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी ।।२।।

    वस्तूंच्या आठवणी, सुख देई आम्हांला,
    क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला ।।३।।

    उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी,
    विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी ।।४।।

    एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे,
    जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तन मनातील तफावत

    देह मनातील, तफावत दिसून येते ।
    चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,

    चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
    जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,

    परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
    शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,

    दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
    परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४

    विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
    विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कलेचे खरे मुल्य

    पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती,
    हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।।

    मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां,
    दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।।

    घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत,
    कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।।

    बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत,
    कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।।

    भरले होते भव्य प्रदर्शन हस्तकला कौशल्याचे,
    नवल वाटले गणपती बघून दालनातील सुरवातीचे ।।५।।

    चकीत झालो जाणूनी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार,
    गणपतीच्या भव्यतेनी मिळविला हा अधिकार ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • माहेर

    मेहंदीच्या हातावर
    उमटली दाट नक्षी
    माहेरच्या आठवांचा
    उभा अंगणात पक्षी..

    उभा अंगणात पक्षी
    त्याला मोकळे आभाळ
    परतून माहेराला
    जाते मन किती काळ..

    जाते मन किती काळ
    सोयरीक साधण्यास
    झोका जाई वरखाली
    कसे सावरु मनास?

    कसे सावरू मनास
    दाटे मनी हूरहूर
    पाखरांनो सांगा आता
    लेक भेटाया आतूर

    सौ.प्रतिभा महादेव चौगले

  • बघते नुसती हसते नुसती

    बघते नुसती हसते नुसती
    फसवत फसवत फसते नुसती !

    लाडिक चालणं लाडिक बोलणं
    खुळ ही लावत असते नुसती !

    बंदच डोळे उघडे डोळे
    डोळ्यापूढे दिसते नुसती !

    सुचवत काही सांगत काही
    काव्यातहि असते नुसती !

    असते छानच नसतानाही
    विचारातच असते नुसती !

    -- श्रीकांत पेटकर

  • स्वप्नातली अपूरी इच्छा

    दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
    झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,

    वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
    स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,

    पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
    घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,

    खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
    खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,

    आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
    टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,

    येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
    बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,

    उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
    हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,

    क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
    खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • संगीत सुर्य

    गदीमा आणी बाबुजींनंतर
    रामायणातील गीत संपले
    भावमधुर त्या भावगीतातील
    भावनांचे अस्तित्व संपले ।

    बाबुजीं नंतर पुन्हा एकदा
    भावगीत ते स्तब्ध जाहले
    देण्या संगीत स्वर्गलोकी
    संगीतसुर्य यशवंत निघाले ।

    संवादिनी ती तानपुऱ्यासह
    आज अश्रु ढाळीत आहे
    ताल हरवलाय आज तबल्याचा
    विणा सरस्वतीची अबोल आहे ।

    भाव मराठी भावगीतातील
    आज गेले आहेत हरवूनी
    गायकांच्या मधूर गळ्यातील
    सूरही आज बसले रुसूनी ।

    वाटते त्या संगीत सुर्यांनी
    जन्म घ्यावा येथे फिरुनी
    पुन्हा एकदा सजवावी मैफील
    गंधर्व लोकीच्या त्या सप्तस्वरांनी ।

    -- सुरेश काळे
    मो. 9860307752
    सातारा.
    ३० आक्टोंबर २०१८