सर्व वाद मागे पडून आता राष्ट्रकुल स्पर्धांना प्रारंभ होत आहे. देशाच्या संस्कृतीचे निदर्शक असल्याने अशा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. या स्पर्धेमधून विविध क्रीडाप्रकारांमध्ये आयकॉन्स निर्माण होतील. हे आयकॉन्स होतकरू खेळाडूंना आकर्षित करतील. त्यांना उत्तम सुविधा मिळाल्या तर क्रीडाक्षेत्रात भारताचे भवितव्य उज्ज्वल राहिल. ही भावना हृदयी ठेवून राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेचा जल्लोष अनुभवायला हवा.
निरोप दिलाच आहेस
आसवांची गर्दी उगाच कशाला..
एकटेपणाचा प्रवास कायमच वाट्याला
एक एक माळेतील मोती ओघळतो
सवय असावी लागते ....
गुंतलेले मन हळवे कातर ..
त्यातही उबदार मायेची शाल
पांघरूण घ्यावी अशी सोय नाही..
कोणाला नको असते वाळवंटात पाणी
अश्रूधारांनी वाहतात का झरे..
मिटवून टाकतात का मनातील अंतरे...
खोल रूतून राहतेच मनात सल
निरोपाच्या भावुक क्षणानंतर...
अस्तित्वच शून्य तुझे माझे
देहां मधून वाहत जाते फक्त..
बदल तर कणाकणातून घडतो आहे
पानं, फूल,वारा,पाऊस, निसर्ग..
आणि व्यापलेला ज्ञात अज्ञात प्रत्येक
जण निरोप घेताना बदलत असतो..
निरोप घेताना फक्त एकच करावं
जाणाऱ्यांना दूरूनच पहावं..
सुकलेल्या फुलांना मधूनच हुंगत जावं..
मिटलेल्या पापण्यात हृदयाच्या तळ्यात
साचवत राहू नये ते निरोपाचे हुंदके..
ते हुंदक्यांचे सूर असूर बनून राहतील
तुमच्या जीवनात...
निरोप रामाने सितेला..कृष्णाने राधेला..
द्रोणाचार्यांने अश्वत्थाम्यास दिला...
अमरत्व प्राप्त झाले असूनही निरोपाच्या
प्रतिक्षेत अश्वत्थामा भटकतो..
चिरकाल तारुण्यात राहणारा
ययाती ही जळतो...
कृष्ण सखा राधेच्या श्वासात
आनंद बनून वाहतो..
निरोपाची सांगता करताना
पुन्हा नव्याने वाट धरतो.
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
-- स्वाती ठोंबरे.
मे ९, २०१६ च्या लोकसत्ता, मुंबई एडिशनमधील ‘गोवंशप्रतिपालकांचा विजय’ हा लेख वाचला. उत्कृष्ट व्यंग. हे व्यंग आमच्यासारख्या वाचकांना समजलें, पण ज्यांना कळायला हवें, त्यांना तें कळलें असेल काय ? एनी वे, तें जें असेल तें असो, आपण यानिमित्तानें , ‘गाय’ या विषयाची थोडीशी चर्चा करूं या.
पुढें जाण्यापूर्वी, मला हें स्पष्ट करणें आवश्यक वाटतें की, एक म्हणजे, मी स्वत: शाकाहारी आहे , आणि दुसरें म्हणजे, माझा कुठल्याही राजकीय पक्षांशी किंवा धार्मिक संस्थांशी कसलाही संबंध नाहीं. हें स्पष्ट करण्याचें कारण असें की, मी ही चर्चा केवळ वैचारिक, तर्काधिष्ठित, दृष्टिकोनातून करत आहे ; माझा अन्य कांहीही उद्देश नाहीं. ( हें स्पष्ट न केल्यास, चर्चेला कुणी नसता-रंग देऊं शकतो, व त्यामुळे चर्चेला विनाकारण नको-ती दिशा मिळण्याचा धोका असतो. तो टाळायला हवा).
साधारणपणें १०,००० वर्षांपूर्वी मानवसमूह हा, Hunter-Gatherers, ( म्हणजे शिकार करणारे व फळफळावळ वगैरे गोळा करणारे ) या स्थितीपासून , Pastural-Agricultural (प्राणिपालन करणारे, शेती करणारे) या स्थितीला आला. जे प्राणी सर्वात आधी मानवानें माणसाळवले (domesticated) , त्यातील एक महत्वाचा प्राणी म्हणजे गाय. गायीचें महत्व दुधदुभत्यासाठी तर होतेंच , पण बैलाची माता म्हणूनही तिचें महत्व मानवाला कळून आलें. बैल हे, माल वहायला, शेतीसाठी नांगर ओढायला, प्रवासासाठी गाडी ओढायला, पाण्यासाठी विहिरीचा रहाट फिरवायला, असे विविध प्रकारें उपयोगी होते. त्यामुळे, तत्कालीन भारतीय समाजात गायीला अतिशय महत्व प्राप्त झालें, व ती पूज्य मानली गेली. महाभारतातही, घोषयात्रा, गोग्रहण वगैरे प्रसंगांवरून, त्या काळीं गायींना असलेलें महत्व दिसून येते. पांडव वनवासात असतांनाचा, कौरवांचा ‘घोषयात्रा’ प्रसंग घ्या. घोषयात्रा म्हणजे, ‘Cattle-Lifting expedition’ (संदर्भ : आर्. एन्. दांडेकर). तसेंच, पांडव अज्ञातवासात असतांनाचा कौरवांचा ‘गो-ग्रहण’ प्रसंग घ्या. कौरवांनी विराटाच्या राज्यावर आक्रमण केलें, तें त्याचें राज्य काबीज करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या गायींचें हरण करण्यासाठी ! पुरातन वाङमात ’कामधेनू’ च्या अपहरणासंबंधीच्या कथा आहेत, ज्या घटनेमुळे युद्धेंही उद्भवली. त्या जमान्यात गाय ही संपदाच मानली गेली होती. गो-धन, गो-दान, हे शब्द त्याचेंच द्योतक आहेत. पुरातन काळापासून गोमूत्र, व गोमय ( गायीचें शेण) यांना पवित्र मानलें गेलेलें आहे.
गो, गौ, धेनु इत्यादींशी संबंधित शब्द आपली संस्कृती व भाषा यांचें अविभाज्य अंग बनले आहेत. त्यांच्यावरून गाईचें तत्कालीन महत्व कळून येतें. उदा. गो-कुल, गो-प, गो-पी, गो-पाल, गो-विंद, गो-पती, गो-पुर, गो-त्र (cow-pen), गो-ष्ठ (cow-pen), गो-व्रज (cow-pen), गो-शाला (cow-stall), गो-कील (नांगर), गो-वर्धन (डोंगराचें नांव), गो-रज (मुहूर्त), गो-धूलि_वेला (संध्याकाळची वेळ) , गो-मुख, गो-ग्रास, गो-रस (दूध), गो-मय (शेण), गो-चर (उदा. दृग्गोचर), गो-मंत (ज्याप्रमाणें बुद्धिमंत, धीमंत, श्रीमंत, तसेंच) , गो-मेद (a type of precious stone), गो-खी (आंत हात घालून जप करण्यासाठी, जपमाळेची थैली), वगैरे वगैरे ; तसेच मराठीतील गुराखी (गौ-रक्षक), गो-वर्या (शेण्या), इत्यादी शब्द ; धेनुसूदन (बलराम), धेनुवल्लभ, गोरक्षनाथ (गोरखनाथ), गायधनी, गोकर्ण, गायतोंडे अशी व्यक्तिनामें व आडनांवें ; गुरखा (गौ-रक्षक) हें जमातीचें नांव; गो-कर्ण_महाबळेश्वर (एक तीर्थक्षेत्र), गो-रखपुर, गो-ध्रा, गो-हाटी, गांवाबाहेरील चरण्यासाठी राखून ठेवलेलें ‘गायरान’, ही शहरांची नांवें व स्थलनामें ; गो-मती हें नदीनाम ; सर्व गायीशी संबंधित आहेत. (संदर्भ : रोमिला थापर, व्ही.एस्. आपटे, इतर लेखक, व मी).
