गिरगावातील रस्त्यावरी
दोन देवळांच्या शेजारी
'आर्यन' आहे आमची शाळा
जेथे ज्ञान मिळते बाळा
नाव शाळेचे लहान आहे
लहानथोरांच्या मुखी आहे
येथून शिक्षण घेऊन गेले
देशमुखांदी मोठे झाले
आम्हीही शिक्षण घेऊन जाऊ
परंपरा त्यांची पुढे चालवू
सर्वांना जी समान मानते
ती शाळा मला खूप भावते
शाळा ही आवडती असे
अभिमान तिचा हृदयी वसे
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(१९७४)
जगती, नित्य सदविवेके
चालत रहा, चालत रहा
मुलमंत्र, हाच जीवनाचा
सत्कर्म, सदा करीत रहा।।
विधिलिखित सारे जीवन
प्राक्तनाच हा भोग आम्हा
सुखदु:खांच्या सावलीतूनी
स्वानंद,समाधान घेत रहा।।
जन्मी, भाळी जे जे लाभले
त्यात समाधान मानीत रहा
निराशावादी कधी राहु नये
मनी, आशावाद जपत रहा।।
सत्संगे, पापांचे होते क्षालन
उतम सहवासात, सदा रहा
जीवन, खेळ कठपुतळीचा
प्रभुरामाचे रामनाम घेत रहा।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०९.
१० - ४ - २०२२
मूल्य नाही कुणा,
तूं दिल्या वेळेचे,
गमावून टाकी,
जाणूनी फुकाचे ।।१।।
लागत नसते,
दाम वेळेसाठीं,
म्हणून दवडे,
अकारणा पोटीं ।।२।।
वस्तूचे मूल्य ते,
पैशांनीच ठरते,
परी वेळेची किंमत,
कुणा न समजते ।।३।।
वेडे आहोत सारे,
कसे होई मूल्य
वेळ जातां मग,
आयुष्य जाईल ।।४।।
आयुष्य खर्चणे,
हेच वेळेचे मुल्य ठरते,
जीवनांतील यश,
त्यावरुन कळते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ज्येष्ठत्वे आता फक्त तडजोड करावी
आपुल्याच मनाची समजूत घालावी
चूक की बरोबर, व्यर्थची वादविवाद
अंतरी संघर्षाविना मन:शांती लाभावी
आता जगती जन्मताच सारेच सर्वज्ञ
इथे कलियुगाचे निर्बंधी दृष्टांत वाजवी
भौतिक सुखाचा सभोवार मुक्त संचार
आपण स्वतःलाच अंती मुरड घालावी
या युगी संस्कारांची, नित्य पायमल्ली
हीच जीवनाचीच, जगरहाटी वास्तवी
उमजुनी सारे,जगाशी तडजोड करावी
सोडुनीया हटवादा, मन:शांती भोगावी
या जन्मी नाती सारी निर्मळ ऋणानुबंधी
भाग्ययोगे ! सावरणारी सकलां लाभावी
जन्म मानवी अनेक जन्मांचीच पुण्यदा
जगता वृद्धत्वे अंती मोक्षमुक्ती लाभावी
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१३२
६ - १० - २०२१.
घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।।
आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी,
घ्याहो निरखूनी ।।१।।
भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी,
घ्याहो निरखूनी ।।२।।
ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी,
घ्याहो निरखूनी ।।३।।
आदर भावांची वसती विवेक बुद्धीने शोधा जाणूनी,
घ्याहो निरखूनी ।।४।।
सुख दुःखाची फळे घेणार हीच जीवनाची खरी कहाणी,
घ्याहो निरखूनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
१८-०९१२८३
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
स्मृतींलहरींच्या हिंदोळ्यावर
मन धावते, हरीच्या गोकुळी।।धृ।।
रवीरथी नारायण हरिमुरारी
घुमवी मंजुळ मधुरम पावरी
जागते गोकुळी राधा बावरी
छुमछुम छंदी, नाद गोकुळी।।१।।
चराचरातुनी सुरेल नादब्रह्म
हरेरामकृष्ण, गोविंद गोविंद
जीवा तोषवीतो हरि कृपाळु
देवकीनंदन, ब्रह्म ते गोकुळी।।२।।
प्राजक्त,उभा रुक्मिणी द्वारी
सडा फुलांचा सत्यभामे द्वारी
निर्मळी प्रीती, निर्मळी भक्ती
हरिहराचा भुलभुलैया गोकुळी।।३।।
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३७.
२० - ५ - २०२२.
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण
त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही
उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण
साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार
देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना
उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना
सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान
प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई
तीच प्रभूसी अर्पण होई
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@gmail.com
स्वातंत्त्र्यदिनानिमित्त
ढम ढमा ढम ढोल वाजवा ढोल
ढम ढमा गा सत्तरीचे बोल ।।
ढम ढमा सत्तरी हेंच अत्तर
हिनें मनांवर केला हल्लाबोल ।।
ढम ढमा ढम सत्तेचाळिसला
देशाला स्वातंत्र्य मिळे अनमोल ।।
ढम ढमा त्या स्वातंत्र्यासाठी
कितिकांनी प्राणांचें दिधलें मोल ।।
ढम ढमा ढम दशकांनी दो-तीन
आणिबाणिची अंधारी झांकोळ ।।
ढम ढमा ढम आदरणिय नेते
चरती, चरुनी बनती गोलमटोल ।।
ढम ढमा ढम सार्या जनतेचा
ऐकूं येतो कोणां ना कल्लोळ !
ढम ढम शंभरिही येईल, तरी
जनता नशिबा लावत राहिल बोल ।।
ढम ढमा अति सोशिक जरि जनता ,
किती भावनांचा राखिल समतोल ?
‘रामनाम सत’ देशाचें होतां
ढम ढम मनुजा, वाजवीत बस ढोल !
ढम ढम तरिही आशा नवी फुले
खचित जन नवे बदलतील माहौल ।
-- सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
आज मन आनंदले,
सुखाच्याही पा--र गेले,
भंवसागरी तरणे खासे,
आता सोपे वाटले,--!!!
दुनियादारी निभावणे,
असते किती कठीण,
तरीही तावून-सुलाखणे,
सहजी कसे जमले,--!!!
मनमोर थुई थुई नाचे,
पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,--!
खंबीर,धीरगंभीर राहणे,
तटस्थभूमिका निभावावी,
येऊ देत वारे--वादळे,
मात्र एक झुंज द्यावी,--!
तुझ्यापेक्षा मी सरस,
म्हणत त्यांन भिडावे,
संकटांचे सतत घोर,
जिवामुळी लावू न घ्यावे
एक दत्तगुरु पाठीराखे,
राहावे निर्धास्त लेकराने, गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
आपुले दुःख सांगावे,--!!!
ते असतां मागे,
त्यांची जाणीव ठेवावी,
एक त्यांचे स्मरण,
सारी दुनिया विसरावी,--!!!
आनंदाच्याही डोही बुडावे,
ओलेत्याने राहावे कोरडे,
पाणी जाताना नाकी तोंडी,
दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,--!!
हिमगौरी कर्वे.©
तू असा वाहता की,खळाळते पाणी,
जसा सागर उचंबळे,
गात जीवनगाणी,--!!!
तू असा निश्चल की,
जसा असतो पहाड,
किती स्थितप्रज्ञ राही,
वाऱ्या वादळी अटल--.!!!
तू असा ढगांसारखा,
अविरत ना चंचल,
संजीवन बरसले तरी,
शांत गंभीर अटळ,--!!!
तू असा किनाऱ्यासम,
भाससी किती तटस्थ,
लाटा सुखदुःखांच्या उफाळती तरीही अतिशय अचल,--!!!
तू असा हिंडता की,
वाऱ्याशी तुझी जोडी,
अखंड वाहशी रातदिनी,
पाय ठहरेना जागी,--!!!
कुठे जाऊन तू पोहोचशी,
तू असा फुलांगत,
जिथे तिथे उमलशी,
वसा आनंदाचा घेऊन,
जागोजागी फैलावशी,--!!!
तू असा वृक्षासारखा,
संसारी अन् संन्यस्त,
इतुके बहरूनही सारखे,
स्वतः मात्र निर्मोही--!!!
हिमगौरी कर्वे.©
Copyright © 2025 | Marathisrushti