शब्द माझे उतावीळ सदा
या मौनातुनी मुक्त व्हावया
तू मात्र अशी कां ?अबोली
कसे लावू तुजसी बोलावया
अव्यक्तातुनीही प्रीत उमजते
तुज लागावे कां ? समजावया
मौन छळतेच जीवा जिव्हारी
हे तुलाही कां ? हवे सांगावया
उमलुदे आता मनभावनांना
फुलुदे, कळ्यांना गंधाळाया
ब्रह्मानंद तोच सुगंध परिमल
जीव आसुसला तुज भेटावया
शब्दभावनां माझ्या उतावीळ
तुझ्याशीच संवाद साधावया
नको, आता असा हा दुरावा
हे नको कां ? गे तुला कळाया
रचना क्र. ६२
२९/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
August 6, 2023
सहकारी संस्थांना आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. तर गृहनिर्माण संस्थां कशाप्रकारे भांडवल उभारणी करू शकतात हे आपण आज या लेखातून समजून घेणार आहोत.
August 25, 2021
मुंबईचा भाव म्हणजे ….गिरगांव….. गिरगांवच्या किवा गिरगांव चांगलं माहित असलेल्या आणि पाडगावकर माहित असलेल्या सर्वांसाठी…
July 25, 2017
सखी मज सांग,
तो राजकुमार कोण,
उंच सरळ धिप्पाड,
बघ हाती धनुष्यबाण,--!!!
सखी मज सांग,
जमला समूह आगळा,
हा त्यातला, पण वेगळा,
रूप देखणे नीलवर्णा,
आला मजसी विवाह करण्या,--!!
राजकुमार सगळे जमले, सगळ्यात उठून दिसे हा,
मज तो शांत वादळ भासे,
नुसते बघून पुरुषोत्तमा,--!!!
वाटे मज तो निर्भय निडर,
जणू शिव शंभूचा अवतार,--
उठला तो अगदी सत्वर,--
शिव धनु पेलण्या तत्पर,--!!!
बघता बघता ते उचलत,
सर्व येथले """आहा--अचंबित, केली सर्वांची मती कुंठित,
तातही माझे किती चकित,--!!!
मोडले ते मध्ये काडकन्,
कोण हा तडफदार तरुण,--?
नायक बनला समूहातून ,
का मुनी हासतीअसे गालात,-?
मघाशी लंकेचा राजा रावण,
पडता खाली हसले खुदकन,
तुलना कर बघ दोघांत,--
सखी वर्णन करून मज सांग,--!!!
बघ तात किती आनंदित,
जनकराजे अगदी सद्गदित,
सखी धडधडते ग माझे हृदय,
सखी मज सांग,--!!!
हाच योग्य म्हणती वर,
लागणार आता स्वयंवर,
डोळ्यात मावेना त्याची मूर्त, आवडला मज माझा प्रिय,--!!!
करत पापण्यांची पीट -पीट,
उभी बघा मी कशी अवगुंठत,
अशी कशी बघ लाजत बुजत, माझीच लागेल भाग्या दृष्ट,--!!!
सखी मज सांग,--
*ते तर अयोध्येचे राघव,
बघ संयम अन मार्दव,
उचंबळत सारे तनमन,
बघती, हळूच स्मित करत,
सखे, आता काय करू सांग*,--!!!
हिमगौरी कर्वे.©
August 18, 2019
निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला.
तो माणूस म्हणाला, 'माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट आला आहे. जगण्यात आता रस उरला नाही. आपल्या बोलण्यावर साधू काही तरी उपदेश करील, कदाचित एखादा आशीर्वाद देईल, एखादा चमत्कारही घडविल ज्यायोगे आपली स्थिती सुधारेल, या अपेक्षेने तो माणूस साधूकडे पहात होता. साधूच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव दिसले नाहीत. काही न बोलता साधूने एकवार इकडेतिकडे नजर टाकली आणि त्या माणसाला काही कळायच्या आत अचानक त्याचे गाठोडे उचलून धूम ठोकली. साधूच्या या अनपेक्षित वागण्याने तो माणूस एकदम गोंधळला, बावरला, उठला आणि आपल्या चपला तिकडेच टाकून जीवाच्या आकांताने त्या साधूमागे पळत सुटला. साधूचा बराच पाठलाग केला तरी त्याला काही गाठता येईना.
बऱ्याच अंतरावर रस्ता एका बाजूला वळला होता. आता तर साधूने गति वाढविली तो दिसेनासाही झाला. तो माणूस वळणावर आला तर एका झाडाखाली आपले गाठोडे पडलेले त्याला दिसले. धापा टाकतच तो गाठोड्याजवळ आला आणि संशयाने त्याने ते उघडूनही पाहिले. सर्व वस्तू तशाच असल्याचे दिसल्यावर तर त्याला आश्चर्य वाटले. तोच झाडामागून तो साधूही पुढे आल्यावर तर तो अधिकच कोड्यात पडला.
साधू हसत हसत म्हणाला, जीवनाला कंटाळला असताना आणि निराशेने घेरले असतानाही या यःकिंचित गाठोड्यासाठी तुला माझा पाठलाग करावासा वाटला. त्या पाठलागात तुझ्यातले नैराश्य, तुझ्यातले दुर्मुखलेपण आणि जगण्यातली उदासी तर कुठल्याकुठे दूर पळाली! हे गाठोडे मिळविण्यासाठी जसा तू प्रयत्न केलास तसाच प्रयत्न एखादे ध्येय समोर ठेवून तू मोठ्या उमेदीने केलास तर तुला जीवनात रस वाटेल!