पण वैदिक काळ व महाभारत काळाला आता कांहीं सहस्रकें उलटून गेलेली आहेत, (म्हणजे, किमान ३००० ते ६००० वर्षें). याचाच अर्थ असा की, त्या काळानंतर, कमीत कमी १५० ते ३०० पिढ्या गेल्या आहेत. ( बाप रे! ) . आतां , विक्रम संवत् म्हणा, शालिवाहन शक म्हणा, किंवा इसवी सन म्हणा, या सर्वांचीही जवळपास २००० वर्षें उलटली आहेत ,( म्हणजे, १०० पिढ्या). आतां यंत्रयुग आहे. अजूनही, अगदी-खेडें असलेल्या कांहीं ठिकाणी बैल वापरतात, पण जवळजवळ सर्वत्र आतां शेतीसाठी लहनमोठी यंत्रें वापरली जातात. प्रवासासाठी बैलगाड्या नव्हेत, तर एस्. टी., मोटार, रेल्वेगाडी वगैरे साधनें आहेत. गो-पालन सुद्धा आतां , एक_गाय-दोन_गायी अशाप्रकारें न होतां, एक धंदा म्हणून अनेक गायी (व म्हशी) पाळून केलें जातें. त्यामुळें, गो-पूजन व गो-रक्षण य परंपरा खरें तर कालबाह्य झालेल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत की, गाय हा फक्त एक उपयुक्त पशू आहे. सावरकर यांचे विचार नेहमीच विज्ञाननिष्ठ असत. त्यामुळे, त्यांचें गायीबद्दलचे कथन, हें कोणाही खोलवर-विचार-करणार्या माणसाला पटल्याशिवाय रहाणार नाहीं. मग, किती दिवस आपण हजारो वर्षें जुन्या, कालबाह्य परंपरेला धरून बसणार आहोत ?
दुसरी एक , आणि अधिक महत्वाची बाब. आणि ही तर अजिबात दुर्लक्षित करून चालणारच नाहीं. हा मुद्दा, ‘क्लब ऑफ रोम’ या multi-disciplined शास्त्रज्ञांच्या संघटनेनें , ‘Limits to Growth’ नामक त्यांच्या, इ.स. १९७० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या, इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये मांडलेला आहे. तो मुद्दा थोडक्यात असा की, मानववंश Exponential-progression प्रमाणें वाढत आहे, तर उत्पादन केलें जाणारें धान्य Arithmatic- progression प्रमाणें वाढत आहे , आणि त्यामुळे दोहोंमधील तफावत वाढत जाते आहे. म्हणून, कांहीं काळानें धान्याची सार्या जगात कमतरता होणार आहे. त्यातून, आणखी असें की, जगभरातील शेतीलायक-भूमीला कांहींतरी Limit, मर्यादा, आहे. म्हणजेच, एका विशिष्ट पातळीनंतर धान्य-उत्पादन फारसें वाढणें शक्य नाहीं. या सर्वाचा परिणाम असा की, लवकरच, सर्व जगातील धान्य-उत्पादन हें पृथ्वीवरील माणसांसाठी अपुरें पडणार आहे. म्हणजेच, या बाबतीत, Crisis नक्कीच येणार आहे, आणि ही स्थिती, दूरच्या-भविष्यात नव्हे तर, या २१ व्या शतकाच्या अखेरीपर्यंतच येऊं शकेल !! भारताच्या दृष्टीनें, याला लागूनच एक उपविचार असा की, शाकाहारी असणें ही निश्चितच चांगली गोष्ट आहे, पण, जर सगळी मानवजातच शाकाहारी बनली, तर हा crisis कितीतरी-पटींनी वाढेल, आणि मग, त्याला अधिक-लवकर सामोरें जावें लागेल. म्हणूनच, सावरकर म्हणत की, मांसाहार करणें मानवजातीसाठी आवश्यक आहे. (आणि हें त्यांनी जवळजवळ ९०-१०० वर्षांपूर्वी , म्हणजे, १९२०-१९३० च्या दशकात म्हटलेलें आहे, हें ध्यानात घ्यावें). हें सांगतांना , सावरकारांना, जात आडवी नाहीं आली, धर्म आडवा नाहीं आला, सनातन परंपरेला ते चिकटून बसले नाहींत ; केवळ तर्काधिष्ठित व विज्ञाननिष्ठ विचारातून या निष्कर्षापर्यंत ते आले. आपणही, तेंच करायला नको कां ?
