(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तीळगुळ घ्या हो (गीतरचना)

    तीळगुळ घ्या हो
    गोड गोड बोला।।
    खाली सांडू नका,
    आणि भांडू नका।।धृ।।

    ऊस ,बोरं ,ओंब्या,
    वाण लावू चला।।
    काटेरी हलवा
    गोडव्याची कला।।
    द्यायला मुळीच
    विसरूच नका।।
    खाली सांडू नका
    आणि भांडू नका।।१।।

    सुगड्याचं वाण
    लावूया गं छान।।
    उपयोगी वस्तू
    त्यांना देऊ मान।।
    हवाय कशाला
    प्लॅस्टीकचा हेका।।
    खाली सांडू नका
    आणि भांडू नका।।२।।

    उखाणा घेऊया
    मौजही करुया।।
    घरोघरी जाऊ
    स्नेह हा वाटूया।।
    राग,द्वेश,सारे
    काढूनच टाका।।
    खाली सांडू नका
    आणि भांडू नका।।३।।

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 15, 2020


  • खरी पूजा

    गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती ।
    श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१।

    भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी ।
    शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२।

    प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती ।
    विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३।

    भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर ।
    पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर ।४।

    गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे
    साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते ।५।

    सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत ।
    मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत ।६।

    साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट ।
    अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ ।७।

    पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला ।
    यथासांग विधीने मनी तोषला ।८।

    संपत असता यात्रा घटना एक घडली ।
    एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली ।९।

    धावून गेला मदत करण्या हा तिजला ।
    औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला ।१०।

    आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे ।
    समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे ।११।

    यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला ।
    श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला ।१२।

    केली होती पूजा सेवा जीवंत आईची ।
    अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची ।१३।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      March 13, 2019


