(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • मातृभूमीच्या सर्व शहीद सुपुत्रांना विनम्र श्रद्धांजली व समर्पितही

    झालो आम्ही *धन्य,
    मातृभूमीच्या कुशीत विसावलो, वीर मरणाचे स्वप्न पाहिले,
    अन् भाग्यवंतही ठरलो,
    देशासाठी लढणे एकच ध्यास, बालपणापासून आमची आंस, येतील कितीही संकटे,अडथळे
    प्यारी आम्हा भारतमाता, तिच्यापुढे खूप आव्हाने" ठाऊक हरेक वार्ता, तिलाजिवापाडजपणे
    सैनिकाचे असते ध्येय,
    कोणी काही म्हणो,
    ना कदर ना काळजी ,
    नको फक्त श्रेय,
    जीवन तिलाच अर्पण,
    दुसरे नको काही,
    पुढील जन्मी होऊ सैनिक,
    अशीच वाटते ग्वाही,
    नागरिक करतात सर्वस्व ओतून, त्यांचे संसार,
    आम्ही नशीबवान शिवाय देशसेवेत रममाण*,-
    तरुण पत्नी, गोंडस मुले,
    वृद्ध माता -पिता,
    आठवण खूप त्यांची येते, धारातीर्थी पडतां,---!!!
    आमच्यासाठी वाट बघतील,
    कोण सावरेल त्यांना,
    आता,कोण कमावेल
    करील भविष्यचिंता,--? मुलगाचआधार,त्यांचा,
    कोण घेईल त्यांची काळजी, सांभाळत घेईल भार,
    संसार उघडा पडून,
    राहील पत्नी एकटी,
    काढा तुम्हीच समजूत,
    करा सांत्वन शेवटी, बाळे कोवळी ती,
    निरागस त्यांची मने,
    वाट पाहतील बाबांची,
    पण त्यांच्याशिवाय राहणे,
    कडा पापण्यांच्या ओलावती,
    जरी जाहलो पावन,
    घेतो निरोप आता,
    सेवेत मातेच्या येणार परतून,--!!!

    हिमगौरी कर्वे

  • निसर्ग व्याप्ती

    उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला

    गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला

    उंचाऊनी बघे मानव, अथांग जगताला

    विज्ञानाच्या जोरावरती, अंतराळात गेला

    युगा युगाचा चंद्रमा, केला अंकित त्याने

    त्याच्या देही ठेवी पाऊल, मोठ्या अभिमानाने

    अगणित दिसती गृहगोल, त्याचा दृष्टीला

    सीमा न उरली आता मग, चौकस बुद्धीला

    चकित होतो प्रथम दर्शनी, विज्ञाना बघता

    दिसून येती अनेक गुढे, एक एक उकलता

    किती घेशी झेप मानवा, उंच उंच गगनी

    वाढत जातील क्षितिजे, तितक्याच पटींनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • रचली जाते कविता

    मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची

    मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची...१,

    शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला

    आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला...२,

    शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता

    अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता...३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • परिपूर्ण स्त्री

    आयुष्याच्या वाटेवर अचानक एक दगड आला ठेच लागूनी पायाला देह तिचा कोसळून पडला ज्यावर होता विश्वास खूप तोच टाळून निघून गेला अश्रू आले अलगद गाली पापण्यांतून सडा गेला आजवर त्यांनी जे काही होतं जपलेलं सारं क्षणात होतं तिथे पसरलेलं प्रेमळ त्या संसाराचा पाया पार खचून गेला

  • आईच्या संगत बसलो उन्हात

    आईच्या संगतबसलो उन्हात,
    बाहेर उबेत,
    थंडी घरात,
    सकाळचा प्रहर,
    जीवास आराम,
    नाही काम धाम,
    बसलो निवांत,
    बागेच्या फाटकात,
    अवधान ठेवत,
    आईचे संरक्षण,
    मग काय वाण-?
    मला ते मिळत,
    मी निर्धास्त,--!!!
    आई बिनधास्त,
    नाही डरत,
    लोक घाबरत,
    मी हसत,--!!!
    कवडसा उन्हात,
    त्यात खेळत,
    जरासा थकत,
    आईस बिलगत,--!!!

