(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुरी गर्वाने टम्म फुगली (बालकविता)

    *पुरी गर्वाने टम्म फुगली,
    बशीत ऐटीत ढिम्म बसली,
    बासुंदीने मग तिला पाहिली, तिला कशी चटकन बुडवली*,

    *चिंगुराव, चिंगुराव,
    केवढा तुमचा तोरा,
    पेरू खाता चोचीने,
    ढंग तुमचा न्यारा*,--!!!

    *मनीमाऊ, मनीमाऊ
    टपोरे तुमचे डोळे,
    शेपूट आपली फिस्कारत,
    करता गोल वाटोळे*,--!!!

    *खारुताई, खारुताई,
    काय खाता लपवून,
    कोणी आले की कशा,
    सुळकन जातां पळून*,--!!!

    *वाघोबा, वाघोबा,
    केवढा तुमचा दरारा,
    नुसते पाहून तुम्हाला,
    घाम फुटतो जगाला*,--!!!

    *मुंगीताई मुंगीताई ,
    निघालात तरी कुठे,
    केवढी ही लगबग,
    काम तुमचे मोठे*,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

  • समत्व बुद्धी

    एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,
    विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।

    जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,
    बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।

    समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,
    त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।

    जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,
    दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।

    संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,
    टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।

    मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,
    स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ज्ञान साठा

    जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची,

    कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची.....१,

    प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो,

    अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो.....२,

    एक किरण तो पूरे जहाला, अंधकार तो नष्ट करण्या,

    ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फूलून येते ज्ञान वाहण्या.....३

    डॉ. भगवान नागापूरकर

    9004079850

    bknagapurkar@gmail.com

  • जातीमधील उद्रेक

    लाट उसळतां ती क्रोधाची, बळी घेतले कित्येकाचे

    हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे...१,

    फार पूरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें

    कुणीतरी फोडून वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने...२,

    त्याच क्षणाला बिज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे

    ईश्वराकडे त्या जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे....३,

    विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी

    विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी,

    चूक कुणाची सजा कुणाला, कालचक्राची रीत न्यारी

    धर्म पंथांचे मार्ग आखूनी, सलोख्यात निर्मिली एक दरी

    कमी न होईल अंतर हे, केवळ दुजा धर्म जाणतां

    एकत्र येवूं तेव्हांच सारे, ईश्वरास तो एक समजतां

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • तीन गुणाचे जीवन

    तीन गुणांनीं युक्त असूं द्या, तुमचे जीवन सारे ।
    जीवन यश पताका तुम्हीं, फडकवित रहा रे ।।१।।

    असती सारे ईश्वरमय, याच भूतला वरचे ।
    प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे ।।२।।

    आनंद घेऊनी संसारांचा, लक्ष्य असावे जीवनीं ।
    निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी ।।३।।

    दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला ।
    आयुष्यातील कांहीं भाग, अर्पा तुम्हीं समाजाला ।।४।।

    तीन दिशात्मक जीवन जगा, यश तुमचे हातीं ।
    जीवनातील आनंद घेतां, समाधान ते लाभती ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • समलैंगिकता

     

  • दर्शनाची ओढ

    पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।

    चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।

    आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।

    मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।

    आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।

    भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।

    आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।

    अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।

    चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।

    फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।

    गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।

    ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।

    टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।

    नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।

    विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।

    देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • वाह्यात रुबाईयात

    ध्यानामधिं राहूं दे दोस्ता, नश्वर ही सगळी मत्ता
    क्षणार्धात जाईल संपुनी, हातीं जें आहे आत्तां
    चंचल आहे लक्ष्मी, जाते निसटुन ती कळण्यांआधी
    कशास मग मागसी गड्या तूं वाढवून महागाईभत्ता ?

    फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको
    अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’
    ‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें –
    ‘चालेल मज पेद्रू कुणीही, फक्त तूं मजला नको’ ।।

    मन तिचें वळवायला युक्ती अशी मी काढली
    रोज तिजला काव्यमय मी प्रेमपत्रें धाडली
    शेवटी फळलीच की गंधित गुलाबी शृंखला
    दूत वरला पोरिनें, जो पोचवी पत्रें तिला !

