यावर्षी बळीराजाला,
सोयाबिननं तारलं !
पण जगाच्या पोशिंद्याले,
मजुरीनं मारलं !!१
...
हजार रुपय एकरानं,
मागील वर्षी सोंगलं !
दोन हजार एकरानं,
मजुर यंदा बोंबलं !!२
...
मळणीवाला म्हणतो मला,
दोनशे रुपये पोतं !
मी म्हटलं त्याचा काय,
आता जीव घेतं !!३
...
आलं आभाळ, झाकण्यासाठी,
ताडपत्री नेतो !
दोन हजारानं इथे त्याचा,
खिसा कापला जातो !!४
...
एवढ सार करुन सोयाबीन,
बाजारात नेतो !
ओलं आहे म्हणून भाव,
सोळाशाचा येतो !! ५
...
घरी आल्यावर सारा हिशेब,
चुकता करुन देतो !
हाती नाही राह्यलं काही,
म्हणून रोगर घेवून घेतो !!६
...
यासाठीचं म्हणतो शेतक-याचा,
वाली कोणी व्हा रे !
नका देवू दुजे काही,
हिंमत तरी द्या रे !! ७
...
असाचं जर बळीराजा,
जहेर पिऊन मेला !
आपलाही पुढे समजा,
खेळ खलास झाला !!८
...
सरकारच्या दरबारी,
आवाज उठला पाहिजे !
त्याच्यासाठी प्रतिनिधी,
आमचा झटला पाहिजे !!९
...
जय किसान जय जवान,
आठवा आता नारा !
दोघांसाठी खरचं आता,
काहितरी करा !!१०
...
फेसबुकवरुन आलेली ही कविता... कवी अज्ञात
प्रेषक - विनय साटम
उठा उठा हो सकळजन
स्वागत करु या रविउदयाचे
फूलून जाते जीवन ज्याने
त्या सूर्य आगमनाचे //धृ//
उषाराणीची चाहूल येता
चंद्रतारका ढळल्या आतां
चराचराना जागे करण्या
चाळवी निद्रा हलके हाता
वंदन करु या लिन होऊनी
चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१//
स्वागत करुया रविउदयाचे
रंगबेरंगी सुमने फुलली
वाऱ्यासंगे डोलू लागली
दरवळूनी तो सुगंध सारा
वातावरणी धुंदी आणली
मकरंदापरि चंचल होऊनी
स्वाद घेवूया त्याच फुलांचे //२//
स्वागत करुया रविउदयाचे
पक्षी येती किलबील करिती
उठा उठा ते सांगुन जाती
कुजबुज करिती राघू मैना
ताना मारित कोकीळ गाती
कुक्कुटाची ती बांग तुतारी
आरंभ करिती पक्षीगीतांचे //३//
स्वागत करुया रविउदयाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उन्हाळे-पावसाळे हिवाळे,सृष्टीचे चक्र अव्याहत,
कोण चालवते त्याला असे,
तोचि एक भगवंत,--!!!
सावली उन्हामध्ये पडते, विधात्याची किमया सतत,
ती देहापुढे - पुढे राहते,
विज्ञानच लपले निसर्गात,--!!!
सागरातून लाट उफाळते,
लाटांचे अशा अधांतर,
या नेत्रसुखद सौंदर्याचे,
रचिता कोण सांगा तर,--!!!
रहस्य जिवाच्या जन्माचे,
मानव काहीसे उघडत,
प्रकार किती ते मृत्यूचे,
नाही कोडे उलगडत,--!!!
डोंगर-दऱ्या विसंगत,
असते त्यांची सदैव संगत,
भयावह कपारी, कडे,
कोणाकडून ते निर्मित,--!!!
विपुल असती फळे-फुले,
अतिरम्य या भव्य सृष्टीत,
सुंदर किती वाखाणण्याजोगे,
कोण त्यांना रंग रूप रस देत,--!!!
नैसर्गिक सुगंध ते,
फळा फुलातून कसे साठवत, कस्तुरी दुर्मिळ मृगात सापडे,
कुठेच नाही, त्यांच्या नाभीत,--!!!
पुन्हा त्याला पत्ता नसे ,
काय आहे त्याच्यातअलौकिक, त्याचे त्याला कळत नसे,
तो भगवंताचा दूत एक,--!!!
© हिमगौरी कर्वे.
एकांताच्या गुढ किनारी
वादळ आठवांचे घोंगावते
आयुष्य सारे सारे हिशोबी
अलवार अंतरात उलगड़ते
क्षणाक्षणांचे स्मृतीकारंजे
भारूनी नभांगणा सजविते
नीरव , नि:शब्दी नीरवता
मन , मनान्तराला सावरीते
सृष्टिचे रूप सुंदर मनोहारी
लोचनातुनी अविरत तरळते
लडिवाळ , लहर प्रीतरंगली
शब्दागंधल्या गीतास गुंफिते
एकांताच्या या गुढ किनारी
मुग्धगीत मनांतरा भुलविते
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४४.
२८ - ५ - २०२२.
एक होता राजा… त्याची काय मजा… त्यानं खाल्ला काऊ.. पोटात झाला बाऊ
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाचे शरीर अमोल किंमतीचं
पशु-पक्ष्यांपेक्षा खूपच मोलाचं
माणसाच्या हातून चांगलंच घडावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाच्या वागण्यात स्वार्थ नसावा
माणसानं आचरणात बदल करावा
आपल्या आचरणातून इतरांना सांगावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं नजरेतून चांगलच पहावं
चांगलच ऐकावं,चांगलच बोलावं
चांगलं वाईट माणसाला कळावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं चंचल मनाला आवरावं
चांगल्यांच्या संगतीत त्याला रमवावं
वाईटाला दूर करावं, चांगल्याला जवळ करावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं तहानलेल्या जीवाला पाणी पाजावं
भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं
इतरांसाठी प्रेम द्यावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
रात्र येत राहते
दिवस येत राहतो
आपण गृहितच
त्यांना धरत राहतो
असेच महिने येत राहतात
असेच वर्ष जात राहतात
आपण गृहितच
त्याना धरत राहतो
केस पांढरे
अंगावर सुरकुत्या
पाठीत बाक
लटपटणं वगैरे
होत राहते
मग
आपल्याला गृहित
धरत राहतात ते
रात्र दिवस माहे साल
काळाचे घटक येत जात राहतात
......आपण कुठे कुठेच गृहित धरायला नसलो तरी
~ कौशल
-- श्रीकांत पेटकर
नातं जिवा-भावाचं
सढळ.....अढळ !
नातं प्रिती-प्रेमाचं
रसाळ .....मधाळ !
नातं राग-लोभाचं
खट्याळ.....स्नेहाळ !
नातं दुःख - हर्षाचं
उदास .....उधाण !
नातं विरहात
एकटे व्याकुळ !
नातं मनांत
सूर गात्रात !
नात्याची गुंफण
रेशमी....रेशमी !
बंध रेशमाचे
अखंड....अतूट !
कस नात्याचा
झळाळे सुवर्ण !
पाईक नात्याचा
पवित्र ....पावन !
बाज नात्याचा
मस्त उनाड !
साज नात्याचा
प्रेम ....आदर !!
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.
नियमित जाऊनी मंदिरी, श्रवण करी तो किर्तन
तन्मयतेनें ऐकत असतां, जाई सदैव तेथे झोपून...१,
एकाग्र करिता चित्त प्रभूसी, निद्रेच्या तो आहारी जाई
निघूनी जाती सर्व मंडळी, एकटाच तो तेथे राही....२,
पवित्रतेच्या वातावरणीं, प्रभू नामाच्या लहरी फिरती
झोपीं गेला कोपऱ्यांत तो, परिणाम त्या त्यावरी करती....३,
शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये, शोषूनी घेती त्या लहरी
आनंदाचे वलय भोवती, समाधान ते त्यास करी....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti