ज्यांच्या वाटेला अनेक चेहरे येतात,
त्यांना एका चेहऱ्याची ओढ नसते,
सहज मिळणाऱ्या सहवासामध्ये,
मनापासून जपणाऱ्यांची आठवण नसते.
ज्यांनी प्रत्येक दुःखात हात दिला,
त्यांच्याकडेच दुर्लक्ष होत जाते,
कारण पर्यायांच्या चमकत्या दुनियेत,
निस्वार्थ प्रेम हरवत जाते.
पण काळ सगळ्यांना शिकवतो,
गर्दी कायमची सोबत नसते,
लोक बदलतात, वाटा वळतात,
आणि माणसंही दूर निघून जातात.
मग उरतात काही आठवणी,
काही शब्द, काही हळवे क्षण,
आणि शोध सुरू होतो त्यांचा,
जे होते मनापासून आपले.
नाती ही पर्यायांनी नव्हे,
तर विश्वासाने जपायची असतात,
कारण जीव लावणारी माणसं
नशिबानेच भेटत असतात.
पर्यायांची गर्दी उद्या ओसरून जाईल,
वैभवाचाही रंग फिका पडेल,
पण प्रेमाने धरलेला एक हात,
शेवटपर्यंत साथ देत राहील.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 3, 2026
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.
मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.
बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.
त्यांना कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .
तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.
तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..
तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..
तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.
त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”
त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.
एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल
तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”
तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.
आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..
आजच्या जागतिक कुटुंब दिवसाला सुंदर सलामी
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
November 8, 2016
`आम्ही साहित्यक फेसबुक ग्रुप'चे लेखक श्री रघू देशपांडे, नांदेड, यांची ही रचना
January 4, 2021
ज्याचे चिंतन आम्ही करतो
तोच 'शिव' चिंतन करतो
स्वानुभवे चिंतन करुनी
चिंतनशक्ति दाखवितो
जीवनाचे सारे सार्थक
लपले असते चिंतनात
चिंतन करुनी ईश्वराचे
त्यांच्यात एकरुप होण्यात
सारे ब्रह्मांड तोच असूनी
अंश रुपाने आम्ही असतो
जेव्हां विसरे बाह्य जगाला
तेव्हांच तयांत सामावतो
चिंतन असे निश्चीत मार्ग
प्रभूजवळ तो जाण्याचा
लय लागूनी ध्यान लागतां
ईश्वरमय होण्याचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००५०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
September 10, 2013
नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।
कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।
जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।
परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।
होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
January 7, 2020
ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या, स्वप्न मजला भावते
कल्पनेचे राज्य जरी असे, आनंददायी वाटते....II धृ II
तव प्रतिमा ही मनी बसवली, आठवण सदैव येवू लागली
जागेपणी जे मिळे न मजला, स्वप्नी मी सारे तेच अनुभवते.......१
स्वप्न मजला भावते,
पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे
हवे हवेसे मनी ठरवी ते, केवळ स्वप्नची मिळवूनी देते....२
स्वप्न मजला भावते,
कल्पना भाव तरंगे उठूनी, रात्री गेल्या कित्येक रंगूनी
क्षणीक असूनी भ्रामक जरी, स्वप्न दिलासी देवून जाते....३
स्वप्न मजला भावते,
विश्वपसारा मायेचा हा, जीवन गुंता दिसतो पहा
किरण आशेचे त्यात चमकूनी, स्वप्न हे वरदान ठरते....४
स्वप्न मजला भावते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 7, 2019
प्रभू दयेची बरसात,
चालू असते सतत,
ज्ञानाची गंगोत्री वाहते,
पिणाऱ्यालाच मिळते ।।१।।
प्रत्येक क्षण दयेचा,
टिपणारा ठरे नशीबाचा,
जलात राहूनी कोरडे,
म्हणावे त्यास काय वेडे ।।२।।
फळे पडतां रोज पाही,
त्याची कुणा उमज न येई,
परि न्यूटन एक निघाला,
बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।३।।
चहा किटलीचे झाकण हाले,
स्टिफनसनने इंजीन शोधले,
जीवनातील साधे प्रसंग,
शास्त्रज्ञांची बनले अंग ।।४।।
प्रभू असतो सतत तयार,
ठरवा दया कशी घेणार,
प्रयत्न होता अंतःकरणी,
यश लाभेल घ्यावे समजोनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 23, 2016
ओंजळभर मोती,
आई तुझ्यासाठी,
कष्टलीस ग बाई,
सारखी संसारासाठी,--!!!
ओंजळभर सोनचाफा,
आई तुझ्यासाठी,
पोळल्या जिवाला गारवा,
मिळेल तुझ्यापाशी,--!!!
ओंजळभर मोगरा,
आई तुझ्यासाठी,
सौंदर्यातील सुगंधाने,
आत्मिक दुवा साधण्यासाठी,-!!
ओंजळभर चंदन,
आई तुझ्यासाठी,
उगाळून झिजलीस,
आमुच्या भल्यासाठी,--!!!
ओंजळभर मरवा,
आई तुझ्यासाठी,
सारखी फुलत राहशी,
तूच आमुच्यासाठी,--!!!
ओंजळभर अश्रू,
आई तुझ्यासाठी,
किती झालीस रिक्ती,
देणीघेणीअजून चालती,--!!!
हिमगौरी कर्वे.©
February 12, 2019
November 13, 2021
समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे.
February 12, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti