(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • कोण ती स्फूर्ती देवता ?

    मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे ।

    कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती ।।

    अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो ।

    शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी ।।

    सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी ।

    असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती ।।

    तळमळ आता एक लागली, जाणून घ्यावी शक्ती आगळी ।

    अर्पीन माझे प्राण त्याला, स्फूर्ती देवता जो मज झाला ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • आई मला लहान व्हायचंय..

    पुन्हा लहान होण्यासाठी एका मुलाने आपल्या आईला घातलेली साद.... मोहन कळमकर यांची ही कविता...

    my poem copy

  • गरज

    शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे.
    संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
    कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत
    परतून येणे हे खूप गरजेचे आहे.

  • तुझी आठवण जागी : ( स्मृतिकाव्य )

    तूं गेलिस, मी उरलो मागे सखा तुझा अनुरागी
    जोवर मी, तोंवर राहीलच तुझी आठवण जागी ।।

    रात्र पसरतां, भवतालीं निद्रिस्त सर्व दुनिया
    मीच फक्त असतो जागा अन् तुझी आठवण जागी ।।

    चुकुनी आली झोप कधी मज, तरि मी निजूं कसा ?
    ठेवायची असे दिनरातीं तुझी आठवण जागी।।

    भाग्य झोपलें माझें, कायमचीच झोपलिस तूं
    मी कायम झोपेतों, कायम तुझी आठवण जागी ।।

    आज असे मी, परंतु सखये, उद्या नसेन इथें
    चिंता ही, नंतर राहिल कां तुझी आठवण जागी ?

    - - -
    ११.०८.२०१६
    (दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत)

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • पाप वा पुण्य काय ?

    काय पुण्य ते काय पाप ते,

    मनाचा खेळ हा

    ज्यास तुम्ही पापी समजता,

    कसा तो तरूनी गेला....१,

    कित्येक जणाचे बळी घेवूनी,

    वाल्या ठरला होता पापी

    मनास वाटत होते आमच्या,

    उद्धरून न जाई कदापी....२,

    मूल्यमापन कृतीचे तुमच्या,

    जेव्हा दुसरा करतो,

    सभोवतालच्या परिस्थितीशी,

    तुलना त्याची तो करतो .....३

    तेच असते पाप वा पुण्य,

    आमच्या अंत:करणा वाटे

    आतील आवाज सत्यचा,

    तोच तुमच्या मनास पटे....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • हृदय अर्पिले तुला

    हृदय अर्पिले तुला,गजानना वाट दाखव मला,
    *वेदना यातनांचा,
    उठतो कल्लोळ,
    शरीर आणि आत्मा,
    नच कुठे मेळ*,
    काया वाचा मने,
    स्मरते रे तुला,
    गजानना वाट दाखव मला,--!||१||

    विघ्नहर्ता असशी तू ,
    जागृत किती देवता,
    हाक तुज मारता,
    मदतीस धावतोस भक्ता, हृदयापासून करत अर्चना,
    विनविते मी तुला,
    गजानना वाट दाखव मला,--!||२||

    रक्तवर्णी त्या सर्व पुष्पी,
    अर्पिते मी तुझ्या चरणी,
    दुर्वांकुररुपी मनोकामना,
    साऱ्या समर्पित तुला,
    गजानना वाट दाखव मला,--!||३||

    निबिड या संसारण्यी,
    आले भटकत, भटकत, ---
    घायाळ मी जखमी,---
    मनपाखरू भिरभिर करत,
    आले दारी कृपा मागत,
    तूच आता माय बाप मला,--!
    गजानना वाट दाखव मला,--||४||

    © हिमगौरी कर्वे

  • निसर्ग सुख!

    आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे
    रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?

    निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं
    निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं

    केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य
    आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य

    मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें
    निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • बाळाची निद्रा

    चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले
    काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे

    कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी
    मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी

    घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी
    कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी

    नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें
    परि शांत न बसलीस तूं तर, जागेल बाळ तान्हें

    चिंव चिंव करणे गीत आहे कां ? अंगाई तुमची
    गावूनी आपल्या पिल्ला करीतां रमवी मने त्यांची

    असे असेल तर चालू ठेव तूं चिंव चिंव ते गाणें
    शाहणा माझा बाळ तो ठावे त्याला सोसणे

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गर्भगिरीतील नाथपंथ

    2-front-300नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.

    हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्‍या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ कि. मी. च्या डोंगरपट्ट्यास गर्भगिरी किंवा गर्भाद्रि असे म्हणतात. नवनाथ भक्तिसार या लोकप्रिय पोथीतील २३ व्या अध्यायात नवनाथांच्या गर्भगिरीतील वास्तव्याचे व कार्याचे वर्णन आहे. आदिनाथ शिवाचे वृध्देश्र्वर हे प्राचीन क्षेत्र तसेच मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ व गहिनीनाथ या प्रमुख नाथसिध्दांच्या संजीवन समाध्या यासह अनेक नाथकालीन स्मृतीस्थळांनी हा परिसर गजबजलेला आहे. तीन तालुक्यांच्या भूभागावर इतक्या दाटीने वसलेली नवनाथांची स्थाने भारतात अन्यत्र कोठे अभावानेच असतील.

    गर्भगिरीतील नाथपंथ
    लेखक
    : टी. एन. परदेशी
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : २५०/- रुपये
    पाने : २०८

  • येशील तू कधीतरी रे

    येशील तू कधीतरी रे
    वाट तुझी ओढ लागता
    नकळत मोहरले मी रे
    गुंतून हळवे क्षण लाजता
    स्पर्श तुझा मज हलकेच होता
    अंगावर रोमांच अलगद उमटता,
    तुझ्या मिठीची आस व्यक्त अशी
    व्याकुळ मी भाव मग्न होते एकांता
    का भूल तुझी पडली मज रे
    मलाही न उमगले कातर वेळा,
    सोडव मोह पाश माझे हे सारे
    डोळ्यांत पाणी अलगद उरले आता
    घेतलेस भाव मिठीत तू मजला
    ते बहरणे निःशब्द सलते आता,
    अस्वस्थ मी अशी अव्यक्त मनी
    न कळणार तुला माझी ही व्यथा
    घे अलवार घट्ट मिठीत मज
    वाट त्या क्षणाची पाहते आता,
    गोड ती जाणीव मोहक मधुर
    तुला न आस ती कोरडा तू असा
    न भेटणार कधी तू असा
    परी आठवणीत मी हुरहूरते,
    तुझ्या स्पर्शात व्याकुळ मोहिनी
    मोहात पुरती मग फसत जाते
    ये असा तू सोडून तमा सारी
    मी ही वाट वळणाची सोडून येते,
    भेट एकदा तू अवचित असा रे
    व्याकुळ मन तुझ्या मिठीत बद्ध होते
    न पेलवतो मनास आताशा
    शांत समंजस भाव तो सारा,
    तुझ्या ओढीत कासावीस जीव
    तप्त मन अव्यक्त भाव कोमेजला
    न कळणार तुला बोचरी सल माझी
    न कळणार दग्ध ही अवस्था,
    न कळणार शांततेमागील तगमग ही
    न कळणार मी तुला कधीही केव्हा
    येशील का रे तू अलवार असा
    जीव तुझ्या ओढीत बावरला,
    न तुला ओढ माझी भाव मी तो जाणला
    अश्रूंचा पूर डोळ्यांत आल्हाद साचला
    न भेटशील तू कधी मज रे
    तोड तू अलवार मज आता,
    समजून घे तू भाव माझे सारे
    समजून घे माझ्या मन व्यथा
    किती कितीक आर्त तुझ्यात होऊ
    न कळणार तुला नाजूक मन कथा,
    का मोहरल्या मनात माझ्या तुझ्या
    मिठीतल्या अबोल स्पर्श भावना
    घेता मिठीत अलगद तू मज
    अश्रूंचा बांध फुटेल मग तेव्हा,
    न येणार तू कधीच रे माहीत मज आता
    वाट पाहून तुझी चंद्रही माझ्यासवे झाकोळला
    -- स्वाती ठोंबरे.