आई' ही... चिरंतन आशा
अनादि नि सुदैवाने अनंत
मानवी आयुष्याला मात्र मर्यादा
दुर्देवाने! ही खचितच खंत
देवाचा अंश, आई परीसस्पर्श
लाभून अवघे आयुष्य पुलकित!
खूप काही सांगायला
फारसे शब्द लागत नाहीत
तुमच्या आमच्या आनंदाला
कारणं फारशी लागत नाहीत
-यतीन सामंत
झाकोळलेले आभाळ, गतस्मृतींचेच कृष्णमेघ
-- स्वाती ठोंबरे.
मानवाने पाहिले की
त्याच्या चारी बाजूंना
मुंग्या पसरलेल्या होत्या,
मुंग्याच मुंग्या.
मानवाने कुतूहलानें पाहिले,
आश्चर्याने पाहिले. १
कांहीं वेळानंतर
मुंग्या मानवाला चावू लागल्या.
मानव बिथरला.
त्याने मुंग्यांच्या वारुळाला
लाथा मारल्या, धक्के मारले.
जमिनीला भेगा पडल्या.
मानवाने मुंग्यांवर पाणीच पाणी फेकले,
इतके पाणी, जसा कांही प्रलयच.
मुंग्यांचे वारूळ
मुळापासून हादरून गेले,
मुंग्या समूळ नष्ट होऊ लागल्या.
मानव पहात राहिला,
निर्विकार. २
*
या धरणीवर
आपण माणसेसुद्धा
पसरलेलो आहोत मुंग्यांसारखेच.
आपणही
पृथ्वीला त्रास देतो आहोत,
तिचे चावे घेतो आहोत,
वारंवार, पुन्हापुन्हा.
आपणही
धरणीला क्रोधित करत आहोत.
म्हणून तर
मोठाले धरणीकंप होत आहेत,
उंचउंच त्सुनामी येत आहेत.
कुठवर
धरणीच्या प्रकोपापासून
माणूस वाचेल ?
कुठवर ? ३
*
जर मुंग्या चावल्या नाहींत,
मुंग्यांनी जर त्रास दिला नाहीं,
तर मानव विनाकारण
त्यांचा विध्वंस करत नाहीं.
माणसानेसुद्धा
पृथ्वीला, निसर्गाला, पर्यावरणाला
त्रास देऊ नये, त्यांचे चावे घेऊ नयेत.
तरच मानव सुरक्षित राहील.
जमेल ना हें आपल्याला ?
जमायलाच हवें ! ४
(स्वत:च्या हिंदी कवितेचें मुक्त भाषांतर)
- सुभाष स. नाईक
M- 9869002126
कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
हात-पाय गार, काटे अंगी येती
नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा
सुकूनची जाते, हिरवे रान
शरिर राहते, घाम निथळून
लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
शोधण्या ढग, मन घेई धाव
थांबवितो कामे, वादळी वारा,
पर्जन्याचा मारा, पडताती गारा
पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे
आपल्या जे हाती मन नसे त्यात
सुख त्याच्यांत पाही, नसे जे हातात
विशाल आपुले पंख फैलावुनी,
उंच उंच आभाळी उडावे,
मनसोक्त रमतगमत दूरवरी, विहरत --विहरत गात जावे,--||१||
नको कुठले ताणतणाव,
नकोच कुठल्या चिंता,
भोवती निळा आसमंत,
मेघ सारे नि विद्युल्लता,--||२||
वाटले तर वृक्षांवर बसुनी,
निवांत करावी फक्त टेहळणी, स्वातंत्र्य फक्त राहावे जपत,
नको कोणाचीच मनधरणी,--||३||
अपमान, मानभंग, दुःखे,
कोणीच नको करायाला,--
नातीगोती टोचती सारी,
अवघ्या मानवजातीला,--||४||
आपल्या दिलाचा मीच राजा, काळवेळ कसले बंधन नसे, एकमेकात लढून सारखे ,
गुंता वाढवणेही नसे,--||५||
निळ्या आभाळात बागडत, मुक्तपणे वर वर जावे,
पैसा सत्ता प्रतिष्ठा सोडुनी,
पक्षीजगातील आनंद लुटावे,--||६||
गोड फळे झाडांवरची,
तृप्त होत खात राहावे,
माणसांना चिडवत चिडवत, फांदीवरती उंच बसावे,--||७||
हिरव्या हिरव्या धरेवरी,
स्वैर सगळे सुख लुटावे,
धुंदीतच राहून आपल्या शेवटी इथेच आपुले प्राण सोडावे,--||८||
हिमगौरी कर्वे ©
क्रियेला प्रतिक्रिया,
ध्वनीला प्रतिध्वनी ।
तत्व ते सनातन,
दिसे नित्य जीवनी ।।१।।
फेकतां जोराने,
आदळे भिंतीवरी ।
प्रवास परतीचा,
होई तुमचे उरीं ।।२।।
शिवी वा अपशब्द,
दिले कुणासाठी ।
येऊनी धडकतील,
तुमचेच पाठीं ।।३।।
प्रेमाने बोलणे,
सुंगध आणिते ।
आनंदी लहरी,
मनां सुखावते ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
प्रभूंनी बँक काढली उघडा खाते
ठेवा पूंजी आपली आणा सुख जीवनाते ।।१।।
जेवढे गुंतवाल मिळेल व्याजा सहित
दरा विषयीं तो आहे अगणित ।।२।।
ही बँकच न्यारी तुम्हां न दिसेल कोठे
धुंडाळूं नका संसारी होईल दुःख मोठे ।।३।।
पाप पुण्याची ठेव जमा करिते बँक
जसा असेल भाव तशी देईल सुख दुःख ।।४।।
गरज पडतां धन मिळणे हे आपल्याच हातीं
परि कामीं येणें पुण्य हें प्रभूचे इच्छांती ।।५।।
जमता पुण्याच्या राशी चांगली कर्मे करुनी
नाते जडतां ईश्वरासी जाल तुम्हीं उद्धरुनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।
दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?
निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।
फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?
चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।
आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।
देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।
हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti