उगवता सूर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||
ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख
बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती
माना डोलावती, डामडोलाला ||१||
उगवता सूर्य. नमन करती त्याला
प्रथम हवे दाम, तरच होई काम
पैशाच्या भोवती, सारेच फिरती
पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||
उगवता सूर्य, नमन करती त्याला
सत्तेची नशा, दाखवी जना आशा
स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर
हांजी हांजी करती, बघता सत्तेला ।।३।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला
अधिकाराची रीत, बघती स्वहीत
गरजवंता अडविती, शोषण तयांचे करती
सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला ।।४।।
उगवता सुर्य़, नमन करती त्याला
कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ
डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी
जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला ।।५।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@Gmail.com
बंधन मुक्तीसाठीं असतां,
बंधनात ते पाडी
कर्मफळाचे एक अंग ते,
टिपे दुसरे बाकी ।।१।।
साध्य करण्या जीवन ध्येय,
देह लागतो साधन म्हणूनी,
सद्उपयोग करूनी घेतां,
साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।।
हिशोब तुमचा चुकून जाता,
तोच देह बनतो मारक,
विनाश करीतो मागें लागतां,
मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।।
बंधन पडते आत्म्याभोंवती,
शरिरांतल्या वासने पायी,
वासनेच्या आहारी जातां,
बंधनास ती बळकटी येई ।।४।।
तपसाधनेचे कष्ट करूनी,
देह करीतो आत्म्यास मुक्त,
देहाचे बंधन पडते,
जेव्हां बनतो वासनायुक्त ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल.......।।धृ।।
लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल ।।
झाली होती पितृज्ञा ती ।
पाठवी रामा वनीं ।।
माता कैकेयीच हट्ट करिते ।
दूजे नव्हते कुणी ।।
कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल....१,
निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।।
उंचबळूनी हृदय भरता ।
कंठी दाटला सारे ।।
शब्द फुटती मुखा मधूनी ।
जे होते हुंदके देणारे ।।
थरथरणाऱ्या ओठांमधूनी भाव कसे उमटतील....२,
निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
लग्न म्हणजे काय असतं ?
एक चुकलेलं गणित असतं
कारण तिथे एक आणि एक तीन असतं...
लग्न म्हणजे काय असतं ?
उगाच त्याग करणं असतं
कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
दोन जीवांचं मिलन असतं
कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
मोक्षाकडे नेणारं दार असतं
कारण ते तोडावसं कित्येकांना वाटत असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
जगण्याला एक निमित्त असतं
कारण त्याशिवाय जिवंत राहण अवघड असतं
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016
(गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद )
अहो सुरांच्या गुरुराया, द्या मला तुम्ही दीक्षा ।।
बनुन सुरांचा दीन भिकारी,
गुरुराया, आलो मी दारीं
सरितेच्या लाटांना तुम्ही शिकवलेत जें गान
स्वरलहरींचें कोकिळास जें दिलेत तुम्ही ज्ञान
त्या ज्ञानाची घाला माझ्या झोळीमधिं भिक्षा ।।
द्या मला तुम्ही दीक्षा ।।
पसरवीन मी तुमचे सूर
जगीं अशान्ती करीन दूर
सूरज्ञान देउन, संगें मज घेउनिया, स्वामी,
असेल कोलाहलच निरंकुश, तिथें चला तुम्ही
तेथें नेउन घ्या माझ्या ज्ञानाची पुरी परीक्षा ।।
द्या मला तुम्ही दीक्षा ।।
- - -
( पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या गद्य भाषांतरावर आधारित )
-
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
इटलीचे लिओनार्डो दा विंचीच्या यांचा आज जन्मदिन असतो. म्हणून आज जागतिक कला दिन(वर्ल्ड आर्ट डे) साजरा करावा म्हणून निश्चित करण्यात आले. दा विंचीची जागतिक शांतता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, बंधुता आणि बहुसंस्कृतीवाद तसेच इतर क्षेत्रात कला महत्त्व म्हणून निवडण्यात आले.
गावाकडच्या खेळाची रंगत भारीच असायची.दुपारच्या वेळी सर्वत्र सूर्य आग ओकत असतांना आम्ही पोरंसोरं मात्र खेळात दंग असायचो.बारवंवरच्या मळयात मोठया केळया आंब्यावर आमचेच राज्य चालायचे..राम्या.मारत्या, देईद्या,सरावण्या, सख्या,डिग्या,दास्या किती नावं घ्यावीत.डाफ नावाचा खेळ एवढा रंगायचा की तहान भूक विसरून जायची.आज हे खेळ नामशेष होत आहेत.
जन्मापासूनी बघतो तूला
परि जन्मापूर्विच ओळखले
रोप लावले बागेमध्ये
फूल तयाने दिले
चमकत होती नभांत तेंव्हा
एक चांदणी म्हणूनी
दिवसाही मिळावा सहवास
हीच आशा मनी
तीच चमकती गोरी कांती
तसेच लुकलुकणे
मध्येच बघते मिश्कीलतेने
हासणे रडणे आणि फुलणे
चांदणीचा सहवास होता
केवळ रात्रीसाठी
दिवस उजाडतां निघून गेली
आठवणी ठेवून पाठी
नको जाऊस जरी ही इच्छा
परि जाशील सोडून दुजा घरी
आठवणीसाठा देत जा मजला
दिलासा तोच हे समाघान धरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तपसाधना करूनी मिळवी,
सत्वगुणाची शक्ती अंगी ।
त्याच शक्तीच्या जोरावरती,
स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।।
शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा,
सारे सुख आणि भोग भोंवतीं ।
परिणामी तो फेकला जाऊनी,
पुनरपी येई याच भूवरती ।।
एक दया दाखवी ईश्वर,
वातावरणी देऊनी संधी ।
जन्म मिळे ते त्याच ठिकाणी,
कमविले पुण्य ज्याने आधी ।।
चक्र खेळ हा चाले सदैव,
स्वर्ग मृत्यू या लोकी त्याचा ।
अंतिम ध्येय तेच ठरते,
मिळविणे क्षण तो मुक्तीचा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti