रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति
व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति....१,
आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं
कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी...२,
विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते
क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते...३,
सद्गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला
रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले
एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले....१,
गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा
शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा....२,
खेच बसता वाढत गेला, होता गुंता
उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता.....३,
दोनच पर्याय होते, त्याचे पुढती
तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती....४,
वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे
अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे ...५,
दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी
राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी.....६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
लोचनी सांजवात आठवांची
झाली व्याकुळ कावरी बावरी...
तव निर्मली रूपात मी हरवलो
सांगना कसा परतु मी माघारी...
तुच लाविलास जीवास जीव
ओथंबुनी, ओघळतेस अंतरी...
आत्म्यास जाणवतो स्पर्श तुझा
हे सत्य मौनी कवटाळीतो उरि...
हुरहुर ती, हरएक क्षण सोबती
जगविते लोभस संध्याकिनारी...
होता नि:शब्द , वादळ अंतरीचे
मग हॄदयी, घुमते हरिची बासुरी...
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५४
१०/१०/२०२२
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली गीतेश शिंदे यांची हि कविता
पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने
पित्याचे ते लक्ष वेधण्या, हनुवटी खेची तो हातानें....१,
प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे
अजाणपणा तो दाखवोनी, दुर्लक्ष करी तो मुलाकडे...२,
शब्दांची ती गुंफन करूनी, कवितेचा तो संग्रह केला
तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,
जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते
अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,
पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले
रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
माझाच जन्म व्हावा
म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं...
माझ्या जन्माचं कोडं
त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं...
माझा जन्म आता
मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं...
मला शक्य असतं तर
या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं...
किती बरं झालं असतं
या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016
मातीचा पुतळा एक
फोडला कुण्या वेड्यानी
जीवंत पुतळे अनेक
जाळून टाकले शहाण्यानी ।।
एक करि तो पिसाट
ठरवी वेडा त्याला
अनेकाची उसळता लाट
धर्माभिमानी ठरविला ।।
अशी आहे रीत
नाहीं समजली मना
करुन विचारावर मात
श्रेष्ठ ठरे भावना ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
Copyright © 2025 | Marathisrushti