चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा
कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा...१
घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ
क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२
सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते
आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते....३
पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी
वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे राहतील विविध आठवणी....४
हाच हिशोब जीवनाचा, दुजा वाचतो इथेच पाढा
इतरांसाठी जगता जेव्हां, सार्थकी होतो आयुष्य लढा...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
पन्नास वर्षे एकत्र नांदलो
आयुष्यातील मार्गप्रवाही
कसा काळ निघुनी गेला
केव्हांच समजले नाही ।।१।।
काळ विसरलो, वेळ न विसरे
क्षणाक्षणाच्या प्रसंगाची
सुखदुःखानी भरलेल्या
अनेक अशा घटनांची ।।२।।
सैल झाला जीवन गुंता
कधीतो गेला आवळूनी
उकलणार नाही कधीच तो
जाणीव आली मनी ।।३।।
हेच असेल विधी लिखित
जिंकणे वा हारणे
आयुष्याचा मार्ग खडतर
समजुनी त्याला घेणे ।।४।।
सुख अथवा दुःखमय लहरी
विचारांच्या चेतना
मीच करतो, मीच अनुभवतो
हीच दैवी योजना ।।५।।
तुटू न देता आयुष्य दोर
जगणे व्हावे वर्षे शंभर
असेच जगु एकत्र मिळूनी
काळ चालतो भराभर ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तप्त लोखंडात, लपली ती आग
दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,
सुंदर फूलात, सुंगध तो छान
अवती भवती काटे, ते कठीण...२,
विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,
झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,
सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया
न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मजेदार वाटत असती, भावंडांची बघून भांडणें
'मला पाहीजे जास्त', हेच मुख्य मागणें
इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार
दांत ओठ खाऊनी, रागव्यक्त होणार
क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें
दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें
राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं
स्वार्थतेचा अभाव दिसे, शत्रु येथे नसे कुणी
बालपणीच्या प्रेमामध्यें, थोडे भांडणें परवडते
चव येण्या पदार्थाला, तिखटमिठ लागते
लहान असतां भांडून घ्या, तेच वय भांडणाचे
मोठे होऊन आठवाल, रम्य दिवस ते बालपणाचे
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
उचंबळूनी येतील शब्द, हृदयामध्ये दडले जे ।
संदेश असता सर्वांसाठी, कुणी न म्हणतील ते माझे ।।
जे जे काही स्फूरूनी येते, जेव्हा अवचित समयी ।
हृदयामधली हाक असे, ठरते आनंद दायी ।।
‘आनंद’ आहे कोणता हा, अन् येई कोठूनी ।
अंतर्यामी सर्वांच्या , सदैव राही बैसूनी ।।
बाहेर पडूनी झेप घेई दूजा हृदयावरी ।
तेथेही जो आनंद बैसला. स्वागत त्याचे करी ।।
पटे मनाला विचार , रूचणारा जो असे ।
हृदयामधला हाच आनंद, स्फूर्ती देवता भासे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
१९४७ साली एक बालक जन्माला आले
माय-पित्यांनी त्याचे नाव चंदाराणी ठेवले
त्याच वेळी मी बिगर राज्याची राणी झाले
नेहमीच विजय तर कधीतरी हार झाली
आणि त्या हारेलाच एक वेगळी धार आली
आयुष्याच्या सुखदु:खांशी मर्दानीपने लढली
संकटाच्या सार्या थव्यांनी आता माघार घेतली
स्त्री म्हणून सारे चटके मी एकटीनेच घेतले
या सार्या चोथ्याचे राज्य माझे असेच उभे राहिले
शेवटच्या घटकेला माझे मलाच उमगले
कुठले राज्य - कुठली राणी.. हे तर अळवावरचे पाणी होते
येणार्या काळाचे मी एक छोटे सावज होते....
- चंदाराणी कोंडाळकर
जवळ वेळ आली ......तयारीस लागा
जवळ वेळ आली ......विलासास त्यागा/
फितूर दिसती येथले लोक छूपे
जवळ वेळ आली...... लढाईस जागा /
कल्लोळ कसला अन चर्चा या कशाला
जवळ वेळ आली...... शहाणेच वागा /
बंधुत्वाचं खूपच फसवं नातं चाले
जवळ वेळ आली..... तपासाच धागा /
निर्णयात क्षण दवळावा कशाला
जवळ वेळ आली.... कशालाच त्रागा /
@कौशल(श्रीकांत पेटकर )
२२/ ०२/ २०१९
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाचे शरीर अमोल किंमतीचं
पशु-पक्ष्यांपेक्षा खूपच मोलाचं
माणसाच्या हातून चांगलंच घडावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाच्या वागण्यात स्वार्थ नसावा
माणसानं आचरणात बदल करावा
आपल्या आचरणातून इतरांना सांगावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं नजरेतून चांगलच पहावं
चांगलच ऐकावं,चांगलच बोलावं
चांगलं वाईट माणसाला कळावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं चंचल मनाला आवरावं
चांगल्यांच्या संगतीत त्याला रमवावं
वाईटाला दूर करावं, चांगल्याला जवळ करावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं तहानलेल्या जीवाला पाणी पाजावं
भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं
इतरांसाठी प्रेम द्यावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
रामरक्षेची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली....
माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन....
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली...
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पीढ़ी आली...
अंगठे दुखतायत आता Type करून
मानसं भेटतायतं आता Skype वरुन...
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता...
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय...
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected',
पण शेजारधर्म '. Totally Disconnected'...
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
'देव देव' काय करता,पूजा करायचं पण App आलाय आता....
या 'Technology' मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता....
विसरले सारे चव आईच्या भाजीची,
शुर गाथा शिवाजीची,
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या 'Technology' ची...
तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने
घेतलीय...!!
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...!!
वडील जिवंतपणिचं"डैड" झाले,
अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...!!
दिवसभर मुलगा CHATTING चं करत,
नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो...!!
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy"
झाली...!!
घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi
आता किती"Yummy" झाली...!!
माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....
बघा जमल्यास विचार करुन शेअर करा व
आपली संस्कृती.लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा प्रयत्न
करा ...!!!!!!!!!
फेसबुकवरुन फिरणारी ही कविता.. कवी अज्ञात..
प्रेषक - विनय साटम
Copyright © 2025 | Marathisrushti