मातृभू तुझ्या करता,
सर्वस्वाचे देतो दान,
रक्षणासाठी केवळ तुझ्या,
सज्ज माझे पंचप्राण,---!!!
कितीतरी बघ आजवर,
झाले तुझसाठी अर्पित,
बिमोड करून शत्रूचा,
निनाद तुझा गर्जत,---!!!
भारत माते तुझी माती,
आम्हा प्रिय प्राणाहून,---
"पाईक" आहोत तुझे आम्ही,
त्रिवार वंदन तुजसी करुन---!!!
वाचवू आम्ही तुला,
करुन जिवाची कुरवंडी,
तीच खरी तुझी सेवा,
बांधल्या आम्ही खुणगाठी,---!!!
हिम्मत जर कोणी,
करेल माईचा लाल,
वचने तुला आमुची,
दाखवू त्याला माती,---!!!
ध्येय श्रेयस प्रेयस सगळे,
कडेकोट तुझीच निगराणी
निर्भय निडर निर्धास्त असावे,
हीच तुला एक विनवणी,---!!!
किती आले किती गेले,
तुझा घास बळकावण्यां,
परास्त होऊन परत फिरले,
मायदेशी तोंड लपवण्या,---!!
आपली धर्मसंस्कृती कधीही,
आम्ही सोडली नाही,
तुझेच संस्कार मनी,
काढावा किंतु सर्वांनी,---!!!
चांगल्याची चांगले आम्ही,
वाईटांशी बनू कर्दनकाळ,
जगानेही ध्यानी ठेवावे,
देशसेवक इथले हर बाळ,--!!!
माता वाट्याला कुणाच्या,
कधीच गेली नाही,
जो येईल तिच्या मार्गी,
त्याची कधीच खैर नाही,---!!!
हिमगौरी कर्वे.©
गोव्याच्या मंगेशीच्या देवळात १९६६ साली अवघ्या सहा वर्षांच्या ज्ञानेश पेंढारकरच्या हस्ते 'जय जय गौरीशंकर' या नाटकाचा मुहूर्त पार पडला आणि तिथून या नाटकाच्या प्रवासाला सुरुवात झाली. पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार,, जयश्री शेजवाडकर यांसह आणखी तीन कलाकारांसोबत विद्याधर गोखले लिखित या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली. नाटकाचे दिग्दर्शक होते नटवर्य मामा पेंडसे तर संगीत दिग्दर्शन होते ख्यातनाम संगीतकार वसंत देसाई यांचे.
तीन महिने तालीम केल्यानंतर १४ ऑगस्ट १९६६ रोजी 'जय जय गौरीशंकर' चा शुभारंभाचा प्रयोग भालचंद्र पेंढारकरांच्या 'ललितकलादर्श' या संस्थेतर्फे बिर्ला मातोश्री सभागृहात रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला. दोन दिवसांत पाच हाउसफुल्ल प्रयोग करणाऱ्या या नाटकाची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत गेली आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. ललितकलादर्श यांच्या संस्थेने या नाटकाचे २२५० प्रयोग केले, हाही संगीत रंगभूमीवरचा विक्रमच आहे. भालचंद्र पेंढारकर आणि पं. राम मराठे या दोन्ही दिग्गज कलावंतांच्या गायन-अभिनयाने आणि वसंत देसाईंच्या संगीताने हे नाटक गाजत राहिले. प्रस्तुत नाटक मुख्यत: शिवलीलामृतांतील १४व्या अध्यायातील शंकर-शबरी कथेवर आधारलेले असून, त्याला स्कंदपुराणांतर्गत सह्याद्रि-खंडातील 'मांगरीश महात्म्या'तील कथाभागाची जोड दिली आहे.
'सप्तसूर झंकारत बोले गिरिजेची वीणा' या दोन विभिन्न तालांमध्ये बांधलेल्या नांदीने नाटकाची सुरुवात होते. पुढे चटपटीत संवाद, राजकीय उपहास यांमुळे नाटक अधिक रंगतदार होत जाते. 'नारायणा रमा रमणा', 'प्रियकरा नसे हा छंद बरा' निराकार ओंकार, शिवशक्तीचा अटीतटीचा, सावज माझं गवसलं, भरे मनात सुंदरा, कशी नाचे छमाछम, रमारमण श्रीरंग यांसारखी एकूण सरस अशी चौदा गाणी या नाटकात असून, पार्श्वसंगीतासाठी १६ विविध ताल वाद्यांचा वापर करण्यात आला होता. ह्या नाटकाचे अप्रतिम नेपथ्य पु श्री काळे (कथा लेखक व पु काळे ह्याचे पिताश्री ) ह्यांनी केले होते व कैलासाचा रम्य देखावा गोमांतवनांतील निसर्ग त्यांनी सुंदर उभा केला होता.
या संगीत नृत्यमय खेळकर नाटकातील कलावंत होते. पं राम मराठे, प्रसाद सावकार, सुकुमार, आ. दे. पाटील, लीलावती, जयश्री आणि निर्माते भालचंद्र पेंढारकर ही सप्त सूर कलाकार मंडळी ह्यात होती.
लेखक / गीत-रचना: विद्याधर गोखले.
नाट्य दिग्दर्शन नटवर्य मामा पेंडसे
संगीत दिग्दर्शन: वसंत देसाई.
नेपथ्य: पु श्री काळे
रंगभूषा: शांताराम विचारे
साथसंगत
ऑर्गन, गोविंदराव पटवर्धन / विश्वनाथ कान्हेरे, तबला दामूअण्णा पार्सेकर/ भोजराज साळवी
व्हायोलिन: मधुकर बर्वे
त्यानंतर काही प्रयोग विश्वनाथ बागुल, माया जाधव, प्रकाश घाग्रेकर, चंदू डेगवेकर, शहाजी काळे, शिवानंद पाटील आदींनी देखील केले.
आता हे नाटक 'आर्यादुर्गा क्रिएशन्स' या संस्थेतर्फे केले जाते.
९० प्रयोग होऊन शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या ह्या नवीन टीमचे निर्मिती सुप्रसिद्ध नाट्यकर्मी सुनील जोशींनी केली असून दिग्दर्शन ही त्यांनीच केले आहे.
संगीत मार्गदर्शक मुकुंद मराठे आणि विलास हर्षे हे आहेत.
आनंदाची बाब म्हणजे ह्या पुनरुज्जीवित नाट्यकृतीला नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर आणि देवल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मूळ प्रयोगात शंकराची भूमिका साकारणाऱ्या पं. राम मराठे यांचे सुपुत्र श्री.मुकुंद मराठे त्याच तडफदार गायकीने आणि समर्थ सकस अभिनयाने पुनरुज्जीवित नाटकात शंकराचीच भूमिका साकारत आहेत, पार्वतीची भूमिका पूनम पंडित / गायत्री दीक्षित तर भालचंद्र पेंढारकर यांनी अजरामर केलेली नारदाची भूमिका आता डोंबिवलीचे नाट्यकर्मी गायक नट सुनील दातार अत्यंत सार्थपणे खुसखुशीत सादर करत आहेत. त्यांच्यासोबत सुनील जोशी प्राजक्ता मराठे, अनुराग गर्गे संदीप राऊत हे सहकलाकार विविध भूमिकांत आहेत....
नेपथ्य प्रकाश सुधीर ठाकूर श्याम चव्हाण ह्यांचे आहे. आजही ह्या संगीत नाटकाला रसिकांची अमाप मागणी आहे. विशेष करून मुंबई पुणे कोंकण गोवा तसेच झाडीपट्टी मध्ये हे नाटक खूप लोकप्रिय आहे
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=ICBN1XJNUCg
https://www.youtube.com/watch?v=6XH7fi-mEXI
https://www.youtube.com/watch?v=m27iFmDiBWM
कुठले नाते? खरे की खोटे?
काही कळेनासे वाटे !
बंधने तोडोनी नात्यांची,
इज्जत गेली पुर्षार्थाची !
कशी नाही रे शर्म वाटली तुला,
आपल्याच मुलीची अब्रू लुटतांना?
जन्मदात्यानेच अब्रू लुटल्यावर,
समजले मला आईच्या नशिबीचे भोग !
विश्वासावे सख्या भावावर,
पण त्यानेही केला कळस सर्वांवर !
जन्मल्याच केली असतीस हत्या तर,
निदान अब्रू आली नसती चव्हाटयावर !
तूटले असते माझे नाते तुमच्या बरोबरचे
मुलगी आणि बहिणीचे !
काय माझ्याकडून प्रज्ञापराध झाले,
ज्याने मी अनाथ आणि पोरकी झाले !
बेअबृची लक्तरे माझ्या नावापुढे चिकटली,
आणि जीवनाची घडी विस्कटली !
देवा हात झाडूदेत स्त्रीची अब्रू लुटणाऱ्यांचे,
तरच देवा मिळेल तिला खरा ज्ञाय !
चित्र दिसूदे स्त्रीचा सन्मान करतांना,
नाहीतर लागेल सर्वांना तिची हाय !
देवा शिकव सर्व नराधमांना,
स्त्रीचा मान ठेवायला !
आणि सुरक्षा देण्याला,
नाहीतर दिसेल इतिहासाची पुनरावृत्ती होतांना !!
स्वप्नातही आणू नकोस अशी काळ-वेळ कुणावर,
नाहीतर निसर्ग कोपेल आपल्यावर !
जगदीश पटवर्धन
तुझ्या घरि आले विसंबूनी, तव प्रेमाचे पडतां बंधन
सात पाऊले टाकीत टाकीत, सोपविले तव हातीं जीवन
सरितेमध्ये नौका सोडली, वल्हविण्या तव हाती दिली
घेवूनी जा ती नदी किनारी, अथवा डुबूं दे ह्याच जळी
ऋणानुबंधाच्या ह्या गांठी, बांधल्या गेल्या पडतां भेटी
जन्मो जन्मीचा प्रवास सारा, पुनरपि चाले यौवन काठी
असेच जाऊ दोघे मिळूनी, कांही काळ तो एक होऊनी
काळाच्या त्या ओघामध्ये, हलके हलके जाय मिटूनी
गतजन्म तो स्मरे न कांही भविष्य काय ते माहित नाही
चालत असेल जोडी आपली, युगानुयुगे दोघे राही...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रदीप निफाडकरांची गझल
(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)
एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी ।। १
मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते ।। २
तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।। ३
कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने ।। ४
भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप काय असते ।। ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हवी कशाला चिंता आता
जिथे सावरणारी साथ आहे
रोज निरनिराळी आव्हाने
तुझे चैतन्य, सामर्थ्य आहे
जरी विरोध पावलोपावली
सत्यार्थी! मी निश्चिन्त आहे
आकांत जीवनी जरी माजला
तुझीच, कृपावंती साथ आहे
जपाव्या कोमलांगी भावनां
ती सुखाची फुलवात आहे
सांगा साध्य कोणते जीवनी
मूल्य मानवतेचे जपणे आहे
कसला, कुठला दुजा भाव
सत्य! क्षणभंगुर जीव आहे
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८२.
१५ - ३ - २०२२.
डोळियांमध्ये किती *तरंग*,
सुख-दु:खांची प्रतिबिंबे,
समाधान,तृप्ती,हर्ष,खेद,
आनंद,लोभ,लालस *उधाणे*,--!!
आत्मिक भावनांचे किती रंग,
प्रेम, भूतदया,शांती,अशी रुपे,
बोलकी उदाहरणे कित्येक,--! कधी मात्र असती *नि:स्संग*,--!!!
डोळे रडती, डोळे हसती, डोळ्यातूनच उमटे राग,
अस्वस्थता जिवाची *काहिली*, *घालमेल* कधी असते उगीच,--!!
कधी कामवासना उफाळे,
डोळे बोलती, माणसे राक्षस, बरसात करती *संजीवने*,
कधी सुखाची ओसंडत *रांस*,--!!!
डोळ्यांचे असते *विश्व* निराळे,
त्यात माणसांची *लकब* दिसे,
सत्ता, लालसा, पैसा, दर्शवती,
हक्क कर्तव्य अधिकार *सोहाळे*,-
©️ हिमगौरी कर्वे.
पहाटेच्या प्रसन्नमयी वातावरणात
चालताना तुझ्याशी घट्ट नातं जाणवतं..
तळ्याकाठीची ओल्या स्पर्शाची तुझी माया..
कितीतरी वेळ थिजून ठेवते...
आठवणीतल्या वाटेवर तू घेऊन जातेस अलगद..
बालपणी तुझ्याबरोबर तासनतास घालवलेला वेळ..
बोटा बोटात तुझं रूतून बसणं..
घरातल्यांच्या धाकाने तेच हात सदऱ्याला पुसणं..
कधी सगळ्या अंगभर तूच आणि मी पटांगणात खेळायचो..
तू पोटात बीज रूजवतेस म्हणून आम्ही भाकरी खातो..
म्हणून पहिल्या पावसाचा मनात अजून मृदूगंध वाहतो..
तू बोलावलेस म्हणून आपल्या माणसात येतो..
तू खरच फार मोलाची आहेस..
वीतभर का होईना पण आपल्या पायाखालची जमीन
आपलं अस्तित्व दाखवते..
तू फार खोलवर गेलेली.. मूळ जननी..
मातेच्या उदरात जन्माला येईल तो शेवटी तुझ्या उदरात
मिसळून जाईल..
हा नश्वर देह गळून पडला की गती मिळण्यासाठी माती
द्यायला येतील ती आपल्या मातीतील माणसं..
ॠणानुबंध मातीशी
शतदा घडावे..
मातीत मिसळून
जीवन कृतार्थ व्हावे..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
Copyright © 2025 | Marathisrushti