
‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
आपली पिल्ले परदेशी शिकायला जातात, अन तिथेच स्थाईक होतात, त्यावर एक सुंदर रचना -
(भाग - 1)
अरे राजा ये ना
नको ग आई
नोकरी मला लागू दे
डॅालर जरा कमवू दे
कर्ज माझे फिटू दे
मग मी येईन
अरे राजा ये ना
नको ग आई
गर्दी किती तिथे
राहू मी कुठे?
घर मला घेऊ दे
मग मी येईन
अरे राजा ये ना
नको ग आई
रस्ते तिथे छोटे
त्यात खड्डे मोठे मोठे
शिस्त नाही कुठे
हॅार्नच्या आवाजाने कानच फाटे
नाही गुणांची कदर
नाही बुध्दीचाआदर
भ्रष्टाचाराचा कहर
कसा जमायचा वावर ?
स्वच्छतेचा अभाव
सत्ता संपत्तीचा प्रभाव
आरक्षणाचा दबाव
कसा लागेल माझा निभाव?
तुला सांगतो एक खरे
वाटते इथेच आता बरे
आई बाबा तुम्हीच
इथे येता का सारे?
आई तू ये ना
नको रे राजा
आई तू ये ना
नको रे राजा
तू म्हणतोस ते खरे
इथे नाही आता बरे
पण कारण याला
आम्हीच तर सारे
कुणी राहिले गप्प
आळी मिळी चुप्प
देश सोडून कुणी
निघून गेले हुप्प
नाही पुढाऱ्यांना टोकले
ना भ्रष्टाचाराला रोकले
ना न्यायासाठी झटले
नाही एकतेला जपले
नाही शिस्तीचे पालन
ना संस्कृतीचे जतन
नाही निसर्गाचे संवर्धन
शिक्षणाचे निमूट, पाहिले पतन.
ना सत्याचा आग्रह
ना कर्तव्याचा निग्रह
ना मूल्यांचा संग्रह
केला धर्माचा दुराग्रह
आता मात्र वाटते
सुधारायचे हे चित्र
देशाला बदलायचे
येऊन साऱ्यांनी एकत्र
मिळून आम्ही सारे
आणू बदलाचे वारे.
मग तरी तुम्ही सारे
परतून याल का रे?
(भाग - 2)
आई मी येऊ का?
का रे राजा?
डॉलरचा रेट कमी झाला
जा आपल्या घरी ट्रम्प म्हणाला
राजा इथली धूळ सोसेल का ?
इथली बेशिस्त पचेल का?
आम्हाला हिणवण्यात
दिवस जातोय तुझा
परत साऱ्यांना
आपलं म्हणशील का?
आई इथे आता
नाही कुणी कुणाचे
सगळंच वातावरण
झालंय खूपच संशयाचे
माहीत नाही माझी
नोकरी कधी जाईल
भीती आता वाटते
धोब्याचा कुत्रा होईल
एखादी छान नोकरी
तिथे मिळेल ना गं मला
इथल्यासारखं नाही मिळालं
तरी चालेल आता मला
ये बाळा ये
तुला सामावून नक्की घेणार
परका झाला होतास
पोरका नाही करणार।
जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
मग्न राही सतत आपल्याच कामीं
अन्नासाठी तूं फिरे दाही दिशानी १
जमवितेस कणकण एकत्र करुनी
दूर द्दष्टीचा स्वभाव दिला तुज कुणी २
सुंदर तुझी वास्तूकला वारुळ केले छान
सहस्त्रांच्या संखे राहतेस आनंदानं ३
कष्ट करण्याचा गुण दाखवी साऱ्याना
कष्टाला पर्याय नसे ह्या जीवना ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली //धृ//
हिरवी साडी अंगावरी खडी रंगीत किनारी
ठिपके चमकती पांढरे त्या साडीवरती पसरे
आकर्षक साडी नेसली //१//
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली
शरीर तुझे बांकदार रुप तुझे मनोहर
चपळाईने तूं वाढते दूर जाण्या झेपावते
वाकड्या चालीत शोभली //२//
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली
मिष्किलपणें तूं हासते विनम्रतेने वाकून जाते
पसरवूनी तुझा सुगंध करी सर्वाना तूं धुंद
राणी ठरतेस बागेमधली //३//
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली
बघूनी नभीचे तारे भेटण्या तुझे मन हावरे
परि खंत वाटे तुजला आधार हवा चढण्याला
नको उंचावू इच्छा आपुली //४//
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तहान लागली होती भारी पण पाणी होतं विषारी,
प्यावे तरी मरणार, नाही प्यावं तरी मरणारचं
-गिरीश.
तू
जीवनाच्या प्रवासात तासन – तास उभ राहून
एखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ……
अग्ग बाई!!
सास्सु बाई
सदा त्यांना
अस्से घाई
ओsss!अरेच्चा!
पहा पहा
आधुनिक
पोषाख हा
अय्यो गडे!
इश्श गडे!
माझ्झी सासू
पहा गडे!
त्यांना तुम्ही
हसू नका
नाव मुळी
ठेवू नका
अय्यो रामा!
म्हणू नका
अभ्यासू त्या
ज्ञान ऐका
ज्ञानपिठ
पुरस्कार
त्यांना मिळे
मान थोर
छंद त्यांचा
ओssss!बघा ना
पुस्तकांचा
हा खजिना
नम्र अति
त्या आहेत
हो!मी सुन
भाग्यवंत
(कल्पनेत कल्पिलेल्या सास्सूबाई)
-- सौ. माणिक शुरजोशी
खरं तर प्रत्येकाच एक
विशिष्ठ अस्तित्व असतं
आत्मसन्मान जपताना
जीवनच पणाला लागतं
जगतानाही खरं तर
कुणीच कुणाचच नसतं
सारी नाती व्यवहारिक
हे सर्वत्र जाणवतं असतं
सोबती सुखाचे असतात
दुःखात तसं कुणी नसतं
प्रत्येकाचे संचित वेगळे
प्रारब्ध भोगायच असतं
मन संवेदना सारख्याच
सारं काही सोसणं असतं
काही किती जरी लपवलं
सत्य ! समोर येतच असतं
********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २९८
१९/११/२०२२
बागेतील फुलपाखरा, काय शोधशी फुलाफुलात,
जसा रमे जीव साऱ्यांचा,
लहानग्या मुलां - मुलांत,--!!!
अर्धोन्मीलित त्या कळ्या,
उघडून आपल्या फुलात,
फुलवून सगळ्या पाकळ्या,
तुझ्यासंगे कशा गमतात,--!!!
रेंगाळशी तू कसा,
वाऱ्यावरती गीत गात,
पंख तुझे फडफडवतांना,
रंगांची मोहक बरसात,--!!!
कुठल्या निवडशी फुलां,
काय असते अंतरात,
टिपत असंख्य परागकणां,
काय चाले हितगुजांत,--!!!
दंग होशी ना मित्रा,
कसा विसरशी भान सुगंधात,
चुकून काट्यांचा स्पर्श होतां,
कोण औषध लावे घावांत,--?
थंडगार त्या झुळुका,
अंगाला असतील झोंबत,
नाजूक, कोमल, तरल, मुलायमा, सहशी कसे हे आघात,--!!!
सापडे कसा तुला रस्ता,
कोण दाखवतो वाट,
काय करीशी मार्ग चुकता,
पुन्हा जाण्याची निसर्गात,--!!!
आपल्या सुंदर अंगकांतीला,
युक्ती कोणती स्वच्छ ठेवण्यात, निसर्गाच्या सुंदर लेकरा,
मजा वाटे तुला निरखण्यात,--!!!
© हिमगौरी कर्वे
Copyright © 2025 | Marathisrushti