कुठे शोधू तुला, ध्यास लागला मनी
वाटे मजला, तू बसलास लपुनी
इंद्र धनुष्याचे रंग, आकर्षक वाटती
बघण्यात दंग, लक्ष वेधुनी घेती
ओढ्याची झुळझुळ, पडे कानावरी
ऐकून नाद मंजुळ, मना वेडे करी
फुलातील गंध, तल्लीन करी मना
होऊनी मी धुंद, विसरे सर्वाना
फळातील रस, देई मधुर स्वाद
उल्हासी मनाला, देऊनी आनंद
वाऱ्याची झुळूक, रोमांचकारी
देई देहा सुख, अल्हाद्कारी
रंग, गंध, रस, स्पर्शात, तुझ्या अस्तित्वाची जाण
तू लपलास गुणांत, तुला शोधणे कठीण
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ना कुठला dance ना कुठली party
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू संस्कृती ....
ना कुठला one piece अन two piece, ना कुठला party wear
पाडवा म्हंटल कि फक्त झब्बा-लेंगा-नववारी म्हणजेच traditional wear ...
ना कुठला DJ break ना कुठला rawadi dance ....
पाडवा म्हंटल कि ढोल - तशा - झांज - ध्वज आणि लेझीम नाच
ना कुठल hard drink ना कुठल मद्य
पाडवा म्हंटल कि फक्त फक्त आणि नैवेद्य ....
ना कुठल hotel, ना कुठला beach, ना कुठला कोपरा
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू नववर्ष शोभा यात्रा ....
ना कुठली बेशुद्धी, ना कसला hangover
पाडवा म्हंटल कि नवचैतन्याचा कहर ...
ना कुठला दिखावा, ना कुठले आकर्षण न घातक ज्ञान
पाडवा म्हणजे आमच्यासाठी आमच हक्काचा सण
ना राग - द्वेष - पश्चात्ताप, ना दगा फटका
पाडवा म्हणजे आपल पथक आणि त्यांच्यावरची निष्ठा ....
ना दुःख - संताप, ना पोकळ चर्चा
पाडवा म्हणजे जल्लोष नववर्षाचा ....
नितळ लोचनी नीरव शांत चराचर..
ब्रह्ममुहूर्ती ऐकू येते सागराची गाज..
एकांती उसळते आर्त भावनांचे गुज..
बिलगता पवन , रुणझुण ती प्रीतीची..।। १ ।।
माहोल , सारा सर्वांतरा दीपविणारा..
प्राचीवरी अलवार उमले बिंब केशरी..
प्रतिबिंब लालगे ते लाघवी मनोहर..
ऐकू येते सुरावट मंगलमयी प्रीतीची..।। २।।
महाकाय , अथांग महासागर हृदयी..
भावनांच्याच बेभान लाटा गगनभेदी..
निरवतेत , घोंगावती अंतरी गतस्मृती..
उलघाल विकल मनी निष्पाप प्रीतीची..।। ३ ।।
खुणावते जीवा ती अवीट सागरमाया..
किनारी साक्ष , रुतल्या प्रीतपाऊलांची..
भरती , ओहोटीतही , प्रतीक्षेत किनारा..
आसक्ती स्पंदना , केवळ तव प्रीतीची.।। ४ ।।
वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र.४२.
दिनांक:- १७ - ३ - २०२१.
विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री
अबला नाही तर दुर्गा असलेली स्त्री
शरीराने असली नाजूक तरी रोजची कसरत करते ती
मनाने असली हळवी तरी खंबीर असते ती
माहेर, सासर जन्मापासून सगळी नाती सांभाळत असते
स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आयुष्यभर जगत असते
स्त्री म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याची खाण असते
चार भिंतीना घरपण देऊन घराचे पावित्र्य राखत असते.
स्त्रीवर अत्याचार करणे आता थांबवा
महिला दिनाचे औचित्य वर्षभर राखा
मुलगी जन्मास आली तर तिला नाकारू नका
उलटपक्षी महिलांचे सक्षमीकरण करा
स्त्री शक्तीचे पाऊल आता पुढे पडू दे
उंच गगनभरारी तिला तिच्या अवकाशात घेऊ दे
स्त्री पुरुष संसार रथाची दोन चाके
बरोबरीने चालतील तरच आयुष्य होईल ओके
आयुष्य होईल ओके ।
- मिनल आठल्ये
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार
तू भासतोस जलदांसारखा, संजीवन बरसवणारा,
अविरत निष्काम सेवेला,
दिनरात अंगिकारणारा,
तू वाटतोस पावसासारखा,
चिंब भिजवून टाकणारा,
परिसरच काय, ओलेता,
तनमनही धुवून काढणारा,
तू असशी वाऱ्यासारखा,
करारी, स्वयंभू विचरणारा,
माहित नाही दिशा रस्ता,
सरळ जाऊन थडकणारा,
तू विस्तीर्ण समुद्रासारखा,
अथांग अपार उफाळणारा, भरती-ओहोटी ना कुणाला, किंचितही घाबरणारा,
तू झऱ्यागत नाचणारा ,
निर्मळ, अवखळ खेळणारा, सेवाव्रत निभावताना,
आनंद तुषार उडवणारा,
प्रतीत होशी नदीसारखा,
गावांनाच कुशीत घेणारा,
दूर सारत अस्वच्छता,
देखभाल शेतांची करणारा,
तू आधारच हतबलां,
धीरगंभीर खंबीर उभा,
सोडवत साऱ्या समस्या,
मदतीचा वसा जपणारा,
तू अगदी पर्वतासारखा,
अचल निश्चल राहणारा,
स्मरून नीर - क्षीर विवेका, जगण्याला तोंड देणारा,--!!!