सावरकर इतके पुढारलेल्या विचारांचे असूनही , त्यांच्याभोवती सनातनी-विचारांच्या मंडळींचा जमाव गोळा झाला होता. लोकशाही राज्यप्रणालीचा एक drawback असा आहे की, मतांच्या माध्यमातून राज्य करायचें म्हणजे कोणालाच दूर लोटतां येत नाहीं. सध्याच्या राज्यकर्त्यांचेंही तेंच झालेलें आहे. त्यामुळे, त्यांना गो-प्रतिपालन, गो-रक्षण, या कालबाह्य गोष्टींचा अवलंब करावा लागत आहे, असें दिसतें.
पण , आपण जेव्हां फासळ्या वर आलेल्या, खंगलेल्या, अर्धमेल्या गाईंना पहातो, ज्यांना रहायला नीट, स्वच्छ, ऐसपैस जागा नाहीं, खायला पुरेसें मिळत नाहीं, तेव्हां आपल्याला त्यांचीच नव्हे, तर त्यांच्या मालकांचीही कणव येते ! मालकाला स्वत:लाच बिचार्याला पुरेसें खायला मिळत नाहीं, त्याचें पोट खपाटीला गेलें आहे, उद्याचें दूर, आजचाच दिवस कसा काढायचा हा त्याच्यापुढे प्रश्न आहे , तर मग तो गायींना काय कायला देणार ? ‘आई जेवूं घालीना, बाप भीक मागूं देईना’ अशी त्या गाईंचीच नव्हे तर त्यांच्या मालकांचीही स्थिती झालेली आहे.
अशा वेळी, १९ व्या शतकातील अमेरिकन (USA) West बद्दल वाचलेल्या माहितीची आठवण येते. त्यातून शिकण्यासारखें बरेंच आहे. हजारो गाईंचे (steers) कळपच्या कळप मैलोन् मैल चालवून एका भागातून दूरवर दुसर्या एकाद्या शहरापर्यंत न्यायचें , म्हणजे कांहींदा अपघात हे व्हायचेच. अशा वेळी जर एखाद्या steer चा किंवा घोड्याचा पाय मोडला तर, बरोबरचे काऊबॉईज् त्या जखमी जनावराच्या डोक्यात गोळी घालून त्याला मारत. असेंच एकदा एकानें आपल्या जायबंदी झालेल्या घोड्याला मारल्यावर, दुसर्या एका नवख्यानें त्याला विचारलें, ‘त्याला मारून टाकलेस, तुझें त्याच्यावर प्रेम नाहीं कां’ ? त्यावर तो उद्गारला की, ‘प्रेम आहे म्हणूनच तर डोक्यात गोळी घालून त्याला क्षणार्धात मारलें, नाहींतर तो खितपत पडला असता व अखेरीस जिवंतपणीच गिधाडांचें खाद्य झाला असता’. या गोष्टीवरून आपण कांहीं बोध घेणार आहोत कां ?
अर्धमेल्या गाईंना तसेंच अर्धमेल्या स्थितीत खितपत ठेवायचें की त्यांना त्यांच्या नरकातून मुक्ती द्यायची ?, हें शांत मनानें ठरवायला हवें, भावनांच्या किंवा परंपरांच्या आहारी जाऊन नव्हे. गाईंना खाद्य देणाच्या सरकारी योजनांबद्दल आपण बोलूंया नको, कारण त्या किती कागदावरच रहाणार आणि किती कृतीत उतरणार, हा प्रश्नच आहे. आणि, कितीही केलें तरी, फाटल्या आभाळाला सरकार ठिगळ लावूं शकणार आहे कां ? त्यातून पुढला प्रश्न, आणि तोही अतिशय महत्वाचा असा, की, अर्धमेल्या माणसांना जगविण्यासाठी कार्यक्रमांचे अवलंबन करायचें की अर्धमेल्या गाईंसाठी ? हें आपणच ठरवायचें आहे.
अखेरीस, असें म्हणावें लागेल की, प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे ; त्यामुळे, ज्यांना शाकाहारी रहायचें आहे, त्यांनी रहावें, पण मांसाशन करणार्यांवर दडपण आणूं नये, हेंच उचित होईल. समाजाच्या दृष्टीनें म्हणाल तर, दूरगामी विचार करून, मानवांसाठी खाद्याचा प्रश्न Long-term दृष्टीनें ध्यानात घेऊन, या विषयावर राज्यकर्त्यांनी dispassionately निर्णय घेणें, व जनतेला तो समजावून देणें, आवश्यक आहे. सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.
- सुभाष स. नाईक
सांताक्रूझ, मुंबई
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन!
हुळहुळते अधरांवर माझ्या पहिले चुंबन!!
तुझा स्पर्श पहिल्यांदा झाला मला असा की,
उभ्या हयातीचे या माझ्या झाले कंचन!
गगनामध्ये अजून गर्दी नक्षत्रांची
तुझ्या नि माझ्या प्रीतीला ती करती वंदन!
सवे माझिया तू असली की, असे वाटते....
स्वर्गामधले अवतरले भवताली नंदन!
श्वासाश्वासामधे चालते तुझीच घमघम
अजून कुठले मला पाहिजे दुसरे रंजन!
मला न वाटे जीवन-मरणाची या भीती
जोवर आहे नाम:स्मरणाचे हे इंधन!
पहा लागलो बहराया मी दिशादिशांना
तुझ्या कृपेचे जेव्हा झाले अविरत सिंचन!
शब्द अता बोलतात माझे तुझीच भाषा
करतो आता तुझेच वाचन, तुझेच चिंतन!
हयात माझी गझलमय जणू झाली आहे
झोपेमध्ये सुद्धा चालू विचारमंथन!
कळते मजला तुझ्याविना मी अपूर्ण आहे
तू माझा स्वर, मी तर साधे आहे व्यंजन!
प्रोफेसर
प्रा. सतिश देवपूरकर
माझी माय मराठी
शिवबाची
कणखर देशाची, ज्ञानेशाची
माझी माय मराठी
अलंकृत
अलंकार तिचे खुलवित
सौंदर्य
माझी माय मराठी
वृत्तात बंदिस्त
गझलकारा करितसे उत्तेजित
माझी माय मराठी
नव रसात चिंब चिंब भिजलेली
रसा -रसातून गर्जे भाव-स्पंदनांची तराणी
माझी माय मराठी
छंदात रमलेली
वाकवाल तशी वाकणारी
मराठीच आमुचा बाणा
मराठीच आमुची माता
तिच्या साठी झिजणार
सारस्वत
हाच तयांचा नारा
-- सौ.माणिक शुरजोशी
दोघे मिळून आलां हातात घेऊन हात
हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात
दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे
सहभागी होतां, युक्ति यशाची खात्री दिसे
एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती
रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती
ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत
गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत
एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे
एकत्र मिळूनी काम करा तुम्ही आहांत जुळे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail bknagapurkar@gmail.com
रिमझिमत्या पावसात
माझ्या गर्द केसात मोगरा माळताना
तू दाखवलीस स्वप्नं...
