(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • भावशक्तीची देणगी

    भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले

    करण्यास तव जवळीक, कामास तेच आले ।।१

    जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम

    उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म ।।२

    भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी

    पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी ।।३

    भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन

    नाचत गांत राहिली, केले तुझ पावन ।।४

    दया क्षमा शांतीचे भाव, करुणेमध्ये भरलेले

    त्यांत शोधता तुझा ठाव, आनंदी मन झाले ।।५

    सर्वस्व तुजला अर्पिता, पावन होतो भक्तासी

    भावनेची ज्योत पेटतां, कदर तुच करिसी ।।६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • दुःख

    दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे ।

    परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे ।।१

    आपण कर्म केलेले आपणचि भोगतो ।

    फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो ।।२

    आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना ।

    खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना ।।३

    इतरांसाठीं आहे ती भावना उदरीं ।

    सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी ।।४

    शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची ।

    नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची ।।५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • बालपणी रमतांना (ओवीबद्ध रचना)

    इवलेसे लहानसे
    होते विश्व ते छानसे
    चार भिंतितले कसे
    ते मोरपंखी जसे।।१।।

    मनमानी वागायचे
    हवे तेव्हा उठायचे
    दिस कोड कौतुकाचे
    पिलू आई-बाबांचे।।२।।

    भोकाड पसरायचे
    लोटांगण घालायचे
    ढोंगी बगळा व्हायचे
    खोटच रडायचे।।३।।

    पोट दुखतं म्हणावे
    घरी खुशाल लोळावे
    आईच्या मागे फिरावे
    अभ्यासाला टाळावे।।४।।
    बालपणी रमतांना
    गमती आठवतांना
    खुप खुप हसतांना
    गंमत वाटतेना।।५।।

    सौ.माणिक शुरजोशी

  • चौदहवी का चांद’ या चित्रपटाची ६२ वर्षे

    हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटात या चित्रपटाचा समावेश होतो. मोहम्मद सादिक दिग्दर्शित या चित्रपटात गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • सुदाम्याला ऐश्वर्य

    गरिब सुदामा बालमित्र , आला हरीच्या भेटीला

    बालपणातील मित्रत्वाची, ओढ येवूनी मनाला....।।

    छोटी पिशवी घेवूनी हाती, पोहे घेतले त्यात

    फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत....।।

    काय दिले वहीनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने

    झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने....।।

    बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते

    मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते....।।

    समोर असता सुदामा, काही न दिले त्याते

    द्विधा होऊनी मन:स्थिती, परत पाठवी रिक्त हस्ते...।।

    देवूनी ऐश्वर्याच्या राशी, सुदाम्याच्या माघारी

    मित्रत्वाच्या प्रेमभावाची, भेट देई श्री हरी....।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • लोपलेले श्रेष्ठत्व

    डोळे उघडून बघा तुम्हीं आपल्या देशाला ।
    महानतेची परंपरा दिसेल तुम्हाला ।।१।।

    जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी नाव होते त्याचे ।
    आज विसरलो महत्त्व सारे आपल्या पूर्वजांचे ।।२।।

    दोष असेल त्यांचा कांहीं सोडून द्यावा ।
    परि अभिमान हा परंपरेचा मनात ठेवावा ।।३।।

    डोळ्यांनी जे बघतो सारे सत्य समजता ।
    कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे चूक ठरविता ।।४।।

    कित्येक गोष्टीची उकलन होती वेदामध्ये आपल्या ।
    परि पुराणातील वांगी समजूनी फेकून त्या दिल्या ।।५।।

    आमचे जवळील ज्ञान गंगाजळ आम्ही विसरतो ।
    परकियांची कास धरूनी वाट भटकतो ।।६।।

    ते तर आहे महाठगते वेद नेई चोरूनी ।
    पिऊनी आमचीच ज्ञान गंगा चाले मान उंचावूनी ।।७।।

    विचार करावा थोडा याचा शांत चित्ताने ।
    मालक तुम्ही असूनी घराचे नोकर परि बनले ।।८।।

    अमेरिकेतील वैज्ञानिकाने नूतन शोध लाविला ।
    अनेक प्रयोगाचा आधार घेऊन निष्कर्ष मांडला ।।९।।

    गर्भाशयातील अर्भक देखील सारे ऐकू शकते ।
    चंचल त्याचे कर्णेद्रिये असूनी ध्वनी लहरी खेचते ।।१०।।

    विस्मित होतो सारे आपण प्रयोग हा जाणता ।
    परि सहजपणे विसरूनी जातो अभिमन्यूची कथा ।।११।।

    ऐके सुभद्रेचे बाळ तेजस्वी चक्रव्यूह भेद ।
    हुंकार निघाला गर्भामधूनी सांगे महाभारत ।।१२।।

    तेहतीस कोटी देव सारे फिरती आकाशी ।
    नारद मुनींचा संचार होता विश्व मंडळाशी ।।१३।।

    अंतराळी चालला मानवच्या दिसे दूरदर्शनी ।
    चेष्टा करितो नारदाची आम्ही गोष्टी त्या समजूनी ।।१४।।

    प्रवास करिता विमानातूनी आधुनिक जगाच्या ।
    करमणुकीसाठी कथा वाचतो पुष्पक विमानाच्या ।।१५।।

    दुर्बिण त्यांची घेवूनी आम्ही पाही दुरीचे तारे ।
    आर्यभट्ट इंदूमतीचे खगोल ज्ञान विसरून जातो सारे ।।१६।।

    विनाशाच्या काठी आहे जग आजच्या क्षणाला ।
    अमेरिका,रशियाची क्षेपणास्त्रे भिवविती जगाला ।।१७।।

    फार पुरातन काळी देखील महायुद्ध झाले ।
    कर्ण, अर्जून, भिष्म, द्रोण यांनी क्षेपणास्त्र वापरले ।।१८।।

    विसरतो आम्ही इतिहास सारा आपल्या भूमिचा ।
    वेद उपनिषदे ग्रंथ पुराणे हाच पुरावा त्याचा ।।१९।।

    सोन्यासारखी धरणी आमची आम्हां सारे देई ।
    कष्ट तुमचे तिजला मिळतां नंदनवन ते होई ।।२०।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • श्रीरामा, घन:श्यामा,sssss

    श्रीरामा, घन:श्यामा,sssss---
    घनघोर या काननी,
    किती पुकारु तुमच्या नावा,ssss-
    लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,--!!! ‌.
    अयोध्येस परतल्यावरी,
    बसले मी राणीपदी,
    आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,--
    त्यातच आणखी गोड बातमी,
    स्वर्गच दोन बोटे राहिला,--!!!

    कुणाची नजर लागली,
    ग्रहस्थिती विपरीत फिरली,
    तुम्ही का सोडले मज रानी,
    जावे कुठे एकाकी मी आता,--!!!

    मनोरथे सगळी संपली तुमची सेवा मनी राहिली,
    असे काय घडले सांगा तरी,
    काय चुकले माझे, पुरुषोत्तमा--!!!

    या रानीवनी मी एकटी,
    काट्यांत कोवळी कळी, हिंडताना-- भरकटलेली,
    या भयानक अरण्यी,
    नाही मज कुणीच त्राता,--!!!

    कुळाचा आपुल्या वंश पोटी,--
    जीव वाढे, माझिया ओटी,--
    पतीने पण सोडल्यावरी,--
    काय सांगू त्या लेकराला,-!!!

    उद्ध्वस्त सीता, उध्वस्त जानकी उध्वस्तताच या तिन्ही लोकी,
    कुठले राज्य कुठला पती,
    अर्थच जीवनात न राहिला,--!!!

    हिमगौरी कर्वे©

  • योगी सर्वकाळ सुखदाता

    चकोर पक्षी हा कोवळ्या चंद्रकिरणातील अमृत पिऊन जगतो अशी एक कल्पना आहे. चंद्रकिरणामधे शीतलता, मृदुता आणि संजीवकता असते. तिचा लाभ चकोराला होतो. असे हळुवार चंद्रकिरणांसारखे मृदुत्व योग्याच्या ठिकाणी असते. हे मृदुत्व आणखी कोणासारखे? तर पक्षिणीच्या पंखासारखे असते. आईच्या पंखांचा आश्रय हे पिलांचे सर्वस्व असते. कारण पंखांमुळे त्यांना उबारा मिळतो. पिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. योगी पुरुषांचेही असेच असते. त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मानसिक आधार लाभतो..

  • गिरनार यात्रा (एक नवे सदर)

    ‘गुरु शिवाय मोक्ष नाही’ जेंव्हा जेंव्हा काही अध्यात्मिक चर्चा ऐकल्या, वाचल्या  सर्वातून हा एकच निष्कर्ष निघाला. तशी मी फार कर्म-कांड करणारी नाही.

  • कालचा मी आणि आजची ती

    कालचा मी आणि आजची
    ती.... खूप फरक असतो का...
    खरा तर फरक त्याच्यामध्ये असतो
    तो आजचा होऊ शकत नाही
    आणि ती आजपण सोडत नाही
    ह्यामध्ये त्याचाही दोष नसतो
    तो काल मध्येच अडकलेला असतो
    आपली मुळे पार आंत गेली आहेत...
    त्याला माहित असते...
    पण त्याला आजचाही मोह असतोच
    मग ती आणि तो ऍडजस्ट करतात
    स्वतःला...
    तो वाट बघत असतो तिची
    मुळे रुजण्याची
    आणि ती मात्र
    वेलीसारखी पसरत रहाते
    मुक्तपणे......
    -- सतीश चाफेकर.