देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 9, 2017
स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून “शिवचरित्र’ लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले.
March 3, 2025
जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
September 19, 2017
विचारांची उठती वादळे ।
अशांत होते चित्त सदा ।।
आवर घालण्या चंचल मना ।
अपयशी झालो अनेकदां ।।
विषण्णतेच्या स्थितीमध्यें ।
नदीकांठच्या किनारीं गेलो ।।
वटवृक्षाचे छायेखाली ।
चौरस आसनावरी बसलो ।।
डोळे मिटूनी शांत बसतां ।
अवचित घटना घडली ।।
विचारांतले दुःख जाऊनी ।
आनंदी भावना येऊं लागली ।।
एक साधूजन ध्यान लावीत ।
बसत होता त्या आसनावरी ।।
पावित्र्याची वलये फिरती ।
आसन दिसले रिकामें जरी ।।
वातावरणाची ही किमया ।
अनुभवते प्रखरतेनें ।।
शुद्ध अशुद्ध विचार येती ।
सभोवतालच्या जाणिवेने ।।
डॉ. बगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 5, 2018
जेव्हां मी म्हणतो माझे,
सोय माझी असते त्यांत,
देह जगविण्या कामीं,
प्रयत्न हे सारे होतात ।।१।।
देह वाटते साधन,
प्रभूकडे त्या जाण्याचे,
त्यासी ठेवतां चांगले,
होते चिंतन तयाचे ।।२।।
भजन करा प्रभूचे,
सुख देवूनी देहाला
परि केवल सुखासाठीं,
विसरूं नका हो त्याला ।।३।।
देह चांगला म्हणजे,
ऐष आरामीं नसावे,
ती एक सोय असूनी,
त्यांने प्रभू मिळवावे ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 3, 2016
मातीच्या मूर्तीला देऊनिया एक नाव
पुजतो माणूस तुला का हे नाही ठाव ||
मंदिरात पुजारी घालतो भक्तीवर घाव
बाहेर समित्या साधती आपलाच डाव ||
माणसाला किती रे ही संपत्तीची हाव
नावावर तुझ्याच मारती मिशीवर ताव ||
मूर्तीला तुझ्या आज रे सोन्याचा भाव
विसर्जन करुनी विसरतील तुझे नाव ||
मनी नाही भाव तरी देवा मला पाव
अशा भक्तांसाठी किती ही धावा धाव ||
नाचती करुनी रे वेडेवाकडे हाव भाव
भक्तांच्या ह्या भक्तीचा लागत नाही ठाव ||
मुर्तीतल्या देवा कर न रे तू एक ठराव
राखेल पर्यावरण शाबूत त्यालाच पाव ||
रविंद्र कामठे
२२ सप्टेंबर २०१५.
September 22, 2015
विसर सर्व गतकाळां,
उगा मना रेगांळशी,
पुढे जाऊन, समोर पहा ,;---
का मागे, मागे वळून पाहशी,---!!!
मागे राहिला बालपणा,
त्यात कशाला हुंदडशी
चार सुखाचे थेंब दिसतां
सारे आभाळ पुन्हा पेलशी,--!!!
कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, सारख्या सारख्या विसरशी,
पाहून आपल्या भूतकाळां,
पुन्हा पुन्हा रे गहिंवरशी,--!!!
घरात माणसांचा राबता,
सांग आता कुठून आणशी,
अशा अनमोल दौलतीला,
तूच ना रे झुगारशी,--!!!?
येता काळ तरुणपणाचा,
तुला जाणीव नव्हती जराशी, गमावशील जर यांना,
कसे त्यांना परत आणशी,-?
एक एक करून सर्व तुला,
राजा, बघ सोडून जाती,
काळाची ही महान किमया,
नातीगोती संपून जाती,--!!!
आता उरला एकटेपणा,
जो जन्माचा सोबती,
दाबून टाक भूतकाळा,
वर्तमानच फक्त या जगी,--!!
हिमगौरी कर्वे. ©
September 3, 2019
पहाट उमलली नवी
किरण झाकले धुक्यात..
चमकतो दवाचा मोती
हिरव्या पानांच्या शिंपल्यात...
तेजस्वी लालबुंद रवी
विराजला निळ्या नभात..
दुतर्फा वेलींची कमान
झुकली फुलांच्या बहरात..
केशर काया गुलमोहर
आला सडा शिंपीत..
भिरभिरते फुलपाखरू
रंग मखमली पंखात..
मधुर गुंजण भ्रमराचे
फुला फुलांच्या कानात..
पक्ष्यांचे थवे चालले
नक्षी भरण्यास अंबरात...
किमयागार चित्र रेखितो
चोहीकडे विश्व रुपात..
सुख दिसावे दृष्टीस
कोणता रंग कुंचल्यात?
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 15, 2026
खरंच रे वेड्या,तुला कळला नाही, माझ्या मनीचा भाव,
नकळत कोरून गेलास,न भरलेल्या जखमेचा घाव...
गळून पडेल का ही जखम? की जाईल ती पण सुखून,
की चीघळून जाईल पुन्हा,सोसेल का हे तळपतं ऊन?
तू दिली आहेस म्हणून खरंच का हिला जपून ठेवू?
सांगना,सजवून धजवून अंगावरचं टपोरं गोंदण मानून घेवू ?
मलम नाही रे हिला,असा कसा रे केलास वार?
उसळणाऱ्या तलवारीतही नव्हती,तुझ्या जिभे एवढी धार...
उफाळून आलंय बघ हे हृदय, स्वत:स मर्यादा घालून,
अश्रूंनाही ठेवतंय मुठीत, भावनांची करपलेली खपली सोलून...
-- कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.
May 7, 2019
ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।
आकाशातील थवे पाहूनी,
चंचल माझी नजर झाली
भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर
असंख्य चित्रे उमटूनी गेली
चित्र बघूनी नाचे मन जे
पाषाणा परी स्थिर कां झाले....१
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
झूळझूळ वाहे सरीता पाणी
पाण्यावरती दिसे तरंग
हलके हलके भिजवी अंग
पुलकीत करी रोम रोम जे
थंड आज परि होता दिसले....२
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,
सारे कांहीं तसेच आहे
सभोवतालचा निसर्ग ठेवा
अंतर्मनही माझे आपले
लुटीत असे जो सुखद मेवा
परि दोन्हीमधले अंतर ते
आज भासते दूर जाहले...३
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti