सय माहेराची येते
मन झुलते झुलते
क्षणात माहेरी जाते
मी तिथेच रमते।।१।।
आहे प्रेमाचे आगर
तिथे मायेचा सागर
घडे प्रितीचा जागर
हा बंधू भगिनीत।।२।।
हे केवड्याचे कणीस
सुगंध रातराणीस
बकुळ माळे वेणीस
परसदार खास।।३।।
मित्र मैत्रिणींचा मेळा
जमतो ना वेळोवेळा
झिम्मा फुगडीही खेळा
हा मैत्रीचा सोहळा।।४।।
आई माझी सुगरण
करी पुरण वरण
मिळे स्वादिष्ट भोजन
अगत्याचे योजन।।५।।
आठव साऱ्या साऱ्याची
मनी पिंगा घालायाची
अडसर संसाराची
ओढ ही माहेराची।।६।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
साडी चोळी सुंदर नेसूनी,
आभूषणें ती अंगावरती,
लज्जा सारी झांकुनी टाकतां,
तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।।
आत्म्यासम ती लज्जा भासे,
सौंदर्य जिवंत त्याच मुळें,
लोप पावतां लज्जा माग ती,
जिवंतपणा तो कसा कळे ।।२।।
लपले असते सौंदर्य सारे,
एक बिंदूच्या केंद्रस्थानीं
शोध घेण्या त्याच बिंदूचा
लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।।
विकृत ती मनाची वृत्ती
स्वच्छंदीपणात ती असते
क्षणिक पणाच्या मागें लागून
खरा आनंद ती गमावते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
पत्र लिहावे मित्रा
पत्र लिहावे आप्ता
मित्र आणि आप्त
थोर नशीबाने प्राप्त
पत्र आनंद लिहिण्याचा
पत्र आनंद वाचण्याचा
पत्र आनंद खरडण्याचा
पत्र आनंद जाणावा घरोघरी
येता दिवाळी दसरा
पत्र आनंद पसरा
पत्र आनंदाची रांगोळी
पत्र खुसखुशीत कडबोळी - जाण बाबा
पत्र महिमा पुरातन
संस्कृतीचे साधन
मानवाचे भूषण
संस्कृतीचे लक्षण - जाणिजे
-- विनायक अत्रे.
एकाच दिशेने जातां,
प्रभू मिळेल सत्वरी,
रेंगाळत बसाल तर,
गमवाल तो श्री हरी ।।१।।
तुम्ही चालत असतां,
अडथळे येती फार,
चालण्यातील तुमचे,
लक्ष ते विचलणार ।।२।।
ऐष आरामी चमक,
शरिराला सुखावते,
प्रेम, लोभ, मोह, माया,
मनाला ती आनंदते ।।३।।
शरिराचा दाह करी,
राग द्वेष अहंकार
मन करण्या क्षीण,
षड् रिपू हे विकार ।।४।।
सुख असो वा ते दु:ख,
बाह्यातील अडथळे
सारेच सारता दूर,
प्रभू तुम्हास मिळे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मनावरचं ओझं हलकं करायला शिका.
प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकत नाही,
हे सत्य हसत स्वीकारायला शिका.
ज्यांनी साथ अर्ध्यावर सोडली,
त्यांच्यावर रुसत बसू नका.
स्वतःच्या आनंदाच्या शोधात,
नव्या वाटा चालायला शिका.
गेल्या क्षणांच्या सावल्यांत,
वर्तमान हरवू देऊ नका.
कालच्या वेदना विसरून,
उद्याच्या आशेला कवटाळायला शिका.
सोडून देणं म्हणजे पराभव नव्हे,
तो आत्मविश्वासाचा नवा आरंभ असतो.
मन मोकळं करून जगताना,
खरा आनंद स्वतःमध्येच सापडत असतो.
सोडून द्यायला शिका...
कारण काही गोष्टी हातातून निसटल्या,
की आयुष्य आपल्याला
स्वतःची खरी ओळख करून देतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
यावर्षी बळीराजाला,
सोयाबिननं तारलं !
पण जगाच्या पोशिंद्याले,
मजुरीनं मारलं !!१
...
हजार रुपय एकरानं,
मागील वर्षी सोंगलं !
दोन हजार एकरानं,
मजुर यंदा बोंबलं !!२
...
मळणीवाला म्हणतो मला,
दोनशे रुपये पोतं !
मी म्हटलं त्याचा काय,
आता जीव घेतं !!३
...
आलं आभाळ, झाकण्यासाठी,
ताडपत्री नेतो !
दोन हजारानं इथे त्याचा,
खिसा कापला जातो !!४
...
एवढ सार करुन सोयाबीन,
बाजारात नेतो !
ओलं आहे म्हणून भाव,
सोळाशाचा येतो !! ५
...
घरी आल्यावर सारा हिशेब,
चुकता करुन देतो !
हाती नाही राह्यलं काही,
म्हणून रोगर घेवून घेतो !!६
...
यासाठीचं म्हणतो शेतक-याचा,
वाली कोणी व्हा रे !
नका देवू दुजे काही,
हिंमत तरी द्या रे !! ७
...
असाचं जर बळीराजा,
जहेर पिऊन मेला !
आपलाही पुढे समजा,
खेळ खलास झाला !!८
...
सरकारच्या दरबारी,
आवाज उठला पाहिजे !
त्याच्यासाठी प्रतिनिधी,
आमचा झटला पाहिजे !!९
...
जय किसान जय जवान,
आठवा आता नारा !
दोघांसाठी खरचं आता,
काहितरी करा !!१०
...
फेसबुकवरुन आलेली ही कविता... कवी अज्ञात
प्रेषक - विनय साटम
स्वरांच्या नभात आज… एक तारा हरपला…
गंध सुरांचा देत देत… शांत निजून गेला…
ओठांवरती गीत तिचे… अजूनही दाटते…
आशाताईंच्या आठवणींनी… मन हे भरून येते…
कधी लावणीच्या ठेक्यावरती… रंग भरले…
कधी विरहाच्या वेदनेला… स्वरांत गुंफले…
कधी खट्याळ… कधी कोमल… कधी दर्दभरी तान…
प्रत्येक सुरात झंकारली… तिच्या स्वरांची शान…
“पिया तू…”च्या लयीत… धुंद जग हे झाले…
“दिल चीज क्या है”… म्हणता… काळही थबकले…
मराठी भावगीतांत… तिचे ममत्व दाटले…
नाट्यगीतांच्या ओव्यात… स्वर मोत्यासारखे वाटले…
जीवनात दुःखांचे वादळ… जरी वाहिले…
तरी हास्य ओठी ठेवून… ती गातच राहिली…
जिद्दीच्या त्या ज्योतीने… नभ उजळून गेले…
स्वतः जळत जळत… कित्येक जीव पेटवून गेली…
आज देह गेला… तरी तिचे स्वर अमर राहतील…
प्रत्येक पिढीच्या श्वासात… तिचे सूर वाहतील…
आशा नावाची ती… केवळ गायिका नव्हती,
ती… भारतभूमीच्या कंठातील अमर स्वर होती…
*आशाताई…*
तुम्ही गेलात…
पण तुमचा आवाज…
आमच्या हृदयात…
आमच्या श्वासात…
आणि या देशाच्या प्रत्येक सुरात…
सदैव जिवंत राहील…
*भावपूर्ण श्रद्धांजली.*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
आम्ही साहित्यिक आहोत
रमू सदैव लेखणीत
लिखाणात भाव असोत
चलाख शब्द पेरणीत
सौ.माणिक शुरजोशी
छेडछाड, बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण..महाराष्ट्रात २०१० सालातील छेडछाडीच्या एकूण गुन्ह्यांपैकी फक्त 5 टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील सन २०११ पर्यंत दाखल झालेल्या एकूण १,६१,५२८ गुन्ह्यांतील फक्त १७ टक्के आरोपींना शिक्षा झाली आणि उरलेले ८३ टक्के गुन्हेगार कोर्टात सुटल्याची धक्कादायक माहिती.या गुन्ह्यांपैकी ४४,८७४ गुन्हे गंभीर स्वरूपाचे.
Copyright © 2025 | Marathisrushti