ही सायंकाळ
ती खग माळ
उंच उडते
सांज सकाळ
पश्चिम वात
उधळी रात
हा सुखावतो
मनामनात
येता घरात
ही तेलवात
दिवेलागण
या देव्हाऱ्यात
दिवा लावला
तम सरला
शुभंकरोती
नाद घुमला
वृंदावनाशी
दिप लावशी
नित्य घरात
लक्ष्मी वसशी
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी
तत्वांची सगळ्या किती हेटाळणी,
कोण आणतो सांगा आचरणी, --!!!
असत्याच्या आधाराने,
हिंसक, मारक, वर्चस्वाने,
वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!
स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
सगळे स्वैराचाराचे भक्त,
माणसाचे वागणे नि:सत्व,
गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!
सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
घर , गाव शहर परिसरां,
"अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!
बोलू बघू ऐकू नका ,
असे सांगती तीन माकडे,
कोण पाळते तत्त्वांना या,
गिरवती अनिती"चेच धडे,
माणूस म्हणुनी माणसाला,
किंमत मुळी ना देती,--!!!
हिमगौरी कर्वे.
दगड़ा मातीच्या विटांनी
उभारलेल्या चार भिंतित
मनातलं घरपण सजलयं
फुलदाणीच्या फुलांफुलात.....
सुखाला शोधित शोधित
दुःखांना निवारत निवारत
जणु सप्तरंगली सावलीच
उतरलीय नभातून अंगणात....
पण मन माझं भिरभिरतय
एकटंच निरभ्र नभांगणात
उरि, प्रारब्धाला कवटाळत
गुंतलय ऋणानुबंधी पाशात....
काळ, झरझर सरतो आहे
मनामनांत, मनेही गुंतलीत
सारं काही छान होणार आहे
हा भाव जपला आहे अंतरात....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४०
१९/९/२०२२
जाणता वेदना जगातील
मम वेदनाही विरुन गेली
पाहता दुःख या जगीची
मम वेदनेलाही शरम आली ।
होतो कवटाळून मी बसलो
लहानशी वेदनाही फक्त माझी
वेदना माझ्यहून किती कठोर
जगी आहे कुणी भोगलेली ।
प्रत्येकाचे आहे दुःख वेगळे
आहे वेदनाही हर एक निराळी
पाहूनी तु सोसलेल्या वेदना
खरी वेदना मजला कळाली ।
-- सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
७ ऑगस्ट २०१८
विश्वामध्ये वावरतां भोंवती विश्व पसारा
रमतो गमतो खेळतो जीवन घालवी सारा,
संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित
प्रत्येक ती निर्माण करी आपलेच विश्व त्यांत
जीव निर्जीव विखूरल्या वस्तू अनेक
आगळ्या त्या परि ठरे एकाचीच घटक,
विश्वामध्येच विश्व असते राहून बघे विश्वांत
समरस होता त्याच विश्वाशी प्रभूमय सारे होत
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
ठरतेय भिंत साद तुझी ती जगातील या ग पीडितांची मोजकेच ते कान आहेत ऐकण्या ती ग व्यथा त्यांची कवी-निलेश बामणे
जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा ।
दोन चाकांत येईल, मोडेल त्याचा कणा ।।
जीवन मृत्यूची चाके, सतत फिरत राही ।
येई जो मध्ये त्याच्या, मागे न उरेल काही ।।
मध्यभागी राही स्थिर, आंस त्यास म्हणती ।
वरचे चाक फिरे, त्याच्या भोवती ।।
आंसाजवळील दाणा, दूर तो चाकापासूनी ।
परिणाम चाकाचा तो होईल, मग कोठूनी ।।
जन्म मृत्यूची चाके, ईश्वर हा फिरवतो ।
जवळीक त्याची मिळता, दु:खातून मुक्त होतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आपल्या घराचं स्वरूप आणि रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या निवडलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्व देखील खुलून येत असतं. सौदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही, तर अंतर्मनातही होत असतो. त्यासाठी घराची निवड करताना वरील सर्वच बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं.
एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद
चादर कायेवर लपेटून,धुक्याची,
पायवाटेची सैर करावी,
थेंब स्पर्शती पायांना अनवाणी,
जाणीवही ती सुखावह किती,--!!
निळे-गहिरे स्वैर तरंग,
हृदयाला जेव्हा छेदती,
असेच आपुले गुपित एखादे,
ते कसे उलगडती,--!
केसांच्या बटांना स्पर्शून,
झुळूक जाते एखादी,
आपल्या प्रेमाची जाणीव,
देऊन जाते ना कधी,--!!!
दूरवर उभ्या झाडांवर,
पक्षी कूजन करिती,
हृदयाला ताजेतवाने,
करुन सोडती अगदी,
शिवाय मोसम हा असा,
थंडी त्यात गुलाबी,
यात काळीज हरवून,
प्रेमपूजा करतो तसा,--!!!!
( गुलजार)
हिमगौरी कर्वे©
जगावे अगदी बिनधास्त,
निर्भय आणि निडर,
कशाला पर्वा कुणाची,
जगणे असावे कलंदर ,
असे जगावे जबरदस्त,
पत्थरांशी टक्करावे,
निधड्या छातीने अगदी,
संकटांना दूर सारावे,
मार्गी जेवढ्या अडचणी,
तेवढी घ्यावी आव्हाने ,
तू मोठा का मी म्हणत,
सरळ त्याच्याशी झुंजावे,
सामना करणे अटळ मग,
कशासाठी ते भ्यायचे,
सिंहाचे काळीज करून,
का नाही लढायाचे,---? आत्मविश्वासाने जग जिंका, भल्याभल्यांनी दाखवले, पळपुटेपणाने शेवट,
काय त्यातून मिळवणे, अडचणींच्या छातीवर,
पाय रोवून उभे रहाणे,
निराशा व्यथा सोडून,
ताठ कणा ठेवणे,--!!!
सुखे आणिक दु:खे ,
देहाच्या छाया पडछाया,
त्यांना प्रकाश देणे ,
खंबीर करून किमया,---!!!
निर्धास्त जगावे,
अचल रहावे,
स्वीकारुनी स्वाभाविक,
सदैव मार्ग क्रमावे,---!!!
-- हिमगौरी कर्वे
Copyright © 2025 | Marathisrushti