(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्मरण असू दे

    हे जगदंबे ! सदैव होते नाम मुखी गे
    लोप पावले आज कसे ते तू मज सांगे.....१

    लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी
    धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी....२

    काही हवेसे वाटू लागले एके दिवशी
    विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी....३

    आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती
    गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती....४

    तगमग करूनी तेच मिळविता आज
    कल्पना विलास होता तो झाली ही समज....५

    खिळवू नकोस मनास गे बाह्य जगाभोवती
    स्मरण असू दे तव नामाचे ओठावरती....६

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • बदलते भाव

    कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते

    राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते....१

    देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले

    अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले....२

    देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी

    केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी...३

    जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून

    भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • सत्य शाश्वताचे

    सांज क्षितीजी थबकता
    रंगले आभाळ भावनांचे
    शिंपण, अंतरी अमृताचे
    मनी भास ते अमरत्वाचे...

    उजळलेली तिन्हीसांजा
    आविष्कार, कृतार्थतेचे
    जरी ही गात्रे पांगुळलेली
    शांत मनात भाव मुक्तीचे...

    जीव ! स्मृतीत गुंतलेला
    नाद अंतरी टाळमृदुंगाचे
    मन, सारे विठ्ठल विठ्ठल
    संकीर्तनी सत्य शाश्वताचे...

    यावीण दूजे सुख कोणते
    अहोभाग्य जन्मोजन्मिचे
    तोच सावळा एक कृपाळू
    अंतरंगी सुर मुग्ध पावरीचे...

    –वि.ग.सातपुते (भावकवी )

    9766544908

    रचना क्र. २०५

    १७/८/२०२२

  • सर्वात तोच आहे

    अगणित तारे जीव जीवाणूं ।
    अथांग विश्व अणू रेणू ।।

    रंगरूप हे नेत्री दिसती ।
    भिन्न भिन्न राहूनी जगती ।।

    रस गंध दरवळे चोहीकडे ।
    जगण्याचा तो मार्ग सापडे ।।

    हे जर आहे रूप ईश्वरी ।
    बघती त्याला आमुच्या नजरी ।।

    सुख दु:ख ही त्याची निर्मिती ।
    फिरे सदा आमचे भोवती ।।

    निराकार निर्गुण, म्हणती त्याला ।
    म्हणूनच तो साऱ्यात सामावला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • निर्मोही

    निर्मोही गुंतावे
    स्वांत सुखाया
    लाभते मन:शांती
    अंतरा सुखाया....

    सुखदुःख क्षणाचे
    संवेदनांची छाया
    हाच जन्म मानवी
    जगुनीया जगवाया....

    खेळ सारे भावनांचे
    भावशब्दात गुंफाया
    जपावित मनेमने
    अंतरंगा जाणुनिया.....

    सावरीत जीवाजीवा
    सुखवावी मन:काया
    अशाश्वती स्पंदनांची
    सारी मृगजळी माया....

    सत्य एक अनामिक
    त्याची कृपाळू छाया
    नित्य त्याला भजावे
    तोच येतो सावराया....

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२२३

    २/९/२०२२

  • जातीची दांडगाई आणि ज्ञानेश्वरांची मराठी

    ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे.

  • झगडणारे जीवन

    गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे ।
    जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे ।।

    निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा ।
    झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या ।।

    दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं ।
    आज दुवा नसता सारे पडती पाठी ।।

    तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे ।
    वंशाने जे मिळे त्याला, जीवन झगडा देणारे ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तारकापुंजाचे कौतुक व्हावे

    तारकापुंजाचे कौतुक व्हावे,
    चंद्राचे तर नेहमीच असे,
    अवतीभोवती चांदणं घोळका,
    तरच चंद्र उठून दिसे,--!!!

    खरेतर चंद्रावरती, डाग किती,
    चांदणे केवढे असते निखळ,
    लुकलुकण्याची किमया त्यांची,
    चंद्राच्या तर न गावी निव्वळ,--!!

    नियम दुनियेचा कठोर असे
    मोठा तोच पुढे येतो,
    लहानांना विसरती सारे,
    मोठेपणाच श्रेष्ठ ठरतो,--!!!

    चांदण्यांची सैर चालू,
    अहोरात्र, दिनांतरी,
    चांदव्याचा खेळ चालतो,
    आमुच्याशी निरंतरी,--!!!

    ढगाढगांतून तो लपतो,
    करीत रासलीला,
    एकेकीशी चांद खेळतो,
    चांदण्या बनती गोपिका,

    फेर धरुन त्याच्याभोवती,
    जी ती तारका नाचते,
    अनुरागाचे अमृत पाजत,
    त्याला संतुष्ट करते,--!!!!

    कधीतरी दखल घ्यावी,
    दुनियेने आमुचीही,
    आमच्यावाचून आभाळाचा,
    पट रिकामाच राही.....!!!!

    हिमगौरी कर्वे ©

  • त्याला हवा तसा हवा तेव्हा

    त्याला हवा तसा हवा तेव्हा त्याचा
    टाईमपास तिच्याबरोबर झाला
    तिच्या दुखऱ्या मनाच्या अजून
    मग चिंधड्या लाख उडल्या..
    आता ती किती चूक हेच
    फक्त त्याच्या लेखी उरलं
    कितीही अपमान त्याने केले
    तरी तीच दुःख त्याला न कळलं..
    मन आणि भावनांची तिची कहाणी
    त्याला कधी कळणार नाही..
    तिच्या मनाची जाणिव त्याला
    दिसणार कधीच ती नाही..
    त्याचा ती टाईमपास झाली
    तिला तो आवडला हीच चूक तिची झाली
    तो पुरुष आणि ती स्त्री हाच फरक उरला
    तिच्या मनाचा गाभा त्याला न कळला..
    प्रश्न मिटवले लोकं आयुष्यातून खोडूनी
    तरी आठवणी मिटत कधीच नाही
    बहर कसाही असो मनाचा ओला
    ऋतुचक्र बदलते पण मन पुन्हा उमलत नाही..
    -- स्वाती ठोंबरे.
  • घरटं जपायला हवं

    तू आहेस ना घरट्यात
    मी आत्ता आलो'
    असं म्हणून तो गेला
    तेव्हा मला दिसला - अपरंपार विश्वास
    .त्याच्या डोळ्यात
    दूरदेशी जाताना लढावं लागलंच
    तर आपले जायबंदी पंख घेऊन
    तो येईल माझ्याचकडे
    किंवा टिपलेलं सोनं मोती
    आणून देईल माझ्याच पदरात !
    त्याच्या डोळ्यातला विश्वास - मला जपायलाच हवा !
    हसरं चिवचिवतं चिमणंपाखरू घरट्यात शिरलं
    तर त्याला मी दिसलेच नाही
    त्याला मी हवी होते.
    त्याच्या दृष्टीत पोरके अश्रू तरळले
    तेवढ्यात त्याला मी दिसले
    आणि पाखरू चिवचिवलं हसून पुन:
    त्याच्या हसण्यानं घरट्यामध्ये आभाळ थिटं झालं
    त्याचं हसणं मला जपायलाच हवं !
    एकदा मीही आभाळात गेले
    परतल्यावर दिसली त्याच्या नजरेत माझी प्रतीक्षा
    आणि चिवचिवत पाखरू माझ्या गळ्यात पडलं
    तेव्हाच ठरवलं -
    आभाळ निसटलं हातातून तरी चालेल
    घरटं जपायला हवं!

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे