चावी
एकदाच तिने माझ्या भेदक या नजरेला नजर दिली
माझ्याकडे पहात गालात लाल गोड हसली ….
…बहिणाबाई चौधरी यांची एक सुंदर रचना
घोड्यावरती बसू देईना, चालू देईना पायी
जगाची ही रीत , कशी समजत नाही ..१,
सज्जनतेची वस्त्रे लेवूनी, निर्मळ जीवन आले
आपण बरे नि काम बरे, तत्व अंगीकारले...२,
मोठा झाला शिष्ठ समजोनी, वाळीत टाकीले मला
दुष्कृत्यामध्ये साथ हवी, त्यातील कांहीं व्यक्तीला...३,
जीवन जगणे कठीण होता, मार्ग तो बदलला
आगळी धडपड करूनी, यश मिळाले मला....४,
मिसळत होतो सर्वामध्ये, अतिशय प्रेमानी
तरीही ऐकला ‘शिष्ट’ शब्द , माझ्याच कानानी..५,
व्यक्ती तितक्या प्रकृती , असती येथे
भिन्नतेचे स्वभाव तेंव्हा , निराशा मनी आणते ..६,
चित्ती येईल तसेच करावे, जागृत भाव ठेवून
इजा न होईल इतर जनाना, हे लक्षात घेवून...७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
ती चुल्ह्याजवळ, तर त्याच्या डोईवर सूर्य
तिच्या हाताला चटके, त्याच्या पायांना !
हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील
बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?...१,
नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा
मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२,
अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी
सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी....३,
काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो
वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो...४,
शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
|| हरी ॐ ||
आल्या आल्या श्रावण सरी,
अवचित करिती चिंब परी !
उन पावसाच्या खेळ हा,
सप्तरंगी पडदया आड हा !
रत्यांवर हिरव्या पानांचा सडा,
दिसतो जसा हिरवा सरडा !
सख्या निघाल्या खेळाया ह्या,
जमवून बाहुलीचे लग्न त्या !
रानीवनी मुक्त हिंडती !
लग्नासाठी जागा निवडती !
जंगलातील रस्ता निसरडा !
तरी नसे मना मुरडा !
बाहुला आला, सर्व लवाजमा सजला,
अंतरपाठ सप्तरंगी मिळाला !
लग्न लागताच श्रावण सर आली,
ऐतीच वाजंत्री वाजू लागली !
वार्यानेही साथ दिली,
वेणूनेही लाज राखली !
रंगीबेरंगी फुलांच्या माळा,
नवरा-नवरीच्या पडल्या गळा !
घरी जाया बाहुली निघाली बाहुल्या,
डोळ्यांच्या कडा पाणावल्या !
अवचित येता श्रावण सरी,
न दिसे डोळा पाणी परी !
जगदीश पटवर्धन
लय फोफावलय तणकटं....
धुरे सोडून मध्ये रानातं घुसलयं.....
रान कमी पडलं मनुन काय की,
आत्ता डाळणाच्या उरावरंबी फोफावलयं...
आत्ता तं पिकबी तणकटाच्या सावलीपुढं,
निमुट मानं टाकुण मुक उभ दिसायलयं...
काल घरातुन निंघताना भिंतीवर
एक पिंपळाचं झाड पाह्यलं...
मनात विचार आला,
मायझं,भुतायलं जागा कमी पडायलीय,
मनुनं ईथबी एक उगवलय काय की?
लय फोफावलयं....
गल्लीतंबी अन दिल्लीतंबी,
घरातंबी अन दारातंबी...
कुठं नाही मनुन सांगु,
ईथं जागाचं शिल्लक राह्यली नाही...
रस्त्यावुन पुढ चलतांनी,
याच तनकटांचे दोरखंडं व्हवून,
माघं खेचतायतं मलं...
असं वारंवार जाणवायलय आजकालं...
आज तं कहरच झाला...
मह्याच मस्तीत विहरत असतांनी ,
अचानक तनकटाच्या दोरखंडांनी,
महे पायचं आवळून जागीच थिजवले...
तसं पाह्यलं तं त्या तणकटाचं,
मह्या मार्गावर,
अतिक्रमनचं व्हतं ते......!
मी पुर्ण ताकदीनिशी मुक्तं व्हवू पहातं व्हतो....
जोर जोरातं ओरडतं मदतीची याचना करत व्हतो....
पण कुनिही मह्या मदतीलं येतं नव्हतं....
जो तो मह्याकडं पाहूनं हसतं व्हता...
मी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करतं व्हतो.....
पण न का जाने मह्याबी मनातं घालमेलं चालली व्हती....
क्षणातचं मह्याबी अंगावरं सळसळत्या गवताची,
हालचाल जानवाय लागली व्हती...
रोम आता राह्यलाचं नव्हता...
मह्या रोम रोमात तणकटं भिनतं व्हतं....
का मीच तणकटं बनतं व्हतो...?
मी भांबावलो,बावचळलो.....
सहज आजुबाजुलं पाह्यलं .....
आत्ता सगळ्या लोकांच्या डोक्यावरं
मलं तणकटं दिसतं व्हतं.....
अन त्याची मुळं,
आरपार मेंदुतं रूजलेली जानवतं व्हती.....
मी ओरडलो....तळमळलो....शेवटी हतबल झालो....
मग शेवटी त्या विधात्यालचं मनलो,
हे विधात्या.....,
तणनाशकानं शेतातल्या तनाचा नाश करता येईल रे....
पण मेंदुतल्या तनाचा नाश कुठल्या तननाशकानं करायचा.....?
©गोडाती बबनराव काळे
9405807079
नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते ।
आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते ।।
ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते ।
प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते ।।
मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी ।
परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं ।।
मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार ।
ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
शंभर वर्षे जगा तुम्हीं, काका आमच्यासाठीं,
बाबांच्या रुपांत रहा, तुम्ही सर्वांच्या पाठीं ।।१।।
भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे,
तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे ।।२।।
उशीर झाला होता, जेंव्हा जीवन उमगले,
कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले ।।३।।
आंबा गेला मोहरुनी, लाविली होती त्यांनी झाडे,
दुर्दैवाने आमुच्या, नाही ते बघण्या फळाकडे ।।४।।
मध्येच सोडूनी गेले, नाटक चालू असतां,
रंगवूनी बाबांची भूमिका पूर्ण करां ते आतां ।।५।।
चालू ठेवा मार्गदर्शने, तुम्हीं आपल्या घराण्याची,
जोपासण्या शिकवा तुम्ही, जीवनाविषयीं तत्वें त्यांची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti