पायासाठी चप्पल की चपलेसाठी पाय हेच मी विसरले |
माती लागू नये पायाला म्हणून मी ते वेष्टिले || १ ||
चमचमणार्या लखलखणार्या आभाळाला भाळले |
अन्न, वस्त्र, निवारा देणार्या मातीला मी विसरले || २ ||
या मातीचा स्पर्श नको म्हणून मी स्वत:ला जपले |
त्या मंगळाने त्या चंद्राने मलाच दूर फेकले || ३ ||
त्यावेळी कळाली मला या मातीची महती |
तिचा एकएक कण होता माझ्या जीवनाची गती || ४ ||
-- चंदाराणी कोंडाळकर
अंहकाराचा पेटून वणवा, थैमान घातिले त्या मेघांनी
तांडव नृत्यापरि भासली, पाऊले त्यांची दाही दिशांनी...१,
अक्राळ विक्राळ घन दाट, नी रंग काळाभोर दिसला
सूर्यालाही लाजवित असता, गर्वपणाचा भाव चमकला...२,
पृथ्वीवरती छाया पसरवूनी, चाहूल देई आगमनाची
तोफेसम गडगडाट करूनी, चमक दाखवी दिव्यत्वाची...३,
मानवप्राणी तसेच जीवाणे, टक लावती नभाकडे
रूप भयानक बघून सारे, कंपीत त्यांची मने धडधडे...४,
त्याच वेळी वादळ सुटूनी, देह घनाचा टाकी विखरूनी
गर्व हरण होऊन जाता, अश्रू पडती नयनामधूनी....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दिंडीत वैष्णवांच्या
धावघावती पाऊले
या लोचनी एकची
परब्रह्म उभे सावळे...
नादात टाळमृदंगाच्या
सारे विठ्ठलनामी रंगले
तनमन विठ्ठल विठ्ठल
सारे वाळवंटी रमलेले...
शुन्यात सत्य ब्रह्मरूप
विटेवरी रुपडे सावळे
राऊळ, गाभारी त्राता
अंत:पुर! उद्धारलेले...
देवा नको रे येणेजाणे
मन तुझ्यात रे तृप्तले
संतत्वात तुझीच साक्ष
ब्रह्मानंदी आत्म दंगलेले...
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र.३०१
२२/११/२०२२
मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ
चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ....१
चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी
करूया काही आगळे ठरवी तो विचारांनी....२
आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे
नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे....३
परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती
कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती....४
करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे
अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे....५
जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी
प्रवास केला आगळा, हेच येते समजूनी....६
मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते
आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले
परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले...१,
वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती
ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करिती...२,
षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो
सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो...३,
पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती
गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती....४,
थोडे राहता गाफील तुम्ही, जाळ्यामध्ये अडकून जातां
जीवनाचे जे साध्य असते, स्वकर्माने गमवून बसतां...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आणखी एक बॉम्बस्फोट
शांततेच काळीज चिरून गेला
पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
सर्वसामान्यांची झोप उडवून गेला
संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां
आणखी एक बॉम्बस्फोट
पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला
ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
मानवतेला काळिमा फासून गेला
डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
डोक बधिर करून गेलां
जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला
कवी – निलेश बामणे
प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या निधनाला २०१६ च्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक वर्ष झालें. त्यानिमित्तानें तिच्या स्मृत्यर्थ.
सहजीवन सरलें , तरि भंवती अजुन खुणा
सखये, आपण भेटूं या एकदा पुन्हां ।।
ठाउक होतें ‘सोडुन जाणें’,
कां गेलिस पण नकळत ?
भेट घडविली ज्या नशिबानें,
तयेंच केलें आहत !
मला कळेना, मी भाग्याचा केला होता काय गुन्हा ?
देह आपुला मर्त्य असे,
प्रियतमे, कळे मज
अंतिम हें जरि सत्य असे,
पण, स्मृती छळे मज
गेलिस तूं, तरि अजून उरला आठवणीभरला खजिना ।।
जें झालें तें झालें, आतां
पुनरपि ये तूं
जवळ येउनी, हातीं हाता
पुनरपि घे तूं
पुनरपि उमलो वठल्या हृदयीं अपुला मीलनचैत्र जुना ।।
+ + +
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph- Res- (022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com,
www.snehalatanaik.com
कविता तीही लिहित असते
कविता मीही लिहित असतो
ती चंद्र- चांदण्यांची बात करते
मी स्वतः ला शोधत असतो
ती जर चंद्र - चांदण्यांतून हटली
मी जर स्वत:मधून निघालो
तर तिला मी दिसेल आणि मला ती
त्यानंतर दोघांच्याही भावना
उलगडत जातील एकमेकांना
जे कधीच आजपर्यंत दोघांकडूनही
बोललं गेलं नाही
जे तिच्याही मौनप्रेमातून हरवलं
जे माझ्याही निशब्दतेतून निसटलं
मग तिचंही प्रेम लख्ख उजळेल
माझाही प्रेमदीप प्रकाश देईल
नंतर काय सांगू मी आता
ती माझी होईल
अन् मी तिचा होईल
- ऋषिकेश तेलंगे
https://www.facebook.com/rushikesh.telange.9
सितेसाठीच रामालाही
आज बदनाम केले आहे
श्रीकृष्णाला गोपिकांनीच
आज बदनाम केले आहे
लक्ष्मीनेच तर सरस्वतीस ही
आज बदनाम केले आहे
महाभारता द्रोपदीनेच
आज बदनाम केले आहे
देवांनाही इंद्राने त्या
आज बदनाम केले आहे
कलियुगाने माणसालाच
आज बदनाम केले आहे
कवी – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com
nileshbamne10@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti