ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं
बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।।
चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे
दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।।
संवाद होता आत्म्याशी
विचारा सारे आतून कांहीं ।।३।।
आंतल्या आवाजांत सत्याचा भाव
भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।।
नियमीत ध्यान साधना करती
इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।।
ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत
राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत ।।६।।
प्रश्न सोडवी ध्यान शक्तीने
आत्म्याची मदत घेई युक्तीने ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गणपति’ ही देवता सर्वच संतांनी पूजनीय मानलेली आहे. जवळपास सर्वच संतांनी गणेशवंदना केलेली दिसते. पण गणपती आणि संत हा अनुबंध अनेक अर्थांनी विशेष वाटतो. केवळ संतांची गणेश वंदना पाहून नव्हे, तर संत आणि गणपती यांच्यामधील अद्वैताचं नातं प्रतीत होतं म्हणून.
तप आणि सत्याची,
महान असे शक्ती,
वाढवूनी बघा तुम्ही,
प्रभूस ती खेचती ।।१।।
तप वाढता तुमचे,
झुकेल तो ईश्वर,
हतबल होत असे,
भक्त जणांसमोर ।।२।।
विश्वाचा तो मालक,
दिसत नाही कुणा,
प्रयत्न होवूनी व्यर्थ,
निराशा येई मना ।।३।।
मिळविण्यास जा तुम्ही,
मिळत नसे केव्हां
तपशक्ती वाढविता,
आपोआप येई तेव्हां ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
स्थिर आहे जग म्हणूनी,
अस्थिर आम्ही जगू शकतो ।
अस्थिर आहे जग म्हणून,
स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।
पोटासाठी वणवण फिरे,
शोधीत कण कण अन्नाचे ।
थकला देह विसावा घेई,
कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।
धरणी फिरते रवि भोवतीं,
ऋतूचक्र हे बदलीत जाते ।
जगण्यामधला प्राण बनूनी,
चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।
पूरक बनती गुणधर्म,
स्थिर वा अस्थिर ते ।
विश्वचक्र फिरवित राहणे,
निसर्गाचे तत्वची असते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
सागर किती ही विशाल असला तरी त्याची एक लाट ही सुखद अनुभव करून जाते तसेच आपल्या दिवसभराच्या कारोबारात ही एखादा सुखद क्षण ही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचारांना प्रकट करण्याची सवय लावावी कारण विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो.
रडणे या साठी सुद्धा आवश्यक होते
कारण प्रत्येक वेळी मी शस्त्र उचलू शकत नव्हतो,
रडणे या साठी सुद्धा आवश्यक होते
कारण प्रत्येक वेळी क्रांति होणार नव्हती,
****
रडणे ऐकले की
मन निश्चिन्त झाले
प्रसव वेदनेने थकलेल्या शरीरात,
रडणे ऐकले की
चूल सारवताना बाळणअंतीच्या
छातीतून दूध पाझरले
******
रडणे असते साक्षी
संयोग-वियोग
जीवन-मरण
मान-अपमान
दुःख-सुख
ग्लानि-पश्चाताप
करुणा-क्षमा
व्यष्टि-समष्टि
प्रारब्ध आणि अंत या साठी
******
रडले की
नदी बनते पुण्यसलिला
आकाश बनते दयानिधि
मेघ बनतात अमृत
पृथ्वी बनते उर्वरा
वृक्षा वर उतरते नवे जीवन
फुलाना मिळतात नवे रंग
*****
रडणे विसरले की
पत्थर बनतात
मनुष्य हृदय,
ती भरली जातात काळोखाने
हिंसा पेटून उठते
सर्वत्र उठतात चीत्कार
थर थर कापते सृष्टि
*****
रडणे असले की
जीवन असते स्निग्ध
देत राहते धाडस
उगवते साहस
रुजवले जाते अंकुर क्षमाशीलतेचे
इतिहासाने जरी बनवले राजे महाराजे
तरी ते प्रेताच्या
ठिगारावर अश्रु ढाळतात
*******
स्त्री ला सांगितलेल्या कल्पित मिथकात
ती कथा सर्वात करुण आहे
ज्या मध्ये तिच्या रडन्याने
अश्रु बनतात मोती
आज पर्यंत ती माळ गुम्फुन स्त्री मिरवत आहे
पुरुष ती 'नकली आहे ' सांगत
त्या माळीची इच्छा बाळगत आहे
****
रडणे आहे
सर्वांत सुंदर रचना
आपल्या अश्रुनी धुतली जातात
आपला आत्मा
रडणे
या साठी आवश्यक आहे की
मरण्याची इच्छा
अनेक तुकडयात जगत राहते
****
(मूळ हिंदी कविता 'रोना' - उपासना झा)
मराठी अनुवाद- विजय नगरकर
मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते,
नेहमीच मज हे दयाघना,--!!!
लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता,
संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,--!!
तरीही माणूसपण असते,
एखाद्या सज्जन हृदयात,
माणुसकीचे महत्व जाणे,
कितीही असेल संकटात,--!!
असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती,
हेच प्रेम असे त्याचे,
जगण्याची विशाल उक्ती,--!!!
मुके प्राणी वृक्षलता,
सारेच त्यापुढे झुकतात,
प्रेमळ बाळकडू मिळतां,
अधिक जीवन जगतात,--!!!
याच माणसात आढळते,
परमेश्वरावर अढळ भक्ती,
तीच तारक बनते,
जीवन सुसह्य सरतेशेवटी,---!!!
करुणा भाके तो भक्त,
लीन दीन ईश्वरापुढे,
जगाच्या कल्याणाकरिता,
ज्ञानेश्वरही घालती साकडे,--!!!!
हिमगौरी कर्वे
©
काडीही हलत नाही
त्याच्या मर्जीशिवाय
आणि मी जग बदलू पाहतोय !
काडी हलण्यालाही
वारा निमित्त असतो
आणि मी स्वतःला बदलू पाहतोय !
मी शांत
आणि स्थिर राहतो
तो माझी परीक्षा घेऊ पाहतोय !
माझे प्रेम
आणि तिचे प्रेम
एकत्र करू पाहतोय!
त्याची मर्जी
मी स्वीकारताना
आता तो पाहतोय !
कवी - निलेश बामणे ( बी डी एन )
गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती.
Copyright © 2025 | Marathisrushti