(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोकुळीची गोधुली

    हे, सुमन निरागस, लोचनी सुंदरा कौमुदी

  • ज्ञानेश्वराची चेतना

    जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।

    दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। १

    सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।

    हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। २

    आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।

    बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। ३

    निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।

    जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।। ३

    संचार त्यांच्या आत्म्याचा , सदैव होत राही ।

    ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।। ५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • सतत बरसणारी दया

    प्रभू दयेची बरसात, चालू असते सतत ।।

    ज्ञानाची गंगोत्री वाहते, पिणाऱ्यालाच ती मिळते ।।

    प्रत्येक क्षण दयेचा, टिपणारा ठरे नशिबाचा ।।

    जलात राहूनी कोरडे, म्हणावे त्यास काय वेडे ।।

    फळे पडतां रोज पाही, त्याची कुणा उमज न येई ।।

    परि न्यूटन एक निघाला, बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।

    चहा किटलीचे झाकण हाले, स्टिफनसनने इंजीन शोधले ।।

    जीवनातील साधे प्रसंग, शास्त्रज्ञांची बनले अंग ।।

    प्रभू असतो सतत तयार, ठरवा तुम्ही दया कशी घेणार ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • वास्तव

    वास्तव! हे प्रतिबिंब अंतरीचे
    तेही तरळते तुझ्याच लोचनी
    तरीही कां? हे रुसणे फुगणे
    नको त्रागा उगा, घे समजुनी
    पाहिले किती? उनपावसाळे
    सत्यता! ती जाण नां जीवनी
    ओल्या मातीत, जिरते पाणी
    प्रीत! रुजते कोवळ्याच मनी
    हिरव्या प्रीतवेली फुलती फुले
    सुगंधा! तीच दरवळते जीवनी
    मनी, ही सारी साक्षात प्रचिती
    आत्म्यास! मन:शांती जीवनी
    --वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ६७
    १ - ३ - २०२२.
  • “किसन” अर्थात….अण्णाऽवतार…

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

  • सौंदर्य दृष्टी

    कां मजला ही सुंदर वाटते ? दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ?
    कोण हे ठरवी निश्चीत, मजला काही न कळते

    असेल जाण सौंदर्याची तर, दिसेल सर्वच सुंदर नयनी
    तिच एक कशी असेल सुंदर, जग सारेच असतां सुंदर

    सौंदर्याची दृष्टी नाहीं, म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही
    पूर्वग्रह दुषित असते, तेच सौंदर्याचे परिणाम ठरते

    मला जे भासते सुंदर, दुजास ना लागे तेच मनोहर
    विविधेतच्या आवडी निवडी, सौंदर्यांत त्या वाटा काढी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • संध्यासमय येताच पक्षी

    संध्यासमय येताच पक्षी, घरट्याकडे सारे निघाले,
    किती दूर, किती योजने,
    लांबवरी फार उडाले,--||१||

    किलबिलाट करत पिल्ले,
    असतील वाट पाहत,
    सय येता त्यांची एकदम,
    पंखात जसे बळ शिरत,--||२||

    आपुले घरटे नजरेस पडतां,
    जीव भांड्यात कसा पडे,
    पिल्ले सुरक्षित पाहता,
    आनंदओसंडे चहूकडे,--!!||३||

    धोका किती कोवळ्या जिवांना, सोडून जायचे निराधार,
    नाग साप मांजरांचा ,
    डोळाच असता त्यांच्यावर,-!!||४||

    नित्य कामास जाणे,
    पक्षीगणांना असते अटळ,
    आपल्यावाचून कोण भरवे,
    घास मायेने पिल्लांना, निव्वळ,!!||५||
    संगोपन त्यांचे करणे,
    कर्तव्यच आहे आमुचे ,
    आमची छोटी छोटी रुपे,
    प्रेमाची इवली प्रतीके,--!!||६||

    हळूहळू शिकवायाचे त्यांना, विशाल गगना तोंड देणे,
    निर्भय होऊन उडायचे,
    ऊन -- पावसात राहणे,--!!||७||

    संकटे आली किती जरी,
    शांत आणि स्थिरच राहणे, कर्तव्यपरायण राहून आपुले,
    सारे जीवन व्यतीत करणे,--!!||८||

    हिमगौरी कर्वे©

  • खाऊ घेउन मामा आला

  • स्त्री शक्ती

    कधी क्वचित मी खचून जाता
    उंच भरारी घेते मी
    टपकलेच जर अवचित अश्रू
    नकळत त्यांना पुसते मी

    थोपटते मी माझे मजला
    गोंजारते मलाच मी
    ऊर्मी माझ्या अंतरातल्या
    नजाकतीने जपते मी

    दुखता खुपता होता अगतिक
    दु:ख झुगारुन देते मी
    नव्या दमाने श्वास घेउनी
    पुढे पुढे हो जाते मी

    मीच असते तेव्हा माझी
    भक्ति मी शक्तिही मी
    माझ्या साठी माझी प्रेरणा
    केवळ मी केवळ मी

  • सलामी

    कोण भोंगळा,कोण वंगळा,
    कुणी कुणाला हिन लेखे,
    माळेमध्ये एकशे आठ मनी,
    एकशे नववा कुठं बसे....!!!

    गोड कडुनिंब,रेशमी बाभळी,
    आम्रवृक्षाला कोण पुसे,
    अनैतीक मितही नैतीक बनती,
    डोळ्यापुढे जेंव्हा सत्ता दिसे....!!!

    विचारधारा, विवेक विवेक,
    राततुनं तं,बापय नं दिसे,
    विवेक,विचार,विकास,प्रकाश
    सत्तेपुढे ते उणे असे..!!!

    आधी धर्म मग जाती पाती,
    पाहुणे राव्हुणेबी ईथे चालती,
    विवेक लपतोय निबीडं अंधारी
    लबाडं ढोंगी थयथय करती...!!!

    सत्तासुंदरी बनली बंदरी ,
    मदारीचं मदारी,चोहिकडे,
    छाताडावरं पाय ठेऊनी,
    थयथय नाचतं,खेळ चले...!!!

    उठ गड्या तु जाग झोपेतुनी
    फेक झुगारूनी पाश गुलामी
    समता,बंधुता,विवेक,जागवूनं,
    नव्या युगाला दे सलामी......!!!

    ©गोडाती बबनराव काळे
    9405807079