(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गीत गा

    अंधार पडला आहे
    उजेडाचे गाणे गा
    वेदना असह्य आहे
    सुखाचे गीत गा

    रडणे आता भाग आहे
    हसण्याचे गाणे गा
    समोर नागफणा आहे
    स्तब्धतेचे गीत गा

    अपघात अटळ आहे
    सावरण्या गाणे गा
    मरणा जवळ आहे
    जीवनाचे गीत गा

    युद्धाचा ढग आहे
    शांतीचे गाणे गा
    निस्तेज मन आहे
    प्रसन्नतेचे गीत गा

    गाण्यांना संगीत आहे
    मानवता रीत जगा
    निसर्ग ढळतो आहे
    समर्पणाचे गीत गा

    -- विठ्ठल जाधव.

    संपर्क: ९४२१४४२९९५

    शिरूरकासार, बीड.

  • एका मनाचे हे भाग

    एक विशाल मन, भाग त्याचे अनेक ।

    विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,

    छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे ।

    अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,

    मनाचे स्वभाव, सारखेच असती ।

    फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,

    अगणीत मनें, कोठे नसे फरक ।

    अनेक बनली, जनक तिचा एक....४,

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • वियोग

    सहवासाचे सुख जेवढे, वियोगाचे दुःखही तेवढे ।

    बांधल्या प्रेम बंधन गाठीं, तुटता विसरुन जाती ।।

    लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा ।

    उडून जातां शाल सुखाची, व्यक्त होई मग दुःखे जीवाची ।।

    कशास करितो प्रेम असे ते, सहवासाने वाढत जाते ।

    फुग्यापरी जातां फूटूनी, दुःख सारे जीवनीं आणिते ।।

    दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी ।

    केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत ।।

    प्रेम वाढते प्रभूसहवासे, निस्वार्थी भक्ती त्यांत वसे ।

    समरस होता एक रुपानें, वियोग मिटतो क्षणाक्षणाणे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • कवच

    आघात होवूनी परिस्थितीचे, सही सलामत सुटत असे

    संकटाची चाहूल लागूनी, परिणाम शून्य तो ठरत असे...१,

    दु:खाची ती चटकती उन्हे, संरक्षणाची छत्री येई

    कोणती तरी अदृष्य शक्ती, त्यास वाचवोनी निघून जाई....३,

    दूर सारूनी षडरिपूला, मनावरती ताबा मिळवी

    प्रेमभाव तो अंगी करूनी, तपशक्तीला सतत वाढवी...३,

    तपोबलाचे बनूनी कवच, फिरत होते अवती भवती

    दु:खाचे ते वार झेलूनी, रक्षण त्याचे सदैव करिती.....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • हृदय नावाची चीज

    भूकंपाच्या एक एक धक्क्याने
    सारं जमीनदोस्त केलं |
    पहाता पहाता त्या भेगांनी
    होत्याच नव्हतं केलं ||१||

    ज्वालामुखीच्या मुखातून
    लाव्हा भळभळतअसताना |
    प्रत्येक वस्तू खाक होत होती
    त्याला अंगावर घेताना ||२||

    हे सारं लोभस दिसत होतं
    दुरुन पहाताना |
    मीच माझा राहू शकलो नाही
    हे अनुभवताना ||३||

    म्हणून वाटतं या जगात
    प्रत्येक माणसाला |
    हृदय नावाची चिज तरी
    हवी स्वत;चीच असायला ||४||

    मग प्रत्येक जण सुखी असेल
    सारं जग सुखी असेल |
    अरे कुणीतरी जगा असे
    हे सारं अनुभवायला ||५||

  • विसरायचं म्हणलं तरी

    विसरायचं म्हणलं तरी
    मन अधिक भरकटत
    किती आवरा मनाला
    नको तिथं गुंतून जातं...
    ओल्या आठवणी साऱ्या
    कातरवेळी मनात तरळतात
    डोळ्यांतील अलगद थेंब मग
    पापणी आड जमा होतात...
    आठवणींचं गाठोडं कस
    अलगद हलकं करायचं ?
    रित्या मनाला खोलवर
    कस सावरुन घ्यायचं...
    नको होतात मग रात्री
    तुझी आठवण ती येता
    हळवे होते मन त्या वेळी
    रात्र सुनी अबोल होते तेव्हा...
    वळणावर चालतांना मग
    मन नक्कीच गुंतून जातं
    सोडायच्या वाटा वळणावरील
    तो मार्ग सहज सोप्पा नसतो...
    भिजलेले मन हलकेच तुझ्या
    मिठीतल्या आठवणीत रमते
    मन गुंतत जाते अधिक तेव्हा
    मनाचे खेळ न कोणास कळते...
    आठवणींच्या उंच झरोक्यात
    कवडसा ही निःशब्द होतो
    दिसत नाही जखमा काही
    पण काटा नक्कीच बोचतो...
    तुझ्या मिठीच्या चांदण्यात
    अलवार मी मोहक गंधाळते
    तुला न कळले चांदणे ते
    रेशमी धाग्यात मी गुंतले..
    काहूर मोहाचे अंतरी उठता
    तू नक्कीच मनात असतो
    भावनेत मी बंदिस्त होते
    अलवार तू हृदय अंगणी मोहरतो...
    -- स्वाती ठोंबरे.
  • बाह्य अडथळे

    एकाच दिशेने जातां,

    प्रभू मिळेल सत्वरी,

    रेंगाळत बसाल तर,

    गमवाल तो श्री हरी ।।१।।

    तुम्ही चालत असतां,

    अडथळे येती फार,

    चालण्यातील तुमचे,

    लक्ष ते विचलणार ।।२।।

    ऐष आरामी चमक,

    शरिराला सुखावते,

    प्रेम, लोभ, मोह, माया,

    मनाला ती आनंदते ।।३।।

    शरिराचा दाह करी,

    राग द्वेष अहंकार

    मन करण्या क्षीण,

    षड् रिपू हे विकार ।।४।।

    सुख असो वा ते दु:ख,

    बाह्यातील अडथळे

    सारेच सारता दूर,

    प्रभू तुम्हास मिळे ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • निर्मोही गंगामाई

    ही पुण्यदा गंगामाई
    हिचाच अगम्य डोह

    डुंबता मनी प्रसन्नता
    तिचाच मजला मोह

    सुखदुःखा गिळूनिया
    अविरत तिचा प्रवाह

    नाही कुणाचाच द्वेष
    तिचाच मजला मोह

    ती विरक्तीचा सागर
    तिच्यात शमतो दाह

    ती भगिरथाची गंगा
    ठायी तिच्या निर्मोह

    जीवनांतीगंगोदक
    दृष्टांत मुक्तीचा सोहं!

    (सोहं --- ब्रह्मानंद!)

    -- वि. ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१५०.

    १३ - १२ - २०२१.

  • आत्म्याचे मिलन

    आत्म्याचे मिलन परमात्म्याशी,

    हेच जीवनाचे ध्येय असे,

    आत्मा ईश्वरी अंश असूनी,

    त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।

    देह पिंजऱ्यांत अडकता,

    बाहेर येण्या झेप घेई तो,

    अवचित साधूनी वेळ ती,

    कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।

    कार्य आत्म्याचे अपूरे होता,

    पुनरपी पडते बंधन,

    चक्र आत्म्याचे चालत राही,

    मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • शरद ऋतू

    दिसभर उकाडा हा
    कुणासही सोसवेना
    त्यावर फुंखर म्हणून का
    केशरी चंद्राच्या दुधाळ चांदण्यांची शितलता...

    आश्विन पोर्णिमेसी वाढली निरभ्रता,सवे पिठूर चांदण्यांची मोहीनी मनाला....

    अंबाबाईचा उत्सव जोडीला भुलाबाईचा जागर
    शिव-पार्वतिचा संगम...

    झाला दिवस लहान,आता होई रात्र महान
    त्या रात्रीला ओवाळण्यास
    दिपावली आली सत्वर...

    शरदाचे हे दिवस सुगीचे
    शेतकरी राजा
    सुखी शय्येवरी आरामात निजे....

    सौ.माणिक
    (रुबी)