|| हरी ॐ ||
आपल्या देशाला थोर परंपरा ऋषींची,
संतांची आणि देशभक्तांची !
विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाही ताबेदारी कुणाची,
उकल करू पाहतो न समजलेल्या ग्रहांची !
अश्या थोर इतिहासाला आणि प्रयासाला,
बट्टा लागला देश हिताला समलिंगी संबंधाचा !
नाही पटत मनाला, कीव येते बुद्धीची
समलैंगिक संबंधींची !
घटनेप्रमाणे लोकशाहीत मतस्वातंत्र सर्वांना,
तरी समलिंगी स्वैराचार नाही पसंत कायद्याला !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली,
माणूसच स्वत:चा बुद्धिभेद करू लागला !
काय त्या पुढारलेल्या चारपाच राष्ट्रांनी
समलिंगींसाठी कायद्यात केले बदल !
पण माहित नाही त्यांना
भविष्यात काय वाढून ठेवले आहेत बदल !
नुकसान आहे स्वत:चे,
राष्ट्राचे, मानवतेचे,
भविष्यात राष्ट्राला
कारण नाही कुटुंबनियोजनाचे !
असे कसे काही शहाणे सुरते,
वागतात बुद्धीभेदाने पछाडल्यासारखे?
हेच का देशप्रेम आणि भक्ती?
जगदीश पटवर्धन, दादर
किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे,
दुःख जिवापाड सोसावे,--!!
ठरवलेले नेहमी चुकते,
विपरीत काही घडते,
अगणित अपेक्षांचे ओझे,
इवल्या हृदयाने पेलावे,-?
जे विधायक, ते दूर राहते,
नकारात्मक ते सारे घडते,
आपल्याच जिवाचा बळी
रोज नव्याने पहावे लागते,-!!
मदतीचा हात करता पुढे,
आरोपांना पेंव फुटते ,
आंधळ्या निर्जन आयुष्याला ,
रानावनीची वाट दिसते,--!!
कुणाला आपले म्हणावे,
मन एक ठरवून ठेवते,
बघता बघताअगदी सारे,
कुठेतरी बिनसलेले असते,--!!!
गैरसमजांची तुफान वादळे,
अवती भोवती घोंघावती ,
अलगद घास टिपण्या,
सभोवार तांडव करिती,-!!
शांतता करुणा प्रेम
सहकाराच्या सर्व भावना,
का हरत राहती सारख्या,--
मग जीवन कसे असावे क्षेम,-?
हिमगौरी कर्वे.©
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल.
जन्मापासूनी बघतो तूला
परि जन्मापूर्विच ओळखले
रोप लावले बागेमध्ये
फूल तयाने दिले
चमकत होती नभांत तेंव्हा
एक चांदणी म्हणूनी
दिवसाही मिळावा सहवास
हीच आशा मनी
तीच चमकती गोरी कांती
तसेच लुकलुकणे
मध्येच बघते मिश्कीलतेने
हासणे रडणे आणि फुलणे
चांदणीचा सहवास होता
केवळ रात्रीसाठी
दिवस उजाडतां निघून गेली
आठवणी ठेवून पाठी
नको जाऊस जरी ही इच्छा
परि जाशील सोडून दुजा घरी
आठवणीसाठा देत जा मजला
दिलासा तोच हे समाघान धरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आज अचानक मी तुला पाहता
भावतरंग मनीचे, उमलुनी आले
निर्माल्याचाही तो गंधाळ सुगंधी
गगन, गतस्मृतींचे दाटुनी आले
सांग सखये, काय काय आठवू
लोचनी, तुझेच भास तरळलेले
खुणा! तुझ्या पावलो, पाऊली
आठव सारेसारे, हृदयी रुतलेले
अजुनही छळतो, तुझा अबोला
मन! अधीर हे तुझ्यात गुंतलेले
लाघवी प्रीती, चैतन्य स्पंदनांचे
मन! तव प्रतीक्षेत घुटमळलेले
आज अचानक मी तुला पाहता
भावतरंग मनीचे, उमलूनी आले
-- वि.ग.सातपुते .(भावकवी)
9766544908
रचना क्र.३८.
७ - २ - २०२२.
लपून सावली आड पृथ्वीच्या पाहतो चंद्र आमावस्येच्या दिवशी जसा चांदणीकडे पाहतो तसा मी लपून रात्रीच्या काळोखा आड प्रकाशातील तुझ्याकडे आहेस तू उत्तर ध्रुव आणि मी दक्षिण ! आपल्या दोघांच्या मध्ये उभी आहे समाजाने आखलेली भिंत विषुववृत्त नावाची
असं प्रेम सोपं नसतं,
ज्यात शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलते,
हातात हात नसतो,
पण मनात घट्ट धरलेलं असतं.
असं प्रेम सोपं नसतं,
ज्यात अधिकार नसतो, फक्त प्रतीक्षा असते,
डोळ्यांत स्वप्नं असतात,
पण ओठांवर कबुली नसते.
रोजच्या संध्याकाळीत
तुझ्या आठवणींचा चंद्र उगवतो,
आणि मनाच्या आकाशात
तुझ्याच नावाचा तारा चमकतो.
असं प्रेम म्हणजे
पावसाआधीची गंधीत माती,
स्पर्श न करताही जाणवणारी
एक गूढ, हलकीशी व्याकुळता.
तुझ्या एका हसण्यावर
संपूर्ण दिवस उजळून निघतो,
आणि तुझ्या एका शांततेत
मन हजार प्रश्नांनी भरून जातो.
असं प्रेम सोपं नसतं..
ते मिळवण्यात नसतं,
ते फक्त जपण्यात असतं.
मनाच्या सर्वात खोल कप्प्यात,
नाव न देता,
पण आयुष्यभरासाठी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
समजावू कसे या मनाला
जे शोधिते अजूनही तुला..
आजही लोचनी रूप तूझे..
तुझाच ध्यास या जीवाला..
एकमेकांवरी नि:सिम प्रीती
तुझी न माझी, जडली होती
पाहता , पाहताच एकमेकां
प्रीतीभाव आगळा रुजला..
नि:शब्दुली ! भाषा मनांची
अंतरंगी सारीच प्रीतभारली
कटाक्षी प्रीती, स्मित लाघवी
जगवित होती तनमनांतराला..
जरी निर्व्याज ही सत्यप्रीती
प्रारब्ध्ये दुरावाच हा भाळी
तुजविण सारे निरर्थ जीवन
हाच दुर्दैवी शाप जीवाला..
क्षणक्षण सारे आज हरवले
त्राणही क्षीण , संथ जाहले
सांजवेळी साऱ्या आठवणी
विमनस्क करती जीवाला..
आज प्रश्न ? मी काय प्रार्थू ?
ओशाळले जीवन सारे सारे
घायाळ जाहली जरी स्पंदने
अंती तुझाच ध्यास जीवाला..
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र. ३७
दिनांक:- १० - ३ - २०२१
खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।
डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।।
किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।
नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।।
सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।
निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।।
बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।
राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।।
निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।
धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।।
जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।।
लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।
तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती
गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें
कसा आला नशिबी निराशा मनी येते
अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले
लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले
मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे
नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे
केवळ त्याने स्पर्श करुनी जाणले माझे नशिब
भाग्यवान ठरवूनी सांगे मिळेल धनलाभ
खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने
नीच मनाचा असून मी पचविले ते हसण्याने
टिपून ठेवला नंबर त्याचा एका कागदावरी
कोटाच्या खिशांत ठेवले तिकीट जपून भारी
निकाल वाचूनी नाचू लागतो आनंदाने पुरता
लाखाचे ते बक्षिस लागूनी लाखोपती बनता
धावत गेलो ऑफिसातूनी तिकीट घेण्या घरी
कोट नव्हता दिसत तेथे रोजच्या जागेवरी
इतर कपड्यामध्ये टाकला धूण्या परीटाकडे
धावत सुटलो नदीवरती शोधण्या तो तिकडे
सुकवलेल्या कपड्यातूनी कोट काढला
तुकडे बघूनी त्या तिकीटाचे मुर्च्छा आली मला
खरय़ा शिक्क्यासम चालले नशिबही वेगाने
खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti