(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • वस्तूतील आनंद

    आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे

    सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे....१,

    प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने

    बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२,

    तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला

    दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३,

    जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत

    वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • एक आरजू- प्रभुकी खोज

    मनमे एक आरजू थी के प्रभु मिल जायेगा
    दिलकी धडकन कहती के उसे अपनेमेंही पायेगा

    आंख सबतरफ ढूंडती है हर एक कण में
    फिरभी दृष्टी असमर्थ हैं उसे पहचाननेमें

    ध्वनी की लहरे हर तरफ गुंज उठती
    कानोंके सहारे आवाज उसकी ना सुनी जाती

    महक उठती हवा खुशबूदार गंधोंसे
    पहचाने उसे कहां बगीचेके फूलोंसे

    बीती कितनी जींदगीयां उसकी खोज करनेमें
    कमजोर पडती है इंद्रिया उसे जान जानेमें

    आ तू इन्सानका रुप लेकर के तुझको मै देख पाऊं
    या मुझको दिव्य शक्ति देकर के तुझमें मैं समा जाऊं

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • क्षण मुक्तीचा

    तपसाधना करूनी मिळवी, सत्वगुणाची शक्ती अंगी ।

    त्याच शक्तीच्या जोरावरती, स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।।

    शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा, सारे सुख आणि भोग भोंवतीं ।

    परिणामी तो फेकला जाऊनी, पुनरपी येई याच भूवरती ।।

    एक दया दाखवी ईश्वर, वातावरणी देऊनी संधी ।

    जन्म मिळे ते त्याच ठिकाणी, कमविले पुण्य ज्याने आधी ।।

    चक्र खेळ हा चाले सदैव, स्वर्ग मृत्यू या लोकी त्याचा ।

    अंतिम ध्येय तेच ठरते, मिळविणे क्षण तो मुक्तीचा ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • आत्मानंद

    जगुनीया झाले सारे काही
    आता मागणे काहीच नाही...

    कसले सुख, कसले दुःख
    संवेदना काहीच उरली नाही...

    प्रारब्ध संचिती जन्म लाभला
    भोगायचे काही राहिले नाही...

    उरलेले क्षण आनंदात जगावे
    आता कुणाला दुःखवू नाही...

    लौकिक , भौतिक नश्वर सारे
    सोबत कधीच काही येत नाही...

    आत्मानंद ! केवळ मन:शांती
    याविण दूजे सुंदर सत्य नाही...

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २३४

    १४/९/२०२२

  • समर्थ – स्वामी राज माऊली-

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

  • स्वच्छंद पक्षी

    कोण दिसे हा पाण्यामध्ये,
    असावा माझाच भाईबंद,
    चोच बांकदार, रूप देखणे,
    मनाने दिसतोय स्वच्छंद,
    गुबगुबीत पांढरी पाठ,
    कोरीव वर काळ्या रेघा,
    नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका ,
    सुळकन जो वर येईल,
    मटकावेन आधी त्याला,--!!!
    कळणारही नाही याला,
    कधी गिळले मी माशाला,-?
    डोळे तीक्ष्णमाझे,
    नजरही अगदी करडी,
    पाण्यातील या पक्ष्याची,
    मात्र भासे मज बेगडी,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • येता तुझ्या चरणांशी

    येता तुझ्या चरणांशी,
    पंढरीनाथा,वेगळी प्रचिती,
    लौकिकाचे काटे बोचती,
    पण अद्वैताचीच अनुभूती,--!!!

    अलौकिकाचे आम्ही प्रवासी,
    स्वर्ग आमुचा पंढरी,
    जन्मोजन्मी आंस तुझी,
    अनंतकाळाचे रे वारकरी,--!!!

    हिमगौरी कर्वे. ©

  • किती पाहुणे उडून येती

    किती पाहुणे उडून येती,
    या देशातून त्या देशात,
    स्थलांतर त्यांचे असे पाहुनी,
    चकित होतो आपण मनात,--!!

    हजारोंची संख्या त्यांची,
    एकरंगी नि एकढंगी,
    सारखेच सगळे दिसती,
    सारख्याच त्यांच्या ढबी,--!!!

    आभाळातून उडताना,
    बहुतेकांना ना थकवा,
    हे पाहुणे असती वेगळे,--
    वेळेवरती-- आपुल्या गावा,--!!!

    आगळेपण त्यांचे उठून दिसे,--!!!
    किती पिढ्या गेल्या तरी,
    हजारो वर्षे येती ते,
    दरवर्षी परिपाठ असे,--
    मार्ग त्यांना कसे सापडती,
    कोण दिशादर्शक म्हणे,? --!!!

    कोण त्यांना घड्याळ दाखवी,
    नि कोण त्यांचे मार्गदर्शक,
    ऋतू त्यांना कसे समजती,
    कसे ठेवती दिवसांचा हिशोब,--?

    सामान कुठले ना बरोबर,
    ना कुठले साहित्य सवे, आत्मविश्वास केवळ घेऊन ,
    प्रवास आपुला करती बरवे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • मोक्ष अंतीम फळ

    मागील कर्म पुढे चालूनी,

    कर्माची होई शृखंला,

    फळ मिळते कर्मावरूनी,

    मदत होई मुक्तीला ।।१।।

    चांगले कार्य करीतेवेळी,

    मृत्यू येता अवचित,

    पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां,

    खेचतो त्याच कार्यात ।।२।।

    अपूरे झाले असतां कार्य,

    ज्ञानेश्वराच्या हातून,

    पुनरपि येऊनी पूर्ण केले,

    आठरा वर्षे जगून ।।३।।

    ध्रुव जगला पांच वर्षे,

    अढळ पद मिळवी,

    कित्येक जन्मीचे तपोबल,

    पांच वर्षांत पूर्ण होई ।।४।।

    कर्म मुक्तता मिळे आत्म्याला,

    जन्म-मृत्यू पासूनी,

    ‘कर्म’ फळानेच जे साधते,

    ‘मोक्ष’ म्हणती कुणी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • श्रद्धांजलि

    सुळीं दिले येशूला वेडेपणाच्या भरांत
    खिळे ठोकले अंगाला रागाच्या ओघांत ।।१।।

    समर्पण केले देहाचे परि न सोडी ध्येय
    बलिदानाच्या मार्गाचे हेच महत्व होय ।।२।।

    सुळावरी तो जातांना वदला आकाशी बघूनी
    क्षमा कर प्रभू त्यांना ते आहेत अज्ञानी ।।३।।

    कळले नाहीं ज्ञान अज्ञान सागरांत
    जाणले तत्वज्ञान उशीर केला त्यांत ।।४।।

    उपयोग नाही आतां वेळ गेली निघूनी
    जाण मनां येता पक्षी गेला उडूनी ।।५।।

    हरकत नाहीं कांहीं उशीर झाला तरी
    तत्वामध्ये रस घेई हीच श्रद्धांजली खरी ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com