मानव जीवन तुम्हां लाभले,
महत् भाग्य ते समजावे
कर्म दिधले पाठी तुमच्या,
सद्उपयोगी यांसी करावे....१,
जीवन रेखा मर्यादेतच,
ठेवली असती तुमचे हातीं
जाणीव त्याची मनीं असावी,
कर्म कार्ये जेव्हां करिती...२,
हाती घेतल्या कार्यामध्ये,
एकचित्त तो प्रयत्न व्हावा
काळ केवढा तुमचे जवळी,
याचा विचार सतत यावा...३,
कार्ये राहता अपूर्ण अशी,
वेळ न उरे तुमचे हाती
अभाव असता योजनेचा,
अपयश ते पदरी पडती....४
कार्य व्याप्तीची दिशा असावी,
शक्ती साधन काळ बघूनी
जीवन यशाचा आनंद खरा,
लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भेटीची आस तुझ्या,
नित्य मज छळते ,
तुझ्यासाठी सखया,
रात्रंदिन मी झुरते,--!!!
चित्र पाहूनी तुझे,
जिवाची ओढ लागते, जन्मोजन्मीचे नाते असता,
कशी हुरहुर वाढते,--!!!
थेट अंतरातुनी मला,
जसे तुझे बोलावणे,
घालमेल होता जीवा,
आतल्या आत लपवते,--!!!
जेव्हा कल्पते एकांता,
माझी न मी राहते,
तुझ्यासंगे भान हरपता, वास्तवालाच मी विसरते,--!!!
मनाचा हा ओढा,
कसाबसा रे दडवते,
आतल्या आत प्रवास सारा,
आत्मिक करून टाकते,--!!!
जीवांचे हे मैत्र राहता,
हातात जणू काही नसते,
तुजविण जीवनाचा साऱ्या
डांव, ना कधी मांडते,--!!!
तुला वाटतां मला वाटतां,
अंतर आपल्यात केवढे,
दोन समांतर रेषा,
एकजीव होणे नसते,--!!!
अशक्याची ना पर्वा,
ना कुठलेही देणे-घेणे,
कशी टाळावी एकरूपता,
प्रश्न किती जीवघेणे ,--???
हिमगौरी कर्वे.©
नवरंग नवरात्रीचे !
प्रतीक शक्ती-भक्तीचे !!
पिवळा रंग सोन्याचा !
शुद्ध तेजस क्षणांचा !
हिरवा रंग सृष्टीचा !
वृध्दी,सुख-समृध्दीचा !!
करडा रंग भाग्याचा !
निरामय आरोग्याचा !!
केशरी रंग निर्मितिचा !
राजमंगल पताकांचा!!
पांढरा रंग शांतीचा !
एकोपा अन मैत्रीचा !!
लाल रंग कुंकवाचा !
सर्व मांगल्य मांगल्याचा !!
निळा रंग अस्मानाचा !
निर्मळशा हृदयाचा !!
गुलाबी रंग प्रितीचा !
अबोधशा यौवनाचा !!
जांभळा रंग नवलाईचा !
सखी रेणुका अंबाबाईचा !!
-- जयश्री दाणी
https://www.facebook.com/jayshri.dani.14
रक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने
व्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने...१,
मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती
सभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती...२,
कर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई,
ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बिजे उत्पन्न होई....३,
बिजांचे मग रोपण होवूनी, नव जीवन येते
स्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नमन माझे श्री गणेशाला
वंदितो मी कुलस्वामिनी श्री रेणुकेला
भाव अर्पितो गुरु दत्तात्रयाला
परमात्म्याची विविध रुपें ।।१।।
परमेश्वराची लीला महान
घ्यावी सर्वानी जाणून
टाकून सारे ब्रह्मांड व्यापून
चालवितसे खेळ जीवनाचा ।।२।।
विश्वाचा तो अधिनायक
जीवन धर्माचा तो पालक
जीवन गाड्याचा तो चालक
परब्रह्म परमात्मा ।।३।।
नसे त्यासी मृत्यु- जन्म
कार्य करी तो अवतार घेऊन
कुणामध्यें अंशरुपे येऊन
जीवनचक्र चालूं ठेवी ।।४।।
प्रभूसी समजावे समर्थ
जाणून घ्यावा जीवन अर्थ
हेच आयुष्याचे सार्थ
आपल्या जीवनाच्या ।।५।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***२५
एकसष्टीनंतर जीवनातील प्रमुख बाबींची प्रश्नावली मुलांच्या हाती द्यावी
ती कशी सोडवतात, त्याकडे सजगतेने नजर ठेवावी
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
बालपणीची मैत्रीण माझी
भातुकलीतील ती सवंगडी
निरागस तो खेळ आगळा
मी राजा, ती राणी भाबडी ।।
कितीतरी हा काळ हरवला
पण आज तीच राणी मनी
ती दूर, दूर तर मी हा इथे
आठवण, तिची नित्य मनी ।।
मला वाटते, भेटावे तिजला
अन बोलावे सारे गुज मनीचे
जे घडले ते आता घडुनी गेले
पुनर्जन्मी! खेळ खेळू मनीचे
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २४.