ध्येयाशिवाय जीवनाला दिशा नाही की जीवनात रसही नाही!
July 8, 2016
संस्थेतील पदाधिकारी हे अनेकदा स्व:ताहून संस्थेचे काम करण्यास पुढे आलेले नसतात. संस्थेचे काम करण्यास सभासद हे उत्साही नसतात. सभासद दुसऱ्यावर आरोप करण्यास नेहमी तत्पर. अनेकदा सदस्याचे म्हणणे असते की, काय काम असते हेच माहित नाही, कोणी सांगितले आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जायचे आणि स्व:ताचे हसे करून घ्यायचे. पदाधिकारी यांची संस्थेतील कार्य, अधिकार आणि जबाबदारी आपल्यासाठी लेखातून देणार आहे. आजच्या लेखात अध्यक्ष याबाबत माहिती आपल्यासाठी उपयोगी असू शकते. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवड दर पाच वर्षाने होते. सभासदामधून निवडून आलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यामधून एका संचालकाची निवड अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेत करण्यात येते. अध्यक्ष हा संस्थेच्या सर्व साधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांचा पदसिद्ध अध्यक्ष असतो व तो नेहमी संचालक मंडळाला जबाबदार असतो.
August 20, 2021
महाराष्ट्राच्या मातीतल्या कणाकणात जपलेला स्वाभिमान,
आणि डोळ्यांत पेटलेला महाराष्ट्राचा अभिमान,
असं व्यक्तिमत्त्व जेव्हा उभं राहतं,
तेव्हा व्यासपीठच रणांगण होतं.
राज ठाकरे...
नावातच एक ठसका,
शब्दांत ज्वालामुखीचा ताप,
आणि विचारांत धारदार तलवारीची चमक.
तो बोलतो तेव्हा
हवेचाही श्वास थांबतो,
कारण प्रत्येक वाक्य
थेट छातीत आदळतं.
भाषेचा प्रश्न असो,
मराठी माणसाचा स्वाभिमान असो,
किंवा व्यवस्थेवरची करडी टीका.
तो मांडतो मुद्दा
तडफेने, निर्विकारपणे,
कोणाच्याही भीतीशिवाय.
त्याच्या शैलीत आहे वारसा,
पण त्याची वाट मात्र स्वतःची.
रेषांच्या व्यंगचित्रांतून
तो उलगडतो सत्तेचं कुरूप सत्य, आणि
सभागृहात त्यांच्या विचारांनी हादरते सत्तेची भिंत.
वाद त्याच्या मागे धावतात,
टीका त्याच्यावर कोसळते,
पण तो उभाच राहतो.
डगमगत नाही,
वाकत नाही.
कारण काही नेते
फक्त राजकारण करत नाहीत,
ते घडवतात लाट
भावनांची, विचारांची, अस्मितेची.
आणि जेव्हा इतिहास
महाराष्ट्राच्या राजकीय पानांवर
ठळक अक्षरांनी नोंद करेल
एक निर्भीड, ठाम, वेगळा आवाज तेव्हा त्या ओळीत
गर्जत उभं असेल.
त्या आवाजाचे एकचं नाव...
राजसाहेब ठाकरे
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 13, 2026
अन्तः पुरीचे जन तै नृपापरी /
कुमार जन्मास अधी निरोपिती /
श्रवोनिया अमृत तुल्य आकक्षरे /
सर्व स्वेद वर्जुनी छत्र चामरे // १६ //
निर्वातशा स्थानिय पंक जापारी /
तटस्थ नेत्रे सुत पाहिल्यावरी /
नृपास प्रेम न समाय अंतरी /
विधू पाहता बहु पूर सागरी // १७ //
April 22, 2011
खेळाच्या त्या मैदानीं,
रंगात आला खेळ,
मुरलेले खेळाडू,
आनंदी जाई वेळ ।।१।।
खेळाच्या कांहीं क्षणी,
टाळ्या शिट्या वाजती,
आनंदाच्या जल्लोषांत,
काही जण नाचती ।।२।।
निराशा डोकावते,
क्वचित त्या प्रसंगीं,
हार- जीत असते,
खेळा मधल्या अंगी ।।३।।
सूज्ञ सारे प्रेक्षक,
टिपती प्रत्येक क्षण,
खेळाडू असूनी ते,
होते खेळाचे ज्ञान ।।४।।
मैदानी उतरती,
ज्यांना असे सराव,
जीत त्यांचीच होते,
ज्यांच्यात खिलाडू भाव ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 30, 2017
घटना' जेव्हां घडली अघटित ।
कुणीही नव्हते शेजारी ।।
कां उगाच रुख रुख वाटते ।
दडपण येवूनी उरीं ।।
जाणून बुजून दुर्लक्ष केले ।
नैतिकतेच्या कल्पनेला ।।
एकटाच आहे समजूनी ।
स्वार्थी भाव मनी आला ।।
नीच कृत्य जे घडले हातून ।
कुणीतरी बघत होता ।।
सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे ।
हेच सारे सुचवित होता ।।
कोण असावा हा गुप्त साक्षीदार ।
नितिमत्ता शिकवी त्याला ।।
बाह्य जगातील द्रष्टा असूनी ।
अंतर्यामीही बसलेला ।।
त्या साक्षीदाराची जाणीव होता ।
कचरुनी जाते मन सदा ।।
अपप्रवृत्तींना आळा बसूनी ।
सत् कर्मे घडती अनेकदा ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti