आजची युवा पिढी या जातीवादी चक्रव्युवात का अडकत चालली आहे याचे सर्वांगीण विश्लेषण होऊन त्यावर उपाय-योजना शोधण्याची जबाबदारी समाजातील जबाबदार व वैचारिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांनी घेण्याची गरज आहे.
आमचे नितीन नांदगावकर साहेब आजवर सदैव अन्यायाशी लढा देत आले आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे दिवसेंदिवस ते वाढत चालले आहे . त्यांच्यावर केलेली एक कविता----
तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ, अन्यायातला पाठीराखा,
काय म्हणावे तुला तेजा,
तुझ्यासम,-- या सम हा-!!!
जनता जनार्दन भक्त होता,
तुला पाठिंबा सकलांचा,
दोस्त तू रंजल्या-गांजल्या,
जुलमीना दाखवीत बडगा,--!!!
दिप्त प्रदीप्त होशी,
अन्याया समोर पाहुनी,
सलाम मराठी अस्मितेला,
विरोधात कार्यवाही करशी,--!!!
निर्भिड निडर धच्चोट काम, जसे उधळत यावे तूफान,
समोर कोणीही उभे न राहती
ते पुरुषार्थाचेच काम,--!!!
स्त्रीला संरक्षण तुझे,
गरीब, गरजू बनती समाधानी, दुःखितांचे अश्रू पुसत,
प्रेषित तू अंतर्यामी,--!!!
फणसांगत वाटशी तू ,
वरून किती काटेरी दिसतो, काळीज तुझे, गोड गरा, अनुभवणारा चक्रावतो,--!!!
मदतीचा हात तुझा,
चटकन पुढे येतो,
व्यथितांना देत दिलासा,
अत्याचारा नाहीसा करतो,-!!!
अगतिक हतबल ते,
तुला शोधीत येती,---
रुपात तुझ्या मग सारे,
प्रत्यक्ष भगवंत बघती,--!!!
© हिमगौरी कर्वे.
सागराला गळामिठी मारताना
नदीचा पाय क्षणभर मागे सरतो I
पर्वतशिखरापासून सुरु झालेला,
वाटेतल्या जंगलांना, खेड्यांना
वेढे घालत इथवर झालेला
प्रवास ती वळून बघते म्हणे –
नाती- गोती कसली,?
करती कशी रक्तबंबाळ,
जीव'च नाही, आत्माही,
होती सारेच घायाळ,--!!!
कुठले मित्र,कसले सखे,
कशाशी खातात मित्रत्व,
स्वार्थ भांडणे वाद ,---
एवढीच जगण्याची तत्वं,--!!!
कसली नीती कशाची मत्ता,
एक दुसऱ्याचा गिरवी कित्ता, खरेपणाची बूंजच नसता, असत्याचीच इथे सर्व सत्ता,--!!!
माझी पोळी, तुझेच तूप,
नव्हे, तुझी पोळी तुझेच तूप,
झाले माझेच ते,तू कितीही खप,
तू खोटा, बाप खोटा,जरा जप,--!!
कोणता भाऊ कोण बहीण-?
कोण भार्या,कोण विहीण,
नणंद, जावा, भावजया,
हरेक भासे विषारी नागीण,--!!!
कसले घर अन् कसले घरपण,
परस्परांवर तुटून पडती,
विसरुन आपुले पुरते बालपण,
विसरुन सगळी नाती,--!!!
आखाडाच तो घर कसले,
करुन टाकती त्याचे रणांगण,
पैसा जोडी, पैसा तोडी,
सत्तालोलूप मानव खोडी,
कामना, लालसा, ईर्ष्या
घालती माणुसकीला बेडी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
आखून देतो निसर्ग सदा, मार्ग जीवनाचे
त्या वाटेवरी चालत रहा, आवाहन त्याचे.....१
चालत राहती जे जे कुणी, त्यावरी विसंबूनी
यशस्वी होती तेच जीवनी, समाधान लाभूनी....२
कर्ता समजूनी काही काही, अहंकारी होती
सुख दु:खाच्या चक्रामध्ये, तेच सापडती....३
भटकत जाती भिन्न मार्ग, काही कळापरि
परिस्थितीचे चटके बसता, येती वाटेवरी....४
हिशोबातील तफावत ही, दु:खाचे कारण
नजीक जाता आखल्या मार्गी, सुखी होई जीवन....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
क्षणा क्षणाला घटते जीवन, जाण त्याची येईल कोठून
मोठे प्रसंग आम्ही टिपतो, तेच सारे लक्षांत ठेवतो,
जीवनाच्या पायऱ्या मोजता, मना विचारा काय राहता
ढोबळतेचा विचार होतो, सूक्ष्मपणाला विसरूनी जातो,
मृत्यू येई तो हर घडीला, जाण नसते त्याची कुणाला
गेला क्षण तो परत न येई, आयुष्य तेवढेच व्यर्थ होई,
समाधान जे मिळे तुम्हाला, देता किंमत प्रत्येक क्षणाला
घटनांची क्रिया चाले सतत, झिजवावा देह प्रभू सेवेत,
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चमचम चमकते नाणें दूरी वरुनी दिसले ।
चांदीचे समजूनी मन तयावर झेपावले ।।
निराशा आली पदरीं जाणतां तुकडा पत्र्याचा ।
खोटी चमक बाळगुनी फसविणे गुणधर्म तयाचा ।।
भास ही चेतना ती तर्क वाढीवी कसा ।
दिसून येई सदैव मनावर जो उमटे ठसा ।।
ठसे उमटती संस्कारांनीं बघतां भोवती सारे ।
मनावर बिंबून जाते आणि भासते तेच खरे ।।
दिसून येतो ऊर्जा वापर देह, बुद्धी वा मनीं ।
संस्काराचे बीज अंकुरते परिस्थिती बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
३० एप्रिल..... ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांचा जन्मदिवस ! "सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा" हे गाणं म्हणता म्हणताच ज्यांच्या संगीतात , लयीत आणि तालात आपण गुंतत जातो ते खळेकाका !
