(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • चिमुकल पाखरू

    चिमुकल पाखरू
    आल माझ्या आगनी
    जन्म घेऊन माझ्या घरी
    वाढवल मी लाडाणी
    शाळा शिकवली मी तिला
    गुणवान बनवले न्यानाने,
    मुलगी असली तरीही
    मुलाची कमी कधी
    भासत नाही मला
    तिचे हसने ,तिचे खेळने
    हाच आधार माझ्या जिवनाला
    जानार लग्न करुन
    मला सोडुन
    घोर लागला या गरीब
    बापाच्या मनाला
    चिमुकल पाखरु
    आल माझ्या अंगनी.

    -- आर. एस्. शिरसाठ
    https://www.facebook.com/rajendra.shirsath.10

  • अभिलाषा

    ************
    मन मुक्त विरक्त आता
    अभिलाषा उरली नाही
    संवेदनाशून्य काळीज
    चिंता कशाचीच नाही....
    कोलाहल उगा अंतरी
    तो कधीच संपत नाही
    स्पंदनांची चाहूल संथ
    सामर्थ्य चैतन्यी नाही....
    उदय अस्त कालचक्री
    त्याला कधी अंत नाही
    सहज सुखा पांघरताना
    केवळ स्वार्थी होवू नाही....
    हरिहर जाणतो सर्वकाही
    तिथे कुणास सुटका नाही
    हे सत्यब्रह्मांडी सुर्यप्रकाशी
    याचा विसर मना पडू नाही....
    **********************
    -वि.ग.सातपुते.( भावकवी )
    रचना क्र. ९
    एप्रिल /२०२३
    9766544908
  • निसर्गाचे मार्ग वेगळे

    मार्ग निसर्गाचे सदा, निश्चित आणि अढळ ।
    चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ ।।१।।

    चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी ।
    करूया काही आगळे ठरवी विचारांनी ।।२।।

    आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे ।
    नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे ।।३।।

    परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती ।
    कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती ।।४।।

    करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे ।
    अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे ।।५।।

    जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी ।
    प्रवास केला वेगळा, हेच येते समजूनी ।।६।।

    मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते ।
    आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते ।।७।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सत्व रज तमो गुण

    त्रिभाव युक्त जीवन,

    सत्व रज तमो गुण,

    स्वभावाची अंगे तीन,

    सर्वात दिसून येती ।।१।।

    कांहीं असे सत्वगुणी,

    कांहीं असे रजोगुणी,

    काही मध्ये तमोगुणी

    दिसे निराळ्या प्रमाणीं ।।२।।

    प्रेम, दया, क्षमा, शांति,

    कांहींचे अंगी वसती,

    सत्वगुण लक्षणें ती,

    कांहींत दिसून येती ।।३।।

    राग, लोभ, अहंकार,

    षडरिपू हेच विकार,

    त्यांतच तो जगणार,

    तमोगुण वाढवून ।।४।।

    सत्व तमोगुणी पूर्ण,

    मिळणे फार कठीण,

    दोन्ही गुणांचे मिश्रण,

    म्हणती त्याला रजोगुण ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • शुद्धीसाठी गुरू

    कितीक वेळा धुतला कोळसा, रंग न बदले त्याचा ।
    उगाळता झिजून जाई, परि काळेपणा कायमचा ।।

    भट्टीत घालून त्यास जाळता, घेई रंग लाल कसा ।
    शुभ्रपणा हा दिसून येतो, राही न जेंव्हा कोळसा ।।

    मलीनता ही मनामधली, खोल रूजली असे ।
    विचारांतील तर्कज्ञान , शुद्धीसाठी पुरे नसे ।।

    गुरू लागतो अग्नी सारखा, चित्त शुद्धी करिता ।
    ज्ञानभट्टी पेटवून देई, जाळण्या अशुद्धता ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • महान ग्रंथकार

    दोन ग्रंथ ते अप्रतीम बनले, ह्या जगावरती

    रामायण महाभारत ह्याहूनी, श्रेष्ठ काही नसती.....१,

    धन्य जहाले वाल्मिकी व्यास, ज्यांनी ग्रंथ लिहीले

    मानवातील विविधतेचे, दर्शन ते घडविले....२,

    विश्वामधला प्रत्येक विषय, हाताळला दोघांनी

    शोधून काढण्या काही, निराळे समर्थ नाही कुणी....३,

    आद्य कवी वा लेखक म्हणूनी, मान तयांना आहे

    अनुकरण ते त्यांचे करिता, पुष्प तयांना वाहे....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • आठवावे मृत्यूसी

    निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना,
    गती देई जीवन चक्रांना, ईश्वरी शक्ती १

    उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती
    याच तत्वे निसर्ग चालती, अविरत २

    ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून
    घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने ३

    वस्तूचे निरनिराळे आकार, चेतना देवूनी करी साकार
    यास जीवन संबोधणार, आपण सारे ४

    मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती
    वापरून तीच ती माती, आकार देई पुन्हा पुन्हा ५

    दिसेल भांडी फुटलेली, अथवा नवी बनलेली
    हीच हात चलाखी, सगळी त्याच्या खेळण्याची ६

    मृत्यू टळला न कुणा, हे अंतर्मनी जाणा
    यशस्वी करा जीवना, मर्म ओळखूनी त्याचे ७

    राहीला नाही राम, उरला नाही शाम
    मागे राही फक्त कर्म, तुमच्या जीवनातील ८

    जाणता मृत्यूची अटळता, घालवी ती मनाची चंचलता
    आणील आयुष्या निश्चिंतता, समजोनी जीवन क्षणभंगूर ९

    ठेवा मनामध्ये बिंबवून, अनिश्चित आहे जीवन
    मर्यादा धडपडीना देवून, आयुष्य मार्ग आक्रमाल १०

    नागडा उघडा येई येथे, तसाच जाई परत तेथे
    कांहीं न तयाला नेता येते, सोडताना हे जग ११

    आत्म्यासंगे जाई कर्म, जगती राही देह धर्म
    निसर्ग चक्राचे हे मर्म, ओळखावे सर्वांनी १२

    धडपड तुमची धनापाठी, कुणी झगडे सत्तेसाठी
    आकर्षण सारे मायेपोटी, बाह्य गोष्टीचे १३

    संसार हा नाशवंत, सर्वासी आहे अंत
    म्हणूनी जाणावा भगवंत, अविनाशी शक्तीस १४

    निद्रेस जाण्यापूर्वी, मृत्यूची आठवण करावी
    मात्र त्याची भिती नसावी, मनामध्ये १५

    मृत्यूची करिता आठवण, चुकांना पडेल बंधन
    बंधनात होईल महान, कार्य तुमचे कडूनी १६

    जाणोनी छोटा काळ, न दवडी तो फुकट वेळ
    शोधण्यास तो जाईल, जीवनाचे प्रयोजन १७

    माहीत असते सर्वांना, मृत्यू टळला न कुणा
    परी आठवण त्याची निर्भय मना, रोज येत राहावी १८

    भीऊ नका मृत्यूला, अपघात समजा त्याला
    जीवनचक्र पूर्ण होण्याला, मदत होई त्याची १९

    जैसा आनंद जन्माचा, तैसा मानावा मृत्यूचा
    यात सहभाग प्रभूचा, समजावे ही विनंती २०

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सुखाचा डब्बा

    जगातील वस्तू, वाटे आकर्षक
    देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१

    प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
    सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२

    चमक बेगडी, फसवी सर्वाला
    काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३

    झाकण उघडा, दुःख दिसे आत
    लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४

    हात लावताच, दुःख हाती येई
    भासलेले सुख, नष्ट होत जाई...५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • भरताची निराशा

    निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल.......।।धृ।।

    लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल ।।

    झाली होती पितृज्ञा ती ।

    पाठवी रामा वनीं ।।

    माता कैकेयीच हट्ट करिते ।

    दूजे नव्हते कुणी ।।

    कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल....१,

    निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।।

    उंचबळूनी हृदय भरता ।

    कंठी दाटला सारे ।।

    शब्द फुटती मुखा मधूनी ।

    जे होते हुंदके देणारे ।।

    थरथरणाऱ्या ओठांमधूनी भाव कसे उमटतील....२,

    निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।।

    डॉ.भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मेघांनो पहा एकवार वळून !

    मेघांनो पहा एकवार वळून,
    हातचे काही राखू नका,
    कोसळताना अडखळू नका,
    झेपावताना लाजू नका,
    पडतांना ‘धड-पडू’ असे करू नका,
    आनंदाने बरसा, मनापासून बरसा !

    तुमचा वर्षाव निरंतर सर्व जिल्ह्यांवर,
    का रे मेघांनो नाराज असे मराठवाडा-विदर्भावर !
    एवढं निष्ठुर झालात तुमच्या आईवर,
    किती विश्वास ठेवला तुमच्यावर !
    किती चटके सोसले तिने
    तुमची वाट पाहून,
    बळीराजाला समजावता
    ती गेली भांबाहून !

    बरेच जण रंगपंचमी खेळले तुमच्याबरोबर,
    मारल्या पिचकाऱ्या कसल्याश्या रसायनांच्या तुमच्यावर !
    नाहीरे मन तुमचे द्रवले तुमच्या आईसाठी
    नाही ढळाढळा अश्रूंची झाली बरसात तिच्यासाठी !

    न राहून विनविले पक्षांच्या थव्यांना तिने
    तुमच्या नाजूक पंखाने, हळुवारपणे, प्रेमाने
    घाला वारा माझ्या बाळांना,
    थंड वाऱ्याच्या झुळकीने तरी
    पाहू फुटतोका उमाळा त्यांना !

    इतर जिल्हेही करतात प्रदूषण रोज
    म्हणून त्याचा राग मराठवाडा आणि विदर्भावर?
    जेव्हडे थेब बरसलात,
    त्याच्या दुप्पट आत्महत्या झाल्या बरोबर !

    मेघांनो पहा एकवार वळून !

    जगदीश पटवर्धन