(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • गुणधर्म

    करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो

    जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते

    बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी

    त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी

    धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो

    सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे

    मात करूनी विचारावरती सुप्त गुण हे विजयी होती

    गुणधर्म ही ईश्वरी योजना घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • वचन

    वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
    मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
    दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
    प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
    स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
    राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
    प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
    पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
    आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
    बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
    मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
    स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
    अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
    ‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • युरो-गंध

    युरोपच्या दौर्‍याचे पद्यरुपात सुंदर वर्णन 

  • आठवावे मृत्यूसी

    कृष्ण कमळ-

  • देहातील शक्ती

    नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा

    थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते

    अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून

    भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती

    आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते

    भावना जेव्हां जागृत होती, रोमरोम ते पुलकित होती

    अवयवे सारी स्फूरीनी जाती, देहामधूनी विज चमकती

    धनको ऋणको विद्युत साठे, अलग अलग दिसती मोठे

    विजातीय लिंग येता जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी

    प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही

    स्थिर करूनी चंचल मना, प्रकाश दिसेल हृदयी सर्वांना

    उष्णता वीज प्रकाश शक्ती, हीच ईश्वरी रूपे असती.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • गुज सांगती

    झाडा वरल्या
    खोप्या मधल्या
    गुज सांगती
    पिला आपल्या.... १

    चारा खाऊनी
    पाणी पिऊनी
    घरी आपल्या
    सुखी राहूनी.....२

    पंखात बळ
    येता बक्कळ
    उडून जाती
    पिले सकळ......३

    पिले उडाली
    आई एकली
    पाखरांसाठी
    हळहळली.....४

    दुनियादारी
    ऐक रे न्यारी
    गुज सांगती
    समर्थ सारी....५

    -- सौ.माणिक शुरजोशी

  • मौनातील काजळ वेदना

    मौनातील काजळ वेदना
    निःशब्द हृदयात सलते
    अनेक दुःखाचे पड आयुष्यात
    भोग भोगूनी रडवुनी जाते..
    सहज साधे काहीच कधी नसते
    आयुष्य कळसूत्री बाहुली असते,
    मन रडते उन्मळून आवेगात
    जीवन ही काटेरी झाडं बनते..
    आयुष्य ही टोकास सहज जाते
    नशीब जेव्हा वाईट असते,
    कधीच सुखद झुळूक नसते
    तप्त बोलांचे घाव जिव्हारी उठते..
    नशिबाच्या ललाटी खेळ रंगतो
    आयुष्य उध्वस्त एकाकी होते,
    दुःखाचा थेंबही अनामिक तेव्हा
    मनातील दुःख रडवून आल्हाद जाते..
    सहज वाटल्या वाटा सरळ साऱ्या
    तरी वाकड्या होतं आयुष्य मिटते,
    नशीब असेल वाईट दुःखद अंतरी
    निःशब्द वेदना जिव्हारी डसते..
    उत्तरायण सुरु होता मग
    नजर पैलतीरी आल्हाद लागते,
    मरणं असेल सुटका सारी अंतिम
    मग पैलडोह वाट नजर पाहते..
    आयुष्यातील संचित भोग
    न कधी कुणाला सुटणारे,
    आनंद डोह पार पैलतीर जावा
    बोलावणे हसत डोळ्यांत जमावे..
    पैलतीरी डोळे व्याकुळ भाव नजर
    दुःख न कळणारे आयुष्य व्यापते,
    सजेल यात्रा अंतिम इहलोकी
    आनंद क्षण ते एकाकी मन रडावे..
    अस्तास जातो सूर्य सांज वेळी
    काळोख नभांगणी अवचित दाटतो,
    दुःख येतात जीवन भरुन अबोल असे
    पैलतीरी जीवन नौका जाता क्षोभ क्षुब्ध होतो..

    -- स्वाती ठोंबरे.

  • अस्तित्व

    "अव्यक्त"

    जे व्यक्त होतात
    ती मते
    कदाचित मनात,हृदयात
    पोहचत नसतील
    तरी ती कानावर पडली पाहिजेत,

    वाद विवाद संवाद
    कोलाहलात सुद्धा
    शोधले पाहिजेत,

    जे व्यक्त होत नाहीत
    त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा
    आदर करुयात,

    इथे फक्त माझे अस्तित्वच
    मोलाचे नाही,
    या यात्रेत
    सहवास ,सह अस्तित्व सुद्धा
    मोलाचे आहे,
    तुझ्या,माझ्या व त्यांच्या
    जगण्याचे मोल
    सदैव समजले पाहिजे.

    ~ विजय नगरकर

  • काव्यानुभव

    फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे ।

    कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे.....१

    बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने ।

    यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने....२

    निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती ।

    शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती....३

    लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता ।

    छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता...४

    त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती ।

    सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती....५

    काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी ।

    मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी....६

    मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी ।

    काव्यातील आनंदात परि, डुबता सारे विसरूनी.... ७

    विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।

    अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता....८

    अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते ।

    उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते....९

    लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी ।

    परिस्थितीशी झगडा देवूनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी....१०

    गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे ।

    सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळे.... ११

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • पाऊसधारा

    क्षणक्षण सारे होता धुसर
    पापण्यातूनी दाटती पाझर
    व्याकुळ,कृष्णमेघ सावळे
    त्या ओढ़ वसुंधरेची निरंतर
    सृष्टिचे रूप अवीट मनोहर
    तोषवीणारा मृदगंध अनावर
    लपंडाव तो उन सावल्यांचा
    मोहवितो मनामनास निरंतर
    चिंबचिंब ओल्या पाऊसधारा
    सुखद सरिंची रिमझिम सुंदर
    आसक्त, ओढ़ प्रीतसखीची
    तनमन हृदया लागे चिरंतर
    जरी सुखदु:ख्खदी मेघडंबरी
    प्रीतभावनांचे अंतरी गहिवर
    ऋतुऋतुंचे सोहळेच लाघवी
    कृपाळू, कृपावंत तो दिगंबर
    -- वि.ग.सातपुते (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १५१.
    १२ - ६ - २०२२