(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बापू….

    बापू,
    आजही तु दिलेल्या टोपीच्या,
    झाकणाखालून सडलेल्या मेंदूतले,
    नासके विचार वाहू लागतात ना
    तव्हा मलं तुह्या अहिंसेतुन जन्मलेल्या
    मुक्त स्वातंत्र्याची किंमत कळते....!!!

    बापु,
    तुलं ते एकदा न कदा मारू शकतात रे,
    पण जव्हाबी तेह्यनं तुलं,
    मारायचा प्रयत्न केला नं,
    तव्हा तव्हा तु रक्तबीजासारखा
    पुनर्जिवीत झालास...!!!
    वांझुट्या विचारांच्या आडुन त्यांनी तुलं,
    मारायचा खुप प्रयत्न केला,
    टोप्यांना वेगवेगळे रंगही दिले,
    तरी पण त्या जहाल विखारांतुन तु,
    चकाकुनच निघालास....!!!

    बापु
    आजही तुह्या सत्य,अहिंसेच्या विचारावरच
    हि पृथ्वी तगुन आहे....!!!
    जव्हा तेह्यनं तुव्हा बापच काढला नं,
    तव्हा तं मव्हबी डोकं भनकु लागलं,
    पण तुह्याच विचारानं,
    मह्या डोक्यातीलं आग शांत केली...!!!
    बापु भलेही तेह्यनं तुही हत्या,
    बंदुकिच्या गोळीनं केली असेल
    पण तुह्या विचारांची हत्या,
    ते कोणत्या बंदुकीनं करतीलं...?

    बापु,
    तेह्यनं धर्माची अफु लोकांना चारली,
    तुह्या सत्याच्या प्रयोगावरही टिका केली,
    तुव्ह लंगोट काढुन वस्त्रहरण करू पाह्यलं,
    तुव्हा बापबी काढला अन विचारांचा,
    विखारी सापबी तुह्यावरं सोडला,
    तरी तु टस का मस झाला नाहीस,
    भलेही तेह्यनं कपटानं तुह्या शरीरावर
    गोळ्या झाडल्या असतीलं रे,
    अन तुही “हे राम!” म्हणत,
    धारातीर्थी पडला असशीलं...
    पण तुह्या विचारांतला “राम”
    ते कव्हाच मारू शकणार नाहीतं.....!!!

    ©गोडाती बबनराव काळे
    9405807079

      August 5, 2023


  • नातं

    काय होतं कुणास ठाऊक देवासंग नातं
    अनवाणी चालत कुत्रं वारीला गेलं होतं
    पाऊसपाण्यात जरी भिजलं होतं अंग
    विठ्ठलाच्या गजरात तरी झालं होतं दंगं...!

    चंद्रभागेच्या पाण्यात अंग ओलं केलं
    मनात घेऊन वेडा भाव पायरीशी गेलं
    दारामागच्या देवाला भेटणार तरी कसं
    माणसांपुढे बिचा-याचं झालं होतं हासं.!

    माणसाचा देव माणसांसाठी असतो
    ज्याच्या खिशात पैसा त्यालाच तो दिसतो
    पायरीवर बसून शेपूट हालवू लागलं
    देवाला भेटण्यासाठी रातभर जागलं..!

    निराश होऊन सकाळी मागे फिरलं
    रस्त्यावरचं भटकं म्हणून त्याला धरलं
    गाडीत घालून त्याला कुठेतरी नेलं
    पाप्यांच्या दुनियेत जिवानिशी गेलं...!!

    .... राजेश जगताप, मुंबई
    ९८२१४३५१२९

      March 13, 2023


  • कृष्णमेघना

    झाकोळल्या नभांगणी
    कृष्णमेघना अनावर...

    जीवा, ध्यास श्रावणी
    सरसरसर धारा सुंदर...

    वर्षा ऋतू बरसणारा
    स्पर्श ओलेता मनोहर...

    शब्द गझला अर्थवाही
    भावगंधी ओंजळ सुंदर...

    चिंबचिंबली पानफुले
    झुळझुळतो नाद सुंदर...

    अतर्क्य रूप चैतन्याचे
    लावण्य रुपडेच मनोहर...

    नाचत नाचत येते वर्षा
    ओथंबलेले गगन सुंदर....
    ********
    रचना क्र. ७८

    २०/७/२०२३

    -वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

      August 12, 2023


  • रंग पहा नभांगणात

    रंग पहा नभांगणात,रोज कसे जमतात,
    एकत्र येऊन फिरतात,
    पंचमी साजरी करतात,--!!

    निळेशार राखाडी पांढरे,
    मेघांची लगीनघाई,
    इकडून तिकडे जाती कुठे ? बघणाऱ्यांना ठाऊक नाही,--!!!

    प्रभात काळी एकेक रंग,
    उषा क्षितिजावर उधळते,
    पिवळे निळे काळे तांबडे,
    त्यात सोनसळी भर असे,--!!!

    कुठून येई,लख्ख प्रकाश ,
    खजिनाच वर वर येई,
    ढगांआडून प्रकाशदाता,
    सगळ्यांना आपुले दर्शन देई,--!!!

    सकाळ होता राज्य त्याचे,
    सम्राटाची सारी जादू ,
    रंग पिवळसर सोनेरी,
    लागतो पसारा मांडू,--!!!

    श्यामल संध्या गगनी येतां,
    पुन्हा रंगांचीच लीला,
    तांबडे निळे राखाडी सोनेरी,
    क्षितिजावर पखरण होतां,--!!!

    वसुंधरेवर तम टाकते,
    आपले पहिले पाऊल,
    जसा सूर्या घरी निघतो,
    होता तांबूस संधिकाल,--!!!

