(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऋतूचे चक्र आणि मन

    कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
    हात-पाय गार, काटे अंगी येती
    नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
    वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा

    सुकूनची जाते, हिरवे रान
    शरिर राहते, घाम निथळून
    लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
    शोधण्या ढग, मन घेई धाव

    थांबवितो कामे, वादळी वारा,
    पर्जन्याचा मारा, पडताती गारा
    पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
    वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे

    आपल्या जे हातीं मन नसे त्यांत
    सुख त्यांच्यांत पाही, नसे जे हातात

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • संवाद

    कधी तरी एक शब्दतरी बोलत जावे असे वाटते

  • बदलते भाव

    कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते

    राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते....१

    देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले

    अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले....२

    देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी

    केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी...३

    जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून

    भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जन्म मानवाचा

    जीवन, जगण्यासाठी
    जीव, आतुरलेला आहे

    जन्म! हा मानवाचा
    विवेकी जगायचाआहे

    ऋतूऋतूंचे आविष्कार
    निसर्गाचे वरदान आहे

    नाती सारी ऋणानुबंधी
    भावप्रिती! साक्ष आहे

    अंतरी लळा जिव्हाळा
    प्रारब्धाचे वरदान आहे

    शिरी आभाळ नक्षत्रांचे
    मनस्वी सुखशांती आहे

    निर्मोही स्पर्श भावनांचे
    स्वर्गसुखाची नांदी आहे

    जगता जगता जगवावे
    मानवी नितीमुल्य आहे

    येताजाता रिक्त ओंजळी
    अंतिम नग्न सत्य आहे

    सदा भजावे अनामिका
    तो कृपाळू तारणार आहे

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१३६

    २१ - १० - २०२१.

  • स्थिर वा अस्थिर

    स्थिर आहे जग म्हणूनी, अस्थिर आम्ही जगू शकतो
    अस्थिर आहे जग म्हणून, स्थिर आम्ही जगू शकतो....१

    पोटासाठी वणवण फिरे, शोधीत कण कण अन्नाचे
    थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे....२

    धरणी फिरते रवि भोवतीं, ऋतूचक्र हे बदलीत जाते
    जगण्यामधला प्राण बनूनी, चैतन्य सारे फुलवून आणते....३

    पूरक बनती गुणधर्म परि, स्थिर असतो वा अस्थिर ते
    विश्वचक्र फिरवित राहणे, निसर्गाचे तत्वची असते......४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • जगणे असते होरपळ

    जगणे असते होरपळ,
    तना-मना-भावनांची,
    रोज रोज प्रत्येक पळ,
    जाणीव होई असुरक्षेची,
    षट्रिपुंचे जगात वर्चस्व,
    ते जनांवर हक्क गाजविती, माणुसकी करुणा अहिंसा,
    भावना थोर मागे पडती,
    सत्ता पैसा लालच,---
    अधिकार फक्त ठाऊक असती, कर्तव्य खाती कशाशी,
    कुंठित झालेली मती,--!!!
    असते कोणाचे कोण-?
    ना आई बापा विचारती,
    *अंधश्रद्धेखातर केवळ,
    लेकरेबाळे बळी देती*,
    सत्य सुंदर शिव,
    सगळ्यांना खुपसले पोटी, सैतानाचे नाव मानव,
    ही शोकांतिकाच मोठी,
    अशा या दुनियेत प्राण,
    देवा माझे घुसमटती,
    सुटका व्हावी आता यातून,
    कित्येक तुला असे आळवती,
    कुठे दिसेना खरे प्रेम,
    मद माया मोह असती,
    सूत्र जीवनाचे किती उथळ,
    सर्व त्याच्या आहारी जाती, जिवाची ही अशी तडफड,
    सांगा कुठे कशी लपवावी
    प्राणपक्षी उडण्या उत्सुक,
    मरणवेळही का तरसावी,--??

    हिमगौरी कर्वे. ©

  • स्मृति

    जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं
    विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।।

    बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना
    देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।।

    काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती
    परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।।

    प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी
    पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • क्षण भंगूर जीवन

    ठसका लागून प्राण जातो,
    घशांत अडकून काही तरी ।
    क्षणांत सारा खेळ आटपतो,
    धडपड केली किती जरी ।।

    हृदय जेव्हा बंद पडते,
    उसंत न मिळे एक क्षणाची ।
    केवळ तुम्हीं चालत असतां,
    यात्रा संपते जीवनाची ।।

    कांचेचे भांडे निसटता,
    तुकडे त्याचे होऊन जाती ।
    देहाचा काय भरवसा,
    जेव्हां सांपडे अपघाती ।।

    वाढ करण्या शरीराची,
    पडत असती बहूत कष्ट ।
    क्षणभंगूर देह असूनी,
    केव्हांही होऊन जाईल नष्ट ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • प्रसन्नता

    प्रांगणी येता प्रभातकिरणे
    चैतन्याच्या कळ्या उमलती.
    वेलीवरी झुळझुळता पर्णे
    प्रसन्नतेची अंतरी अनुभूती.
    मध्यान्हीला, श्रमलेलेही
    साऊली, प्राजक्ती शोधती
    कालचक्र ते फिरविणारा
    भानू येता क्षितिजावरती.
    सारे, नजारे गुलमुसलेले
    सांजेला मंदिरी दीप तेवती.
    वात्सल्याचे ते स्पर्श लाघवी
    गुरे गोधुली प्रीत उधळत येती

    रचना क्र. ६७

    ८/७/२०२३

    - वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

  • आता आस उरली नाही

    दिसे किनारा, निवता वारा
    तेवती संध्यादीप काही
    आता, आस उरली नाही ॥

    पूर्वायुष्य या पुसत्या रेषा
    नव्या धुक्यात अशा विराव्या
    ना भविष्य, नसे वर्तमान, उगा दुःख काही
    आता आस उरली नाही ॥ १ ॥

    न जगताच जे जगले
    जीवन, त्यातच मन उबले
    थरथर मनीची शरीरी उतरुन राही
    आता आस उरली नाही ॥ ३ ॥

    भयाणतेच्या सीमेवरी
    वास्तवता वास्तव्य करी
    जीवन झाले चोथा, रस उरला नाही
    आता आस उरली नाही.

    -- यतीन सामंत