लग्न म्हणजे काय असतं ?
एक चुकलेलं गणित असतं
कारण तिथे एक आणि एक तीन असतं...
लग्न म्हणजे काय असतं ?
उगाच त्याग करणं असतं
कारण त्यातून काहीतरीमिळवायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
दोन जीवांचं मिलन असतं
कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
मोक्षाकडे नेणारं दार असतं
कारण ते तोडावसंकित्येकांना वाटत असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
जगण्याला एक निमित्त असतं
कारण त्याशिवाय जिवंत राहण अवघड असतं
© कवी – निलेश बामणे
आपल्याच आत्म्याचा आहे प्रतिबिंब गणवेश आपला
नसतो झाकण्या तो आपल्या शरिराची नग्नता !! धृ !!
शिकत असता शाळेत घालायचो मी गणवेश रोजच
मिरवायचो दाखवत उडालेली शाई त्यावर !! 1 !!
कवी होताच चढला कवीचा गणवेश अंगावर
झाला मग वर्षाव फक्त कौतुकांचा माझ्यावर !! 2 !!
पुर्वी होता गणवेश माझ्याच अंगावर गरिबीचा
काढताच तो चढला माज मलाच श्रीमंतीचा !! 3 !!
वाटले चढवावेच अंगावरी गणवेश दुसर्यांचे
सावरलेच पाहता मन मग त्याखालील काटे !! 4 !!
झाकतात अंग हल्ली रोज नवनवीन गणवेश माझे
उतरविता ते दिसते मला ही नग्न शरीर माझे !! 5 !!
कवी – निलेश बामणे
92-7 तुषार हिल वेल्फेअर सो. श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
जन. अ.कु.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ) ,
मुंबई- 65.
मो. 9029338268
लाटांवर लाटा उसळत,
तयार होते भिंत,
अगणित थेंबांच्या रेषा,
अशा, कोसळती अविरत,
थ
सोनसळीप्रकाश त्यावरी त्यांच्यावरी बघा खेळतो,
जलथेंबांचे अखंड नाच,
पाहुनी तो चमचमतो,
खालवर जाऊन पाण्यात,
जादूगार तो किमयाकरे
रंग सोनेरी हिरवे निळे,
जांभळे पांढरे त्यात पसरे,
लाटांची खळबळ ऐकून,
हसे तटस्थ तो किनारा,
चलबिचल"त्यांचीपाहत राही
विस्तीर्ण दूरवर पसरलेला,-!
लाटांचे चढउतार चालू,
एक दुसरीवरी उसळे,
प्रत्येकीचे प्रताप" वेगळे,
सामर्थ्यबघता ते निराळे,
भरती ओहोटी असो वा,
रुद्रतांडव रत्नाकराचे,
लाटांवाचून अस्तित्व" नाही, किती या विशाल सागराचे,!
थेंबाथेंबांचे अस्थिरहोणे,
खालवर वरखाली पुढेमागे,
लाट होऊनी काय दर्शवे,
जगणे आपुले तसेअसावे,!
थेंबाथेंबाने जीवन चाले पुढे,
खाली-- वरती पुढेमागे,
असे असूनही परस्परांशी,
जोडायचे ना प्रेमधागे,--?
असंख्य जलबिंदू दाखवती, जीवनातील भंगुरता
चंचल स्वरूप हे यांचे ,
अन् टोकाचीअस्थिरता,--!
थेंबाना किनारा गाठणे,
कितीअप्राप्यवाटते, कधीतरी या यात्रेला,पण, मुक्तीही दैवीचअसते,--!!
हिमगौरी कर्वे
कितीक वेळा धुतला कोळसा, रंग न बदले त्याचा ।
उगाळता झिजून जाई, परि काळेपणा कायमचा ।।
भट्टीत घालून त्यास जाळता, घेई रंग लाल कसा ।
शुभ्रपणा हा दिसून येतो, राही न जेंव्हा कोळसा ।।
मलीनता ही मनामधली, खोल रूजली असे ।
विचारांतील तर्कज्ञान , शुद्धीसाठी पुरे नसे ।।
गुरू लागतो अग्नी सारखा, चित्त शुद्धी करिता ।
ज्ञानभट्टी पेटवून देई, जाळण्या अशुद्धता ।।
डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सखी मज सांग, तो राजकुमार कोण,
उंच सरळ धिप्पाड,
बघ हाती धनुष्यबाण,--!!!
सखी मज सांग,
जमला समूह आगळा,
हा त्यातला, पण वेगळा,
रूप देखणे नीलवर्णा,
आला मजसी विवाह करण्या,--!!
राजकुमार सगळे जमले, सगळ्यात उठून दिसे हा,
मज तो शांत वादळ भासे,
नुसते बघून पुरुषोत्तमा,--!!!
वाटे मज तो निर्भय निडर,
जणू शिव शंभूचा अवतार,--
उठला तो अगदी सत्वर,--
शिव धनु पेलण्या तत्पर,--!!!
बघता बघता ते उचलत,
सर्व येथले """आहा--अचंबित,
केली सर्वांची मती कुंठित,
तातही माझे किती चकित,--!!!
मोडले ते मध्ये काडकन्,
कोण हा तडफदार तरुण,--?
नायक बनला समूहातून ,
का मुनी हासतीअसे गालात,-?
मघाशी लंकेचा राजा रावण,
पडता खाली हसले खुदकन,
तुलना कर बघ दोघांत,--
सखी वर्णन करून मज सांग,--!!!
बघ तात किती आनंदित,
जनकराजे अगदी सद्गदित,
सखी धडधडते ग माझे हृदय,
सखी मज सांग,--!!!
हाच योग्य म्हणती वर,
लागणार आता स्वयंवर,
डोळ्यात मावेना त्याची मूर्त, आवडला मज माझा प्रिय,--!!!
करत पापण्यांची पीट -पीट,
उभी बघा मी कशी अवगुंठत,
अशी कशी बघ लाजत बुजत,
माझीच लागेल भाग्या दृष्ट,--!!!
सखी मज सांग,--
ते तर अयोध्येचे राघव,
बघ संयम अन मार्दव,
उचंबळत सारे तनमन,
बघती, हळूच स्मित करत,
सखे, आता काय करू सांग,--!!!
हिमगौरी कर्वे.©
का असा धांवतोस तूं ,
नशिबाच्या मागें मागें,
यत्न होता भगिरथी,
नशीब येईल संगे ।।१।।
प्रयत्न होतां जोमाने,
दिशा दिसताती तेथें,
यशाचे ध्येय सदैव,
योग्य मार्गानें मिळते ।।२।।
प्रयत्न करूनी बघा,
ईश्वर देखील मिळेल,
इच्छा शक्ती प्रभावानें,
नशीबही बदलेल ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कवितेच्या मागे धावता - धावता
मी कधी म्हातारा झालो ?
मला कळलेच नाही...
माझे तारुण्य चोरून रोज
अधिक तरुण होणारी माझी कविता
कधी म्हातारी झालीच नाही...
माझी कविता आता रोज
तरुणांना प्रेमात पडल्याशिवाय
क्षणभरही शांत बसत नाही...
तिच्या प्रेमात पडलेले
माझे म्हातारे हृदय आता
फडफडल्या शिवाय रहात नाही...
आता मला तिच्यावर कोणतीच
बंधने घालता येत नाही
आणि स्वैर सोडता येत नाही...
मी तरुणच राहायचे ठरविले
तर माझी कविता आता
तरुण राहणार नाही...
तिचे तारुण्य हेरून मी
आता तरुण झालो तरी
जगण्यात मजा उरणार नाही...
©निलेश बामणे
स्वामी निश्चलानंदांची एक कविता
(मुक्तछंदात्मक)
थोडा वाकून पहा खाली,
काय चाललंय या पृथ्वीतली,
सत्ता, लत्ता, अधिकार, पैसा, यामधून एवढा माततो का कुणी,-? जनावरे बरी म्हणायची पाळी, संकेत, भाषा, सभ्यता, निष्ठा,
कशी पाळतात ती सारी,--!!!
समूहनियम, कर्तव्येही माहित,
अधिकाराचे बडगे दाखवत नाहीत,
नुसतीच माणुसकीचा आंव आणून,----
पैसा इतका प्रिय असावा की, म्हाताऱ्या आई-बापांनी जावे वृद्धाश्रमी,
खस्ता जराही आठवत नाहीत, त्यांनी भोगलेल्या; केवळ लेकरांसाठी,--!!!
स्त्रीचे स्त्रीत्व शालीनतेत,
कुठे उडली रे लाज,--?
किती किती असभ्य बनल्या आहेत त्या, ---
आज स्वतःच्या हाताने घेतलंय करून,----
समाजातली स्त्री फक्त भोगवस्तू स्त्री शक्तीचा आदर सन्मान,ते, करतो तरी कोण,--?
वासनांनी बरबटलेले डोळे,
बाकी काय बोलतील,--?
नीती प्रीती भक्ती कशाशी खातात,--?
जन्म-मृत्यूही इतके स्वस्त इथे,जीवनच महागडं झालंय,
अशा दुनियेत जगवतोस, ही, आम्हाला दिलेली शिक्षा का मोठी,--?
-- © हिमगौरी कर्वे.
Copyright © 2025 | Marathisrushti