(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • आठव स्मृतींचे

    कधीतरी बोलना तूं एकदा
    गुज तुझ्या अव्यक्त अंतरीचे
    आता सरला हा जन्म सारा
    गहिवरले हे हुंदके भावनांचे
    गोठले स्नेहार्द भाव अंतरात
    भिजले चिंब पदर पापण्यांचे
    सांग! मनास कसे समजवावे
    दारुण दग्धदुःख या जीवनाचे
    हरविले सारे व्याकुळला जीव
    तरीही लोचनी आठव स्मृतींचे
    रचना क्र. १३४
    / ४ / १० / २०२३
    -वि.ग.सातपुते.(भावकवी )
    9766544908
  • काळाची चाहूल

    जो जो येईल पाया खालती,
    तुडविला जातो त्याचक्षणी
    कुणी मरावे अथवा जगावे,
    सारे प्रभूवर अवलंबूनी....१,

    भक्ष्य शोधण्या किटक चाले,
    तसाच फिरतो प्राणी देखील
    जगण्यासाठी फिरत असता,
    मृत्यूची येते त्याला चाहूल...२,

    चालत असतो काळ सदैव,
    दाही दिशांनी घिरट्या घालीत
    झडप घाली अचानक तो,
    जो जो येई त्याच्या टापूत...३,

    जरी दिसे मारक कुणीतरी,
    करवूनी घेतो काळच सारे
    विश्वाचा खेळ खेळविण्या,
    जन्म-मृत्यूचे चक्र फिरे....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • चहा

    लवंग, आले दालचिनीचा
    सुगंध सारा भरून घ्यावा
    डोळे मिटूनि निवांत रेलून
    घोट चहाचा हळूच घ्यावा

    वेळ असो दुपार तीनाची
    की पहाटेचा असो गारवा
    चहास का लागे निमित्त कोणते?
    कधीही द्यावा कधीही घ्यावा

    चाहते असे चहाचे मिळता
    योग दुर्मिळ जुळून यावा
    स्थळकाळाचे बंधन सोडून
    मस्त गप्पांचा फड रंगावा

    मात्र एकट्या सांजवेळी
    घोट चहाचा हळूच घ्यावा
    पापणीतल्या सुखस्वप्नांना
    आठवणींचा गहिवर यावा...

    ---आनंद

  • जीवन आनंद

    ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
    उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।

    संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
    समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।

    खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
    बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।

    विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
    यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।

    संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
    प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।

    वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
    आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।

    एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
    शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।

    हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
    गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।

    ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
    संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।

    मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
    कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।

    आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
    देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।

    हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
    ‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।

    --डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मातृभू तुझ्या करता

    मातृभू तुझ्या करता,
    सर्वस्वाचे देतो दान,
    रक्षणासाठी केवळ तुझ्या,
    सज्ज माझे पंचप्राण,---!!!

    कितीतरी बघ आजवर,
    झाले तुझसाठी अर्पित,
    बिमोड करून शत्रूचा,
    निनाद तुझा गर्जत,---!!!

    भारत माते तुझी माती,
    आम्हा प्रिय प्राणाहून,---
    "पाईक" आहोत तुझे आम्ही,
    त्रिवार वंदन तुजसी करुन---!!!

    वाचवू आम्ही तुला,
    करुन जिवाची कुरवंडी,
    तीच खरी तुझी सेवा,
    बांधल्या आम्ही खुणगाठी,---!!!

    हिम्मत जर कोणी,
    करेल माईचा लाल,
    वचने तुला आमुची,
    दाखवू त्याला माती,---!!!

    ध्येय श्रेयस प्रेयस सगळे,
    कडेकोट तुझीच निगराणी
    निर्भय निडर निर्धास्त असावे,
    हीच तुला एक विनवणी,---!!!

    किती आले किती गेले,
    तुझा घास बळकावण्यां,
    परास्त होऊन परत फिरले,
    मायदेशी तोंड लपवण्या,---!!

    आपली धर्मसंस्कृती कधीही,
    आम्ही सोडली नाही,
    तुझेच संस्कार मनी,
    काढावा किंतु सर्वांनी,---!!!