२४ - १ - २०२२.
सारेच आहे प्रभूमय,
अणूपासून ब्रह्मांड होय...१,
ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२,
सर्वत्र व्यापले आकाश,
न जाणती त्याचे पाश, ....३,
वायूचा होवून संचार,
जीव जंतू जगविणार....४
वायू असे शक्तीचे रूप,
पेटवी तो प्राणदीप....५,
प्राण आपल्या अंतरी,
तेच असे रूप ईश्वरी....६
जसे शिव आणि शक्ती,
तसे प्राण व वायू असती...७,
बाहेरची वायू शक्ती,
अंतरिच्या प्राणास भेटती....८,
जाता दोन्ही एक होवूनी,
चेतना मिळते जीवनी...९
- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
देव निळाईत न्हाई
देव राऊळात न्हाई
शोध बापा माणसाच्या
अंतरीच्या ठायी ठायी
फुलं नि फळं ही सारी
त्याच्या रं अंगणाची
पुन्ना काय वाहतो तू
वीणा भाव ती फुकाची
नगं त्यास रं डोलारे
सोन्यारुप्याचे मनोरे
कशाची रं हाव त्याला
त्याला दावू नगं गाजरे
देणं घेणं हा व्येव्हार
देवा काय रं कामाचा
एक शबूद ओलेता
डोळा थेंब आनंदाचा
म्हणशीला त्यो दिसं देव
न्हायतर साधा रं दगुड
देव मनाच्या कुपीत
सुद्ध अत्तर परिमळ!!
-- वर्षा कदम.
श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर ।
विविध नामे परि, दुर्बलांची करण्या कामे ।१।
अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी ।
दैवी शक्ती अंगी, अंधारी चमकली ठिणगी ।२।
मशाल घेवून हाती, आला धावत पुढती ।
अति वेगाने, सर्वांची उजळीत मने ।३।
कर्म योग आणि भक्ती, ह्या तीन ईश्वरी शक्ती ।
एकत्र जाहल्या, मशालीत त्या समावल्या ।४।
वाहत्या काळाच्या ओघात, ते शरीर झाले शांत ।
जग सोडूनी, परि मशालीत शक्त ठेऊनी ।५।
ही तीच मशाल घेवूनी, पुढती चाले दूजा कुणी ।
वारसा त्यांचा, प्रेषित ज्या शक्ती ।६।
जरी तो नाही जगी आता, तत्त्व कार्य ते मागे उरता ।
मशाल रूपे, जन म्हणूनीच जपे तिजला ।७।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हर्ष आहे शोक आहे, अजुनही माणूस तूं
त्याहुनी आश्चर्य आहे - अजुनही माणूस तूं !
राग हृदयीं लोभ हृदयीं अन् असूया द्वेषही
सर्व दुर्गुण असुनही हे, अजुनही माणूस तूं ?
ईश ना शकसी बनूं, सैतान तरि होऊं नको
त्यापरी स्वीकार कर हें – अजुनही माणूस तूं ।।
कधिच तूं बनलास फत्तर, तरि कधी नयनातलें
सांगतें जें नीर वाहे – अजुनही माणूस तूं ।।
श्वापदाहुन हीनतम कृत्यें तुझी, म्हणुनी तुला
देव ‘आ’ वासून पाहे – अजुनही माणूस तूं !!
-- सुभाष स. नाईक
Copyright © 2025 | Marathisrushti