" गोरी गोरी पान" ते "लळा जिव्हाळा शब्दच खोटे", "या चिमण्यांनो परत फिरा रे" ते "ऊन असो वा असो सावली", "चुकचुकली पाल एक" ते "शुक्रतारा", "लाजून हसणे अन" ते "कळीदार कपूरी पान"
किती किती गाणी आठवावीत जी आपण आपल्या मनाच्या अत्तरकुपित साठवून ठेवली आहेत त्याचा हवा तेव्हा सुगंध घ्यायला !
"ताक धीना धीन" या मुंबई दूरदर्शन च्या मेगा फायनल च्या बक्षीस वितरण समारंभास खळे काका स्वतः उपस्थित होते साल होतं २०००. मी आणि माझ्या सहकारी सौ प्रज्ञा लेले, मुंबई मेगा फायनलचे विजेते ठरलो होतो, त्यावेळी झालेल्या खळे नामक परीस स्पर्शाची आठवण आजही मनात ताजी आहे !
खळे काकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
आज खळे काकांवर मी लिहिलेली ती कविता खास तुमच्यासाठी पुन्हा रिपोस्ट करत आहे !! जरूर प्रतिक्रिया दया !
"शुक्र तारा" जो संगीतातला
लय तालाशी खेळे
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II धृ II
सुगम भासती रचना ज्यांच्या
गाण्या परी कठीण
मुखड्या वरूनी अंतऱ्यातला
प्रवास गूढ गहन
"राजहंस" जो संगीतातला
सुरम्य ज्याचे तळे
मोहक सुंदर सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II १ II
"ऊन असो वा असो सावली"
गाणी जी रिझवीती
"सर्व सर्व विसरू दे" म्हणताना
"आनंद तरंग" उठती
"अभंगी तुक्याच्या" तल्लीन
"जे का रंजले गांजले"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II २ II
"चंद्र पुनवेचा" दिसे कुठे ती
"चंदाराणी उदास"
"निज माझ्या नंदलाला रे"
अंगाई बाळास
कुणी षोडशा हरवून पाही
"प्रतिबिंब पाण्यातले"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ३ II
इथेच "भेटे अंतर्यामीचा
कान्हो वनमाळी"
इथेच राधेसाठी सुस्वर
"बाजे रे मुरली"
"किलबिल किलबिल पक्षी बोलती"
गाणे मनातले
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ४ II
बाज्याची पेटी विकण्याची कधी
वेळ जयांवर आली
त्याच श्रीनिवासावरी पुढे श्री
सरस्वती बरसली
त्याच्या गाणे आमुची अवस्था
"अजी मी ब्रह्म पाहिले"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ५ II
"जाहल्या काही चुका अन
सूर काही राहिले"
"ओठातल्या ओठात वेडे
शब्द माझे राहिले"
"रात्री तरी गाऊ नको ग"
"गेले ते दिन गेले"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ६ II
नतमस्तक मी तुझ्या पुढे रे
असा श्रीनिवासा
तुझ्या संगीते सुगंध येई
मातीच्या वासा
तुझ्या मुळे रे मन"आकाशी
फुलती चांदण मळे"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ७ I
काव्यरचना ©✍?
प्रमोद मनोहर जोशी जळगाव 9422775554, 8830117926
कविता कॉपी राईट अंतर्गत आहे
रोज रोज तुला सकाळी पाहतो । तुला बघता क्षणी माझा दिवस मजेत जातो ।
रोज हसताना तुझ्या गालावर पडते फुलाची पाकळी । तिच तर आहे माझ्या खऱ्या प्रेमाची साखळी ।
कित्येक दिवस दिलीस मला तुझ्या नजरेची साथ । फक्त तुझ्याकडून प्रेमाचा होकार मागताना करू नकोस माझा घात।
जेव्हा तुला दिसतो,,, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर दिसतो राग । तोच तर आहे माझ्या प्रेमाचा खरा भाग....!!!!!!
कवी - सचिन जाधव
sachinrjadhav1992@gmail.com
Mob -8459493123
धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला
सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला...१
मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे,
वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे...२,
आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे
जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे...३,
खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत
बाह्य जगी शोधत असतां दुःख तुमचे हातीं लागते...४,
दुःख असे अंवती भंवती, सुख तुमच्या अंतर्यामीं
बाह्य जगातील सुख परि कधीं न येती तुमचे कामीं....५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti