(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • ज्ञान देणारे सर्वच गुरू

    अवतीभोवती सारे तुझ्या,

    आहेत गुरू बसलेले,

    जाण तयांची येण्यासाठी,

    प्रभूसी मी विनविले ।।१।।

    निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,

    काही तरी असे गुण,

    आपणासची ज्ञान असावे,

    घेण्यास ते समजून ।।२।।

    उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,

    बघाल जेंव्हां शेजारी,

    काही ना काही ज्ञान मिळते,

    वस्तूच्या त्या गुणापरी ।।३।।

    सारे सजीव निर्जीव वस्तू,

    गुरू सारखे वाटावे,

    तेच आहेत ईश्वरमय,

    तुम्हीच ते समजावे ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • गीतात सुगंधा

    मनांतरीच्या भावनांना
    शब्दातुनी मी माळीतो
    अंतरातील गुज प्रीतीचे
    भावगीतात मी मांडितो

    स्पर्श! वात्सल्यप्रीतीचे
    स्वरगंगेसवे, गुणगुणतो
    गुणगुण आर्त भावनांची
    मी हृदयांतरी आळवितो

    गीता! ही प्रीतभावनांची
    श्वासासंगे, मी गुणगुणतो
    गीतात! नि:ष्पाप सुगंधा
    गंधाळ! जीवनी दरवळतो

    दिव्य! सुरम्य भावस्पर्ष
    प्रीतशब्दातूनी,ओघळतो
    लोचनी, तीच एक प्रीती
    मी, मलाच भुलूनी जातो

    कृपा ही त्याच दयघनाची
    मी तिला मनांतरी स्मरतो
    सदैव, हीच ओढ प्रीतीची
    माझ्या गीतातुनी मांडतो

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ५६

    २३ - २ - २०२२.

  • मनमंदिर….

    सावळा विठ्ठल माझ्या घरी आला.
    रखुमाबाई सवे गाभाऱ्यात विसावला...
    माझ्या माय बाईची पुण्याई फळा आली.
    जणु पंढरपूर अवघी माझ्या घरीच दुमदुमली...
    गोजिरे साजिरे ते रुप सुंदर मनोहर.
    पाहताच विसरून गेले हे भवसागर...
    तू आहेस अनाथांचा नाथ पंढरीनाथ.
    शरण आले तुला जोडोनिया दोन्ही हात..
    तुम्ही येता दोघेही घर झाले माझे पवित्र मंदिर.
    घरच नाही तर माझे मनही झाले पवित्र मंदिर..

    सौ कुमुद ढवळेकर

    (यंदा वारीला जातांना एका परिचितांना भेटायला गेलेल्या जवळ आम्हाला एक विठ्ठल रखुमाबाईची मूर्ती दिली आहे. आज एकादशीला ती देवघरात ठेवून पुजा केली आहे त्यामुळे मी जणू पंढरपुरात आहे असे वाटले होते.)

  • खोडकर कृष्ण

    किती रे खोड्या करिशी कृष्णा

    यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।

    झोपू दे रे तिजला आतां, ती तर गेली खूप दमूनी

    दही दुधांनी भांडी भरली,

    काही प्याली, काही वाटली,

    काही तर ती उपडी झाली,

    पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी...१,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी

    गणरायाचे पूजन करितां

    मग्न झाली यशोदा माता

    लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडतां

    फस्त करशी कांहीं मोदक, ताटामधले तूंच खाऊनी....२,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,

    गोपींच्या तूं फोडल्या घागरी,

    पळवी त्यांची वस्त्रे सारी,

    दुधा तुपाची केली चोरी,

    मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी...४

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,

    खोंड्या नच लीला बघूनी,

    प्रेमभावना उचंबळूनी

    जाई यशोदा ती बावरूनी

    डोळ्यामधले लपवून आश्रू, लटका राग दिसे शब्दानी...५,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • काहीही झालं तरीही….

    काहीही झालं तरीही....
    लोकलची गर्दी कमी होणार नाही....,.

    कितीही कायदा कडक केला तरी.....
    सरकारी कर्मचाऱ्यांच लाच घ्यायच कमी होणार नाही...

    कितीही जागृती अभियान राबवले तरीही...
    सुशिक्षितांचा मतदानाचा "आळस" कमी होणार नाही....

    प्रामाणिकपणे भरगच्च कर भरला तरीही ...,,
    सरकारकडुन करांचा छळ कमी होणार नाही...

    कितीही लांब जायच झाला तरीही.., .,,
    स्त्रियांच्या मेकअपची वेळ कमी होणार नाही..

    लग्न होऊन भरपुर वर्षे झाले तरीही....
    पत्नींशी खोट बोलायची सवय पतीची कमी होणार नाही...

    सत्ताधारींनी कितीही राज्यात विकास केला तरी.....
    विरोधकांचे जातीय राजकारण कमी होणार नाही..

    भारतीय आर्मीने मुस्लिम दहशतवाद्यांना ठेचुन कंठस्नास घातले तरीही.....
    पाकिस्तान दहशतवाद्यांच्या भारतातील कारवाया कमी होणार नाहीत.....

