सूर्यकिरण येती दाराशी
चंद्र झोपतो रोज उशाशी ।
अवसेची त्या कशास चिंता
दिवे सभोती, उठता बसता ।
धनचिंता ना ज्यास भिवविते
तोळा मासा दुःखही निवते ।।
सूर्य लोपता चंद्र पुरेसा
प्रकाश नसूदे पुरे कवडसा ।
अवसेच्या रात्रीला उरतो
व्रुथा भरवसा देवावर तो ।
दारिद्र्याचे असेच असते
तोळा मासा सुख नांदते।।
.......मी मानसी
सहज एकदा फेरफटका मारताना
वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला...
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो अरे नुकताच
"संयम" पाळलाय घरात
आणि "माया" पण माहेरपणाला
आली आहे..
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!!
पुढे बाजारात "चिडचिड"
उभी दिसली गर्दीत, खरं तर
ही माझी बालमैत्रीण पण पुढे
कॉलेजात "अक्कल" नावाचा
मित्र मिळाला आणि हिच्याशी
संपर्क तुटला..!!
आज मला पाहून म्हणाली अरे
"कटकट" आणि "वैताग"
ची काय खबरबात ?
मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा..
हल्ली मी "भक्ती" बरोबर
सख्य केलय त्यामुळे
"आनंदा"त आहे अगदी..!!
पुढे जवळच्याच बागेत
"कंटाळा" झोपा काढताना दिसला
माझं अन त्याच हाडवैर....
अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख
दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला..!!
मीही मग मुद्दाम "गडबडी" कडे
लिफ्ट मागितली आणि
तिथून सटकलो..!!
पुढे एका वळणावर "दुःख"
भेटलं, मला पाहताच म्हणालं
"अरे ये, तुझीच वाट पहात होतो"
मी म्हणालो, "अरे वाट पहात
होतास कि वाट लावायच्या
तयारीत होतास? आणि माझ्या
बायकोपेक्षा तूच जास्त वाट
बघतोस कि रे माझी
"तसं "लाजून" ते म्हणालं,
"अरे मी पाचवीलाच पडलो
(पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.
कस काय सर्व ? घरचे मजेत ना?"
मी म्हणालो, "छान" चाललय सगळं...
"श्रद्धा" आणि "विश्वास"
असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात
त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.
तू नको "काळजी" करूस.
हे ऐकल्यावर "ओशाळलं"
आणि निघून गेलं..!!
थोडं पुढे गेलो तोच
"सुख" लांब उभं दिसलं
तिथूनच मला खुणावत होतं,
धावत ये नाहीतर मी चाललो
मला उशीर होतोय..
मी म्हणालो, "अरे कळायला
लागल्यापासून तुझ्याच तर मागे
धावतोय उर फुटे पर्यंत,
आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट
झालीय... एकदा दोनदा भेटलास
पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट
करून मला एकटं पाडलत..
दर वेळी. आता तूच काय तुझी
"अपेक्षा" पण नकोय मला.
मी शोधलीय माझी "शांती"
आणि घराच्यानीं माझ नावच
"समाधान" ठेवलंय..!!
विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा
काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा
बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी
पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी
सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे
गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे
चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई
बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई
खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी
चकित झाले मन बघूनी हिरवळ जागोजागी
इच्छित दिशेने पाणी वाही बांध घातल्यामुळे
सारे जीवन प्रफुल्ल करीं आनंदमय सगळे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर
आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर....१,
विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार
पक्वपणा त्याच्यातील, देई आनंदाला धार...२,
पक्वपणा येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी
ज्ञान तेव्हां चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही....३,
विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो
अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पावूल टाकतो...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तारूण्याच्या उंबरठ्यावरी, ज्योत प्रेमाची पेटून जाते
बाह्यांगाचे आकर्षण परि, वयांत त्या भूरळ घालते...१,
प्रेमामधली काव्य कल्पना, शरिर सुखाच्या नजीक ती
किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती...२,
प्रेम हवे तर प्रेम कर तूं, मूळे असावी अंतर्यामी
मना मधली ओढ खरी ती, येईल अखेर तीच कामीं...३,
अंतर्मनातील प्रेम बंधन, नाते त्याचे अतूट असते
देहामध्यें बदल घडूनही, प्रेम मनींचे फुलत राहते....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दु:खातची शिकतो सारे, उघडोनी मनाची द्वारे
दु:खा परी नसे कुणी, जो सांगे अनुभवानी
दु:ख मनावरी बिंबविते, वस्तूस्थितीची जाणीव देते
दुसऱ्या परि अस्था देई, जाणीव ठेवूनी कार्य करि
अधिकाराने माज चढतो, खालच्यांना तुच्छ लेखतो
जाता अधिकार हातातूनी, माणूसकीला राही जागूनी
कष्ट करण्याची वृति येते, सर्वांना समावून घेते
श्रीमंतिमध्ये वाहून जाती, आरामाची नशा चढती
गरिबी शिकवते मेहनत, कष्टाने राही आनंदात
अनुभवासारखा शिक्षक, नसे दुजा परि एक दु:ख
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आत्मविश्वास जागृत ठेवूनी,
कार्य घेवूनी तडीस नेती ।
कधीही न राही अवलंबूनी,
मदतीसाठी दूजा वरती ।।
ईश्वर करीतो मदत तयांना,
मदत करी जे आपले आपण ।
आपल्यातची तो ईश्वर आहे,
असते याची जयास जाण ।।
विश्वासाने हुरूप येई,
जागृत करीती अंतर चेतना ।
लक्ष्य सारे केंद्रीत होता,
यश चमकते प्रयत्नांना ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जगातील वस्तू, वाटे आकर्षक
देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१
प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२
चमक बेगडी, फसवी सर्वाला
काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३
झाकण उघडा, दुःख दिसे आंत
लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४
हात लावताच, दुःख हाती येई
भासलेले सुख, नष्ट होत जाई...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
लेखिका – अंजना कर्णिक – वाचक दिनानिमित्त कविता
Copyright © 2025 | Marathisrushti