© हिमगौरी कर्वे.
कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे
वैराण वाळवंटातील भगभगीत वारे
नात्यांचे आखीवरेखीव बंध काही
आपुलकीचा आनंद गंध नाही
हास्याच्या कृत्रिम कवायती या
अंतरीचा त्यात उन्माद नाही
भावनांना यांच्या ओल नाही
जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही
आटलेल्याच मनोनद्या साऱ्या
पात्र कुणाचेच खोल नाही
आपुलकीची ओसरतीही सर नाही
भावनांना कुणाच्याही घर नाही
अहिल्याच्या शिळांना तर आता
कुणा श्रीरामाचा कर नाही
काळजात सल कधी उठत नाही
आतड्यातही यांच्या का तुटत नाही
मनं कशी कुणात गुंततच नाही
नाती जुळलीच जर, तर कळत नाही
देणगी भेटी, दिखाव्याचा महापूर
भावनेचा ओलावा नाही ताकास तूर
कातळात उमलत नाही आज अंकुराचा अंश
सुदाम्याच्या पोह्यांचा झाला केव्हाचा निर्वंश
कोरडा मी, कोरडा तू, कोरडपाषाण सारे
विमनस्क अशा आभाळी विखुरले तारे
नाळ आमची लुप्त झाली होऊनी शततुकडे
पताका प्रगतीची मिरविती मनाचे हे नागडे
नव्या युगाचे श्रीमंत भिकारी आम्ही
भावनांचा बाजार मांडाया सज्ज होतो
रसरशीत कांतीच्या चालत्या बोलत्या
मडद्यांच्या गर्दीत सामावण्या धावतो
(आजच्या व्यवहारी (केवळ व्यावहारिक?) जगामध्ये वावरताना पुष्कळदा एक तटस्थ कोरडेपणा जाणवतो. माणसं सारी चांगलीच असतात - वाईट मुद्दामहून कुणीच वागत नाही. पण आपलं असं कुणीच वाटत नाही. अगदी नात्यातसुद्धा वैर कुणाचंच नसतं पण प्रेमही कुणी करत नाही. एक प्रकारचा भौतिक रोखठोकपणा, कोरडेपणा प्रत्येक व्यवहारातला भावनिक ओलावा-आपुलकी फार झपाट्याने शोषून घेत आहे. काळ जसजसा पुढे जात आहे तसा हा कोरडेपणा फारच प्रकर्षाने जाणवतो. कोरडेपणातच जन्म झालेल्या नवनव्या पिढींना कदाचित तो भासणारही नाही पण ज्यांनी भावनिक ओलावा अनुभवला असेल त्यांना ही रखरखीत माध्यान्हं फारच जड जात असतील.)
- यतीन सामंत
इतकं सारं विस्तीर्ण अवकाश असताना
गरीबांच्या घरीच तेवढं
छपरातून का डोकावून पाहावं
आकाशानं ?
-- श्रीकांत पेटकर
माती असशी मातीत मिळशी, हे तत्वच आहे सृजनी,---
दया करुणा उपकार करिती,---
तेच होती विलीन पांडुरंगी*--!!!!
© हिमगौरी कर्वे
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझ हे होते. या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टीतील जीवन संघर्ष या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. या चित्रपटात स्मिता पाटील (अम्माच्या भूमिकेत), नसिरुद्दीन शहा (लूका), कुलभूषण खरबंदा (अण्णा), अंजली पैंजणकर (चैन्ना) तसेच रोहिणी हट्टंगडी, रणजित चौधरी, सलिम घोष इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे अलका कुबलचीही या चित्रपटात भूमिका आहे. तेव्हा ती शाळकरी वयात होती.
वेध गुलाबी थंडीचे
पेटे शेकोटी रात्रीची
फड रंगती गप्पांचे
पार्टी असते हुर्ड्याची....१
पडे चांदणे रात्रीचे
चंद्र निरभ्र आकाशी
गुज सांगते मनीचे
सखी ही प्रियकराशी....२
उब वाढता तनाची
सय घालतो सखीसी
आस असे मिलनाची
आवतण रजईसी.......
३
निशा अंधाऱ्या रात्रीची
साथ मिळे गारव्याची
जादू रती-मदनाची
प्रित खुले युगलांची.......
४
दिस आले प्रणयाचे
रिते चषक मद्याचे
वेध गुलाबी थंडीचे
गौप्य हे आलिंगनाचे......
५
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Copyright © 2025 | Marathisrushti