रुणझुणत्या चुड्याची
भरजरी शालूच्या स्पर्शाची
पराक्रमी राजपुत्रानं
नजर करावं गुलबकावलीचं फूल
हळव्या राजकन्येला
तशी अवघ्या स्वप्नांची पूर्ती झाली
तुझी शपथ, तेव्हा वाटलं
पायतळी मंझिल आली !
आणि मग -
हातीच्या गुलाबाची
पाकळी पाकळी पडावी गळून..
तसे क्षण गेले निसटून
नि कसली अगम्य ओढ
मनात राहिली दाटून?
चालत्या पावलांना मी विचारते,
"तुम्हाला काय हवंय बाबांनो?'
कालचा मोगरीचा गंध
तस्सा ताजा --टवटवीत...
की पूर्ती झालेली सारी स्वप्ने.....
की त्याही पलिकडचं काही... अरुप.... अनाम..
जे काय तेही नक्की कळत नाही.....
साऱ्याच सुखाचा असा अर्थ शोधत राहिलास
तर हाय हृदया !
तुझ्या अतृप्तीला सीमा नाही।
तुझ्या अतृप्तीला. सीमा नाही !!
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
समर्थ नाहीं कुणी,जाणून घेण्या प्रभूला
थोटके पडतो सारे,घेण्यास त्याच्या दयेला
बरसत असे दया,प्रचंड त्या वेगाने
दुर्दैवी असूनी आम्हीं,झेलतो फाटक्या झोळीने
असीम होते कृपा,पात्र नसूनी कुणी
तो बरसत राही सतत,परि आहे सारे अज्ञानी
दयेच्या तो प्रवाह,वाहात राही नदीसारखा
डूबती कांहीं त्यांत,परि न दिसे अनेकां
नशीब लागते थोर,पेलण्यास दया ती
जलांत असूनी कांहीं,तहानलेली राहून जाती
शिवून तुमची झोळी,प्रथम पात्र व्हा सारे
सदैव उघडी आहेत,कृपेची त्याची द्वारे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रूप असे देखणे
काळजां भिडले भारी,
डोळे असती लकाकते,
पाणीदार जसे मोती,
काया कशी तुकतुकीत,
नजर फिरता हाले,
सुंदर तांबूस वर्ण,
त्यावर पांढरे ठिपके,
शिंगांची नक्षी डोई,
दिसते वर शोभुनी,
हिंडते बागडते रानी,
कुणी बालिका की हरणी, --??
चपल चंचल वृत्ती,
अचूक आविर्भाव मुखी,
क्षणोक्षणी मान वेळावी,
भय दाटले नयनी,--!!!
पाय मजेदार हलती,
नाजुकसे ते हडकुळे,
पण त्यात ताकद किती,
खुट्ट वाजता वाऱ्यावरती,--!!!
चरत चरत कुरणी,
हिरव्या गवतावर निवांत,
सारखी ही हले डुले ही,
गोजिरवाणी बघा हरिणी,--!!!
भोवती बाळे करिती घोळका त्यांच्याकडेच ना ध्यान,
हलवून इवली शेपूट,
शिकवे जगण्याचे ज्ञान, --!!!
जागरूक राहून सारखी,
भोवती नजर भिरभिरत राहे,
सभोवती हरणें सगळी,
पाहून मग जीव शांतावे,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
Copyright © 2025 | Marathisrushti