    R.T.O कडे रिक्षाचालकांच्या कितीही तक्रारी केल्या तरीही..
    या रिक्षाचालकांची मस्ती व मुजोरपणा कमी होणार नाही.....

    बघाना....
    आपले कितीही कामे अडली असले तरीसुद्धा ...
    सतत "अॉनलाईन" राहणे कमी होणार नाहीच...

    -- विवेक जोशी

  • बाह्य अडथळे

    एकाच दिशेने जातां,
    प्रभू मिळेल सत्वरी,
    रेंगाळत बसाल तर,
    गमवाल तो श्री हरी ।।१।।

    तुम्ही चालत असतां,
    अडथळे येती फार,
    चालण्यातील तुमचे,
    लक्ष ते विचलणार ।।२।।

    ऐष आरामी चमक,
    शरिराला सुखावते,
    प्रेम, लोभ, मोह, माया,
    मनाला ती आनंदते ।।३।।

    शरिराचा दाह करी,
    राग द्वेष अहंकार
    मन करण्या क्षीण,
    षड् रिपू हे विकार ।।४।।

    सुख असो वा ते दु:ख,
    बाह्यातील अडथळे
    सारेच सारता दूर,
    प्रभू तुम्हास मिळे ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सांग पावसा कुठेशी दडला ?

    माझी ही गीतरचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेली आहे तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे

    दुष्टकाळ रे म्हणती याला,
    सांग पावसा कुठेशी दडला ?!| ध्रु ||

    तुला गौरविले जीवनदाता,
    स्वतःच ठरला खोटा आता,
    कां रे डोळा असा उघडला ?
    सांग पावसा कुठेशी दडला ? || १ ||

    करीत होता मेघगर्जना,
    गङगङोनी भिववी जनांना,
    मुहूर्त टळला, तरीही अडला,
    सांग पावसा कुठेशी दडला ? || २ ||

    धाडधाड तू कोसळणारा,
    छप्पर ढगांचे फाङणारा,
    मेघराजा तो इतिहास घडला,
    सांग पावसा, कुठेशी दडला ? || ३ ||

    केली पेरणी, फळा न आली,
    उरली - सुरली आशा पळाली,
    बोल तुला रे, कुणी कोंडला ?
    सांग पावसा कुठेशी दडला ? || ४ ||

    अवर्षणाची अवकाळी ऐरण,
    गाई - गुरांना नाही वैरण,
    भयभीत होऊनी, जीवच उड़ला,
    सांग पावसा कुठेशी दडला ? || ५ ||

    मेघा धरणे कुणी भरावी ?
    वरुणा, करुणा, किती करावी ?
    भयसागरी या मानव बुडला,
    सांग पावसा कुठेशी दडला ? || ६ ||

    फसवे ढग हे अवती - भवती,
    हुलकाउनी ते तोंड फिरवती,
    पेच तुला कां, कसला पडला ?
    सांग पावसा कुठेशी दडला ? || ७ ||

    अवर्षणाने घडे उपोषण,
    उपोषणाने घडे कुपोषण,
    कुणास ठावे, दिस कसा पुढला ?
    सांग पावसा कुठेशी दडला ? || ८ ||

    जलातुनी रे जीव जन्मतो,
    जलाकारणे जीव पोसतो,
    हाय ! जलाविण तो तङफङला,
    सांग पावसा कुठेशी दडला ? || ९ ||

    आमिष तुजला नसे धनाचे,
    वचन हवे कां, संतुलनाचे,
    संकल्प आज मी झणी सोडला,
    सांग पावसा कुठेशी दडला ? || १० ||

    © रचना : उपेंद्र चिंचोरे

  • गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस

    आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी म्हणतात. यालाच 'वसुबारस ' असे नांव आहे.

    समुद्रमंथनातून पाच कामधेनू निर्माण झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स धेनूचे पूजन करतात. तिची प्रार्थना करतात. हे सर्वात्मिके आणि सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझी मनोकामना सफल कर. गोडधोड करून तिला खाऊ घालतात.

    उत्तर भारतात या व्रताला वछवाँछ असे म्हणतात.

  • ऋतूचे चक्र आणि मन

    कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
    हात-पाय गार, काटे अंगी येती
    नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
    वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा

    सुकूनची जाते, हिरवे रान
    शरिर राहते, घाम निथळून
    लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
    शोधण्या ढग, मन घेई धाव

    थांबवितो कामे, वादळी वारा,
    पर्जन्याचा मारा, पडताती गारा
    पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
    वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे

    आपल्या जे हातीं मन नसे त्यांत
    सुख त्यांच्यांत पाही, नसे जे हातात

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • खरी स्थिती

    मला नाही मान मला नाही अपमान,

    हेच तूं जाण तत्व जीवनाचे....१

    कुणी नाही सबळ कुणी नसे दुर्बल

    हा मनाचा खेळ तुमच्या असे....२

    कुणी नाही मोठा कुणी नसे छोटा

    प्रभूच्या ह्या वाटा सारख्याच असती....३

    विविधता दिसे ती कृत्रिम असे

    निसर्गाची नसे ती वस्तूस्थिती....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com