    होऊनिया आतूर मी गेलो तिला भेटायला
    तात्काळ दरवाजा तिनें लावून की हो घेतला
    लावला होता तिनें कां, टाळण्यांसाठी मला ?
    लावला होता तिनें, कवटाळण्यांसाठी मला !!

    जातांच मी, ती मजकडे आतूर होउन धावली
    लागलिच मजला मिठी सर्वांसमोरच मारली
    चुंबनें कांहीं भराभर वर्षवी ती मजवरी
    गोड मोठी तीन वर्षांची असे ती छोकरी !

    हात त्यानें लावला सर्वांपुढे अंगा तिच्या
    लागला सोडूं निर्‍या त्या सुंदरीच्या साडिच्या
    तो ज़रा ना लाजला, तीही मुळी ना लाजली
    स्टाफ तो शोरूममधला, ती “डमी” काचेतली ।।

    आंत ती जातांच, आतुर तिजकडे तो धावला
    लागलिच लगटुन, तिच्या पदरास झोंबूं लागला
    हर्षली तीही, तयाला थांबवी नच मुळिच ती
    पाळला-कुत्रा असे तो सुंदरीला प्रिय अती ।।

    दिसतसे कित्येक वेळां ती मला टीव्हीवरी
    प्रथम कुतुहल, ध्यास नंतर लागला मज अंतरीं
    राहवेना, पोचलो स्टुडिओमधे मी टीव्हीच्या
    समजलें, टीव्हीतली माशी असे अगदी खरी !

    शांत रात्रीं सुंदरी ती दिसतसे कधिकधि मला
    धाडसानें एकदा मी ‘जवळ ये’ म्हटलें तिला
    हांसली, आली पुढे, मी रूप जवळुन पाहिलें
    घाम फुटला दरदरुन मज, बघुन उलटी पावलें ।।

    - सुभाष स. नाईक

  • निखळ प्रेम !

    राधेचं श्रीकृष्णावरील निखळ प्रेम
    आजच्या तरुण प्रेमिकांत दिसत नाही !
    असा प्रश्न सामान्य जनांच्या मनात
    आला तर काही चुकले नाही !

    प्रेमी युगल एकमेकांवर अंधळ प्रेम करतात,
    तर काही जण प्रेमात पडून अंधळे होतात !
    कोणाचं प्रेम खरं कोणाचं खोटं,
    ते आपापल्यापरीने पुढे रेटतात !

    एकतर्फी प्रेमात अपयश आल्यावर
    अॅसिड हल्ले, बलात्कार होतात,
    बाह्य आकर्षणाला भुलून केलेलं प्रेम
    काश्याची साक्ष देतात !

    आंधळ्या प्रेमात केलेल्या चुका
    गडद काळोखात वाकुल्या दाखवतात,
    मुलांपेक्षा मुलींच्या कलंकांच्या
    शृंखला भविष्यात सुरु होतात !

    अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्यावर कळते
    निर्णय चुकीचा होता,
    प्रेम नव्हतेच
    वासनांचा चक्क बाजार होता !

    जगदीश पटवर्धन, दादर

  • सत्य सुर्यप्रकाशी

    शब्द जरी जाहले अबोल
    मौनी मन, मनाशी बोलते

    द्वंद्व! ते सत्य, असत्याचे
    जीवाला सदा खात असते

    कर्म! मनी बिलोरी आरसा
    स्वचे, खरे प्रतिबिंब दिसते

    जरी प्रतारणा जगाशी केली
    सत्यता उरीची जीवा छळते

    सर्वांती नोंदणी ती चंद्रगुप्ती
    लेखाजोखा, सामोरी मांडते

    जन्म! कर्म विवेकी, संचिती
    अर्थ! मुक्ती, मोक्षाचा सांगते

    प्रीती, सद्भावना सदा सांगाती
    सत्य! सूर्यप्रकाशी समोर येते

    -- वि. ग. सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ३९.

    ८ - २ - २०२२.