    © हिमगौरी कर्वे

  • आता आस उरली नाही

    दिसे किनारा, निवता वारा
    तेवती संध्यादीप काही
    आता, आस उरली नाही ॥

    पूर्वायुष्य या पुसत्या रेषा
    नव्या धुक्यात अशा विराव्या
    ना भविष्य, नसे वर्तमान, उगा दुःख काही
    आता आस उरली नाही ॥ १ ॥

    न जगताच जे जगले
    जीवन, त्यातच मन उबले
    थरथर मनीची शरीरी उतरुन राही
    आता आस उरली नाही ॥ ३ ॥

    भयाणतेच्या सीमेवरी
    वास्तवता वास्तव्य करी
    जीवन झाले चोथा, रस उरला नाही
    आता आस उरली नाही.

    -- यतीन सामंत

  • बाबा

    नेहमीच तिन्हीसांजेला वाट पाहीली
    आमचे बाबा घरी कधी येतील?
    मायेचा पंख पसरून कुशीत कधी घेतील
    परिराणीची गाणी कि गोष्ट आज सांगतील?
    नेहमी सांगे आई, कामात गुंतले असतील
    निज बाळा आता, आत्ता इतक्यात येतील
    वाट पाहून पाहून डोळे जाती थकून
    दिवा जाई विझून नि रात्र जाई सरून
    बाबा येण्याची रात्र कधी उगवलीच नाही
    गोड गोष्टींच सुख कधी लाभलंच नाही
    बाबा तुम्ही कधी आलाच नाहीत का?
    कि निजलेले आम्हाला पाहून थांबलाच नाहीत का?
    एकदातरी तुम्हाला अभिमानाने पाहायचं होत
    एकदातरी तुमच्यासारखं होईन, मनातलं हे बोलायचं होत
    मनातलं सार काही मनातच राहून गेलं
    आठवताना तुम्हांला डोळ्यातलं मळभ वाहून गेलं...
    -- वर्षा कदम.
  • चिमुकले जग

    किती सोसायचे
    किती भोगायचे
    दोन चिमुकल्या हातांसाठी जगायचे
    बोबड्या बोलातल्या
    जिव्हाळ्यात झुलायचे,
    भाबड्या डोळ्यात त्या
    हास्य फुलवायचे अन्
    चिमण्या ओठांमधले
    गीत होऊन गायचे
    भरारणार्या पंखामधले
    सामर्थ्य होऊन रहायचे
    अंधारात मार्ग होऊन
    ज्योतीपरी तेवायचे
    जागेपणी उद्याचे
    स्वप्नगंध हुंगायचे
    अन् पुन्हा एकदा
    एकटे एकटेच व्हायचे
    ना कुणासाठी झुरायचे
    ना कुणासाठी फुलायचे
    फक्त .....
    चिमण्या पिलासाठीच उरायचे

  • सुखाचा डब्बा

    जगातील वस्तू, वाटे आकर्षक
    देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१

    प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
    सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२

    चमक बेगडी, फसवी सर्वाला
    काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३

    झाकण उघडा, दुःख दिसे आत
    लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४

    हात लावताच, दुःख हाती येई
    भासलेले सुख, नष्ट होत जाई...५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • एक दगड वाटेवरचा

    एक दगड वाटेवरचा,मला उचलले कुणी
    आणले मंदिरी, जरासा आकार देवूनी ।।

    हात जोडती... पाया पडती
    अंगावर किती थर जडती
    वेगळाच मी ठरतो, देव शब्दात अडकुनी ।
    एक दगड वाटेवरचा,मला उचलले कुणी।।

    किती खाऊ,किती फळेफुले
    तोंड न मजला, देतच सुटले
    कशासाठी कुणासाठी, मला पडे ना पचनी ।
    एक दगड वाटेवरचा......मला उचलले कुणी।।

    शाळेच्या भिंती आम्ही बांधू
    धरणाच्या भिंतीतही आमचे बंधू
    असे यावे क्षण म्हणतो.. सार्थ ठरावे जीवनी ।
    एक दगड वाटेवरचा...मला उचलले कुणी ।।

    कौशल.

    -- श्रीकांत पेटकर