    चांगल्याची चांगले आम्ही,
    वाईटांशी बनू कर्दनकाळ,
    जगानेही ध्यानी ठेवावे,
    देशसेवक इथले हर बाळ,--!!!

    माता वाट्याला कुणाच्या,
    कधीच गेली नाही,
    जो येईल तिच्या मार्गी,
    त्याची कधीच खैर नाही,---!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • भटक्या कुत्र्यांना आवर घालायाला नको का ?

    दोन एकदिवसापूर्वी मुंब्र्यात एक लहान मुलगा शाळेत जात असताना सात – आठ भटक्याकुत्र्यांनी त्याचे लचके तोडून जखमी केले. त्या जखमी मुलाला जवळ पास १५० टाके पडले.जर लोकांनी योग्य वेळी मदत केली नसती तर कदाचित त्या मुलाला आपले प्राणही गमवावेलागले असते.

  • नातं कसं असावं?

    नातं कसं असावं? नातं डब्यासारखं असावं..
    उघडल्यावर रुचकर, खमंग आठवणी देणारं आणि त्यांना जपूनही ठेवणारं..
    तर कधी नाविन्याला जन्माला घालणारं..

    नातं कसं नसावं..? तुझ नि माझं सारखचं रे, असं न म्हणणारं
    वा माझं सगळ्यांवर सारखाचं प्रेम आहे हे हि न सांगणारं..

    नातं कसं असावं? नातं डब्यासारखंचं असावं..
    ज्याची झाकणं ज्याची त्यालाचं बसतील असं..

    - शिल्पा परांडेकर

  • कांचनकिरणे

    मौन पांघरुनी चोरपाऊली
    यामिनी, चांणदे पेरीत येते
    नि:शब्दी, अव्यक्त भावनां
    अलवार मिठीत घट्ट मिटते

    दाटता काळोख नभांगणी
    घरट्यातुनी विसावतो जीव
    प्रतिक्षा! मौनात प्रभातीची
    चाहूल, सोनपाऊली सजते

    प्रसन्न! उषा किरण कांचनी
    जगण्यासाठी देते आत्मबल
    तेजाची ही कोवळी किमया
    चैतन्याला, उधळीत उजळते

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ५३.

    १९ - २ - २०२२.

  • निसर्ग व्याप्ती

    उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला

    गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला

    उंचाऊनी बघे मानव, अथांग जगताला

    विज्ञानाच्या जोरावरती, अंतराळात गेला

    युगा युगाचा चंद्रमा, केला अंकित त्याने

    त्याच्या देही ठेवी पाऊल, मोठ्या अभिमानाने

    अगणित दिसती गृहगोल, त्याचा दृष्टीला

    सीमा न उरली आता मग, चौकस बुद्धीला

    चकित होतो प्रथम दर्शनी, विज्ञाना बघता

    दिसून येती अनेक गुढे, एक एक उकलता

    किती घेशी झेप मानवा, उंच उंच गगनी

    वाढत जातील क्षितिजे, तितक्याच पटींनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • संन्यस्त अश्वत्थ बनते

    आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे,
    खालून मुळ्यांची पेरणी,
    झाडाझुडपांचा पायाच असे,
    वाढावे असेच उदंड,
    खालून वरवर जावे,
    कितीही वर गेलो तरी,
    पायाला न कधी विसरावे,
    गगन विस्तीर्ण भोवती,
    बुंध्यातून वाढीस लागावे,
    फांद्या पाने ,फुले यांनी,
    खोडास सतत बिलगावे,
    झाड लेकुरवाळे असते,
    तरी किती निस्संग,---!!!
    एक निळाई त्याच्या डोळी,
    दुसरा न कुठला रंग ,--!!!
    *हिरवे असून, आसमानी जाई,
    अवती भोवती किती लेकरे,
    सोडून सगळ्या ऐहिक गोष्टी, मोक्षाचा फक्त माग काढे*,--!!!
    फांद्या, पाने, फुले सारे,
    शिकती सारे झाडाकडुनी, दुसऱ्याला देऊन टाकणे,
    स्वार्थ कधी नसतोच मनी,--!!!
    म्हणूनच का एवढे जाते,
    उंचावरती पसरत ते ,------?
    कुठून आणे तटस्थ वृत्ती,
    संन्यस्त अश्वत्थ बनते,--?

    © हिमगौरी कर्वे.