(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ये ज़वळ बस (स्मृतिकाव्य)

    ‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं,
    मी बसलोही
    क्षीण तुझा कर करीं घेउनी
    सुखावलोही .
    नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू
    काय व्हायचें होतें
    ‘उद्या’च येथुन कायमचें तुज
    दूर ज़ायचें होतें.

    - - -
    ( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता
    हिच्या आठवणीत )

    -- सुभाष स. नाईक

  • खेचून मिळवा

    तो तर देत नसतो कांहीं,
    घ्यावे लागते खेचूनी ।
    शक्ती लावूनी खेचा सारे,
    देईल परि ढील सोडूनी ।।

    जरी असला दयेचा सागर,
    केवळ मागणें मान्य नसे ।
    तुटून तुमचे प्रयत्न होता,
    ओजळीने तो देत दिसे ।।

    व्यर्थ घालवी जीवन कांही,
    स्वार्थीपणाच्या मागणी पायी ।
    वेडे ठराल तुम्हींच परि,
    काळ मात्र कधी थांबत नाही ।।

    धडपड करा, लुटून घ्या
    सांघिकतेच्या भूमिकेतूनी ।
    जाच न होई दुजास त्याचा,
    हीच भावना उरी बाळगूनी ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • निसर्ग आणि मन (चारोळी)

    *निसर्ग*
    अद्भुत घटनांनी भरलेला
    कविंना वेडावून सोडणारा
    तुझ्या चमत्कारांनी मी भारावलेला
    या मानवाला गुढतेत ढकलणारा

    *मन*
    मन हे चपळ चपळ
    कधी इथे तर कधी तिथे
    मन हे उथळ उथळ
    कधी रडे तर कधी हसे

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • क्षणाचा भरवसां

    तुमचे वागणे , बोलणे
    कुणाला समजत नाही
    असे कधी समजू नका
    फक्त कुणी बोलत नाही
    वादविवाद नको म्हणूनी
    संघर्ष कुणी करत नाही
    मौनं सर्वार्थ साधनम.
    या शिवाय शांती नाही
    मनामनाला जपत रहावे
    याविण , दूजे सुख नाही
    अध्यात्म ही आत्ममुखता
    मीत्व कधी मिरवणे नाही
    केवळ स्वतःचा शोध घेणे
    याविण जीवना अर्थ नाही
    परस्पर प्रेमळभाव जपावा
    याविण दूजे सत्कर्म नाही
    श्वास ! हा बुडबुडा क्षणाचा
    इथे उद्याचा भरवसां नाही
    उगा हवेत कशाला हेवे दावे
    मृत्युसंगे , काही येणार नाही
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १२१.
    २१ - ४ - २०२२.
  • धन्य ती महाराष्ट्र माऊली !

    कृष्ण कमळ-

  • माझा जन्म

    माझाच जन्म व्हावा
    म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं...

    माझ्या जन्माचं कोडं
    त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं...

    माझा जन्म आता
    मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं...

    मला शक्य असतं तर
    या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं...

    किती बरं झालं असतं
    या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं...

    © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
    दिनांक – 9 मार्च 2016

  • शब्द फुले

    माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार,

    अर्पित जातो ते, प्रभू चरणांवर....१,

    राम नाम जपत, कुणी एक येतात

    घटकाभरासाठी, विश्रांती ते घेतात....२,

    रोज देती मजला, ओंजळभर फूले

    कोणत्या बागेतली, कधी न सांगीतले....३,

    त्यांच्याच सांगण्याने, हार मी गुंफीतो

    बघतात कौतुकें कसा मी अर्पितो....४,

    फूलांची ओंजळ ती, नव्हे तो तर शब्दांचा ठेवा,

    कवितेच्या रचनी, उपयोगी पडावा....५,

    शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो

    विषय मिळूनी, काव्य मी रचीतो....६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • तृप्तीचे आभाळ

    गुलमुसलेली सांज केशरी...
    गतआठवांचे थवे नभाळी...
    भावनांचे अंतरंग लाघवी...
    शब्दांचे प्रतिध्वनी नभाळी...
    स्वरगंगेत नाहता भावप्रिती...
    गोधुलीची ही सांज आगळी..
    मनस्पर्श तुझा गं स्वर्गानंदी...
    प्रीतभारली तू कोमलकळी...
    सत्यप्रीती , हे दान भाळीचे...
    मकरंद , अमृती हा मधाळी...
    तृप्तीचे आभाळ अलौकिक...
    घुमते पावरी हरिची नभाळी..
    सांजाळलेल्या केशरी उदरी..
    उमलणारी प्रभात सोनसळी..
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    रचना क्र. 61 / ६ - ५ - २०२१
    ( मुक्तरचना)
    ?9766544908
  • चांदण्याना पण साथ हवी असते चंद्राची

    चांदण्याना पण साथ
    हवी असते चंद्राची,
    सरिता अंतिम सागरात
    हळुवार विलीन होते.
    मग स्त्रीला पण हवी
    असते गरज पुरुषाची..
    अपूर्ण आहे दोघे एकमेकांशिवाय,
    खरं स्त्रीत्वाचे अनेक नाजूक
    पैलू पुरुषाला खुणावतात..
    मग स्त्रीला पण खुणावत असतात
    पुरुषातील पुरुष सौंदर्य असतं, ते म्हणजे
    पुरुष जिगर, हिम्मत, पुरुष बाणा!
    अनादीअनंत काला पासून हे
    चक्र चालू आहे...
    ह्या भाव विभोरातून तो निलवर्णी सावळा
    कृष्ण पण सुटला नाही ..
    तर मग आपल्या सारख्या
    सामान्य लोकांनी ह्या विभोरात
    फक्त झोकून द्यायचं...
    ह्या जाणिवेत गुंतून जातो पुरुष,
    आणि स्त्री पण गुंतून जाते..
    भावना आणि मन नाजूक
    झालं की जाणिवा बद्ध होतात,
    गुंतलेल्या भावनांना सोडणं
    की धरण हे भाव विभोरावर असतं..
    पण सत्य हेच की गुंतल जातं
    त्याला मन म्हणतात..
    आणि भावना उत्कट होतात
    तेव्हा मन एकमेकांत जुळतात..
    स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय
    अपूर्ण हे सत्य अंतिम ठरतं...
    मग त्या उत्कट भावनेत वाटा
    गंधाळल्या तर दोघेही बरोबर
    किंवा दोघेही चूक...
    एक भाव आणि एक मन
    ह्यांच हितगूज म्हणजे एक
    स्त्री मन आणि एक पुरुष भाव
    यांचं उत्कट गंधित मनोमिलन..
    -- स्वाती ठोंबरे.
  • आनंदी भाव हाच भगवंत

    गेले सारे आयुष्य परि न कळला ईश

    इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं ।।१

    बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ

    मनाची एकाग्रता केली शरीरा करिता ।।२

    तरुणपणाची उमेद जिंकू वा मरु ही जिद्द

    करुन प्रयत्नांची पराकाष्टा बनवी जीवन मार्ग निष्ठा ।।३

    संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण

    वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव ।।४

    काळ येता वृद्धत्वाचा दाखवी मार्ग अनुभवाचा

    भजन पुजेत जाई वेळ ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।५

    आता झालो देह दुर्बल प्रभू चिंतनात जाई वेळ

    वाट बघतो निरोपाची ओढ फक्त जगदंबेची ।।६

    आयुष्य संपता सारे खंत येऊन मन विचारे

    कां न प्रभू भेटला ह्याची रुखरुख मनाला ।।७

    आत्म चिंतन करिता जाणवे मी भगवंता

    ईश्वर निर्गुण निराकार कर्म करी त्यास साकार ।।८

    दया क्षमा शांती ह्याच ईश्वराच्या शक्ती

    आयुष्यातील आनंदी क्षण हीच ईश्वराची खूण ।।९

    जीवनांतील समाधान ईश्वर प्राप्तीचे लक्षण

    नसावी मनी खंत आनंदी भाव हाच भगवंत ।।१०

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०