  • मोहरली ही अवनी

    ग्रीष्माच्या काहिलीने
    आसमंत तप्त झाला
    अति उष्णतेने धारित्रीस
    कासावीस करून गेला ।। 1 ।।
    भेगाळलेल्या जमिनी आणि
    बंद पडलेली मोट
    नाही आला पाऊस
    तर कसं भरेल पोट? ।। 2 ।।
    प्रत्येक जण प्रतीक्षेत
    कधी येईल पाऊस
    डोळ्यांतून पाणी येईपर्यंत
    नको वाट बघायला लावूस ।। 3 ।।
    पाण्याविना तडफडत होते
    पशू, पक्षी, मानव
    मग तो प्रासाद असो, इमारत असो,
    शिवार असो वा अंगण ।। 4 ।।
    गोठ्यात, जंगलात, चारा छावणीत
    हंबरत होती गुरं ढोरं
    निढळावर हात ठेवून बळीराजा
    पावसाची करत होता आर्जवं ।। 5 ।।
    इंद्राला रिझवण्यासाठी मोर
    नाचत होते विसरून सारे भान
    कोकीळ, पावश्या हाकारत होते
    मेघांना, गाऊन सुंदर गान ।। 6 ।।
    इंद्रदेवापर्यंत पोहोचल्या
    लाखो मनांच्या आर्त हाका
    वरुण राजाला धाडलं त्यानं
    घेऊन ढगांच्या खूप साऱ्या लड्या।। 7 ।।
    वाऱ्याला सोबत घेवून ढगांचे पुंजके
    बागडू लागले आभाळभर
    कुठं दाट कुठं विरळ
    सैरावैरा धावाधाव माळरानावर ।। 8 ।।
    विद्युल्लता पण सामील झाली
    खेळायला पाठ शिवणीचा डाव
    मग त्यांच्याही आनंदाला
    राहिला नाही ठाव ।। 9 ।।
    ढगुल्यांचा आणि विजुडीचा
    खेळ आला रंगात
    डफ-मृदंगाची जुगलबंदी
    जमली जणू नभांगणात ।। 10 ।।
    तहानलेली धरित्री आणि
    तिची सारी लेकरं
    पाहु लागली आभाळाकडे
    विस्फारून त्यांची नेत्रं ।। 11 ।।
    ढग कुजबुजले एकमेकांशी
    हिरवे डोंगर अन् झाडे
    दिसतील आपल्याला जिथं जिथं
    बरसुया आपण फक्त तिथं तिथं ।। 12 ।।
    बाकीच्या ओसाड प्रदेशाचं काय?
    तिथंही चालू आहे आत्महत्यांचे सत्र
    पाण्याविना
    ते पण झालेत गलितगात्र ।। 13 ।।
    चूक तर माणसांचीच आहे
    वागावे लागेल सक्त
    झाडे तोडून त्यांनीच तर केले
    धरणीला या उजाड आणि रिक्त ।। 14 ।।
    आता पावसाची मागणी करण्याचा
    त्यांना राहिला नाही हक्क
    त्यांच्याच पापाची शिक्षा मिळणार त्यांना
    त्यासाठीच आहेत ते पात्र ।। 15 ।।
    ढग झुकले थोडे खाली
    झाले थोडे दक्ष
    झाडांसाठी मानवांनी खोदलेल्या
    खड्डयांकडे गेले त्यांचे लक्ष ।। 16 ।।
    गावोगावी गावकऱ्यांनी
    खोदले होते असंख्य चर
    स्वच्छ करून ठेवल्या होत्या
    कोरड्या विहिरी आणि हातपंप ।। 17 ।।
    दारोदारी वाढवली होती
    हजारो छोटी छोटी रोपं
    मोठे विलक्षण आणि
    आश्वासक होते ते दृश्य ।। 18 ।।
    लहानथोरांची चालली होती लगबग
    यावर्षी एकच होते सर्वांचे लक्ष्य
    केला होता त्यांनी संकल्प
    लावण्याचा कोटी कोटी वृक्ष ।। 19 ।।
    हे पाहून आनंदाने मग
    ढगांनी केली खूप दाटी
    विजुताईच्या हातावर दिली
    जोरदार टाळी ।। 20 ।।
    आसमंतात वाजू लागला नगारा
    सुटला भन्नाट वारा
    होवू लागला ढगांचा गडगडाट
    अन विजांचा लखलखाट ।। 21 ।।
    बरसू लागल्या मग मेघांच्या
    झिम्माड सरीवर सरी
    थेंबांच्या टिपऱ्या वाजू लागल्या अंगणी
    क्षणात पावसाने भिजली सारी धरित्री ।। 22 ।।
    पावसाचा होताच धुवांधार वर्षाव
    दरवळला तो मृदगंध आसमंतात
    ओढे, नाले, नद्या, चर
    आणि भरले सारे तलाव काठोकाठ ।। 23 ।।
    कळून आली मानवाला
    त्याची मोठ्ठी चूक
    झाडे लावा झाडे जगवा
    पाणी जिरवा, पाणी वाचवा
    मंत्र अंगिकारला अचुक ।। 24 ।।
    मोहरली ही अवनी
    मग आनंदाने पानोपानी
    सज्ज झाली नेसावयाला
    हिरवी पैठणी......हिरवी पैठणी......।। 25 ।।
    -- मी सदाफुली
    @ ✍️ संध्या प्रकाश बापट

      November 13, 2019


  • लढण्यासाठी समोर माझ्या कौरव होते

    प्रदीप निफाडकरांची गझल

      April 17, 2010


  • प्रीतीची फुंकर

    मध्ये एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे तिची सुखदुःखे जाणून घेतली. तिचा नवरा बराच आजारी होता. ती मानसिक दृष्टीने खचली होती. परंतु त्यावेळची तिची मानसिक अवस्था पाहून,-- आज आठवून मी खालील कविता केली आहे,---

    मी आहे बघ जवळी,
    रात्र घनतम काळी,
    किती सोसशी वेदना,
    प्रीतीची फुंकर निराळी,--!!!

    असह्य होता तुझा,
    जीव किती कळकळे,
    काळजात थेट उठे,
    कळ माझ्या सख्या रे, --!!!

    कधी होशील ठीक ,
    जीव सारखा तळमळे,
    संसार आपुला अर्ध्यावर,
    तुझ्यावाचून, कसा होईल रे,--!!!

    धडकी भरे उरात माझ्या, कल्पनेतही नको हे सारे,--
    भोगांची परिसीमा गाठता,
    आत तरी किती तुटते रे,--!!!

    जन्मोजन्मी साथ आपली,
    केव्हा हे सारे सरणार रे ,
    पती-पत्नी एकच असती,
    देह फक्त ना दोन रे,--!!!

    किती एकजीव आपण,
    कुणाला सांगू जावे रे ,
    जगाला हे कळत नसते,
    ही अद्वैताची गुंफण रे,--!!!

    प्रेमपाखरू कसे रडते,
    तुला पाहून काळीज हलते,
    स्वतःस किती दिलासा देऊ,
    कसा ठेवावा धीर रे,--!!!

    पती स्त्रीचे जग असते,
    कोणाला कळेल हे बरे,
    पाहून तुझे तडफडणे,
    आतून मी उद्ध्वस्त रे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      August 19, 2019


  • अनुभव

    सुख दुःखाच्या लाटेमध्ये,
    तरणे वा बुडणे,
    जगेल तो त्या क्षणी,
    ज्याला माहित पोहणे ।।१।।

    पोहणे जगणे कला असूनी,
    अनुभव हा शिकवूनी जातो,
    जागरुकतेने कसे जगता,
    यशही त्याला तसेच देतो ।।२।।

    जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या,
    कष्ट लागती महान,
    परि केवळ एक अनुभवी प्रसंग,
    सारे देतो मिळवून ।।३।।

    अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे,
    निसर्ग शिकवी क्षणोक्षणी,
    सतर्कतेने वेचून घ्यावे,
    दैनंदिनीच्या घटनामधूनी ।।४।।

    बोल सारे अनुभवाचे,
    त्या बोलीची भाषाच न्यारी
    सुख दुःखाच्या गुंत्यामधला,
    अर्थ सांगतो कुणीतरी ।।५।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 7, 2017


  • ती कुंकू लावते मंगळसूत्र घालते

    ती कुंकू लावते मंगळसूत्र घालते
    मग तिला नावं ठेवली जातात
    पण या नावं ठेवणाऱ्या काही बायका
    फॅशन म्हणून वेगवेगळी मंगळसूत्र घालतात
    तिने हळदी कुंकू केलं म्हणून
    मागासपणा काहीजणी म्हणतात
    पण किटी पार्टी असते खरी यांची ती
    पण नावाला या हळदी कुंकू आहे म्हणतात
    संस्कार संस्कृती जपली तर बॅकवर्ड ठरतो
    हाय फायच्या नावाखाली सरळ
    सण परंपरा नाकारणं होत असत
    हल्ली आता नवीनच फॅशन आली
    पुरुषांना उगाच बोलायचं
    स्त्री मुक्तीच्या नावाखाली नाहक
    सरसकट प्रत्येक पुरुषाला चुकीच ठरवायचं
    खरच सांगा बायांनो अस खरं असतं?
    कुठलाच नवरा किंवा पुरुष प्रत्येक
    जड जोखड बायकांवर लादत असतो?
    नसत अस खर काही पण दाखवलं जातं
    काही टक्के असतील पुरुष तसे
    पण बायकांचं बोलणं मात्र होत असत
    स्त्री पण दुसऱ्या स्त्रीला बोलते
    सोडत नाही बाई बाईलाच बोलणं
    पुरुष राहिले बाजूला सारे मग
    बाईला बोलणं पण कुठे अजूनही सुटलं
    सण संस्कृती ही आपली परंपरा
    त्यात बायकांना वेठीस धरण होत नसत
    करा किंवा करु नका प्रत्येकीच मत
    पण पुरुषांना बोलणं चुकीच होत असत
    सणात भारी साडी दागिने बायकांना नटायला
    कारण मग हळदी कुंकूच चालते
    तेव्हा सहज हौसेने होत असते पण
    दुसरीने हे सण जपले तर मागासपण ठरते
    हल्ली म्हणे टिकली लावली तर ती
    ओल्ड फॅशन होते टिकली ही फॅशन
    हे गणित नव्यानेच आता कळते
    खर सांगू प्रत्येक स्त्री टिकली लावल्यावर
    सुरेख छान दिसते चेहेऱ्यावरील
    भाव टिकली रेखते
    मंगळसूत्र घाला अथवा नका घालू
    हा प्रत्येकीचा निर्णय असतो पण
    त्या वरुन पण इशू करणं कित्येक
    बायकांना सहज अस जमत असत
    थोडक्यात सार सांगते कित्येक स्त्रिया
    त्यांच्या सवडीने वागत असतात
    बोलतांना मात्र त्या स्त्री समानतेवर
    उगाच नारे लावून बोलत असतात
    नवीन फॅशन म्हणून जुन्याला
    नावं ठेवण बऱ्याचदा होत असत
    पण हौस करायची तर जुन्याच
    गाठोडं काहीजणींना चालत असत
    सत्य आहे हे सखींनो राग मानू नका
    पुरुषाला बोलतांना विचार करुन पहा
    स्वतंत्र आहे स्त्री तरीही नारे लागतात
    काळाच्या नावाखाली चुकीचे नारे लागतात
    -- स्वाती ठोंबरे.

      March 5, 2022


  • लक्ष्मीसूत

    आशीर्वाद दे ग आई मजला, विनवितो मी तुझाच पूत्र ।

    बाबा माझे नसती हयात, कोण मजला ह्या जगतात ।।

    'केशव' माझे वडील असता, 'केवशसूत' हा ठरतो मी ।

    तसाच बनता 'केशवकुमार', मोठे होण्याची युक्ती नामी ।।

    जगावयाचे जर मोठ्या नामी, तूच मजला महान आहे ।

    'लक्ष्मी' तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 6, 2016


  • मदमस्त तारुण्य बहर

    मदमस्त तारुण्य बहर,
    पाहून कसा मी,
    जागच्या जागी थिजलो,
    दया कर जराशी,
    तुला पाहुनी अचानक,
    बर्फासारखा विरघळलो,--!!!

    सुवर्णचंपकी कांती तुझी, चाफेकळीगत नाक,
    भिरभिरणारे टपोरे नेत्र,
    अन लाल कपोती गाल, --!!!

    भुरभुरणारे केस उडती,
    कसे वाऱ्यावरती,
    जसा सुगंधच होतो,
    येणाऱ्या झुळकेवर स्वार,--!!!

    धडधडणारे उरोज पाहून,
    पुरता मी ढांसळलो,
    लटपट चालीने त्या,
    एकदम गांगरुन गेलो,--!!!

    शब्द "मंजुळ" किती,
    जशी "सुरीली" तान,
    भान हरपून ऐकत राहिलो,
    तुझे "यौवनी" गान,--!!!

    मादक"" चाल तुझी ती,
    जशी नागीण "सळसळणारी",
    पृथ्वीवरती अवतरली का,
    कुणी अस्मानी परी,--!!!

    तुझे लडिवाळ चाळे ,
    पाहून धकधक जिवांत होते,
    येते कुणी पाहुनी तुला,
    काळीज काढून ठेवते,--!!!

    डौलदार ती यष्टी,
    गोरी-- पान काया,
    भलेभले जन तरसून उठती,
    तुझ्यासमोरी जाया,--!!!

    नयनबांण"" फेकता कसे,
    गारद मी झालो,
    तृषार्त चकोर बनुनी,
    कशी वाट पाहत राहिलो,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      February 4, 2019


  • परमोच्य बिंदु

    ऊर्जा शोषत असतां पाणी
    उकलन बिंदूवर येते
    पाण्याचे रुप बदलूनी
    बाष्प त्यांतून निघूं लागते

    एक सिमा असे निसर्गाची
    स्थित्यंतर जेव्हां घडते
    एक स्थीति जावून पूर्ण
    दुजामध्ये ती मिळून जाते

    तपोबलाची ऊर्जा देखील
    प्रभूमय ते सारे करिते
    परमबिंदूचा क्षण येतां
    साक्षात्कार तुम्हां घडविते

    तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं
    ईश्वरमय होऊन जाता
    सारे परि ते तेव्हांच घडते
    परम बींदूला जेव्हां पोहंचता

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      July 17, 2017