    काळा रंग आता पसरे,
    महत्त्व त्याचे येता रजनी,
    नभी दुधी चांदणे,उगवता,
    काळ्या ढगांस कडा रुपेरी,--!!!

    हिमगौरी कर्वे ©

      May 11, 2019


  • मीरेची तल्लीनता

    नाच नाचती तालावरती

    मीरेची पाऊले

    चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ

    लागला प्रभुचा ध्यास

    हरि दिसे नयनास

    चलबिचल नजर होऊन

    अंग सारे मोहरले - - -१

    चित्त ते हरीमय जाहाले

    न राही आपले भान

    झाली भजनी तल्लीन

    तनमन प्रभुचे ठायी जाता

    संसार ते विसरले. - - - २

    चित्त ते हरीमय जाहाले

    विषाचा घेता प्याला

    हरि तो त्यातची दिसला

    झेपावूनी गेली त्याच क्षणी

    घट घटा प्राशन केले. - - - ३

    चित्त ते हरीमय जाहाले

    जहाल होते विष

    मृत्युचा तो पाश

    प्रभूभक्तीच्या शक्तीने परि

    अमृत ते बनले - - - ४

    चित्त ते हरीमय जाहाले

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 25, 2019


  • लोकशाहीच्या नावाने चांगभलं…!!

    मतदान हा लोकशाहीचा उत्सव... चार दिवसांचा... त्या साठी आपले गावातील संबंध खराब करु नयेत, कर्ज काढून खर्च करू नये... हे सांगण्याचा प्रयत्न....

    `आम्ही साहित्यक फेसबुक ग्रुप'चे लेखक श्री रघू देशपांडे, नांदेड, यांची ही रचना


    गावोगावी वेशीवर
    लोकशाहीचा नगारा
    गल्लीच्या कुशीवर
    भाऊबंदकी नजारा...
    जातीपातीची वाटणी
    गोळाबेरीज मांडली
    गावएकीची चटणी
    सत्तेपायी वाटली...
    गोंधळ जागवला
    स्वार्थी कुरघोडीने
    अख्खा गाव नागवला
    रात्री अफाट खर्चाने...
    क्षणांचे राजकारण
    भिंती घातल्या मनात
    भाऊ भाऊ करीती रण
    कोण किती तें पाण्यात..
    बॅलेटचे मतदान
    बुलेटने ठरु लागलें
    गावोगावी अन्नदान
    मदिरापान झडू लागले...
    आली आली लोकशाही
    गाव नशेने झिंगला
    कुणा एका पाटलाने
    आपला मळा विकला...
    अमाप खर्च करून
    लोकप्रतिनिधी जिंकला
    विकासाच्या नावा वरुन
    बेल भंडारा उधळला...
    यासाठी का दिले भावा
    संविधान भिमाने...?
    मतदान घ्यावे भावा
    आप आपल्या सत्कर्माने...!!
    -- रघू देशपांडे
    नांदेड

      January 4, 2021


  • सिलेंडरच्या भाववाढीने

     

      January 2, 2014


  • भावनेच्या आहारीं

    नको बनूस अविचारी
    जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।।

    प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले
    विवेक करण्या मनी यश तुला साधले
    नको घेऊं ऊंच भरारी ।।१।।

    जाऊनी भावनेच्या आहारी
    प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची
    विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची
    नको बनूस अहंकारी ।।२।।

    जाऊनी भावनेच्या आहारी
    बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी
    राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास गमवूनी
    नको जाऊस दारोदारी ।।३।।
    जाऊनी भावनेच्या आहारी

    प्रयत्न करिता यश मिळे विश्वास ठेवा मनी
    ज्ञानानी प्रश्न सुटती सगळे महत्व घे तूं जाणूनी
    कां मनाचा गोंधळ करी ।।४।।
    जाऊनी भावनेच्या आहारी

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 2, 2016


  • इंद्रधनू

    इंद्रधनू आले अंगणात
    अंगणात फुलली तुळस..
    इंद्रायणी काठी सजलेला
    सजलेला सोनेरी कळस ..

    तुकोबांच्या तरलेल्या गाथा
    गाथा संत वाणी बहुमोल..
    ज्ञानेश्वरी वेद पारायण
    पारायण सुख अनमोल..

    माळ तुळशीची गुंफलेली
    गुंफलेली नामजप माला..
    ओवाळू भावार्थे पांडुरंग
    पांडुरंग मनात वसला..

    उरावे फक्त विठ्ठल ध्यान
    ध्यान सावळा ठेवेल माझे
    देवा विठ्ठला भेटाया आलो
    आलो वरदान घेण्या तुझे

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

      June 9, 2026


  • गीता – जीवनाची एक उकल

    रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी
    जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ//

    अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती
    सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी
    कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते
    सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते त्याची
    तूं आहेस अर्जुना सोंगटी प्रभू ईच्छे फिरे पटावरी //२//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    कर तूं, नसे तुझे ते कर्म हा आहे केवळ प्रभूधर्म
    सोडून द्यावीस फलआशा न येई केव्हां तुज निराशा
    तत्वे सांगुनी आर्जुनासी संशय त्याचा दूर करी //३//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    विचार कर तूं आहेस कोण जाणार कोठे, येई कोठून
    चक्रे फिरती अनेक तूं आहेस त्यातील एक
    स्वतंत्र असूनी कांही अंशी अवलंबून तूं दुजावरी //४//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    गीता सांगे अपूर्व ज्ञान जीवनाची करी उकलन
    प्रश्न त्यांचे सारे सुटती आत्मचिंतन जेव्हां करिती
    केवळ समजतां गीतेला खरें समाधान लाभे उरीं //५//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      August 24, 2015